साधं सोपं आयुष्य

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं


कवी - प्रसाद शिरगांवकर

जिना

कळले आता घराघरातुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...


कवी - वसंत बापट

माझे गाणे

माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे,
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,
या विश्वाची एकतानता हे माझे गाणे

आशेच्या वीणेचा चढवुनि सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गाता.

ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची,
सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.

"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी,
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.

सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले,
माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले

शांतहि मत्सर, प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला,
चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला.

ही मोक्षाची, स्वातंत्र्याची, उन्नतिची माला,
सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला.

हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली !
मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.


कवी - बालकवी

तुझी वंचना, साधना

तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही आता, वेदना, होत आहे

पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे

जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे

जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे

नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे

कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे

शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे

तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे

जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

सार्तथा संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरीही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे

कवी - भाऊसाहेब पाटणकर

पावसा

पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून...


कवी - अनिल

फटका

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

नास्तिकपणि तुं शिरुनि जनाचा बोल आपणा घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको

मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारमधि फसूं नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको ॥ १ ॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको

मी मोठा शाहणा, धनाढ्यहि, गर्वभार हा वाहू नको
एकाहून चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरीबाला तू गुरकावू नको
दो दिवसाची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको

विडा पैजेचा उचलु नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहू नको ॥ २ ॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको

कष्टाची बरी भाजिभाकरी, तूपसाखरे चोरू नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधिं विटू नको

असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आता तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकु नको

सुविचारा कातरू नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजना विस्मरू नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥ ३ ॥

कवी - अनंत फंदी

'विरामचिन्हे'

जेव्हा जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला,
जो जो दृष्टित ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला!
बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे,
तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे!

आहे काय जगात? काय तिकडे? हे कोण? कोठे असे?
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे ते काय? केंव्हा? कसे?
जे ते पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित,
सारा जीवनलेख मी करितसे तै 'प्रश्नचिन्हां'कित.

अर्धांगी पुढती करी वश मना श्रुंगारदेवी नटे,
अर्धे जीवन सार्थ होइल इथे साक्षी मनाची पटे;
प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले येथून हालू नये !

झाली व्यापक दृष्टि; चित्त फिरले साश्चर्य विश्वांतरी,
दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती; लागे मुळी अंत न,
त्याकाळी मग जाहले सहजची 'उद्गार'वाची मन !

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश -
ही एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश !
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला,
देवा! 'पूर्णविराम' त्या तव पदी दे शीघ्र आता मला !


कवी - गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात

आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात

कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात


कवी - ग. दि. माडगूळकर

प्रेम कर भिल्लासारखं

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


कवी - कुसुमाग्रज

शिक्षण वाईट आरोग्य चांगले

प्रगति पुस्तक वाचतांना

वडील : हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शुन्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे.

मुलगा : बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे..

पंचांगाचे थोतांड….....!!

पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी,
पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥

मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज,
दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥

कामचुकारांना। धार्जिणे पंचांग,
सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥

मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते,
आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥

चांगल्या कामाला। लागावे कधीही,
गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥

दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी,
माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥

वेळ, हवा पाणी। आकाश बाधेना,
भटांच्या कल्पना। शुभाशुभ ॥७॥

विवेकाने वागा। होऊनी निर्भय,
अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥८॥

सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,
चाला, नाही मागे। आला कोण ॥९॥

- जगतगुरू तुकोबाराय

रंगा येई वो येई, रंगा येई वो येई

रंगा येई वो येई, रंगा येई वो येई |
विठाई किटायी माझे कृष्णाई कान्हाई || १ ||

वैकुन्ठ्वासिनी विठाई जगत्र जननी |
तुझा वेधू माझे मनी || २ ||

कटी कर विराजित मुगुट रत्न जडित |
पितांबरू कासिला तैसा येऊ का धावत || ३ ||

विश्व-रूपे-विश्वं-भरे कमाल-नयने कमलाकरे वो |
तुझे ध्यान लागो बाप राखुमादेविवारे वो || ४ ||

-संत ज्ञानेश्वर

देणार्याने देत जावे

देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !

कवी - विंदा करंदीकर
बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.

नवरा - कशावरून???

.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर
शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा
थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,

'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?''
...
'' अगं काही नाही ... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''

साईनाथ आरती

जोडूनिया कर चरणी ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा ।। १ ॥

असो नसो भाव आलो तुझिया ठाया ।
कृपादॄष्टी पाहे मजकडे सदगुरूराया ॥ २ ॥

अखंडित असावे ऐसे वाटते पायी ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई ॥ ३ ॥

तुका म्हणे देवा माझी वेदीवाकुडी ।
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी । ४ ॥

रचनाकर्ता-जगद्गुरू तुकाराम महाराज

तरुतळी

त्या तरुतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेऊन फिरतो
इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना
स्वरातूनी चमकते वेदना
तप्तरणे तुडिवत हिंडतो
ती छाया आठवीत

विशाल तरु तरी फांदी लवली
थंडगार घनगदर् सावली
मनीची अस्फुट स्मिते झळकती
तसे कवडसे तीत

मदालसा तरुवरी रेलूनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळी सळसळे, वळे ती
मथित हृदय कवळीत

पदर ढळे, कचपाश भुरभूरे
नव्या उभारीत उर थरथरे
अधरी अमृत ऊतू जाय
परी पदरी हृदय व्यथित

उभी उभी ती तरुतळी शिणली
भ्रमणी मम तनू थकली गळली
एक गीत, परी चरण विखुरले
व्दिधा हृदय संगीत


कवी - वा.रा.कांत
गायक - सुधीर फडके
संगीतकार - यशवंत देव

अवचिता परिमळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू |
मी म्हणू गोपाळू, आला गे माये || १ ||

चांचरती चांचरती बाहेरी निघाले |
ठकची मी ठेले काय करू || २ ||

तो सावळा सुंदरु कसे पितांबरू |
लावण्य मनोहरु देखियेला || ३ ||

बोधुनी ठेले मन तव जाले आन |
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये || ४ ||

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा |
तेणे काय माने वाचा वेधियेले || ५ ||
लग्नाआधी.....

प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात..

लग्नानंतर.....

बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?
नवरा : म्हशे, डोळे फुटले का? वर आकाशात कोण तुझा बाप टॉर्च घेऊन उभा आहे का ....?

मी तुझी वाट पाहत राहीन....

गुन्हा फक्त इतकाचं झाला,

कि मी तुझ्यावर प्रेम केलं..

माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.....

प्रेम मी करतचं राहिली ,

तू फक्त व्यस्त राहिलास...

मी मात्र धावतचं राहिली ,

तू मात्र पाहतचं राहिलास...

आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,

तू मात्र तिथेचं राहिलास...

आठवणी मात्र येत असतात,

मी अश्रू पुसत राहते...

जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,

पण मी तुझी वाट पाहत राहीन.....

जग बदलतय

"तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय...
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...
वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...
दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झालीये....

सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे

पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्
पडून इ.
प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.
पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव
काय
आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास
राणीच्या
बागेत?''
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.
मी
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न
करत होतो.''
आता
दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.
मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे
टाकायचा प्रयत्न
करत होतो.''
तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी
पण
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत
होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं
नाव
शेंगदाणे!!!!''
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो सुविचार
११. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
१२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
१३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
१४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!!
१५. अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका !
१६. मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

बोलतो ते

बोलतो ते चूक आहे की बरोबर?
मी बरोबर वा खरोखर ती बरोबर?

काय डोळ्यांतून माझ्या दोष आहे ?
कोणताही रंग का नाही बरोबर?

बांध तू ताईत स्वप्नांच्या उद्याच्या
राख थोडी राहू दे माझी बरोबर

प्रश्न माझे अडचणीचे एवढे की
उत्तरे सांगू नये कोणी बरोबर

काळजी घे ! चांदण्याचा झोतसुद्धा
सौम्य कांतीला तुझ्या नाही बरोबर!

चुक तू होतीस हे शाबित होता
काय कळुनी फायदा की मी बरोबर !!

-संदीप खरे
शिक्षक : सेमिस्टर सिस्टिमचे फायदे सांग.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या : फायदे नाही माहीत.. पण
तोटा हा आहे की, वर्षातून
दोनदा अपमान होतो..

कानाने आंधळा

एका दरोडेखोराने एका घरात डाका टाकला. घरातले सगळे पैसे दागिने एकाजागी जमा केले आणि घरमालकासमोर सुरा काढत म्हणाला.

'' चल सांग अजुन कुठे आहे तुझ्या घरात माल नाहीतर या सुऱ्याने तुझे कानच कापतो''

घरमालक म्हणाला , '' साहेब रहम करा पण माझे कान कापू नका... नाहितर मी आंधळा होईन ''

'' आंधळा?'' दरोडेखोर आश्चर्याने म्हणाला, '' कान कापल्यावर जास्तीत जास्त बहिरा होशील... आंधळा कसा काय होशील?''

'' साहेब.... कान कापल्यावर मी माझा चष्मा कसा लावू?'' घरमालक म्हणाला.

जीन्स वर टिकली

सासू: किती वेळा सांगितले बाहेर जाताना टिकली
लावत जा..

सून: जीन्स वर कोणी टिकली नाही लावत अहो..

सासू: अग जीन्स वर नाही.. कपाळावर लाव..
चम्या. . . . चे लग्न होते.....
आणि एकदा तो पहाटे फिरायला जातो... खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो... आणि चिंगी जवळ जाऊन झोपतो.
चम्या :- आज बाहेर खूप खूप थंडी आहे.......
चिंगी :- तरी पण आमच बावळट बाहेर फिरायला गेलंय ..

पैल तो गे काऊ कोकताहे

पैल तो गे काऊ कोकताहे |
शकुन गे माये सांगताहे || १ ||

उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ |
पाहुणे पंढरीरावो घर कै येती || २ ||

दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी |
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी || ३ ||

दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोठी |
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी || ४ ||

आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळी |
आजिचे रे काळी शकुन सांगे || ५ ||

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे |
भेटती पंढरीराये शकून संगे || ६ ||

-संत ज्ञानेश्वर

॥ जय महाराष्ट्र ॥



माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या भगव्या शुभेच्छा ...

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतातम्यांस मानाचा मुजरा...

!!!...जय महाराष्ट्र..!!!

मी मराठी.....

नररत्नांची खाण मराठी
सदैव उन्नत मान मराठी
अजिंक्य आहे, अजिंक्य राहील
भारतभूची 'जान' मराठी!

पक्ष्यांची ही साद मराठी
कडे कपारी, नाद मराठी
'हर हर हर' डरकाळी फुटते
विजयाचा अस्वाद मराठी!

लाजलाजिरी रात मराठी
महाराष्ट्राची बात मराठी
गवतांनाही भाले फुटती
त्या हिरव्या कोंबात मराठी!

या मातीचा श्वास मराठी
या दर्याचा न्यास मराठी
या व्योमाच्या अणुरेणूतून
वसते अमुची खास मराठी!

या दुर्गांची माळ मराठी
कधी न तुटते नाळ मराठी
वरून कणखर, आतून हळवे
हृदयामधले बाळ मराठी!

धरतीच्या उदरात मराठी
कधी न सोडी साथ मराठी
या देशातून प्रेम वाहते
या देशाची जात मराठी!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज पुन्हा मला प्रेम होत आहे....

शब्द दडले होते माझे
आज पुन्हा मजसी दिसत आहेत
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा प्रेम मला होत आहे ♥

भावना सुखद प्रेमाची ती
आज पुन्हा मनी दाटत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

विचार मनातील सारे माझ्या
आज काव्यात उतरत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

प्रेमाचा गंध हृदयाला स्पर्शुनी
मन उल्हासित आज करत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

सुखद स्पर्श मनाला आज असा
चटका लावूनी खिलवत आहे
ना ठाऊक मलाही...आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

प्रेमाची साथ सदा सोबत राहावी
साथ तुझी भावी कधी न सुटावी
मागणी प्रेमाला घालत मी आहे
ना ठाऊक मलाही....आज पुन्हा मला प्रेम होत आहे ♥

दारूचा पाढा

दारू एके दारू, बैठक झाली सुरु.
दारू दुणे ग्लास, मजा येईल खास.
दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाईन.
दारू चोक बियर, टाका पुढचा गिअर.
दारू पंचे रम, विसरून जाऊ गम.
दारू सक ब्रॅडी, आण चिकन अंडी.
दारू सात विस्की, कॉकटेल करता रिस्की.
दारू आठ बेवडा, आणा शेव चिवडा.
दारू नव कंट्री, मारा परत एंट्री.
दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाल...!
तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...?
हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...?
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?
गंमत म्हणून तिला विचारलं तू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का.....?
कळी उमाळण्याच्या आशेत वेडा चंद्र रात्रभर जागा होता,
कळी उमाळनार असा त्याचा विश्वास होता,
पहाट झाली, कळी उमळली,
पण हे पाहण्यास वेडा चंद्र कुठे होता???
मुलगा : जान मी हात सोडुन गाडी चालऊ का ?
मुलगी : नको रे,
आपण पडु ना मग..
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मग माझा शेंबुड पुस, तोंडात चाललाय..
एक दुधवाला रस्त्याने त्याच्या गाडीवरुन चाललेला असतो........तर तो अचानक त्याच्याजवळ असलेले सगळे दुध पिऊन टाकतो !!!!!!

का ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण मागुन एक कार हॉर्न वाजवत असते.......(पी पी पी पी)....

खटारा गाडी

रम्या चम्यासमोर आपल्या अफाट श्रीमंतीचे गोडवे गात असतो.

रम्या : अरे, सकाळीसकाळी मी कार घेऊन बाहेर पडलो, तरी संध्याकाळपर्यंत माझी अर्धी प्रॉपटीर्ही पाहून होत नाही.

चम्या : मग त्यात काय? तशी खटारा गाडी माझ्याकडे पण आहे.

प्रेमाचे राजकारण

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की,
कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत..
आणि, ती मुलाकडे पाहून हसली की,
त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत
आणि, लग्नाला एक वर्ष झाल की, मग,
" आदर्श घोटाळl " केल्यासारख वाटत !!!