दगडाची पार्थिव भिंत

मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी।।

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार।।

आभाळ म्हणाले 'नाही' - भूमिही म्हणाली 'नाही'।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही।।

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही।
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या 'बाही'।।

दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली।
'मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही' असे ती वदली।


कवी - मनमोहन नातू

दीवटी

आधी होते मी दीवटी
शेतकर्यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मीणमीणती!!

समई केले मला कुणी
देवापुढती नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत कालासा धूर!!

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती
मीच त्यातील प्री ज्योती !!

ब्त्तीचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बर्वे
वरात मज वाचून अडे
झ्ग्झ्गाट तो कसा पडे!!

आता झाले मी बीज्ली
घरे मंदीरे ल्ख्ल्ख्ली
देवा ठाउक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे .

एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जलो अन् जग उजलो!!


कवी - वी. म. कुलकर्णी

बाबा

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !


कवी - ग. दि. माडगूळकर

मी विझल्यावर

मी विझल्यावर
त्या राखेवर
नित्याच्या
जनरितीप्रमाणे
विस्मरणाचे
थंड काजळी
उठेल थडगे
केविलवाणे

मी विझल्यावर
त्या राखेवर
पण कवण्या
अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या
कविता माझ्या
धरतील
चंद्रफुलांची छत्री


कवी - बा. भ. बोरकर

झुळुक

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा


कवी - दामोदर कारे

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी


कवी -वि. म. कुलकर्णी

चढवू गगनी निशाण

चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःशांतीचे, समतेचे अन् विश्वशांतीचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेजमहान

मुठ न सोडू जरी तुटला कर, गाऊ फासही जरी आवळला तर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरी शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगूनी पाषाण

विराटशक्ती आम्ही मानव, वाण अमुचे दलितोद्धारण
मनवू बळीचा किरिट उद्धट ठेवुनी पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण


कवी - बा. भ. बोरकर

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले


कवी - बा. भ. बोरकर.

बाभुळझाड

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll


कवी - वसंत बापट

सौंदर्याचा अभ्यास कर!

गाणें हें रचिले असें जुळवुनी कोठून कांहींतरी,
वाणी सत्य तुझी असेल भरली द्वेषानलानें जरी;
रम्याकार चमत्कृतिप्रचुर हें ब्रह्मांड नेत्रीं दिसे.
खेळे कांहिंतरीं तयांतुनि, मनीं गाणें तदा होतसे.

सूर्याची किरणें, सुनिर्मल तशा त्या तारकामालिका,
संध्येचे रमणीय रंग, उदयीं सृष्टी मनोहारिका,
वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलद्‍दूर्वादलाच्छादिता,
वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता;

प्रेमाने अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वीं दिसे;
चित्ताची रमणीयता उतरुनी संगीत होतें तसें
तें सौंदर्यच आणीलें जुळवुनी कोठून कांहीतरी.
तूंतें तें न दिसे म्हणून सखया अभ्यास याचा करी.


कवी - बालकवी

चाफेकळी

"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"

ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घ्रर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें"

"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."

सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी,--


(हि कविता बालकवींच्या देहान्तामुळे अपूर्णच राहिली )

कवी - बालकवी 

शून्य मनाचा घुमट

शून्य मनाच्या घुमटांत
कसलें तरि घुमतें गीत;
अर्थ कळेना कसलाही,
विश्रांती परि त्या नाहीं;
      वारा वाही,
      निर्झर गाई,
      मर्मर होई.

परि त्याचे भीषण भूत
घोंघावत फिरतें येथ.
दिव्यरूपिणी सृष्टी जरी
भीषण रूपा एथ धरी;
जग सगळे भीषण होतें
नांदाया मग ये येथें;
      न कळे असला,
      घुमट बनविला,
      कुणीं कशाला?--


कवी - बालकवी


आत्मारामाची भूपाळी

उठा प्रातःकाळ झाला । आत्माराम पाहूं चला ।
हा समयो जरिं टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ध्रु०॥

जीव-शिव दोघेजण । भरत आणि शत्रुघन ।
आला बंधु लक्षुमण । मन उन्मन होऊनी ॥१॥

विवेक वसिष्ठ सद‌गुरु । संतसज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु । हर्षनिर्भर होउनियां ॥२॥

सात्त्विक सुमंत प्रधान । नगरवासी अवघे जन ।
आला वायूला नंदन । श्रीचरण पाहावया ॥३॥ 

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !


कवी - बालकवी

मधुयामिनी

मधुयामिनि नील-लता
हो गगनीं कुसुमयुता
धवलित करि पवनपथा
कौमुदि मधु मंगला--

दिव्य शांति चंद्रकरीं
आंदोलित नील सरीं
गिरिगिरिवरि, तरुतरुवरि
पसरे नव भूतिला--

सुप्रसन्न, पुण्य, शांत
रामण्यकभरित धौत
या मंगल मोहनांत
विश्वगोल रंगला.


कवी - बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबरही | साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें |
रामा जनार्दनी | पायीं मस्तक ठेविलें || ३ ||


रचनाकर्ते - समर्थ रामदास स्वामी

लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला

बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन

नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

माहेर

बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी
दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी

गांवामधी दबदबा बाप महाजन माझा
त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा

माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली

तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुले
तुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले

भाऊ 'घमा' गाये घाम 'गना' भगत गनांत
'धना' माझा लिखनार गेला शिक्याले धुयांत

आम्ही बहीनी 'आह्यला' 'सीता, तुयसा, बहीना'
देल्या आशीलाचे घरीं सगेसाई मोतीदाना

लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल
माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल

जीव व्हती लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन
पाय पडतां 'लौकींत' शीन जातो निंघीसन

तापीवानी नही थडी जरी वाहे थोडी थोडी
पानी 'लौकी'चं नित्तय त्याले अम्रीताची गोडी

माहेरून ये निरोप सांगे कानामंधि वारा
माझ्या माहेराच्या खेपा 'लौकी' नदीले विचारा !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

जीव देवानं धाडला

जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'

दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली

नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन

आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!

येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप

ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन

अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा

हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास

जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आदिमाया

आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?

बारा गाडे काजळ कुंकू पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?

धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

इडा पिडा संकटाले देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?

बरह्मा इस्नू रुद्र बाळ खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

नशीबाचे नऊ गिर्‍हे काय तुझ्या लेखीं?
गिर्‍ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?

नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

घरोट

देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट
सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट
अरे, घरोट घरोट वानी बाम्हनाचं जातं,
कसा घरघर वाजे त्याले म्हनवा घरोट

अरे, जोडतां तोडलं त्याले तानं म्हनू नहीं
ज्याच्यांतून येतं पीठ त्याले जातं म्हनूं नहीं
कसा घरोट घरोट माझा वाजे घरघर
घरघरींतून माले माले ऐकूं येतो सूर

त्यांत आहे घरघर येड्या, आपल्या घराची
अरे, आहे घरघर त्यांत भर्ल्या आभायाची
आतां घरोटा घरोटा दयन मांडलं नीट
अरे, घंट्या भरामधीं कर त्याचं आतां पीठ

चाल घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
तुझ्या घरघरींतून पीठ गये भरभर
जशी तुझी रे घरोटा पाऊ फिरे गरगर
तसं दुधावानी पीठ पडतं रे भूईवर

अरे, घरोटा घरोटा तुझ्या माकनीची आस
माझ्या एका हातीं खुटा दुज्या हातीं देते घांस
अरे, घरोटा घरोटा घांस माझा जवारीचा
तुले सनासुदी गहूं कधीं देते बाजरीचा

माझा घरोट घरोट दोन दाढा दोन व्होट
दाने खाये मूठ मूठ त्याच्यातून गये पीठ
अरे, घरोटा घरोटा माझे दुखतां रे हात
तसं संसाराचं गानं माझं बसते मी गात

अरे, घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटीं
दाने दयतां दयतां जशी घामानं मी भिजे
तुझी घरोटा घरोटा तशी पाऊ तुझी झिजे

झिजिसनी झिजीसनी झाला संगमरवरी
बापा, तुले टाकलाये टकारीन आली दारीं !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

दया नही मया नही

दया नही मया नही, डोयाले पानी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी

केसावार रुसली फनी
एकदा तरी घाला माझी येनी

कर्‍याले गेली नवस
आज निघाली आवस

आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही
टाया पिटीसनी देव भेटत नही

पोटामधी घान, होटाले मलई
मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई

तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला
पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला

मानसानं घडला पैसा
पैशासाठी जीव झाला कोयसा

मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर
दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर

डोयाले आली लाली
चस्म्याले औसदी लावली

वडगन्याले ठान नही
घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही

म्हननारानं म्हन केली
जाननाराले अक्कल आली


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

किडन्या

झंप्या : आपल्या दातांचं रक्षण कोण करत ?

डेँटीस्ट : कोलगेट

झंप्या : कशी ??

डेँटीस्ट : ते आपल्या दातांना किडन्यापासून वाचवत.

झंप्या : (डोके खाजवून ) पण किडन्या तर पोटात असतात ना.... 

राजा शेतकरी

जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी
सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी

कारामधी रोखठोक नही उसनउधारी
दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी

असा राजा शेतकरी चालला रे आढवनी
देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी

बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली
पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली

हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले
हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले

अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर
शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर

इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप
देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

अरे रडता रडता

अरे रडता रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले
आसू सरले सरले माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
 झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली
देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव
कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत
नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव



कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आई वडिल

न्हाननी माझा घर,

सप्या लोट्यांनी दिसे थोर.

कापसाच्या गादयेवर

पटी वाचिता माझो बाळ.

दारातले केळी,

वाकडा तुझा बौण

नेणता तान्हा बाळ

शिरी कंबाळ त्याचा तौण

जायेच्या झाडाखाली,

कोण निजलो मुशाफिर,

त्याच्या नि मस्तकावर,

जायो गळती थंडगार, 

परिपक्व झाडे

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…


 कवी - द. भा धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

निळा पारवा

वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.

डोळ्यावरती राखी ढापण,
लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.

-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;
टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.

जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षी…
कुणी घासली चोच तयावर;
कुणी घातली शिळ तयाला;
ऐकवैली…पंखाची फडफड;
दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.
गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;
झुलवित अपुले पंखे,
झुलवित त्याला.

पुन्हा दचकला निळा पारवा’
मनात भरले वारे
पिसा पिसातुन थरथरणारे;
फुगली पंखे;
उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;
मान ताठली जरा खालती
झेंप भाराया…

तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.
भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,
एकच माणिक , झगमगणारे.

पुन्हा टेकले पाउल खाली;
नितळाई ये पुन्हा पिसांवर
-आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.


कवियत्री - इंदिरा संत

दगड

किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन…

किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.

चुकले नाही… चढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;
चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…

थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन


कवियत्री – इंदिरा संत

रक्तामध्ये ओढ मातीची

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे


कवियत्री - इंदिरा संत

जशी ती

तो कधी येईल, कधी न येईलकधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहिल, कधी न लिहिल
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती…………..
बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी.
म्रूत्युसारखी.

त्या अनिश्चितीच्या ताणांच्या धाग्यात
तिचे पाय गुंतणार, काचणार……..
कोलमडणार….
पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली
या अस्मानापासुन त्या अस्मानापर्यंत
अशी ती एक मूक्ता
वार्यासारखी. जीवनासारखी.

कवियत्री - इंदिरा संत

मामुली ऑपरेशन

 गणपतरावांच पायाच ऑपरेशन व्हायचं होत ; पण ऐन वेळेला ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी धूम ठोकली
आणि ऑपरेशन काही झाल नाही .

विलासरावांनी विचारलं 'का हो' अस का केलेत तुम्ही ?

मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेल . डॉक्टर मला भूल देण्याची तयारी करत होते .आणि नर्स म्हणाली ..........

'घाबरू नका , मामुली तर ऑपरेशन आहे' आणि ते ऐकून मी तिथून धूम ठोकली गणपतरावांनी सांगितलं .

ही मात्र हद्दच झाली ह गणपतराव . मामुली ऑपरेशन आणि नर्स एवढी धीर देत असताना तुम्ही पळालात ? विलासराव आशचर्य चकित होऊन म्हणाले .

'अहो तसं नव्हे ती नर्स डॉक्टरांना धीर देत होती ' गणपतरावांनी खुलासा केला .

ग्लोबलायझजेशन

ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन
म्हणजे नेमक असत काय?

आमच्या गल्लीत त्यांची दुकाने
गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय!
आणि दुसरे सांगा काय!

आमचा मळा, आमचा माळी
त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली
याहून दुसरे सांगा काय?

 आमचे मास्तर त्यांच्या शाळा
त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर
याहून दुसरे सांगा काय?

त्यांच्या कंपन्या आमची माणसे
बिनभांडवली व्याज आपले
असा ऍडव्हांटेज दुसरे काय?

होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी
भेटवस्तू मेड इन चायना
ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय?

जग म्हणजे एक लहान गाव
मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव
हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे
आणखी काय!

- मुक्तछंदा

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे

निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी.
शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.
नव्हती जाणिव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे,उभे रहावे.
पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठि
उरते पदरी तिच आठवण,
निवडुंगाच्या शीर्ण फ़ुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…


कवियत्री - इंदिरा संत

आला केसराचा वारा

प्रभातीच्या केशराची कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला असा केशरी उल्हास!

रंगा गंधाने माखून झाला सुखद शितळ
आणि ठुमकत चालला शीळ घालीत मंजुळ!

हेलावत्या तळ्यावर वारा केशराचा आला
लाटा -लहरी तरंगानी उचंबळुन झेलला!

नीळे आभाळ क्षणात तळ्यामधे उतरले!
एकाएकी स्तब्ध झाले!!

नऊ सुर्याची मुद्रीका सीतामाईने टाकली
इथे काय प्रकटली!

तळ्याकाठी माझे घर , उभी दारात रहाते
हेलावत्या केशरात स्वप्ने सुंदर पहाते

केशराचे मंज माझा मनावर चमकले!
आली किरणे तळ्याशी दारातुन आत आले

मनातील बिंदु बिंदि निगुतीने गोळा केले
तळ्यावरच्य़ा शेल्यात घट्ट गाठीने बांधले


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

चुकून चुकून

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …

शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम

कधि कुठे न भेटणार

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच
मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार


गीत – इंदिरा संत
संगीत – गजानन वाटवे
स्वर – रंजना जोगळेकर

बाकी

होते का ते नुसते
येणे आणिक जाणे
होत्या का त्या नुसत्या गप्पा
क्षेमकुशल अन स्मरणे ;होते का ते नुसते फिरणे -
करड्या चढणीवरुणी
हिरवी उतरण घेणे
होते का ते नुसते बघणे
क्षितीजावरची चित्र लिपी अन
पायाखालील गवतावरची
तुसें रेशमी
निवांतवेळी
आभाळाच्या पाटीवरती
हिशोब मांडू बघता
उरते बाकी
चंद्र घेतला जरी हातचा
तरीही उरते बाकी.




कवियत्री - इंदिरा संत

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!


कवियत्री - इंदिरा संत

पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी

अजूनही तिन्ही सांज

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

“ऐक जरा ना”

ऐक जरा ना…….
अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलावर;
एकाकीपण आले पसरत
दिशादिशातुन.

घेरायास्तव…..
एकटीच मी
पडते निपचित मिटुन डोळे.

हळुच येते दार घराचे
अंधारातुन;
उभे रहाते बाजुला.

“ऐक जरा ना….”
आठवते मज ती… टकटक
त्या बोटांची;
शहारते अन रंगरोगणाखाली
एक आठवण,
गतजन्मीची;
आभाळातुन पडणार्या त्या थेंबाची

“ऐक जरा ना”
दंडावरती हात ठेवुनी
कुजबुजते आरामखुर्ची.

“आठवते का अजुन तुला ती
कातरवेळा.
माहित नव्हते तुजला,
वाट तुझी तो पहात होता
मिटून डॊळे.
होते दाटुन असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत काळी;
अजुन होते मजला जाणिव
निबिड वनांतिल….
मध्यरात्रिच्या वावटळीची
-झपाटल्याची”

“ऐक जरा ना “
कौलारांतुन थेंब ठिबकला
ऒठांवरती.

“ऐक ना जरा….एक आठवण.
ज्येष्ठामधल्या – त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षित से
तया कोंडले जलधारांनी
तुझ्याच पाशी.

ऊठला जेंव्हा बंद कराया
उघडी खीडकी,
कसे म्हणाला…….
मीच ऐकले शब्द तयाचे…
’या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय’

-धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वस्तुतुन , त्या पाण्यातुन,
दिशादिशातुन,
हात ठेवुनी कानावरती;
ऐकु न यावे शब्द कुणाचे;
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - म्रुगजळ

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा

   
    कवियत्री  – इंदिरा संत
    संगीत     – कमलाकर भागवत
    स्वर        – सुमन कल्याणपूर

आई

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.



कवियत्री -  इंदिरा संत

बाहुली

एक बाहुली हरवते तेव्हा
दुसरई साठी हटुन बसते;
नवी मिळता,नाचतं नाचतां
ती ही कुठे हरवून जाते.
किती किती नि कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या;

पिवळी रंगीत लाकडाची ठकी,
तांबुस काळी चंदनाची कंकी,
आवाज काढणारी रबराची पिंपी,
उघड मीट डोळ्यांची कचकड्यांची चंपी,
मण्यांच्या झग्याची काचेची सोनी,
बिंदी बिजवऱ्यांची कापडाची राणी
किती किती नी कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या.

खेळाचा पेटारा उघडुन पाहिला,
संसार सारा धुंडुन पाहिला,
ढगात धुक्यात शोध गेतला,
स्वप्नांचा ढीग उपसुन झाला…
किती किती नी कसल्या कसल्या
माझ्या मी हरवुन बसल्या.


 कवियत्री - इंदिरा संत

कुब्जा

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ ॥ १ ॥

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकून आपुले तनमन ॥ २ ॥

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डॊळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ॥ ३ ॥


कवियत्री : इंदिरा संत (१९७५)
गायिका: सुमन कल्याणपूर
संगीतकार: दशरथ पुजारी

तवंग

शेतावरती इथे नाचणी कशी बिलगते पायाभवती;
थरथरणारी नाजुक पाती इतुके कसले गूज सांगती

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर….!!


कवियत्री - इंदिरा संत

आक्रोश

दिसु नको, दिसु नको,
नवी रीत मांडु नकॊ
येउ नको, येउ नको,
प्राण माझा कोंडू नको…

नवे अनोखे बेट,
नवे रेशमाचे फास
आणि मनाच्या तळाशी
नको नको चा आक्रोश..


कवियत्री - इंदिरा संत

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्य़ांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे . गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापुर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.


कवियत्री - इंदिरा संत

थेंबाथेंबी

तारेवरती असती थांबुन
थेंब दवाचे;
मनांत ज्यांच्या,
इवले काही, हिरवे पिवळे
चमचमणारे……
सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनांत ज्यांच्या ,
इवले कांही, निळे- जांभळे
झनझनणारे…….
मनोमनावर असती थांबुन
थेंब विजेचे;
छेडुन तारा करांगुलीने.
ऒठ करावे पुढती
टिपायला ती थेंबाथेंबी.

कवियत्री - इंदिरा संत

वेदना

इथे वेदना लालतांबडी;
इथे बधिरताअ संगमरवरी;
इथे उकळते रक्त तापुनी,
बेहोषी अन येथे काळी.
दुखणे बसले चिंध्या फाडित.
गर गर फिरती त्याचे डोळे
नसांनसातुन.
घुमते त्याचे हास्य भयानक
उरल्या सुरल्या रक्त कणांतुन
समोर त्याच्या
करते नर्तन …..एक आठवण
त्या प्रलयाची.
हे कथ्थक…त्या मुद्रा…..
अन ते खर्जातले कंपन.


कवियत्री – इंदिरा संत

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?

नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;

आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली….



कवियत्री - इंदिरा संत

हिमोग्लोबिन कमी झालय

मंग्या पॅथोलोजी मध्ये काम करणारया अंजूच्या प्रेमात पडला,
तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने स्वताच्या रक्ताने प्रेमपत्र लिहील,
तिला ते पत्र देत तो मस्करीत म्हणाला " मला याचा रिपोर्ट कळव".
चलाख अंजूने दुसरया दिवशी त्याच्या हातात एक चिट्ठी ठेवली,
मंग्याला वाटल पोरगी पटली, त्याने चिट्टी उघडून पहिली,
...त्यात लिहील होत,

"रक्तगट O+ आहे फक्त हिमोग्लोबिन कमी झालय"

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं

आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

फिरले रे ग्रह माझे फिरले रे

फिरले रे ग्रह माझे फिरले रे
ओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढीने, भुलले रे मन माझे भुलले रे

लेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्यापुढे
गरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे
या वेडाने, या वेडाने, लावीले शनीचे फेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, तुटले रे जन माझे तुटले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....


विचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....


कवी - सुभाष डिके

ही निकामी आढ्यता का?

ही निकामी आढ्यता का? दाद द्या आणि शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरीतो का? चोरीता का व्हाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किवा पाकळी

दाद देणे हे ही गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवांचे आणि वायूचे घट

नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्य्तले की वेचीत येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोण लावीत ये दिपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा


कवि - आरती प्रभू

भारताचे पोलिस

 एकदा अमेरीका, चीन आणि भारत ह्या तीन देशाच्या पोलिसांमध्ये शर्यत लागली, की जंगलामध्ये सर्वात प्रथम अस्वलाला कोण पकडत?

प्रथम चीन देशाचे पोलिस जंगला गेले त्यांनी अस्वलाला दोन तासात पकडल.

नंतर अमेरीक पोलिस जंगलात गेले त्यांनी दिड तासात अस्वलाला पकडुन आणल.

शेवटी भारताचे पोलिस जंगलात अस्वल पकडण्यासाठी गेले. ते अर्ध्यातासात परत आले. त्यांनी एका माकडाला पकडुन सर्वांनसमोर हजर केले. सर्वांना आश्चर्य वाटले की ह्यांना अस्वल पकडायला पाठवले आणि हे माकड पकडुन घेऊन आले?

तेवढ्यात एका भारतीय पोलिसाने त्या माकड्याच्या कंबर्ड्यात लाथ घातली. तसे ते माकड ओरडु लागल, "हो मीच ते अस्वल".

आई म्हणोनी कोणी

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे



कवी - यशवंत

जाती-प्रजाती

तुझ्या प्रत्येक स्वप्नाला दिली मी मूठमाती
रिकामे भाळ घेउन धाय मोकलतात राती

कुणासाठी कुणी मेले तरीही नाव नसते
पतंगाचे दिव्यावर प्रेम, जळती तेल-वाती !

स्वत:चे स्वप्न आवडते मला तुकड्यांत बघणे
म्हणुन आलो तिच्या लग्नात मी वेडा वराती !

कुणी मुलगा, कुणी दासी, कुणी तर प्रेयसीही
तुझ्या सगळ्याच भक्तांची तुझ्याशी भिन्न नाती !

नको तू भेदभावाला 'जितू' मानूस कुठल्या
तरी हर एक अर्जावर लिही जाती-प्रजाती !



कवी - रसप(रणजित पराडकर)

एकटा

एकटी स्वप्न माझी ,
मी स्वप्नातही एकटा.
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा.

ओळखिच्या माणसांना

समजलो सहवास ज्याला तो खरा आभास होता
ओळखिच्या माणसांना ओळखिचा त्रास होता

घेतले होते जरी मी भरभरुनी श्वास ताजे
जीवनाची कोठडी अन् मृत्युचा गळफास होता

चालले मागील पानातुन पुढे आयुष्य माझे
तोच तो कंटाळवाणा लांबलेला तास होता

जन्मभर ओल्याच होत्या पापण्यांच्या ओंजळी अन्
जन्मभर माझ्या तृषेला मृगजळाचा ध्यास होता

पाहिले जेव्हा तुला मी बस् पहातच राहिलो गं
पण किती कोट्यावधीचा अर्थ त्या शून्यास होता


कवी - मयुरेश साने

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

कवी - वसंत बापट

निरोप

बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट् कन्या
धर्मं जाणते विरांचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.


कवियत्री - पद्मा गोळे

मी एक पक्षिण

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.

गुजे आरुणि जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारीते काय विणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर

कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी

कीती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी



कवियत्री - पद्मा गोळे

तक्ता

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय


कवी - अरुण कोलटकर

गरमा गरम

मक्या : गरम काय आहे ?

वेटर: चाउमीन.

मक्या : आणखी गरम?

वेटर: सूप.

मक्या: आणखी गरम?

वेटर: गरम पानी.

मक्या : आणखी गरम?

वेटर: आगीचा गोला आहे साल्या.

मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे .

आईपणाची भीती

आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती
अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती.
विचारलेस आज मला"आई कोणती वाट धरू?"
गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू.
कोणती दिशा दाखवू मी तुला? पूर्व? पश्चिम्? दक्षिण? उत्तर?
माझ्यासारख्याच भीतीने या चारी दिशा झाल्या फ़त्तर.

कोठे ज्ञान, यश, सुख? काय त्यांच्या खाणाखुणा?
या-त्या रुपात दिसतो सैतानच वावरताना.
जळी, स्थळी, आकाशीही अणूबॉम्ब झाकला आहे
प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्ताने रे माखला आहे.
आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा
द्रौणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा.

कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती
जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती.
खचू नको, शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग
कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग.
धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई
आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई.



कवियत्री - पद्मा गोळे

कुणी जाल का

कुणी जाल का सांगाल का,
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळीला.

सांभाळूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा ती झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली.


कवी     - अनिल
संगीत  - यशवंत देव
स्वर    - डॉ. वसंतराव देशपांडे

~ हा नशेचा 'फास' आहे ~

सांजवेळी सोबतीला 'जी' मिळे 'ती' खास आहे
ब्रांड सारे सोड वेड्या लागलेली प्यास आहे !

सांज होता पाय माझे ओढताती 'त्या' दिशेने
काय सांगू काय होते सोडवेना 'त्रास' आहे.

सांजवेळीची नशा रे रात होता पेट घेते
जीव लागे टांगणीला, तीच माझा श्वास आहे

खोल आता बाटली ती, 'वाट' का रे लावतो तू ?
मी अताशा ढोसण्याचा घेतलेला ध्यास आहे !

काय झाले घाबराया, घे सुखाचा घोट आता
बायको नाहीच लेका 'जे' दिसे तो भास आहे !

सांज झाली, रात झाली, चेतल्यारे भावना या
ती रिकामी, मी रिकामा, हा नशेचा 'फास' आहे


कवी - रमेश ठोंबरे

रंगि रंगला श्रीरंग

अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥

मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥

नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥

देही असुनि तूं विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥

पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥



रचना    -     संत सोयराबाई
संगीत   -     किशोरी आमोणकर
स्वर     -     किशोरी आमोणकर
राग      -    भैरवी

कांदा-मुळा-भाजी

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता म्हणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥



रचना     -     संत सावता माळी
संगीत    -     स्‍नेहल भाटकर
स्वर      -     स्‍नेहल भाटकर

अगा वैकुंठीच्या राया

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥



रचना    -     संत कान्होपात्रा
संगीत   -     मा. कृष्णराव,  विनायकबुवा पटवर्धन
स्वर      -     पं. राम मराठे
नाटक   -    संत कान्होपात्रा (१९३१)
राग      -    भैरवी
ताल     -    केरवा

नको देवराया अंत आता पाहू

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलूनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात




रचना     -    संत कान्होपात्रा
संगीत    -    आनंदघन
स्वर       -    पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट   -    साधी माणसं (१९६३)

कोणी गेलं म्हणून

कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...

आठवणींच्या वाटांवरून
आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...

आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही, रात्र तुझीच आहे.
त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं...

कोणी गेलं म्हणून..

दळिता कांडिता

दळिता कांडिता ।    तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी ।    तुझे नाम ग मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार ।    मुखी हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी ।    तू बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागले चरणासी ।    म्हणे नामयाची दासी ॥५॥


रचना     -    संत जनाबाई
संगीत    -    सुधीर फडके
स्वर       -    आशा भोसले
चित्रपट   -    संत जनाबाई (१९४९)
एक T.C पाच बायकांना पकडतो...
त्यातल्या पहिल्या बाईने साडी घातलेली असेत म्हणुनतो T.C.तीच्याकडुन 400 रु घेतो...
.
दुसर्या बाईन जीन्स घातलेली असतेतो TC. तीच्याकडुन 300 रु घेतो..
.
तीसर्या बाईने हाफ टॉप आणी स्कर्ट घातलेली असते तो T.C. तीच्या कडुन 200रु घेतो..
.
चौथ्या बाईने त्यापेक्षाही हाफ स्कर्ट घातलेला असतो तो T.C. तीच्याकडुन 100रु घेतो....
.
तर तो T.C. त्या पाचव्या बाईकडुन पैसे नाही घेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्या बाईकडे तिकीट असते..
.
विचार बदला...
देश बदला..
मित्राचे कोणते पाच शब्द आपले कॉलजचे
अक्खे वर्ष वाया घालवु शकते ?
.
.
.
.
.
.
.
.
- शप्पथ ! ती तुझ्याकडेच बघत होती

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात समावतं, माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन झालं झालं आपससूक
हिरिदांत सूर्याबापा दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझं येणं-जाणं वारा सांगे कानांमधी


गीत       -     बहिणाबाई चौधरी
संगीत    -     यशवंत देव
स्वर       -     उत्तरा केळकर  

स्वप्‍न

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !

स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?

स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले

स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्‍त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले

स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले

जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले


गीतकार    -     विंदा करंदीकर
संगीत       -     यशवंत देव
स्वर          -     पद्मजा फेणाणी-जोगळेकर
गीतसंग्रह  -    ही शुभ्र फुलांची ज्वाला
ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परकं घर आपलं मानायचं?
तिच्याकडून का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची?
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे,
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून...
तो येतो का कधीतरी तिच्याकडे
आपली वाट मोडून,
तीचं पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती 
त्याचीच बनून जाते...
एकदा सागर विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते,
पण म्हणून नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं...
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं...!!

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा


कवी - सुधीर मोघे 

सुभाषिताचा अर्थ

शिक्षक : मुलांनो सुभाषिताचा अर्थ सांगा -
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा

विद्यार्थी : सोपा आहे गुरुजी.
दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला वा जनका तुझी मजा आहे.

"रोज-गार"

भयंकर पी जे :

१ बे रोजगार मुलगा होता,
त्याने गुलाबाचे फूल फ्रीजर मध्ये
ठेवले,
..
.
.
.
.
.
आणि मग दुसर्या दिवशी ...
त्याला "रोज-गार" मिळाला !!!

दारू पिता का??

डॉक्टर: कस येण केलं??

झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत होत.

डॉक्टर: दारू पिता का??

झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा.

तलवारबाजी

एकदा तलवारबाजीची प्रतियोगिता असते.....
चायनीज हवेत..... एक केस उडवतो आणि तलवार फिरवतो

केसाचे २ तुकडे....
सगळे लोक टाळ्या वाजवतात.....
जापनीज उडत्या माशीचे पर कापतो....
सर्वत्र टाळ्या.....
आता झंप्याची पाळी होती झंप्या मच्छर हवेत उडवतो आणि तलवार फिरवतो....
मच्छर तरीपण उडत असतो....
जापनीज आणि चायनिज = मच्छर आता पण उडतोय....

झंप्या = मच्छर उडतोय..... पण तो आता कधी बाप होऊ शकणार नाही.....
टाळ्यांचा कडकडाट.

सोनिया सोनिया सोनिया

चम्प्या - जर तुझ्या नवर्याला एखाद्या परक्या देशात कोणीतरी मारलं असेल..
तर तू त्याचा बदला घेशील कि त्या देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करशील?
.
.
.
.

चिंगी - मी तरी बदला घेतला असता..

.
.
.
.

चम्प्या - तेच सोनिया करत आहे सध्या.

अन वाघांची संख्या कमी झाली......

वाघ व माकड यांच्यात
संभाषन सुरु आसते !
वाघ : यार हे
डीस्कवरी वाले लैय वैताग
देत आहे !

माकड : काय रे काय झालं
.
.
.
.
.
.
.
वाघ : आरे
काही प्रायवसी नावाची काही गोष्ट
आसले का नाही राव , अनं
वरुन हेच बोलतात
की वाघांची संख्या कमी झाली आहे !
आम्ही कराव तरी काय!!
झंप्या – यार मी काय करू?
मी काहीपण काम
करायला जातो तेंव्हा माझी बायको मध्ये
मध्ये येते..
.
.
.
.
चम्प्या – मग तू ट्रक चालवून बघ..
नशीब कदाचित साथ देईल…
एकदा रजनीकांत व मकरंद (मक्या) बोलत असतात.
रजनिकांत : मी तर माझ्या ” जी. एफ़ ” ला ती जगात कोठेही असली तरी तिच्या परफ़्युमच्या वासाने ओळखु शकतो.
.
.
.
.
.
मकरंद (मक्या) : तुझ्या मायलातुझ्या !
रजन्या, आधल्या जन्मात तु कुत्रा होतास की काय ??

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!


१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!

३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!

४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!

८)असाक्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!

हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू नका देवू....!!!!

नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे क्षण...