काचेची बरणी आणि २ कप चहा

(आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.

पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."

सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते

भूमिपूजन

लग्न झालेल्या मुली भांगेत कुंकू का लावतात?
?
?
?
?
...
कारण पोरांना कळावं कि ज्या प्लॉटवर त्यांची नजर पडलीयत्याच भूमिपूजन आधीच झालंय

श्रीगणेशास 'मंगलमूर्ती' का म्हणतात ?


पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा वेदशास्त्रनिपुण ऋषी रहात होता. एके दिवशी क्षिप्रा नदीवर तो स्नानासाठी गेला असता जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सरेस पाहून तो कामातूर झाला आणि त्यांचे वीर्य पृथ्वीवर पडले. पृथ्वीने ते आपल्या उदरात धारण केले.
यथावकाश त्या रेतापासून पृथ्वीने एका जास्वंदी फुलाप्रमाणे तांबड्या त्याच्या पुत्रास जन्म दिला आणि त्याचे पालनपोषण केले. हा पुत्र कुमारवयात येताच त्याने आपल्या मातेस प्रश्न केला “माते, माझे शरीर इतर मानवांप्रमाणे असूनही माझ्या अंगाचा रंग इतका तांबडा कसा?” तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचे जन्मवृत्त कथन केले. ते ऐकून त्याने पृथ्वीकडे पित्याजवळ राहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा पृथ्वी त्याला भारद्वाजऋषीकडे घेऊन गेली. भारद्वाजऋषीने आपल्या या पुत्राचा (भूमीपुत्र) स्वीकार केला आणि त्याचे नाव, ‘भीम’ ठेवले. पुढे शुभदिवस पाहून त्याचे उपनयन करुन त्याला वेदशास्त्र शिकविले. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा उपदेश करून जप करण्याची आज्ञा केली पित्याच्या आज्ञेवरून भीमाने नर्मदा नदीच्या काठी जाऊन तपश्चर्या सुरू केली.
नर्मदा नदीकाठी एक हजार वर्षे श्रीगणेशाच्या मंत्राचा जप केल्यावर गजानन माघ शुद्ध चतुर्थी दिवशी त्याला प्रसन्न झाला आणि भीमास गजाननाने साक्षात दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा भीमाने ‘मला स्वर्गामध्ये राहून अमृतप्राशन करण्याची इच्छा अहे. तसेच माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध व्हावे आणि ज्या माघ शुद्ध चतुर्थीदिवशी तुम्ही मला प्रसन्न झालात. ती चतुर्थी सर्वांना कल्याणकारी होवो.’ असा वर मागितला.
भीमाचे हे बोलणे ऐकून गजाननाने ‘तुला देवांसह अमृतपान कराव्यास मिळेल. तुझे ‘मंगल’ असे नाव प्रसिद्ध होईल. तुझ्या नावावरूनच मला लोक ‘मंगलमूर्ती’ म्हणून ओळखतील. तुझा रंग अंगाराप्रमाणे लाल असल्याने चतुर्थीस ‘अंगारकी चतुर्थी’ असे म्हणतील. या चतुर्थीचे व्रत करणाऱ्यास एकवीस संकष्टीचे व्रत केल्याचे पुण्य मिळेल.’ असा वर भीमास दिला. अशा प्रकारचा वर देऊन गजानन गुप्त झाला असता मंगलाने त्या ठिकाणी उत्तम प्रकारचे देवालय बांधिले आणि त्यात सोंड व दहा हातांनी युक्त अशी गणपतीची सुंदर मूर्ती स्थापिली. त्या मूर्तीचे नाव मंगलमूर्ती असे ठेविले.
तेव्हापासून श्रीगणेशास लोक‘मंगलमूर्ती’ म्हणू लागले आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी गणपती अंगारकास प्रसन्न झाले. म्हणून मंगळवारी येणाऱ्या ‘अंगारकी म्हणतात. 

सांग कधी कळणार तुला

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला


जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला

गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर 
चित्रपट - अपराध

मी का पळू?

संता  - बंता  जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.बंता प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो संताला म्हणाला,
''पळ पळ संता  !''
.
.
.
.
.
.
.
.
संता  चिढून म्हणाला''
मी का पळू?
माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!
बायको नवर्याला फोन करते
: (रागात) कुठे आहात तुम्ही??
नवरा : कालतुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस
आवडलं होतं,आणि माझ्याकडे पैसे
नव्हते ते घ्यायला.......आणि मी म्हंटलं होतं नंतर
घेईल तुला ते नेकलेस......
बायको : (प्रेमात)
हो..आठवतं ना हो ♥
नवरा : त्या दुकानाच्या शेजारच्या सलून
मध्ये दाढी करतोय....आलो थोडा वेळात

पोरीला मिशा आहेत !!!

एक कुत्रा मांजरीच्या प्रेमात पडला.

पण त्याच्या पालकांनी लग्नाला साफ नकार दिला........

कारण काय असावं ?

.
.
.
.

त्यांनी भन्नाट कारण दिलं..........
.
.
.
.
" पोरीला मिशा आहेत !!! 
वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट 
माझी नाही तुमची आहे

फिफ्टी-फिफ्टी

 
एकदा संता आणी बंता दोघे रस्त्याने फिरत असताना त्यांना एक हजार रुपयाची नोट सापडली.
बंता: चल संता , आपण फिफ्टी-फिफ्टी वाटुन घेऊया.
.
.
.
.
.
संता: मग बाकीच्या 900 रुपयांचे काय करायचे?

दिस चार झाले मन


दिस चार झाले मन... हो.. पाखरू होऊन
पान पानात आणि...
पान पानात आणि झाड बहरून

दिस चार झाले मन... हो.. पाखरू होऊन

सांज वेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कोठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

दिस चार झाले मन... हो.. पाखरू होऊन

न कळत आठवणी जसे विसरले
न कळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वारी दिसे सूर्य सनई भरून

दिस चार झाले मन... हो.. पाखरू होऊन

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला येथे ऋतू वसंताचा
ऋतू हा सुखाचा इथला गेला ओसरून

दिस चार झाले मन... हो.. पाखरू होऊन
पान पानात आणि...
पान पानात आणि झाड बहरून

दिस चार झाले मन... हो.. पाखरू होऊन


चित्रपट :- आईशप्पथ...!
गायिका :- साधना सरगम
गीतकार :- सौमित्रा

विंदाच्या कणिका

[ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर यांच्या काही सादर करत आहे.
कणिका म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...]

१. उत्क्रांती
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी


२. प्रेम
सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!


३. चंद्र आणि क्षय
चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुकला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!


४. दर्पण
परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!


५. पदवीजिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर


६. नारदाचा वारस
नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!


७. इतिहासइतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा


८. नायक
रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण


९. खळी
स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती


कवी - विंदा करंदीकर

।। श्री गणेश सम्पूर्ण पूजाविधी ।।


श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !
कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव' हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे', या भावानेच सर्व उपचार करावेत.

१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.

१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम, ३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो, ६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग, ३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी १ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली १ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती १ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग, ४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)


१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे


१ इ १. पूजास्थळाची शुद्धी

अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.

१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे

१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.'

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।' हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे', असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि' असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।


३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा

।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:' हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे. १. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:' या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. ४. श्री गोविंदाय नम: । पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत. ५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: । २०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।। पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.

देवतास्मरण : श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।

देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल' म्हणावा. श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा. `तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।। संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.
श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.

ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो. श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।

आवाहन :
उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.) `श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।'

आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।। चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि' हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत. श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.) उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे. प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' अशा प्रकारे म्हणतात.) हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे. श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।

अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने. यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्' हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे. अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।

श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो' म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।' असे म्हणावे.

कलशपूजन गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.

शंखपूजा शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।। अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.

घंटापूजा आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।। अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो. घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

दीपपूजा भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)

मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि' या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे. मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.

पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा

प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे', असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत. अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप - प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.) अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।। नंतर `परमात्मने नम: ।' असे १५ वेळा म्हणावे.

ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.
(टीप - हा मंत्र वेदोक्‍त आहे. ) एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.) आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.

२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना देवांच्या चरणी वहा. विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।

३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।

४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि' म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा. रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात. राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर. उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर. श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.) श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)

१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.
अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो. महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे. श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात. श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर) श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर) श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर) पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि' असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर) श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा) श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति) यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: । आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।। भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा. नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे. नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। फुलाला गंध लावून देवाला वहावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। यानंतर आरती करून कापूरारती करावी.

पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा. नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।। सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी. यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् । तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।। दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.) दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।' असे म्हणावे. श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: । श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।। नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी. गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।। विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।। श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी. अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.) प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे. विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।। यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।' असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी')

हरतालिका व्रत

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा सुरेख पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यावर हे व्रत करण्याचा काय अर्थ आहे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`

पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.

तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.

इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.

रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते.त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते.


महत्व :

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे.दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते,तर गणेशोत्सवामधील दीड दिवसांत ते १००० पटीहून अधिक कार्यरत असते.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी
‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’,
असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला
‘ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या ।
वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा ।।’
याप्रमाणे वंदन केले आहे.
संत नामदेवांनी
‘लंबरोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।’,
असे म्हटले आहे.


प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व(वरची) आणि अधर(खालची) अशा दोन दिशा. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात.


प्राणशक्ति वाढविणारा

मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या निरनिराळ्या शक्तींच्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हणतात. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ति वाढविणारा आहे.


श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे.
‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’


पूजेत डाव्या सोंडेचा गणपति का ठेवावा ?

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्तीशाली व जागृत आहे, असे म्हटले जाते.याउलट डाव्या सोंडेचा गणपति शीतल व अध्यात्माला पूरक असतो, याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.

श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावित ?

दुर्वांमध्ये श्रीगणेशाचे तत्त्व जास्तीतजास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्याने मूर्तीत मोठ्या प्रमाणावर गणेशाची शक्ती जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ मूर्ती जागृत होते. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे; गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.

मोदक
अ. 'मोद' म्हणजे आनंद व 'क' म्हणजे भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग.
मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' या ब्रह्यरध्रांतील पोकळी सारखा असतो.
कुंडलिनी 'ख' पर्यंत पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे
आनंद प्रदान करणारी शक्ती.

आ. 'मोदक' हे ज्ञानाचे प्रतिक आहे; म्हणून त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान
प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू
लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे
प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.


आरती अन् नामजप

गणेश चतुर्थीच्या काळात आरती म्हणणे म्हणजे कर्णकर्कश्य आवाजात ती म्हणणे, असे जणू समीकरणच झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष भगवान श्री गणेशासमारे उभे आरती आपण आरती म्हणत आहोत असा भाव ठेवून भावपूर्ण आणि आर्ततेने आरती म्हटली पाहिजे. तर तिचा लाभ होतो. खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशाच नामजप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो.

बाप्पा

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला

"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला

"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"

मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"

"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?

मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"

"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक

तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"

"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो

भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"

"काय करू आता माझ्याने manage होत नाही

पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"

"immigration च्या requests ने system झालीये hang

तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"

"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात

माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"

"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation

management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"

"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?

Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"

"असं कर बाप्पा एक Call Center टाक

तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"

"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको

परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला

"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"

"CEO ची position, Townhouse ची ownership

immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"

मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"

अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?

"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं

सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"

"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव

प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"

"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?

नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"

"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं

आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"

"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार

भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"

"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान

देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"

"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला......

पाहीले मी . . . . .


पाहीले मी पाचोळ्याला
फांद्याना लटकून रडताना,जगताना
तर कधी फुलण्याआधी
कळी गळून पडताना
ऐन बहरात फुलांचा
रंग उडून जाताना
अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला
गंध ओवळून टाकताना

पाहीले मी डेरेदार वृक्षाखाली
सावली हरवून जाताना
तर कुठे इवल्या रोपाखाली
वारूळ उभे रहाताना
वादळाशी झूंज देत
इतिहास नवा रचताना
तर कुणी अलवार झूळकीसरशी
मुळासकट पडताना

पाहीले मी देवळात दगडावर
अभीषेक दुधाचा होताना
तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात
अन्कुर उद्याचा फुटताना
खडकाळ बंजर जमीनीवर
नांगर यत्नाच फिरताना
तर कुठे नर्मदेच्या तीरावर
गोट्यांचे पीक येताना

पाहीले मी हिमालयाला
नतमस्तक धरेसमोर होताना
तर कधी इवल्या शीळेला
मिजास उंचीची मारताना
कुणी उगीच ढगात बोट घालून
देवांशी नाते सांगताना
तर कुठे कुण्या रामाच्या संजीवनीसाठी
भार सारा वीसरताना

पहातोय मी सचेतनात अचेतन
तितकेच भरून आहे
निर्मळ भागीरथीच्या संगे
गटारगंगा दडुन वाहे

असेच सर्व पहता पहता
डोळे क्षणभर मीटून घेतो
गोल खोल गुढ जगाची
खडकाळ रीत समजुन घेतो...

माझा घोडा छैलछाबिला

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

माझ्या गाडीला दोन चाके
त्यात बसती बाळ राजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
माझा घोडा डौलात चाले !

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

माझा चाबूक सटाक वाजे
चल रे घोड्या जाऊ वेगी
खूळ खूळ घुंगरू वाजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
माझा घोडा भर भर धावे !

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

मामा चे घर आले आले
दाणा पाणी देईन तुझ रे
खूळ खूळ घुंगरू वाजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
माझा घोडा चौखूर धावे !

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

माझ्या गाडीला दोन चाके
त्यात बसती बाळ राजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
माझा घोडा डौलात चाले !

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

माझा चाबूक सटाक वाजे
चल रे घोड्या जाऊ वेगी
खूळ खूळ घुंगरू वाजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
माझा घोडा भर भर धावे !

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

मामा चे घर आले आले
दाणा पाणी देईन तुझ रे
खूळ खूळ घुंगरू वाजे
खूळ खूळ घुंगरू वाजे
माझा घोडा चौखूर धावे !

मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला
मी घोडा गाडीवाला
माझा घोडा छैलछाबिला

आनंदी आनंद गडे


आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

तू अशी. . तू तशी. . .

तू अशी. . तू तशी. . . तू नक्की आहे तरी कशी. .??
अल्लड, अवघड तरीही सर्वाना आवडेल अशी. . .
तू आहे तुझ्या सारखीच स्वछंदी. . . .
तुझ्या येण्याने सर्व जग बदलून जाते. .
सारे काही सुगंधी, संगीतमय. . हवे हवेसे वाटते. . .
तू फक्त बोलली तरी ग्रीष्मात पाउस पडेल,
तू एकदा हसली तर निमिषभर फक्त तूच दिसेल. . .
तुझ्या प्रत्येक कृतीत प्रेम, मैत्री, माया
यांचं त्रिवेणी संगम आहे. . .
तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला कसलीच तोड नाही,
मला आता तुझ्या शिवाय दुसरी कसलीचओढ नाही. . . .
तुझ्या निखळ मनात अडकून राहायला होतं. .
तुझ्या निरागस हसण्यात हरवून जायला होतं. . .
तुझ्या आवाजातील बंदिश जीव ओढून नेते. .
तुझ्या डोळ्यातील अश्रु माझे प्राणच् घेते. . .
या वेड्याचे प्रेमफक्त तुझ्यावरच असेल. .
तु प्रेम दे अथवा नको देऊ, पण साथ मात्र सोडू नकोस. .
दुःख आले माझ्याशीबोल, एकटी सहन करु नकोस. .
ओठांवर नेहमी हसु ठेव, डोळ्यात अश्रु आणु नकोस. . . ..

प्रेमाला उपमा नाही

प्रेमाला उपमा नाही ,
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पम्प नाही,
पम्पाला पैसे नाही,
पैस्याला नौकरी नाही,
नौकरीला डीग्री नाही,
डीगरीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन्शीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा

ते आम्ही!


चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

तुझ्यावर एक कविता करू का


ये सांग न ग मला तुझ्यावर एक कविता करू का
जास्त नाही ग जमत पण थोडा ट्रअय तरी मारू का
डोळ्याचे कौतुक करतो मधी आणि मग केसाकडे वळू का
ओठाचे गुणगान गाऊ आधी मग नाकाकडे बघू का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

कायग नेहमीच भाव तू खायचा मी पण जरा खाऊ का
रुसणे मात्र तुझे आणि समजुतीला मात्र मीच का
एकटेपणा वाटतो तुला आणि सोबतीला मात्र मीच का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

शॉपिंग मात्र ढीगभर करते आणि बिल दयाला मीच का
भांडण मात्र तू काढतेस आणि मिटवायचे मात्र मीच का
नाकावरती राग येतो तुझ्या तेव्हा वाटते तू हीच का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

माझे मन गेले उडत आणि तुझेच घोडे पुढे का
लई लाडात नको येऊ सारखे एक कानाखाली देऊ का
जाऊदे ग वेडे विसर तो लटका राग आता गोड हसू देशील का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

- अशोक खेडकर

का रुसलीस तू

का रुसलीस तू हे कधी न जाणिले मी

का हसलीस तू हे कधी न जाणिले मी

तुज्या स्तब्ध ओठांनी हि प्रेम गीत गायिले तू

तुज्या लुप्त लोचनांनी नव चैतन्य दाविले तू

दाटून कंठ येतो तुझी आठवण हि बिलोरी

विखरून बघ गेली तुझी स्वप्न हि रुपेरी

का छळतेस आज पुन्हा या एकांत सांजवेळी

देऊनी हि उजाळा हि रात्र अजाण काळी

येशीलकाग पुन्हा या एकांत चांदराती

भेटशीलनाग पुन्हा या आठवणी हि मज छळती

का गेलीस दूरदेशी का सापडेलनाग हा रस्ता

परतीची ओढ् तुझ्या खाशीलनाग या खस्ता

परतीची नसे वाट जाणतोग मी हे सत्य

कसे सांगू या मना जणू वाटतेची हे मिथ्य

परतून ये प्रिये मना या लागली ओढ आकंठ

छळनार ना कधी करशील ना हसू उदंड


- अशोक खेडकर

तुझ्या भेटीस अर्थ होता...

तुझ्या भेटीस अर्थ होता नाजूक या कळ्यांचा

कळ्यानाही गंध होता या लाजऱ्या प्रेमाचा

काजव्यांनी चोरून मनी हार मांडलेले

चांदण्यांनी जणू हे आभाळ सांडलेले

स्पर्शतुनी जणू हि लाखोली वाहिलेली

निशाब्ध शांततेला जणू शब्द हि सुचेना

वारा निशब्ध झाला आईकून श्वाश माझे

फुलेही स्तब्ध झाली घेऊन गंध ओला

जुईच्या गंधाने आवेग मुग्ध झाला

चोरट्या या भेटीला नवाच अर्थ आला

उमलत्या या कळीला नवाच गंध आला

भेटीचा अर्थ उमगला कळीचे फुल झाले

परसातल्या कळ्याचे आयुंष्य सार्थ झाले


- अशोक खेडकर

.....पण विषय सापडत नाही चांगला


बऱ्याच दिवसातून कविता करावी म्हणतोय पण विषय सापडत नाही चांगला |

प्रेमावर करावी म्हणतोय पण प्रेमिकेला राग यायचा म्हणून तो सोडला |

दारुडयावर करावी म्हटले तर च्यामारी तिथे तिचा बाप बेवडा निघला |

देवदासावर करावी म्हटले तर नेमका तिच्याच भावाला पोरीने सोडला |

कुत्र्यावर करावी म्हटले तर तिच्याच आईने काल अल्सेसिअन आणला |

बोक्यावर करावी म्हटले तर तिच्या मांजरीनेच काल बोका मारला |

च्यामारी विषय शोधत शोधत माझ्या डोक्याचा भेजा फ्राय बनला |

शेवटी काय करणार राव मग विडंबन हाच एक धंदा उरला |

बऱ्याच दिवसातून कविता करावी म्हणतोय पण विषय सापडत नाही चांगला |


- अशोक खेडकर

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
बळेच लेकचर करणे ते पण डुलक्या मारत
लेकचर बंक करीत पोरीच्या मागे फिरत
पोरीने मात्र दगा करायचा मागच्या गेटने आत शिरत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
जर्नल पूर्ण करत तेही नाईट मारत मारत
चेक तरी कराना म्हणून म्याडेम च्या पाया पडत
शेवटच्या दिवशी मात्र ATKT साठीतरी अभ्यास करत
तीन तास पेपर लिहीत तरी अवघड होता म्हणून बोमबा मारत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
फर्स्ट क्लास हुकला म्हणून बसायचे रडत
ATKT तरी मिळाली म्हणून मात्र हसत हसत
जीवावर आले कॅम्पस सोडून जाताना डोळे पुसत
जगावे लागतेय आज कुणाच्या तरी पुढे नाक घासत

नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत


-अशोक खेडकर

मारियोची गर्लफ्रेँड

एक लहान मुलगा सुपर मारिओला भेटला आणि म्हणाला- "काय भावा, ओळखलं का मला ?"
मारिओ- "नाय रे , कोण तु ?"
मुलगा- "बस का भावा,विसरला का ? मी माझं अख्खं बालपण वाया घालवलं तुझी गर्लफ्रेँड तुला मिळवून देण्यात !

॥ जीवनसार ॥


जन्माला आला आहेस थोड जगुन पहा

या जीवनात खुप दुःख आहेत
थोड सोसुन पहा

चिमुटभर दुःखाने कोसळून जावू नका
दुःखाचे काही पहाड तू चढून पहा

नंतर यशाची चव चाखुन पहा
अपयश येतं निरखुन पहा

घरट बांधन सोप असत
थोडी मेहनत करून पहा

जगन कठीन , मरणं सोप असत
दोन्हिँतल्या वेदना झेलून पहा

जीवन-मरण हे फक्त एक कोड असत
जाता-जाता ते सोडवून पहा


-कविकुमार

दूरावा ऒलावा

दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

... दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...
दूराव्यात प्रेमाचं घर असतं,
अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

पोरी महागात पडतात!!


पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव,त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित,कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय सर्वांनाच

प्रेमसाठी हेही


तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..

तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..

बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..

तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..

म्हणतात प्यार मे
दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..

बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..

नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..

खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..

एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..

अरे खाट
तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....

बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..

ओळख


तुला का वाटते गाफील आहे मी
तुझ्या खेळामधे सामील आहे मी

हवासा वाटतो पण काय कामाचा
जुन्या पत्रातला तपशील आहे मी

तुझी उजळीत स्वप्ने रात्रभर जळतो
तुझ्या दारातला कंदील आहे मी

कशाला वास्तवाशी रोजचा झगडा
चुकीचे काय जर स्वप्नील आहे मी

कधी जमलेच तर घे गुणगुणून मजला
तुझ्या ओठातली मैफील आहे मी

जगाला काय ओळख वेगळी सांगू
खरे तर तूच माझ्यातील आहे मी

- अभिजीत दाते

घंटा

एखादी गोष्ट कधी तरी खूप आवडते आणि कधी एकदम नकोशी होते. प्रत्येकाच्याच आठवणीत एक महत्त्वाचं स्थान असलेली ही वस्तू आहे- ती म्हणजे घंटा! आमच्या शाळेत एक पितळेचा गोल तुकडा तारेने टांगलेला असायचा. शाळा सुरु व्हायची वेळ झाली, की महादेव शिपाई त्या पितळेच्या गोल तुकड्यावर अडकवून ठेवलेली हातोडी सोडवून घंटा वाजवायचा. शाळा सुरु होतांना वाजणारी घंटा अंगावर काटा उभा करायची, कारण जर उशीर झाला तर हेडमास्तर हातात रुळ घेऊन समोरच्या दरवाजात उभे असायचे. उशीर झालेल्या मुलांना हातावर फटके द्यायला! हीच घंटा जेंव्हा शाळा सुटल्यावर वाजायची तेंव्हा मात्र हिचा आवाज खूप कर्ण मधुर वाटायचा.एकाच घंटेच्या आवाजाचे किती प्रकारचे अर्थ निघू शकतात नाही का? शाळेत ८ वी मधे असतांना एक बदली शिक्षिका आल्या होत्या , त्यांचा पिरियड संपण्याची घंटा वाजू नये असे वाटायचे. :) आणि नावडत्या शिक्षकाचा पिरियड सुरु झाला, की कधी पिरियड संपल्याची घंटा वाजते इकडे लक्ष असायचं.

या घंटे मुळे आयुष्यातला खूप मजेचा वेळ ( म्हणजे झोपेचा) :) वाया गेला आहे. शाळेत असतांना उद्यापासून रोज सकाळी अभ्यासाला उठायचं म्हणून आई अलार्म क्लॉक ( जे मेकॅनिकल चावी चे असायचे त्याला) अलार्मची चावी फिरवून अलार्म सेट करून ठेवायची. सकाळी चार वाजता तो अलार्मच्या घंटीचा आवाज ऐकून घरातले सगळे जरी खडबडून उठले तरीही मला मात्र जाग यायची नाही, आणि मग पाठी वर चार धपाटे खाऊनच उठणे व्हायचे. समजा एखाद्या वेळेस जाग आली तरी पण डोक्याखालची उशी कनावर दाबून झोपायचा प्रयत्न करायचो.. तेंव्हापासून अलार्म क्लॉक मला न आवडणारी वस्तू म्हणून जी डोक्यात बसली, ती आजपर्यंत! अजूनही सकाळची फ्लाईट असली की ह्या अलार्म क्लॉकची आवाज ऐकू आला की नको ते गावाला जाणं असं वाटायला लागतं. हल्ली मोबाइल मधे किंवा फोन वर अलार्मची सोय आल्या पासून अलार्म क्लॉक ही वस्तू इतिहास जमा झालेली आहे- पण माझ्या आयुष्यातली एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणून लक्षात राहील माझ्या.

लहानपणी मला नेहेमी फायरब्रिगेड चा ट्रक ड्रायव्हर व्हायची इच्छा होती. फायरब्रिगेड च्या ट्रक वर पण अगदी मागच्या भागात एक मोठी चकचकीत पितळी घंटा असायची. तिच्या लंबकाला बांधलेली एक दोरी ड्रायव्हरच्या मागे उघड्या जागेवर उभ्या असलेल्या फायर मॅन च्या हाती असायची. कुठे आग लागली कंडक्टर प्रमाणे दोरी ओढून घंटा वाजवत ,तो फायर ट्रक जायचा. ते पाहिलं की ही बेल वाजवायला मिळावे म्हणून तरी आपण फायरब्रिगेड मधे मोठं झाल्यावर काम करायलाच हवं, असं वाटायचं. हल्ली ती घंटा जाऊन तिच्या जागी सायरन आलाय, पण त्या घंटेची मजा सायरन मधे नाही.

उन्हाळ्यात अमरावतीला रात्री घरासमोरून एक कुल्फीवाला जायचा. ही कुल्फी म्हणजे माझा जीव की प्राण! खूप आवडायची मला ती. एका हातगाडीवर मटका कुल्फी चा माठ आणि वर बांधलेली एक घंटा असायची. त्या घंटेच्या आवाजाची तर आम्ही दररोज रात्री वाट पहायचो. दोन कुल्फी वाले होते, एक भोंगा हॉर्न वाजवायचा, आणि दुसरा हा घंटी वाला. हा घंटीवाला माझा फेवरेट. हा घंटीचा आवाज ऐकला की मी पंचवीस पैसे दे म्हणून घरी मागे लागायचो, आणि एकदा पैसे हातात पडले की दुसऱ्याच क्षणी त्या कुल्फीवाल्याकडे धाव घ्यायचॊ.

नाटक सुरु होण्यापूर्वी, मोगऱ्याच्या गजऱ्यांचा आणि पर्फ्युम्स च्या सुवासाच्या पार्श्वभूमीवर स्टेज वरून तीन वेळा हातात पितळी घंटा घेऊन एक माणूस वाजवत जायचा. तिथे त्या सुगंधी पार्श्वभूमीवर तिचा आवाज पण खूप छान वाटायचा. हल्ली मात्र त्या घंटेची जागा इलेक्ट्रीक बेल ने घेतलेली आहे. काही गोष्टी कधी बदलू नये असे मला वाटते, त्यातलीच ही एक.

पूर्वी रेल्वे स्टेशन वर गाडी येण्यापूर्वी सूचना देण्यासाठी घंटा वाजवली जायची , ती घंटा ऐकली की सगळे सरसावून नीट सामान सेट करून गाडी मधे चढण्यास तयार रहायचे, ती पण हल्ली बंद केल्या गेली आहे, आणि त्या ऐवजी अनाउन्समेंट केली जाते, पण घंटेची आठवण काही पुसल्या जात नाही. कदाचित पुढच्या पिढीला अशी काही पद्धत होती हे माहिती पण रहाणार नाही.

जेंव्हा मला माझी पहिली सायकल मिळाली, ( ७वी मधे ) तेंव्हा सायकल घेतांना त्याला कुठली घंटी बसवायची ह्याचंच स्वप्न रंजन मी करत होतो. त्या काळी दोन प्रकारच्या घंट्या होत्या, एक म्हणजे फक्त एकदाच टिण्ण वाजणारी, आणि दुसरी म्हणजे तिला आत स्प्रिंग असायचं आणि स्प्रिंग अनवाईंड होऊन घड्याळाच्या अलार्म सारखा आवाज यायचा ती . मला दुसरी घंटी लावायची होती सायकलला. सायकल घेतल्यावर सायकल घेण्याच्या आनंदा पेक्षा घंटी वाजवायला मिळणार , अगदी हवी तेवढी! हा आनंद काही वेगळाच होता.

मी लहान असतांना माझ्या आजोळी जायचो, तेंव्हा घरी असलेल्या गाई म्हशी चरायला नेण्यासाठी सकाळी गुराखी यायचा, तो जेंव्हा सगळ्या जनावरांना घेऊन जायचा तेंव्हा प्रत्येक गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज वेगवेगळा असायचा. त्या घंटे मधे लंबक जो असतो, तो लाकडी असायचा आणि म्हणूनच त्या मुळे होणारा घंटा नाद पण अगदी वेगळाच असायचा. शाहरुख च्या एका सिनेमात जी घंटा तो आणतो, त्याच प्रकारची घंटा असायची ती. गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज हा संध्याकाळी गाई घरी आल्या की सकाळ पेक्षा नक्कीच वेगळा वाटायचा. एकच घंटा पण आवाजात इतका फरक कसा काय वाटू शकतो?

नाशिकच्या नारोशंकर देवळात १८ व्या शतकाच्या मध्यंतरी बसवलेली एक घंटा आहे, ती घंटा गोदावरीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाढली, की आपोआप वाजेल अशी व्यवस्था केल्या गेलेली होती. धोक्याची घंटा म्हणूनच हिचा उपयोग केल्या जायचा.

घंटेचं आयुष्यातलं स्थान खूप मोठं आहे . घंटा म्हणजे केवळ धोक्याच्या वेळेस वाजवली जाते असे नाही, तर आनंदाच्या क्षणी पण तेवढ्याच उत्साहाने वाजवली जाते. दूर कशाला, आपल्या देवाला पण घंटा वाजवूनच उठवल्यावर मग पूजा करता येते, किंबहुना घंटे शिवाय पूजा पुर्ण होतच नाही. म्हणून घंटेचं महत्त्व आयुष्यभर रहातं. कितीही विसरायचं म्हटलं, तरी विसरली न जाणारी ती घंटा..

जाता जाता, कालच एक मित्राचा फोन आला होता, म्हणतो, संध्याकाळी भेटतो का? कुठेतरी ’बसू’ या थोडा वेळ. ” मी त्याला विचारले की ” तुझी बायको माहेरी गेली का? तर म्हणतो, ” घंटा , जाते ती माहेरी”… मी जोरात हसलो, आणि ठरवलं की एक पोस्ट नक्की होऊ शकतं या घंटा विषयावर. त्याच्या त्या एका शब्दात सगळं जे काही मनात होतं ते बाहेर पडलं.जरी जूनी पितळी घंटा संपली विस्मृती मधे गेली , तरी ही वाक्प्रचारांसाठी वापरली जाणारी ” घंटा ” मात्र कधीच विसरली जाणार नाही हे बाकी नक्की!

माझ्या गरीबाच्या झोपडीत

माझ्या गरीबाच्या झोपडीत नसेल ऐश्वर्य, सोन,चांदी
आहे प्रेमाची चटणी भाकर, आणि ममतेची कढी,.....
माझ्या गरीबाच्या झोपडीत नसेल शावर, आणि एसी ,
आहे ते शांतीच दालन, जिथे मिळेल शांत झोप,
माझ्या गरीबाच्या झोपडीत नसेल भरझारी कपडे, अंनि पैठणी
आहे मायेची गोधडी, तिला प्रेमाची झालर,......
ये न माझ्या झोपडीत तुझ्या नाजूक पावलांनी, नको आणूस सोनं चांदी,
भर घाल प्रेमाची नी ममतेची , ....
तेव्हा माझं मरण आल दारात, त्याला मी थोपविण
थांब माझी सखी आली तिला नको रडवूस .....
ती गेल्यावर , तिच्या आठवणीत
आनदाने तुझ्याबरोबर येईन......



जव निधर्म होता कौर्य
गाजवी धर्म, जागती शौर्य
तख्त झुकावितो, औरंग्यास रडवितो
असा मर्द शिवबाचा
"शंभूछावा"...!!

शंभू समशेरीचे पुण्य
जाहली स्वराज्य दौलत
बेशक, राणमर्द मराठा
असा मर्द शिवबाचा
"शंभूछावा"...!!

काळ समोर उभा
तरीही
ललकारीतो नभा
धर्मवीर हा मराठा
शेर शिवबाचा
"शंभूछावा"...!!

काय बाई सांगू, कसं गं सांगू ?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज

उगीच फुलूनी आलं फूल
उगीच जीवाला पडली भूल
त्या रंगाचा, त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले साज


जरी लाजरी झाले धीट
बघत राहीले त्याला नीट
कुळवंताची पोर कशी मी
विसरुन गेले रितरीवाज

सहज बोलले हसले मी
मलाच हरवून बसले मी
एक अनावर जडली बाधा
नाही चालला काही इलाज

मैत्री करत असाल तर....


मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा

वारा गाई गाणे

वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे

या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने

आज वेड हे कुणी लाविले ?
अंतराळी का पडती पाऊले ?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ?

गीतकार :जगदीश खेबुडकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :संसार

प्रेमासाठी वेचलेले

प्रेमासाठी वेचलेले मी,या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .

उडाली पाखरे घरट्यातुनि , साद घालती भविष्याला
मनी सतत तिच्याच आठवणी,दोष का वेड्या मनाला ?
ओढ कसली तरी अनामिक,आठवणींच्या रेशमी धाग्यांना ……….. १

भेटली अशीच ती पर्वानंतर,वाचा फुटली नजरेला
वेचला होता मकरंद आपण एकाच प्रेम-फुलातला
चोरुनी नजरा तिने दिली कबुली, हवास तूच या डोळ्यांना !! ……..२

शब्दही सुचले सूरही जुळले, गावे कसे या गीताला ?
व्यक्त करावे प्रेम कसे ? उत्तर नसते या कोड्याला
अडखळली परत ही वाचा म्हणून, कवितेत उतरविले शब्दांना ………..३

प्रेमासाठी वेचलेले मी , या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .


- ऋषिकेश पाटील

मौनातच अर्थ सारे

नजरा नजर होताच आमुची
चाफेकळी सम ती फुलली होती
ओठांवरती स्मित हास्य पसरले
लाजून नजर अन तिने चोरली होती ….

केतकी चेहरा तिचा
गुलाबापरी रंगला होता
गजरयातल्या जाईचा सुगंध
माझ्यापर्यंत पोचला होता ……

नजर झुकलेली अन
चालीचा वेग मंदावला होता
मोगरा लावण्याचा
नखशिखांत बहरला होता …..

इच्छा असली मनात जरी
नजर तिने उचलली नव्हती
कसलीही रीत लाजण्याची,
कुणाची तरी का भीती होती ?…..

हिरावू नकोस प्रिये तू,
भाग्यातला हा क्षण एकदाचा
तुझ्या डोळ्यात पाहू दे ग मला,
तरल भाव तो प्रेमाचा ……

हलकीच उमलली पापणी हिमतीने शेवटी
बांध तुटले संयमाचे
शब्दात कसे तरी सांगू मित्रहो,
अबोल भाव ते प्रीतीचे ……

नजरेचा कट्यार तिच्या
काळजात हळुवार घुसला होता
गुलाबाचा काटा मनात
कुठेतरी खोलवर रुतला होता……..

स्तब्द्ध होते विश्व भोवतीचे
धुंद होते भाव सारे
नजरेचीच फक्त भाषा
अन मौनातच अर्थ सारे …….


ऋषिकेश पाटील

भरोसा


भरोसा ठेवला ज्या सावलीवर..
त्याचे सूर्याशी कधीचेच नाते होते..

मी पाहिली वाट तुझी कितीक
त्या वाटेवरून आधीच कुणी गेले होते..

वा-याशी सलगी कराया निघालो..
त्याने आधीच तुला छेडले होते..

किती पाणीशार डोळे तुझे ते
का पाहण्याआधी मी ते रडले होते..

पाऊस आला आणि गेला
मज सोडून तुलाच त्याने भिजविले होते..

तुला नजर लागण्याची चिंताच नव्हती…
नजर लागणा-या सर्वांनी.. तुला पहिले होते…


शशी गराडे

गोष्ट एक स्वप्नातली .....


गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..
ओठांच्या पाकळ्या फुलताना ,
त्यांना मी काय म्हणू ?
लाघवी हास्य ते,गुलाबाचे फुल जणू……..

घायाळ तुझ्या नयन तीरांनी ,
शुद्धीत कसा मी राहू ?
मादिरेच प्यालाच तो,शिंपल्यातील मोती जणू ………..

न्हालेल्या त्या केसांचा,
सुगंध कसा मी घेऊ ?
पावसाळी मेघ ते,मोरपंखांचा पिसारा जणू ……

गालावरची खळी तुझ्या,
नजरेत कसा या साठवू ?
सौंदर्याच्या मंदिराचा,सोनेरी तो कळस जणू …..

मखमली कांती तुझी ,
रंगात कसा मी सांगू ?
बदामी तारुण्य ते,केवड्याचे फुल जणू ………

हरिणीची चाल तुझी ,
शब्दात कसा मी रेखू ?
सडा पारिजातकाचा मागे , चंद्राची तू कोर जणू …….

मलमली तारुण्य तुझे ,
शब्दांत कसा मी बांधू ?
शब्दच रिते माझे, सौंदर्याचा शब्दकोष तू ………….

ऋषिकेश पाटील

हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही …

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला 'शब्द' तिला आठवायचा नाही ..!!

तेव्हा आले सगळे बघायला

होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,


जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,


आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

भिजून घ्या

पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

पहिला पाऊस

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

र्बमगठिव्का


अलीकडेच सातार्ला (साताऱ्याला) जाण्याचा योग आला. इथेही मोबाईल (इकडे शेल्फोन म्हणतात)धारकांची वाढती संख्या सहज नजरेत भरण्यासारखी होती. ज्याला पाहावे त्याच्या मोबाईल हाताला आणि हात कानाला. इथल्या शेल्फोनधारकांच्या संभाषणात ‘र्बमगठिव्का’ आणि ‘र्बमगठिव्तो’ हे दोन शब्द पुन:पुन्हा उच्चारले जात होते. ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं व्हायला आलं, मात्र ‘र्बमगठिव्का’ ही काय भानगड आहे याचा मला काहीच उलगडा होत नव्हता. कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे संभाषण अगदी जीवाचे कान करून ऐकू लागलो. यातून एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला. खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत फेरफटका मारताना ‘र्बमगठिव्का’चा उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी ऐकली त्यातले काही तुकडे जरी आपण ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन शब्दांची नक्कीच भर पडेल. तर ऐकूया

संभाषण नं. १.

क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय. कंचा हाय तुजा?
ख : माजा यार्टेल (एअरटेल). तुझा ?
क : माजा ब्येस्नेल (बी.एस.एन.एल.)
(कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य पर्याय आहेत. कौरेच, कौरेज, कव्रेज, करवेज आणि कर्वेजसुद्धा.)
ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान् वडाफोनचंबी टावरं झाल्याती. आन् रिंज (रेंज) बी बरी घाव्ते.
क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये.
ख : हौ ऽऽ वडा वडाच. आर्पय्ला आरिंज म्हंजी संत्र न्हव्तं का, मगं हुच (HUTCH) झालं. आनात्ता वडाफोन.
आणखी बरंच काही संभाषण होत असतं. त्यात अधूनमधून ‘र्बमगठिव्का’ व ‘र्बमगठिव्तो’ ही चालूच असतं.

* * * * *

संभाषण क्र. २..

ग : आर्तुहाय्स कुठं, पंध्रा दिस झालं सार्खा ट्राय कर्तुय सरख आप्लं वेट्वची टॅप वाज्तीय. बर्तुजा म्हात्रा आजा कसाय ? (‘कसाय’चा अर्थ ‘कसा आहे’ असा घेणे)..
घ : आर्आजाला गाच्कुन पंध्रा दिस झालं की.
ग : हात्तिच्यामाय्ला! र्आमग येकाद् यश्मेस करायचा का न्हाय.
आणखी बरंच काही आणि अधूनमधून ‘र्बमगठिव्का’.

* * * * *

संभाषण क्र. ३

ट : आर्तुजी क्वालर्टुन (कॉलरटय़ुन) बादाल्ली वाट्टं.
ठ : व्हय. जाला की म्हैना, आन् रिंग्टुनबी बदली केलीया. कराची का तुला डांलोड (डाऊनलोड)?
ट : करू की मंग कवातरी. तुज्यात कोंचं शिम्कार्ड हाय म्हंलास.
ठ : माज्यात बीप्येल (बी.पी.एल.)
ट : टॉक्टाय्माचंय का बिलाचंय?
ठ : त्ये काय ठावं न्हाय गडय़ा. तातु म्हन्ला व्हता पिर्पेट (प्रीपेड) क् काय हाय. पन रिंज न्हाय गडय़ा.
ट : आमच्याकड् रिलांसनटाटाची बरी घाव्ते (रेंज). घरात वाईच नेटवरचा (नेटवर्कचा) प्राब्लेम अस्तो. बाकी बाज्रारात झ्ॉक.
आणखी बरंच काही बोलणं होत असताना मध्ये मध्ये ‘र्बमगठिव्का’ ‘र्बमगठिव्तो’ होतच असतं.

* * * * *

संभाषण क्र. ४

ड : तुजा हँशेट कोंचा हाय रं ?
ढ : माजा नोक्या. लाँग्लाय्फची (लाँग लाईफ) बॅट्री नोक्याचीच गडय़ा.
बाकी मोट्रोला, सामसुम, येरिक्शन, येल्ची बिल्चीचं काय बी खरं न्हाय बग.
तुजा कोंचा हाय ?
ड : माजाबी नोक्याच हाय. यफ यम, रेडोन्क्यॅम्रा (रेडिओ अन् कॅमेरा)बी हाय.
ढ : माज्यात बी हाय रं. माज्यात विडो
(व्हिडीओ)बी हाय आन् चार जीभीची (जी.बी.) मेम्री पन् हाय.
आणखी बरंच काही बोलणं होत असतं आणि मध्ये मध्ये र्बमगठिव्का. या सगळ्यांबरोबरच मध्ये मध्ये ‘आर्पन’ (अरे पण),
‘हात्तिच्यामाय्ला’, ‘च्या माय्ला’ आणि ‘चॅआय्ला’ अशा ठराविक शब्दांचा योग्य आणि अयोग्य ठिकाणी भरपूर वापर होत असतो. बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ मी लावू शकत होतो परंतु हे ‘र्बमगठिव्का’ माझी पाठ सोडत नव्हतं. शेवटी न राहवून एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा त्याला मुद्दामच विचारलं.
मी : हे ‘र्बमगठिव्का’ म्हंजे काय राव?
नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला, ‘भायर्न आलाय दिस्तासा.’
मी : हो, मुंबईहून.
मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये (विथ अ‍ॅक्शन) त्याने मला समजावलं. ‘र्बमगठिव्का’ म्हंजी, र्बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का. म्हंजी फून (फोन) ठिवू ऽऽ क्काऽ’
(हात्तिच्या मा.. माझ्या तोंडात आलंच होतं. मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही.) ‘र्बमगठिव्काच्या’ गुंत्यातून एकदाचा मोकळा झालो. डोकं हलकं हलकं झालं. इतका साधा सरळ शब्द मला कळला कसा नाही. विचार करतच होतो इतक्यात माझा शेल्फोन वाजला. मी हॅलो बोलायच्या आतच पलीकडून जोरात आवाज आला.
‘आर्हाय्स्कुठं तू? कवा धर्न ट्राय कर्तुया तुझा सार्खा आप्ला सीचहॉप (स्वीच ऑफ), वेट्व नाय्त आप्लं बीजी.’
मी : कोण बोलताय ?
पलिकडून : आर्मीसर्जा (अरे मी सर्जा).
या सातार्करांची सर्व शब्द जोडून एक वाक्य एका शब्दात बोलण्याची कला मात्र फक्कड हाय बगा. मी कोणा सर्जाला ओळखत नव्हतो. त्याच्याकडून चुकून माझा नंबर लागला गेला असावा. तरीसुद्धा थोडी मजा करावी म्हणून जोरात ओरडून-
मी : आर्पन हिथ्लं नेटवर पार ढय़ापाळंय बग. माजा आव्टाफकौरेचज झालाय. बाज्रात पोचल्याव मंग मीच लावतो तुला, र्बमगठिव्का ?
सर्जा : आर्पन.. मला... आर्र..
त्याचं बोलणं तोडत मी ‘र्बमगठिव्तो’ बोलून (जवळ जवळ ओरडूनच) माझा शेल्फोन सिचहॉप केला.

बघा पटतंय काय ?


1. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?

२. अनुभवी डौक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?

३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?

४. बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?

५. "फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?

६. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?

७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?

८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?

९. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?....

१०. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?

११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?........

१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?

१३. "पार्टी" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते?............

१४. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?

प्रेम तुझं खरं असेल तर

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं!!
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं

आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU "

का असे घडावे?

मी झुरावे अन तुला काहीच न कळावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

मी पाहता नभी मेघही सरावे
मेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

यातनांनी मनीचे रान भरावे
आसवांनी उरीचे बंध तुटावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावेसांगना का असे घडावे?
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?
बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या
मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?
मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता,
समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे.....

डकवर्थ लुईस

नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?



कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.

आळशी माणसं


"आळशी माणसं खुप हुशार असतात". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे.

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर.

ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे.

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही?

असेनही किंवा दिसेनही


असेनही किंवा दिसेनही
तुझियासवे नसेनही ॥ धृ॥

शब्द तुझे आठवतीलही
शब्द काही विसरतीलही
आता मन कोरा कागद
तुझ्यासामोरी असेलही ॥१॥

म्हणे कोणी दिलेल्याची
करू नये वाच्यता
म्हणे कोणॊ घेतल्याची
करू नये उपेक्षा ॥२॥

वळताना या वळणावरती
रिक्त हस्त असेनही
किंवा माझ्या मनातली
भावना मी जपेनही ॥३॥

हा आला सामोरी
काव्य सत्याचा आरसा
त्यात माझी प्रतिमा
कदाचित मी पाहीनही ॥४॥

ओळखीचे वा अनोळखी
असतील ते कोणीही
वार त्यांचे झेललेले
माफी किंवा परतवेनही ॥५॥

प्रेम , वात्सल्य , ममता
तुझिया सवे अनुभवले
तटस्थ मागे बघताना
गुणदोषांना मी दाखवेनही ॥६॥

पाहिजे मज स्पष्ट्ता
मन आणि विचारातही
दोन मुखांनी बोलताना
खंजीर काही खुपसतीलही ॥७॥

मी ना अवखळबाला
ना मी पदभिकारी
समजून असे चालताती
मुक्त त्यांना करेनही ॥८॥

गुंत्यात मी गुंतलेही
फसले किंवा फसवलेही
नीजधामी मम जाताना
आत्म अवलोकन करेनही ॥९॥

तो नियंता जाणतोही
मम आत्मा ना ऋणी
आत्मजा मम म्हणताना
"आदिमाया" मी असेनही ॥१०॥

सोनाली - आदिमाया

फरक


शिक्षक : गण्या ... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायव्हरमध्ये काय फरक आहे ...?
.
.
.
.
.
.
गण्या : कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकिट नाही निघणार..आणि ड्रायव्हर झोपला... तर.. सर्वांचीच तिकिटं निघतील...

प्रेमाच अजिर्न


हम्मा गाय येते येते

बाळाला दूध देते देते

दूध पिऊन बाळ खेळे

खेळताना तर दूर पळे

माउली आई येते येते

बाळाला पापा देते देते

प्रेमाचा पाऊस