तुझी आठवण

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास

मी जर राजा झालो

मी जर झालो एक दिवस
सारेजण हुकुम मानतील माझा
सर्वांना माझा एवढा वाटेल धाक
ऐकतील निमूट मुठीत धरून नाक!

आईला म्हणेन, जेवण नको वाढू
उघड सारे दबे, काढ चिवडा-लाडू!

ताईला म्हणेन, आरशात नको पाहू
उटसूट सिनेमातली गाणी नको गाऊ!

दादाला म्हणेन, घोळवीत शीळ
मिशीला उगीच भारू नको पीळ!

बाबांना म्हणेन, बाजारात जाउन
माझ्यासाठी छानसा स्कूटर या घेउन!

मुलांना म्हणेन तुम्ही पतंग उडवा
गुरूजींना म्हणेन, तुम्ही गणित सोडवा!

मी जर झालो एक दिवस राजा
खरे सांग बारे, किती येइल मजा!

- शांता शेळके

तो एक बाप असतो…

शाळेपासून बापाच्या धाकात तो राहात असतो,
कमी मार्क पडलेलं प्रगतीपुस्तक लपवत असतो.
आईच्या पाठी लपून, तो बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, तो हुंदडायला जात असतो.

शाळा संपते पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भूलभुलैयात, मन हरखून जात असतं.
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं.

सुरु होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्ष पुढे सरत जातात.
ग्रुप जमतो दोस्ती होते, मारामार्या दणाणतात,
"माझा बाप ठावूक नाही"! म्हणत धमक्या गाजत असतात.

परीक्षा संपते अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या,
नोकरी मिळवत नोकरी टिकवत कमावू लागतो चार दिडक्या.
आरामात पसरणारे बाजीराव, मग घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात मग नेमाने मोहिमा काढू लागतात.

नोकरी जमते छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात.
दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्याकोर्या बापाला मग मात्र, जुन्याचं मन कळू लागतं.

नवा कोरा बाप मग पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबांच्या कायेत शिरतो.
पोराशी खेळता-खेळता दोघेही जातात भूतकाळात,
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान.

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅशबॅक,
बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ.
लेकरासाठी मग त्याला कळवळणाराबाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो.

कडकपाणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या, झगडणारं हाड असतं.
दोन घास कमी खाईल, पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या, ओव्हरटाईम तो मारत असतो.

डोक्यावरती उन झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो.
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो.

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही, नि बाप कधी मातत नाही.
पोरं सोडतात घरटं अन्, शोधू लागतात क्षितिजं नवी,
बाप मात्र धरून बसतो घरट्याची प्रत्येक काडी.

पोरांच्या याशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना ते आतून रडत असतं.
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो.
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो.

सारी कथा समजायला फार मोठं वहावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं.
आकाशाहून भव्य अन्, सागराची खोली असते,
'बाप' या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते.

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बाप माणूस असतो तो, बापाशिवाय कसं कळणार.
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही.

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा, बाप काही छोटा नाही.
सोनचाफ्याचं फुल ते, सुगंध कुपीत मावणार नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग काही लागत नाही.

केला खरा आज गुन्हा, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढं सांगितलं, आधार आमच्या असण्याचा.
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आई मार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही.

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
पृथ्वी तोलून धरण्यासाठी शेशाचाच लागतो फणा.
बाप नावाच्या पारिजातकाचं, असाच काहीसं जीणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं.

शाळा. . .

शेजारील पिंटुचे,काल मला दप्तर दिसले.
नकळत माझे मन मग,बालपणात गेले!

आठवले सर्वकाही,आठवली ती शाळा.
आठवला तो सुविचार लिहलेला,सुंदरसा फळा!

आठवला तो गणवेश,आठवली ती सॅक.
गळ्यात अडकवलेली,छोटीशी वॉटरबॅग!

आठवली ती प्रार्थना,आठवले ते जनगणमन.
सरळ रांगेत उभे राहण्याची,चाललेली चणचण!

पहिल्या बाकासाठी,झालेला मित्रांशी तंटा.
आठवली ती घणघणारी,मोठी पितळी घंटा!

आठवले ते दिलेले रोज,आईने आठ आणे.
मधल्या सुटटीतल्या खाऊसाठी,चिँच आणि चणे!

आठवला सरांचा तो,पाठीवरचा मारा.
आठवला वहीवरचा तो,लाल अपुर्ण शेरा!

आठवले ते शाळेसमोरील,मैदान स्वरुपी अंगण.
डब्बा खाण्यासाठी केलेले,सवंगड्यांचे रिँगण!

आठवले ते मैदान,आणि PE चा तो तास
फुटबॉल आणि क्रिकेटचा वेगळाच उल्हास!

आठवतात ते पाढे,आणि आठवते ती परिक्षा
कमी मिळाले गुण म्हणुन,केलेली शिक्षा!

आठवतात ते गुरुजी आणि त्या बाई.
मित्रासोबत शाळेत जाण्याची,केविलवाणी घाई!

अशी माझी शाळा,मला बालपणात नेते.
तिच्या आठवणिने डोळ्यात पाणि ठेऊन जाते!

दिलेस तर देवा,एकच वरदान दे मला,
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला..
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला..... .

नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....


कवी - संदीप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे

गूगलबाई

मित्र : अरे, वहिनींचं नाव तरी सांग? 

 गंपू : गूगलबाई. 

 मित्र : क्काय? 

 गंपू : हो ना! एक प्रश्न विचारला, तर दहा उत्तरं देते!

समजण्यात चूक

न वरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं.


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं?


बायको : नाही तर काय?


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो.

काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे

सहनशिलतेचा येथे संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचा सरंजाम आहे

गवताची पाती सजली भयाण राती
काजव्यांचा सूर्यास जणू शाप आहे

शुरतेचे निशान फडकते रणांगणी
पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे

यल्गाराचा दबला आवाज येथे
उगाच खोट्यांचाच चित्कार आहे

जरी आज भयाण शांतता इथे
येणार उद्या मोठ वादळ आहे

ते एक वडील असतात...

ते एक वडील असतात...



आई प्रेमाची नदी तर, वडील सागर असतात
खारट पाणी असूनसुद्धा ,सर्वाना समावून घेत असतात
घरातल्या सर्वांवर त्यांची, करडी नजर असते
मुले घरी वेळेवर नसली तर, गच्चीतच त्याची मूर्ती उभी असते
पोरांनी खूप मोठे झालेले पाहणे, हे त्याचे स्वप्न असते
त्यासाठी घरदार सोडून पळण, त्याच्या जिवालाच माहिती असते
नसेल प्रेम दाखवत तरी ,आतून वाहता झरा असतात
पोर जेवली का विचारल्याश िवाय,ते ताटाला हात लावत नसतात
शाळा कॉलेज च्या प्रवेशासाठ ी, घाम टिपत रांगेत तेच उभ असतात
पैशाची जमवाजमव करत, तुटकी चप्पल पुन्हापुन् हा शिवत असतात
पोरग शाळेत जाऊ लागले कि, त्यालासायकल हवी असते
थोडी वरची पायरी चढल्यावर, त्याला बाइक नवी लागते
वडील आपल अजूनही ,बसच्या मागे पळत असतात
पोर नोकरीला लागल्यावर, आता चार चाकीच घेईन म्हणतात
मुलांची लग्न झाल्यावर, स्वेच्छा निवृत्ती घेईन म्हणतात
मुले नातवंडे परदेशी गेल्यावर रिकाम्या घरात, नोकरीला गेलेलेचबरे म्हणतात
चारचौघात कोडकौतुक करणार, ते एक वडील असतात
आई समईतील ज्योत, तर जळणारी फुलवात वडील असतात.♥

इंग्लिश कुत्रा

एकदा बंड्या इंग्लिश केसाल कुत्र्याला घेवून फिरायला जातो.
शेजारच्या काकू:-किती गोड कुत्रा आहे हा.. (असे म्हणून पटापट त्याच्या मुका घेवू लागतात...) बंड्या = अहो काकू ऐकून तरी घ्या.
काकू = अरे थांब मला याच्या खूप पाप्या घेऊ दे खूप गोड कुत्रा आहे.
(जरा वेळाने पापी घेऊन झाल्यावर....)
काकू = आता बोल.
बंड्या = अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे

एक झाड कमरेमध्ये वाकलेल.........

एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता-मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय…
चुकल काय…चुकल काय
मुळात चुकल काय…पाह्यला झुकलेल

एक मासा पाण्यामुळे पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला
रडता येत नाही…
येत नाही..येत नाही…
रडता येत नाही…म्हणून चिडलेला

एक आभाळ उंच उंच टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मान…खूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल

एक शून्य काना कोपरा नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल
वेड्या सारख
वेड्या सारख…वेड्या सारख
शून्यात बघत हसलेल

एक मी सार सार बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…सार्‍यात माझे पाहणारा

एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा

सासु-सुनेची मागणी

सासुची मागणी :-
१) मुलगी सुन्दर हवी.
२) श्रीमंत हवी.
३) शिकलेली हवी.
४) कमी वयाची हवी.
५) जरी तिला बोलले रागावले
तरी ती नेहमी हसतमुख हवी.
६) ........
७) ......
लिस्ट खुप मोठी आहे.........
सुनेची फ़क्त एकाच मागणी :-
.
.
.
.
.
.
.
.
.
सासु फ़क्त फोटो मधे हवी.

राम - कृष्णाचे जन्मस्थान

एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले -

" आपण कुठे चालला आहात ?"

प्रवासी - " जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे "

टीसी - " आपलं तिकिट दाखवा "

प्रवासी - "टिकिट तर नाही आहे"

टीटी - "तर चला माझ्या सोबत "

मुसाफिर - "कुठे ?"

टीटी - "जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे"

चॅटिंग करताना सावधान

चिंगी एका अनोळखी व्यक्ती बरोबर चॅटिंग करताणा

चिंगी : हाय हॅण्ड सम

अनोळखी व्यक्ती : हाय,

चिंगी : मस्त प्रो.पिक आहे, छान दिसतोस, एकदम रापचिक,
शर्ट कुठे घेतलास

अनोळखी व्यक्ती : बाजारातून

चिंगी :तू काय करतोस,

अनोळखी व्यक्ती : मी आंध्रा बँकेत काम करतो

चिंगी :हो का,मस्त, माझे बाबा पण त्याच बँकेत काम करतात

अनोळखी व्यक्ती : काय नाव त्यांचे

चिंगी : विजय कावळे

अनोळखी व्यक्ती( विजय कावळे) :

कार्टे, क्लासला जातेस म्हणून गेलिस ना ?
इथे काय करतेय, घरी ये, बघतोच तुझ्याकडे
नव्या वर्षाची भेट

फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल

एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा

500 जीबी मेमरी

320 मेगापिक्सल कॅमेरा

शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये
2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.
प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’

‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’
गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.

ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.

शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.

रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.

कसे सरतील साये

वेड लागणार नाही तर काय?

देशी दारुचे दुकान आणि आध्यात्मिक साक्षात्कार

कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं.....
नव्हत्याचं... मुळीच नव्हतं होतं.
ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद होताना पाहिलय. आजपर्यंत ह्या कुतुहलापायी मी कित्येकदा मार खाता खाता राहिलोय..... (........आणि कित्येकदा खाल्लायही !!)
लहानपणी ट्रॅफीक पोलीसाची शिट्टी वाजवल्यावर काय होतं... कसं वाटतं ? ह्याचं कुतुहल असायचं. मग एकदा हळुच त्याचं लक्ष नसताना वाजवुन पाहिली. प्यायच्या पाण्याच्या पिंपात सोडलेले मासे नळातुन बाहेर येतात का ते पाहिलं. (येतात... विशेषतः जर वडलांनी ग्लास धरला असेल तर... येतातच.) दिवसातले २८ तास अभ्यास करायला लावणा-या हेड्मास्तरांची मुलगी रविवारी काय करते हे तिला पत्रातुन विचारुन पाहिलं. (त्याचं उत्तर परिक्षेच्या पेपरवर मिळालं.) १२०-३०० तंबाखुचं पान खाउन गिळुन पाहिलं, एकच वेळेला बिडी, सिगारेट आणि सिगार ओढली तर काय होईल...(नको.. नको त्या आठवणी...) हे पाहिलं. भावांची माहिती न काढताच मुलींना त्यांची माहिती विचारुन पाहिली. सर्कशीसाठी आणुन ठेवलेल्या अस्वलाच्या पिंज-याचा दरवाजा...... असो....
.........पण ह्या प्रत्येक वेळेला मार खाता खाता राहिलो. (मार खाल्लेली कुतहलं इथे लिहणे इष्ट नाही, हे सुज्ञांना कळाले असेलच.) तेंव्हापासुन मनातलं कुतुहल दाबुन मी नाकासमोर चालत आलोय.... अगदी परवा परवा पर्यंत !
पण परवा मी पडलोच. परवा कुतुहलानी मला गाठलंच... मोह आड आलाच..... पाऊल वाकडं पडलंच.... माझ्या घरी येण्याच्या वाटेवर मला दोन अशी मोहाची दोन वळणं येतात. ज्या वळणांवर वळुन त्या वाटेवर हरवुन जावंसं वाटायचं...
एक म्हणजे....
रामदासस्वामींचा मठ ! (नाही... नाही.... हे ते रामदासस्वामी नाही... हे स्वामी म्हणजे रा. म. दासस्वामी. रामय्या मलिंगप्पा दासस्वामी. मागच्याच्या मागच्या जन्मी ते सुखाराम महाराजांच्या कोणाचेतरी कोणतरी होते म्हणे.... म्हणे म्हणजे तिथं गेल्यावर असे लोक म्हणाले. असो). ह्या मठात एकदा तरी नक्की काय होतं हे मला पाहायचंच होतं.
आणि दुसरं मोहाच वळण म्हणजे...
देशी दारुचे दुकान... दुकान म्हणजे फक्त देवाण नाही... घेवाण सुद्धा... म्हणजे देशी दारुचा गुत्ता !
तर मी काय सांगत होतो.... परवा माझं पाऊल वाकडं पडलंच....

त्या पहिल्या वळणावरच्या मठात घाबरत घाबरत मी आत गेलो. एकट्यानीच कुठे अनोळखी ठिकाणी जायला भिती वाटते हो.... आत गेलो आणि बघतो तर ही गर्दी... घाबरलोच. माझ्यासारखेच अनंत भक्तगण तिथे एकमेकांवर उच्छ्वास सोडत उभे होते. आत जाताच एका माणसानी मला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं.

तिकडे गायीच्या तोंडाचा एक दगडी नळ होता. मला वाटलं की गरम पाण्याचं जिवंत कुंड असेल. तिथं खाली तर ग्रीन मार्बल बघुन वाटलं की इथे बहुतेक शेवाळे महराजांनी जिवंत समाधी घेतली असेल. त्या संगमरवरावर पाय ठेवतो तर काय.... ज्ञानेश्वरांच्या भिंतीसारखं आपोआप, पाऊल न उचलता त्या नळापर्यंत पोहचलो. पण तिथं आपोआप न थांबता एकदम त्या नळावरच्या गायीच्या शिंगावर आपटलोच. कपाळावर टेंगुळ आलं. मग कळालं की ग्रीन मार्बल वगैरे काही नाही तिथे शेवाळं साठलय. मला टेंगुळाचा प्रसाद देणा-या त्या हलकट माणसाला मी शोधायला लागलो. पण तो केंव्हाच त्या अनंतात विलीन झाला होता. मग मी ही पुढच्या येणा-या माणसाला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं आणि प्रसाद पुढे वाटला. एका पायात ती हिरवी स्लीपर आणि दुस-या पायावर ती मेंदी घेऊन मी रांगेत उभं राहिलो.

"स्वामींना अस्वच्छेतेची खुप चीड ! " अशी बहुमुल्य माहिती मला एका भक्तानी पुरवली. भक्तांच्या पदकमलांनी तिथे हिरवे हिरवे गार गालीचे असे साठत असतील तर कुणालाही चीड येईल.
"हि जागृत वास्तु आहे आणि तुम्हाला इथे ओम सतत जाणवत राहतो." हि दुसरी माहिती मिळते न मिळते तोच एक माणुस गंध घेऊन आला. त्याच्या हातात ओमच्या आकाराचा एक आकडा होता, जो गंधात बुडवुन तो लोकांच्या कपाळावर लावत होता. ते गंध त्यानी इतक्या जोरात माझ्या कपाळावरच्या टेंगळावर लावलं की मला वाटतं ते मागुन पण दिसलं असेल. पण एक खरं झालं की तो ओम मला सतत जाणवत राहिला.
लोक मुर्ख असतात हो.... काय वाट्टेल ते करतात हो. कधी त्यांच अनुकरण करु नये. तिथं एका समाधीबाहेरची साखळी घेऊन लोक कपाळावर लावत होते, डोळ्यांना लावत होते, डोक्यावरुन फिरवत होते. मी पण एका सामाधीबाहेरची साखळी घेऊन कपाळावर लावली आणि सोडुन दिली. ती त्या समाधीवरच्या दरवाज्यावर आपटली. आणि तो दरवाजा च्क्क उघडला गेला. पाहातो तर काय...
चमत्कार !!

त्या जागृत समाधीतुन एक जिवंत बाई..... साध्वीच असणार कोणतरी ! "कोन पायजे ?" हे इतक्या भसाड्या आवाजात तिनी मला विचारलं की माझी तंद्री भंग पावली. मग तिथे मठाचा रखवालदार राहतो आणि ती त्याची बायको आहे ही अजुन एक बहुमुल्य माहिती मिळाली.
मिळेल तिथले अंगारे घेऊन लोक भरुन घेत होते, उदबत्त्या हुंगत होते, भंडारा उधळत होते, कुंकु कपाळावर लावत होते. मी पण तिथल्या एका भिंतीवरचं कुंकु कपाळावर लावलं.

लोकं काय असभ्य, बेशिस्त, असंस्कृत, बेजवाबदार, अशिक्षित, बेअक्क्ल आणि आर्वाच्य असतात हो. एक तर मठात येतानाही गुटखा वगैरे खाउन येतात आणि वर कुठही थुंकतात. ते कपाळावर लावलेलं थुंकु... माफ करा... कुंकु धुवायला मी पुन्हा शेवाळे महाराजांकडे गेलो. मग दुस-याही पायावर मेंदी काढुन घेऊन मी पुन्हा रांगेत आणि मग पुन्हा तो कपाळावर ओम कोरण्याचा कार्यक्रम झाला.
तिथं इतकी गर्दी होती की त्या रांगेत घामाघुम झालो. लोक एकमेकांना अगदी चिकटुन चिटकुन उभी होती. घाम आला म्हणुन रुमाल काढायला खिशात हात घातला तर हातात चुन्याची डबीच आली. कुणाच्या खिशात हात घातला होता कुणास ठाऊक ! मग पुन्हा तिथं ठेवायला गेलो तर तिथं आधिच एक डबी होती. मला काय समजायचं ते समजलं. मी गपचुप ती डबी खाली टाकली. ती तिस-याच भक्ताच्या पायावर पडली. त्याला वाटली त्याचीच.

(इथे सगळे भक्तांकडे जोरदार त्रिसुत्री होती. हातात फुलांचा हार, कपाळावर घामाची धार आणि तोंडात तंबाखुचा बार... )
तर त्याला वाटलं की त्याचीच डबी म्हणुन तो मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. त्या मागच्याला वाटलं की तो पहिला नमस्कारालाच वाकलाय. देवाचंच काहितरी म्हणुन तो ही त्याच्या मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. लोकं माकड असतात. कशाला कुणाचं अनुकरण करायच.. ! पण नाही.... मग त्या माणसाच्या मागचा वाकला, मग त्याच्या मागचा.... असं करत करत शेवटचा माणुस एकदम बाहेरच ढकलला गेला. मग तिथं छोटीशी झटापट झाली. त्या गोंधळाचा फायदा घेउन मी हळुच स्वामींच्या खोलीत शिरलो.
आत गेल्यावर रा. म. दासस्वामींचं दर्शन झालं. फॅन्सीड्रेस स्पर्धेत अफजलखानसारखं दिसणा-या कुणी जर सुखाराम महाराजांचा ड्रेस घातला तर कसं दिसेल तसे ते दिसत होते. डोळे मिटुन ते रामदासस्वामी (स्वतःच्याच) मनाचे श्लोक म्हणत होते. मध्ये त्यांनी डोळे उघडले आणि सुखाराममहाराजांचा अभंग वाचला....

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे
सुखा म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला
हा अभंग त्यांनी तिथं का म्हंटला ते काही कळालं नाही. त्यांना नमस्कार करुन बाहेर पडावं असा विचार करुन मी नतमस्तक होणारच होतो. पण त्याआधिच स्वामींच्या एका शिष्यानी माझं मुंडकं पकडुन त्यांच्या पायाशीच इतक्या जोरात आपटलं की तो कपाळावर कोरलेला ओमसुद्धा खाली पडला. आणि ओम पुन्हा त्या वास्तुतच राहिला.
नुसता ओम पडला असता तर काही वाटल नसतं, पण त्या ओम बरोबराच माझ्य खिशातुन शंभराची एक नोट पडली हो...! ती महाराजांनी उचलुन लगेच खिशात घातली आणि एकदम जोरात ओरडले, " विचार वत्सा, विचार एक प्रश्न "
" ती माझी पडलेली नोट परत मिळेल का ?" असं मला विचारायचं होतं पण त्या शिष्याचा हात अजुनही माझ्या मानेवरच होता. खाजगी प्रश्न त्या गर्दीत विचारणं शक्यच नव्हतं म्हणुन काहितरी विचारायच म्हणुन मी विचारलं की आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या अभंगाचा अर्थ कळेल का ? तर स्वामी म्हणाले की, " आत्मनंदात आत्मवंचना झालेल्या आत्म्याला आत्मचिंतीत आत्ममननाची जोड दिली तर आत्मपरिक्षणानंतर जन्मणा-या आत्मविवेचनातच आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार आत्म्याला होतो. "
मी त्या शंभर रुपायाच अखेरचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो ते पुन्हा कधी कुतुहलाच्या वाटेला जायचं नाही हे ठरवनुच.... !
पण अनुभवाच्या वळणावर सडकुन आपटुन शहाणा झाला तर तो माणुस कसला ! ते देशी दारुचं दुकान मला बोलावत राहिलं आणि एक दिवस मी दुस-या वळणावर वळालोच. आणि ज्या अभंगाचा अर्थ मला त्या मठात कळला नव्हता तो मला त्या गुत्त्यात कळाला.
त्याचं असं झालं............
मला नेहमी रस्त्यावरुन जाताना तो दारुचा गुत्ता दिसायचा. जाता जाता काही क्षणांसाठी त्या गुत्त्याच्या दरवाज्यावरचा पडदा हलायचा आणि आत दिसायचे सगळे तृप्त चेहरे... समाधानाने ओथंबलेले... सुखाने डोळे काठोकाठ भरलेले.... पराकोटीच्या आनंदात रममाण.... शांत, प्रसन्न, उत्साही जीव... ध्यानमग्न.... आत्मतल्लीन..... पुण्यात्मेच !!
का नाही वाटणार हेवा...? का नाही होणार मोह....? का नाही वळणार पाऊल तिकडं... ? वळालंच एकदा....
गाडी थोडी लांबच लावली आणि चालत चालत त्या ध्यानमंदीराकडे निघालो. कुणी ओळखु नये म्हणुन तोंडावर रुमाल बांधला. छातीत जाम धडधड होत होती पण कुतुहलही तितकच होतं. कच खाऊन मागे वळणार तितक्यात पुन्हा पडदा हलला आणि पुन्हा त्या चेह-यांच दर्शन... मग दारात जाऊन उभं राहिलो.
तुम्हाला खोटं वाटेल पण, दारात दोन बायका दोन बाजुला स्वागताला उभ्या होत्या. ते भरतनाट्यम का कथ्थकला नेसतात तश्या जरीच्या साड्या नेसुन... दोघींच्या लांबसडक वेण्या, अगदी कंबरेपर्यंत.... त्यावर वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या, चमक्या, वेगवेगळ्या रंगांचे मणी आणि गजरे.... डोळ्यात नीळं काजळ आणि गालावर (आपल्याकडे शाळेत स्नेहसंमेलनात लावतात तसं) गुलाबी रुज का काय ते.... हातात ('त्या लमाणी आहेत काय' असा संशय यावा इतक्या) बांगड्या... पायात जाडजुड पैंजण (त्याला घुंगरु आहेत की घंटा हे मी बराच वेळ पाहत राहिलो पण कळालं नाही).... एकीच्या हातात आरतीची थाळी आणि दुसरी 'प्रभात चित्र'वाल्या बाईसारखी एक पाय मागे दुमडुन फुलं टाकयासाठी तयार....
पडद्यावर पण काय छान छान चित्र असतात ना....!

मग त्या स्वागतानं गहिवरुन गेलेलो मी आत गेलो. आणि आतलं वर्णन काय सांगु महाराजा... ? तिथं जनसागरच लोटला होता. प्रंचंड गर्दी पण गोंधळ अजिबात नाही. सगळ शिस्तबद्ध.... ४ माणसं रांगेत होती... ७ रांगत होती.... ६ वेगवेगळ्या दिशेला तोंड करुन, पायांचे एकमेकांशी विविध कोन करुन बसली होती (हि बसलेली माणसं कुणाशी तरे बोलत होती पण बहुतेकांच्या समोर दुस-याचे पाय, पाठ किंवा भिंत होती. केवढी मानसीक ताकद पहा... कुणी असो नसो फरक पडुन द्यायचा नाही. नाहीतर आपण...)

....आणि सुमारे ११ माणसं अस्ताव्यस्त पडलेली होती...(सुमारे असं म्हणण्याचं कारण की नीट मोजता नाही आली. कोण कुणाच्या वर आहे, कुणाचं अंग कुठलं आहे आणि डोकं कुठंलं आहे काही कळत नव्हतं. मग हात आणि पाय मोजुन पाहिले तर हात २३ भरले आणि पाय २१... म्हणुन सरासरी ११. अर्थात खुप खालची खालची माणसं नाही मोजली. कारण ती मोजताना वेळ जात होता आणि तोपर्यंत रांगत असलेली माणसं पडत असल्यामुळे घोळ व्हायला लागला.)

हसु नकात.... भल्याभल्यांना जमणार नाहीत अशी योगासनं करणारे हे योगी....., (हो मग... योगीच ते... नाहीतर जमिनीवर बसुन, एक पाय स्वतःच्याच गळ्यात, दुसरा पाय समोरच्या बाकड्यावर, त्या पायावर एक योगी-बंधु, मांडीवर एक योगी-बंधु, एका हाताने भिंतीचा आधार घेतलेला आणि दुसरा हात सापडत नाहीये...अशा अवस्थेत मान खाली खाली नेऊन तोंडानी जमिनीवरचा ग्लास उचलायचा... ह्यासाठी कमीतकमी १३८ योगासनं माहित हवीत.)
तर हे सगळे हटयोगी, दिसत असले जरी जमिनीवर, तरी होते सगळे तरंगत. इतक्यात एका महात्म्याने मला टेबल समजुन, (मी आहे थोडा बुटका, त्यात त्याची काय चुक) माझ्या डोक्यावर ठेवलेला ग्लास माझ्यावर अमृताचा वर्षाव करुन गेला आणि मी चिंब भिजलो. आनंदाच्या लाटांवर लाटा उसळत होत्या आणि त्या आनंद-डोहात सगळे चिंब भिजले होते. सगळय़ांच्याच अंगात आनंद इतकाच ओसंडत होता की तुझं अंग, माझं अंग असा फरकच राहिला नव्हता. ह्या वातावरणात मी गहिवरुन गेलो आणि नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
कुठे ते दासस्वामी, जे डझनभर शब्द घेऊन सुद्धा मला काहिच समजावु शकले नाहीत. आणि कुठे ही मंडळी, ज्यांनी न बोलताच मला पहिला श्लोक समजावुनही दिला.
माझ्याही नकळत मी रांगेत उभा राहिलो आणि कधी एकदा माझा नंबर येईल ह्याची वाट पाहायला लागलो. मी असं ऐकलं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर सुंदर गोष्टी घडतातच पण ब-याचदा खुप उशिरा. इथे नाही झालं असं... लगेच आला नंबर माझा...

काय आपण उगाच रडतो की महागाई... महागाई... ! इथे १ ग्लास ८ रुपायाला... ५ ग्लासवर २ ग्लास फ्री आणि ७ ग्लास घेतले तर तो ग्लास पण फ़्री... ! मंथली मेंबर्सना चकणा फ़्री... ! लाईफ मेंबर्सना पिक-अप आणि ड्रॉप फ्री... ! नुसता सेल लागला होता तिथं.
मी एक ग्लास घेतला आणि ओठापर्यंत आणला. जवळपास एखादा उंदीर मरुन पडला असणार नाहीतर एवढ्या सुंदर द्रवाचा वास असा येणंच शक्य नाही. मी तो ग्लास कसाबसा ओठाला लावला आणि नेमकं तेंव्हाच २-३ जणांच्या खाली गाडला गेलेला कोणतरी एक फिनीक्स पुन्हा भरारी घ्यायला उठला. मग त्याचा एक जोरदार धक्का मला आणि एका घोटात सगळं कुतुहल पोटात.
....उगाच त्या २६ व्या मजल्यावरुन खाली पडायला नको म्हणुन मी रांगत रांगत एका भिंतीच्या कडेला जाऊन बसलो. आणि मग भास व्हायला लागले किंवा.... किंवा भासही असतील.... नाहीतरी निघायचे भासच ! पण काही का असेना माझ्या कानातली ती भीकबाळी मला टोचायला लागली... डोक्यावरच्या त्या पगडीवरचे मोती कपाळावर आपटायला लागले... हातातलं गुलाबाचं फुल सापडेनाच... मस्तानी मात्र नाचता नाचता मध्येच तिरका डोळा का तिरकी मान असं काहीतरी करुन हसत होती.... मध्येच त्या पाणगेंड्याशी माझी कुस्ती झाली नसती तर मगरीला लोळावलाच असता मी... पण मला एक अजुन कळालं नाहीये की माझा रणगाडा कुणी चोरला....

हळुहळु जरा चढायला लागली आणि मग एकेक दुःख बाहेर पडायला लागली. आणि मी माझ्या बाबतीत आजपर्यंत जे काहिचियाबाही झाल होतं आणि मला आवड नसतानाही त्या अग्निपथावर मी कसा पुढे चालत राहिलो हे त्या भिंतीला सांगितलं. मग भिंत झाली म्हणुन काय झालं... भिंतीलाही कान असतात.
खुप हलकं वाटलं... मोकळं वाटलं... अगदी पिसासारखं... आणि मग मी पुढं पुढं जायला लागलो... अगदी आवडीनं... कसलाही आकस नाही, दुःख नाही... तक्रार नाही.... आता मला सुखाराममहराजांचा श्लोक उमजला.
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
जोपर्यंत आपल्या मनातुन आयुष्यात घडलेलं ते काहिचियाबाही आपण कुणाला सांगत नाही तोपर्यंत पुढे आवडीनं नाही चालता येत.
....आणि आपण मुर्ख लोक त्या दारु पिउन बडबडणा-या माणसांना हसतो, जे खर तर समाधानानी चालत असतात... आवडीनं चालत असतात.
आपण... (म्हणजे तुम्ही... स्वतःला शहाणे म्हणवणारे,) नसाल एकटचं बडबडत पण आयुष्याची पाऊलवाट रडत रडत, रखडत रखडत चालता हे लक्षात ठेवा....)
आयुष्याला सामोर जायची लोकांची ती जिद्द पाहिली आणि चेह-यावरचा तो रुमाल नावाचा मुखवटा गळुन पडला. आणि मी आपोआप आवडीने पुढे चालायला लागलो. सुरवातीला दोन पावलं टाकायला पण त्रास झाला मग दोन ग्लास टाकल्यावर हवं तिथं तरंगतच जायला लागलो. आणि मग सुख-दुःख, समाधान-तक्रार, वेडा-शहाणा, जमिन-आकाश, जन्म-मृत्यु असा काही फरकच राहिला नाही.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात तेच खरं....
तुम्ही काय आणलय जे हरवेल ? जे घेतलत इथुनच घेतलंत.... जे दिलंत इथेच दिलंत.... (ह्याचा अर्थ दारु इथेच पिऊन ती पुन्हा ओकुन इथेच देणे असा घेऊ नये. ह्यातला गर्भित अर्थ ग्लासमध्ये घ्यावा.)
खरं सांगायचं तर जीव जेंव्हा गर्भात असतो तेंव्हाच सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला काय हवय ते त्या गर्भाला बरोबर कळतं आणि ते शोधत तो इच्छित स्थळी पोहचतोही. शेवटी माता एक निमित्त आहे. एक माया आहे. डोहाळे हा एक भास आहे. खरा जिव्हाळा असतो त्या समाधीत... त्या मोक्षात.... आत्म्याच्या प्रतिबिंबात....
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे

.............आणि शेवटाच्या कड्व्याचं म्हणाल तर त्यात मुद्रणदोष आहे. त्या कडव्यातलं पहिल वाक्य ' सुखा म्हणे तैसा ओतलासे ठसा' असे नसुन, तो श्लोक ’सुखा म्हणे घसा ओतलासे ठर्रा' असा आहे. ठर्रा म्हणजे मदिरा. तर सुखाराम महाराज म्हणतात,
सुखा म्हणे घसा ओतलासे ठर्रा
अनुभव सरिसा मुखा आला
म्हणजे.... नुसत्या तोंडाला येणा-या वासावरुन दारुचा अनुभव नाही घेता येत, त्यासाठी दारु घश्यातच ओतावी लागते. एकदा का तुम्ही ठर्रा घशात ओतला की अनुभव तुमच्या मुखा आलाच म्हणुन समजा. काय मोठी गोष्ट सांगुन गेलेत पहा बुवा, की अनुभव घेतल्याशिवाय मजा नाही. मला सांगा, घरात बसुन मुसळधार पडणा-या पावसाचा आनंद खिडकीत बसुन मिळेल काय ? त्यासाठी बाहेर जाउन भिजायलाच हवं हो.... नुसतं गाण्याचे नोट्स वाचुन काय हरवुन जाता येईल काय ? त्यासाठी सुरांची नशाच अनुभवायला पाहिजे.
आणि साहेब... ठर्रा म्हणजे तर स्वर्गच की ! पाऊस पडुन जातो, सुर विरुन जातो... पण ठर्रा उरुन राहतो.
जे सगळ्यांना दिसतं ते दाखवतोच, पण जे कोणाला दिसणार नाही ते ही दाखवतो. त्या पडद्यावरच्या बायकांना मी स्वतः आरती ओवाळताना आणि माझ्यावर फुलं टाकताना मी पाहायलय. इथल्या काही योगी युगपुरषांनी तर त्यांचा नाचही पाहायलाय. एकदा याच तुम्ही अनुभव घ्यायला.
मी हल्ली ब-याचदा घेतो...
त्यामुळे हल्ली मला आनंदाचे झटके येतात... तरंगावंसं वाटतं.... स्वत:बद्दल प्रेम, करुणा आणि वात्सल्य दाटुन येतं.... कोणाचा राग येत नाही, हेवा नाही, मत्सर नाही... खरं सांगायचं तर अजुबाजुच्या जगाची जाणिवही नाही... फक्त समाधान आणि तुप्ती.... !
मला सांगा आध्यात्मात अजुन काय मिळतं.... आत्मसाक्षात्कार ह्याहुन काय वेगळा असतो हो...?
हल्ली मी असाच तल्लीन असतो. सगळी कुतुहलं आता शमवलीत पण हल्ली हल्ली ध्यानमंदीरात कुठल्या तरी बाईच्या तमाशाची जोरदार चर्चा असते. तमाशा वगैरेचा आपल्याला नाद नाय करायचा पण कुतुहल म्हणुन गेलोच तिथे तर सांगेनच तुम्हाला लवकर...
तोपर्यंत....
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

धुंद रवी.

तेरवी

चार वर्षापासून, शेती पार बुडाली
अवंदाबी चिमणी, अभायात उडाली
दरवर्षी कर्ज, फेडता झाली घान
मिरचीच्या रोपाची लुली पडली मान
कोहळ्याच्या येलाले, दिसत न्हाई कयी
अतिरेक्यावानी पडली, पह्याटीवर अयी
जवारी तं पह्यले, उकरीनंच पाडली
उरली सुरली मुरयीनं, जमिनीत गाडली
मुंगावर चिकटा पडला, तुरीले मूयकिडा
कडू लागते आता मिठ्या पानाचा ईडा
पानीबी मंधातच, देऊन राह्यला झाकोले,
निसर्गबी वरून मारून राह्यला टोले
धुर्र्यावर नाही गवत, दिसत नाही चार
बैलं कुठं चारावं, कुठचा कापावं भारा
कर्जाची होयी अशी, धीरे धीरे पेटते
पेराले मांगतलं,तं सोंगतांनी भेटते
सरकार गुतलं, सत्ता खुर्चीच्या तालात,
वावटयच पुरी घुसली, त्याहिच्या पालात
म्हून म्हणतो पंजाब,भविष्य बरं नाही
तेरवीची सोय कर, बुढीचं खरं नाही
...........डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

शहीद

कृषीप्रधान शब्दापासून, व्हा आता सावधान
शेतीसाठी लवकरच, होणार हाये प्रावधान
शेतकऱ्यां साठी खूप, सवलती येनार हाय
मरासाठी विष, सरकार आनून देणार हाय
विहिरीत जीव द्याचा, इचार करा पक्का
सरकारच मांगून देईन, तुमाले धक्का
जळून मरासाठी, रॉकेल डब्बी सकट
गयफास घ्यासाठी, दोरी घरपोच फुकट
हासू नका, तोंड करू नका हेकडं
सरकारच देईन पाहा, जायासाठी लाकडं
पोस्टमार्टम कराची, झंझट राह्यनार नाही
प्रेताले तुमच्या कापून कोणी पाह्यनार नाही
जीव देनं तुमचं, हराममौत ठरनार नाही
थो कायचा शेतकरी जो आत्महत्या करणार नाही
अन्तयात्रेचा खर्च, सरकार करन सोता
तेरवीसाठी कुटुंबाले, तांदूय एक पोता
प्रेताले सलामी, मंत्री वाह्यतीन पुष्पचक्र
भाषणात सांगतीन, हाना दाबून वखरं
सोनं नानं इका, घर ठेवा गहान
शेती पिकवा बनवा, मेरा भारत महान
लेकराईले शिकवू नका, शेतीतच दाबा
देशाच्या भविष्यासाठी,राब राब राबा
जवानासारखी, किसानाची जय करा
वावरातल्या धुर्र्याचा, हिमालय करा
शेती नाही पिकली तं, आत्महत्या कराची
सैनिकासारखी संधी, देशासाठी मराची
शहीद झाले म्हनून, गौरव तुमचा करू
पुढं चाला गानं म्हनत, जगू कींवा मारू
-डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

पोशिंदा

अवघ्या सृष्टीचा भार
घेऊनिया खांद्यावरी
सदा पोसण्या तयार
सार्‍या जगाचा कैवारी...

कधी ओला कधी सुका
हसे कोरडा दुष्काळ
तुझ्या पाचविला सदा
रिते फ़सवे आभाळ...

काळ्या मातीतले सोने
पीक डोलते शिवारी
भाव मातीमोल येता
घाव बसतो जिव्हारी...

रात दिसाला राबून
सोसुनिया उनवारा
रान पिकवुनी आता
हाती उरला कासरा...

सार्‍या जगाचा पोशिंदा
जग तुझ्याविन खूज
धन्य धन्य आहे राजा
तुझं शेतकरी राज..!

- शिवाजी विसपुते
एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील train ने जात असतात. त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं
कपल बसलेल असतं.
तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”
तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..
माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..)
जगात तिन प्रकारचे लोक असतात.
काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.
काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.
आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

टेंपररी -पर्मनंट

एक शिपाई दुसऱ्याला : ‘काय रे, एवढा का चिडतोस?’

दुसरा शिपाई- ‘हा मंत्री फुकट दटावून गेला मला.’

पहिला शिपाई- ‘अरे, मग त्यात एवढा राग येण्याचे कारण काय?’

दुसरा शिपाई- ‘का नाही? एक टेंपररी माणूस एका सरकारी पर्मनंट माणसाला दटावतो म्हणजे काय?

आजचा जमाना

एका मुलाला १ चिराग मिळाला... खुश होऊन त्यानी तो घासला....
लगेचच धूर झाला... आणि थोड्याच वेळात..............
.
.
.
.
"धड्दम" असा स्फोट झाला.. ५ जागीस ठार !! आणि ७ जखमी....!!!!!
अल्लादिन चा जमाना गेला आता....

लावारिस वस्तूंना हात लाऊ नका.....