सरदार=> प्रश्न-उत्तरे

प्रश्न - सरदारजीला जर एखाद्या मासळीला मारायचे असेल तर तो तीला कसे मारेल?
उत्तर - पाण्यात डूबवून डूबवून...


प्रश्न - सरदारजीला जर तासन तास व्यस्त ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तर - एका कागदावर दोन्हीकडून ' प्लीज टर्न ओव्हर' असं लिहून त्याला वाचायला द्या...

स्वर्गात क्रिकेट आहे का?

दोन म्हातारे बऱ्याच वर्षापासून अगदी जिवलग मित्र होते. दोघांचही वय आता जवळपास 90च्या दरम्यान असेल जेव्हा त्यातील एक जण खुप आजारी पडला. त्याचा दुसरा मित्र त्याला रोज भेटायला येत असे आणि ते रोज आपल्या मैत्रीच्या गप्पा करीत असत. त्यांना आता जवळपास कल्पना आली होती की जो बिमार पडला आहे तो थोड्याच दिवसांचा साथीदार आहे. एक दिवस त्याच्या मित्राने मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राला म्हटले, '' बघ जेव्हा तू मरशील माझ्यासाठी एक काम करशील का?''

"कोणतं?" मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राने विचारले.

"तू मेल्यानंतर मला स्वर्गात क्रिकेट आहे का ते सांगशिल का?" दुसऱ्याने विचारले.

दोघंही क्रिकेट वेडे होते.

"का नाही जरुर सांगेन की" मृत्यूशय्येवर पडलेला मित्र म्हणाला.

आणि एकदोन दिवसातच तो बिमार पडलेला मित्र मरण पावला.

काही दिवसानंतर जो जिवंत म्हातारा मित्र होता त्याला झोपेत त्याच्या मेलेल्या मित्राचा आवाज एकू आला-

"तुझ्यासाठी माझ्याकडे दोन बातम्या आहेत... एक वाईट आणि एक चांगली... चांगली बातमी ही आहे की स्वर्गात क्रिकेट आहे ..."

"आणि वाईट बातमी?"

"आणि वाईट बातमी ही आहे की तुला येत्या बुधवारच्या मॅचमधे बॉलींग करायची आहे"

करोडपती....

निलेश- अरे मला जी मुलगी आवडत होती तिने माझ्याशी लग्न नाही केल रे ...
गौरव - अस का झालं ? पण तू सांगायचं ना कि तुझे काका करोडपती आहेत ते ...
निलेश - सांगितलं ना ... चालू निघाली रे ती, तिने काकाशीच लग्न केलं..

श्रीमंत योगी

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। 
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। 
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। 
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। 
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर । सावधपणे नृपवर तुच्छ केले।। 
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। 
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।। 
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला । कित्येकाला आश्रयो जाहला । शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

नदीच्या पलिकडे

संताला नदीच्या पलीकडे जायचं होतं पण कसं जावं त्याला काही कळत नव्हतं. तेवढ्यात त्याला नदीच्या पलिकडे बंता दिसला. संताने बंताला जोरात ओरडून विचारले, '' ए बंता... मी नदीच्या पलिकडे कसा येवू?''

बंताने नदीच्या आजुबाजुला चौफेर आपली नजर फिरवली आणि म्हणाला, ''अबे तु तर पलिकडेच आहेस ''

बदमाश वकील

प्रश्न - एका बदमाश वकिलात आणि घाणीने भरलेल्या बादलीत काय फरक आहे?

उत्तर - बादलीचा

पगारी नोकर

पगारी नोकराच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 - गरम

तारीख 11 ते तारीख 20 - नरम

तारीख 21 ते तारीख 30 - बेशरम

पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 - चंद्रमुखी

तारीख 11 ते तारीख 20 - सुर्यमुखी

तारीख 21 ते तारीख 30 - ज्वालामुखी

कस्टमची चोरी

एका सुंदर युवतीने प्लेनमध्ये प्रवास करतांना तिच्या शेजारी बसलेल्या स्वामीजीला विचारले,

'' स्वामीजी तुम्ही मला एक मदत कराल का ?''

'' जरुर... तुम्ही सांगा तर मी आपली काय मदत करु शकतो ?''

'' मी एक किमती इलेक्ट्रॉनीक हेअर ड्रायर विकत घेतलेला आहे... पण तो कस्टम लिमीटच्या वर जातो आहे... आणि मला काळजी वाटते की कस्टमवाले त्याला नक्कीच जब्त करणार ... तुम्ही त्या हेअर ड्रायरला आपल्या चोंग्यात लपवून नेवू शकता का?'' युवतीने विचारले.

'' मला तुम्हाला मदत करण्यात नक्कीच आनंद होईल... पण मी आधीच सांगुन ठेवतो की मी खोटं बोलणार नाही '' स्वामीजीने म्हटले.

'' स्वामीजी तुमच्या भोळ्या चेहऱ्यामुळे तुमच्यावर कुणीच शंका घेवू शकणार नाही... त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्नच कुठे उदभवतो. '' युवतीने म्हटले.

''ठिक आहे... जसी तुमची इच्छा. '' स्वामीजी तयार झाले.

जेव्हा प्लेन लॅंड झालं आणि सगळेजण कस्टममधून जावू लागले तेव्हा त्या युवतीने स्वामीजीला आपल्या आधी समोर जावू दिलं.

कस्टम ऑफीसरने प्रत्येक प्रवाशाला विचारतात तसं स्वामीजीला विचारलं,

'' स्वामीजी तुम्ही गैरकानुनी काही लपवून तर नेत नाही ना ?''

'' माझ्या डोक्यापासून कमरेपर्यंत मी गैरकानुनी काहीही लपविलेलं नाही आहे. '' स्वामीजीने म्हटले.

ऑफीसरला हे स्वामीजीचे उत्तर जरा विचित्रच वाटलं. म्हणून त्याने विचारले, '' आणि कमरेच्या खाली जमिनीपर्यंत आपण गैरकानुनी काही लपविलेलं तर नाही?''

'' हो एक छोटीसी सुंदर गोष्ट लपविलेली आहे... जिचा वापर स्त्रीया करतात... पण माझ्याजवळ जे आहे त्याचा वापर अजुनपर्यंत झालेला नाही आहे... '' स्वामीजींनी म्हटले.

ऑफीसर जोरात खळखळून हसायला लागला आणि म्हणाला, '' ठिक आहे स्वामीजी तुम्ही जावू शकता ... नेक्ट!''
जाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जावू शकतात... 

एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली.

हिप्नोटीझम

एका मोठ्या हॉलमध्ये हिप्नोटीझमचा प्रयोग चालला होता. प्रयोग बघण्यास आणि अनुभवण्यास लोकांनी हॉलमध्ये एकच गर्दी केली होती. हिप्नोटीस्टने स्टेजवर उभं राहून आता हिप्नोटीजमच्या प्रयोगास सुरवात केली. त्याने खिशातून एक चेन असलेलं घड्याळ काढलं आणि ते घड्याळ पेंडूलमप्रमाणे हलवित लोकांना म्हटलं, '' आता तुम्ही या घड्याळीकडे पहा''

जसं घड्याळ उजवीकडे - डावीकडे हलू लागलं त्या घड्याळीकडे पाहतांना लोकांची बुबुळं सुध्दा तशी उजवीकडे - डावीकडे हलू लागली. आणि थोड्याच वेळात लोकांना तंद्री लागुन लोक हिप्नोटाईझ झाले. आता हिप्नोटीस्ट जसा आदेश देत असे तसे लोक वागू लागले. त्याने 'नाचा' म्हटलं की लोक नाचू लागत. 'तुमच्या हातात सफरचंद आहे आणि ते तूम्ही खात आहे' म्हटलं की लोक त्यांच्या हातातलं काल्पनीक सफरचंद खाऊ लागत.

हे सगळे आदेश देता देता गडबडीत त्या हिप्नोटीस्ट च्या हातातून ते घड्याळ खाली पडून फुटलं आणि त्याच्या तोंडून निघालं, '' शिट''

तो हॉल पुर्णपणे साफ करण्यासाठी पुढचे पाच दिवस लागले.

बाप

दोन मनांतील अंतर

एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, ” आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?”. सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो.”
यावर साधुमहाराज म्हणाले, ” पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो”. यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले, ” जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात.”

“आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?” असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,” कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही…..

माननीय चोर

अवचित अश्या कातरवेळी कल्लोळ कानी आला
वलुनी पाहता मागे चोर लोकांच्या हाती लागला
"पाकिट चोरले पाकिट चोरले " एक माणुस ओरडत होता
जमावातिल प्रत्येकजन त्या चोराला बडवत होता
यछेद बडवून पोलिसांच्या ताब्यात देवून जो तो आपापल्या घरी परतला
मी ही मग घरी जावुन सारा प्रसंग वर्णिला
दिवस उलटले सारे प्रसंग धूसर झाले
सिग्नल वर आज मला पुन्हा "तोच" हो हो तोच "तो" दिसला
नकळत माझा हात पर्स सवारन्यास सरसावला
नजर मात्र वेगालेच दृश्य दाखवित होती
शुन्यात नजर लावून त्याची निरर्थक बडबड चालू होती
" बाळ गेला माझा बाळ गेला " पैशाअभावी औषधाला मुकला
प्रत्येक शब्द ह्रदय चिरत होता त्या बिचारयाच्या बडबडीला खुप कठोर अर्थ होता
काही क्षणासाठी त्याच्यात शिरलेला चोर सर्वाना दिसला
पण त्याच्यातील गरजवंत असा हतबल बाप मात्र कोणीच नाही पाहिला
खरच नियति नशीब यालाच का म्हणतात ?
एक पाकिट मारणारा चोर संबोधिला जातो
आणि लाखोंचे घोटाले करणारा मात्र माननीय संबोधिला जातो

अंधारात कसा चढणार डोंगर?

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती?

जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.

‘राम राम पाव्हनं का असं निजलात?’ म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.

शेतकरी म्हणाला, ‘‘राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.’’

म्हातारा हसला. म्हणाला, ‘‘अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?’’ ‘‘एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त
दिसतंय याच्या प्रकाशात.’’ तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.’’

म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

आजचा संकल्प : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.

माझी मायं

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्‍यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय




कवी - स. द. पाचपोळ, हिंगोली