बिचारा संता

संता एकदा आग लागलेल्या इमारतीत घुसतो आणि आतून पाच जणांना बाहेर घेऊन येतो...

पण जमलेले लोक मात्र संतालाच बेदम मारतात

कारण ज्या लोकांना संता बाहेर आणतो ते अग्निशमन दलाचे कर्मचारी असतात.
एक वेडा पत्र लिहित असतो.

डॉक्टर विचारतात कोणाला पत्र लिहित आहेस

वेडा - स्वतःला

डॉक्टर - काय लिहिले आहे?

वेडा - मला काय माहित! अजून मला पत्र मिळाले नाही
हत्ती मुंगीला लग्नासाठी प्रपोज करतो.

मुंगी - मीसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते.

हत्ती - मग, लग्नाला नाही का म्हणतेस?

मुंगी - मी तुला किती वेळेस सांगितले, माझ्या घरच्यांचा इंटरकास्ट लग्नाला विरोध नाही परंतु इंटरसाईझला आहे.

गोलकीपर

खेळाचे एक शिक्षक नव्याने रुजू झाले व ग्राउंडवर गेले. ग्राउंडवर मुले फुटबॉल खेळत होती व एक मुलगा एकटाच उभा होता.

गुरुजी : तू त्यांच्यासोबत खेळत का नाहीस? काही अडचण?

मुलगा : नाही मी येथेच बरा आहे.

गुरुजी : अरे पण का एकटाच उभा आहेस?

मुलगा : (चिडून) कारण मी गोलकीपर आहे.

पाऊस अवखळ...

क्षणात सरसर, धावे धरिवर...
खट्याळ कोमल, वारा भरभर..
नभी पसरली, सुंदर झालर...
मेघांमागे, दडला भास्कर...

पाऊस अवखळ, वेड्या तालावर....
बागडतो हा, चराचरावर...
मनही माझे, पडले बाहेर...
गारा घेउन, तळहातावर...

चोहिकडे हे, पाणीच पाणी...
सुरात बेसुर, ओठी गाणी...
चैत्राच्या ह्या उष्ण दुपारी...
अवनी हरली, त्या जलधारांनी...

सळसळ करती, झाडे झुरली...
नेसुन उन्हाची, साडी पिवळी...
थरथरला तो, मातीवरती...
सुवास ओला, हळुच विखुरती...

इन्द्रधनुच्या पंखावरती...
'मेघांच्या' त्या, सुंदर पंक्ती...
मना-मनाच्या, हर्ष-कळ्यांची...
खुलली गाणी, अन संध्या वरती...

दिसं नकळत जाई

दिसं नकळत जाई
सांज  रेंगाळून राहि.
क्षणं एकहि न ज्याला,
तुझि आठवन नाही.

भेट तुझि ती पहिली
लाख लाख आठवितो,
रूप तुझे ते धुक्याचे
कणा कणा साठवितो.

ही वेळ सखी साजणी मज
वेडावून जाई,
दिसं नकळत जाई
सांज रेंगाळून राहि....

असा भरून ये ऊर
जसा वळीव भरवा
अशी हूरहूर जसा
गंध  रानी पसरवा

रान मनातले माझ्या
मगं भिजुनिया जाई..
दिसं नकलत जाई
सांज रेंगाळून राही

किती तरी दिवसात...

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाऊन निर्भय
गावाकडच्या नदीत
होऊन मी जलमय.

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी.

बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पा-याचा
बरी तोतया नळाची
शिरी धार मुखी ऋचा

रानात श्रावणात

रानात श्रावणात
बरसून मेघ गेला
देहात नि मनात
लावून आस गेला ...

रानात श्रावणात
दिसतात रंग ओले
किलबिल पाखरांत
तरू तृप्त वाकलेले ...

रानात श्रावणात
दाटी नव्या तृणांची
मधु दाटल्या फुलांत
आरास भ्रमरांची ...

रानात श्रावणात
आवाज निर्झरांचे
खडकाळ डोंगरात
चैतन्य जीवनाचे ...

रानात श्रावणात
फुलली अनेक नाती
कुणी पाहिले न हात
घडवून ज्यांस जाती ...

माझे न राहिलेले

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले 

स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग कारे, सर्वस्व वाहिलेले

स्वप्नात वाहिलेले, म्हणुनी कसे असत्य
स्वप्नात सत्य असते, सामील जाहलेले

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पख
दिवसास पाय पंगु, अन हात शापिलेले

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात घेवुनी जा
हे नेत्र घेवुनी जा, स्वप्नात नाहलेले

जा नेत्र घेवुनी जा, स्वप्नांध आंधळीचे
आता पहावयाचे, काही न राहीलेले
हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच
दाबून धरावा लागतो.

कुणीतरी आठवण काढतंय

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!

जो पर्यंत आहे श्वास

("जब तक हैं जान" चे मराठी रुपांतर )

तुझ्या डोळ्यातील तेजस्वी हस्ती
तुझ्या हसण्याची बेफिकीर मस्ती
तुझ्या केसांची उडणारी दाट वस्ती
नाही विसरणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

तुझं हाथातून हाथ काढणं
तुझ्या आत्म्याने रस्ता बदलणं
तुझं पलटून पुन्हा न बघणं
नाही माफ करणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

पावसातील बेधडक तुझ्या नाचण्यावर
प्रत्येक गोष्टीवरून विनाकारण तुझ्या रूसण्यावर
छोट्या छोट्या तुझ्या बालिश खोडयांवर
प्रेम करेन मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

तुझ्या खोट्या शपथा आणि वचनांचा
तुझ्या जाळणार्या बैचैन स्वप्नांचा
तुझ्या न लाभणार्या प्रार्थनेचा
तिरस्कार करेन मी("जब तक हैं जान" चे मराठी रुपांतर )
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते.

याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत.
राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.

१)    पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

२)    पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ. मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.

३)   पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

४)    मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

५)    सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वगळून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

६)    पंत सुमंत (डबीर ) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

७)    न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

 ८)   पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

तू सागर मी किनारा


मॅडम : बंड्या...तू वहीत लिहलेली दहा उत्तरं चुकीची आहेत.

.
बंड्या : नाही मॅडम...माझी फक्त तीनच उत्तरं चुकली आहेत.

.
मॅडम : मूर्खा...तुझी वही परत बघ...दहा उत्तरं चुकली आहेत.
.
बंड्या :नाही मॅडम...देवाशप्पथ...यातली तीन उत्तरं
पप्पांची आहेत,
चारमम्मीची आहेत...
माझी फक्त तीनच आहेत..

पुणेरी पाहुणचार

एकदा साठेंकडे एक दूरचा पाहुणा अचानक येतो. महाशय येतात, बसतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होते. तेवढ्यात चहा येतो.

पाहुणा गरम गरम चहाचा एक मस्त फुरका मारतो.
तेवढ्यात साठे पाहुण्याला विचारतात, “काय हो उपवास वगैरे धरता की नाही?”

पाहुणा : नाही हो. आपल्याला पोटभर दाबून जेवण लागतं. दिवसातून तीन वेळा.
साठे : बरं, बरं. आपण मांसाहारी की शाकाहारी?

पाहुणा मनातल्या मनात खुश होतो. त्याला वाटतं, आज मस्त मेजवानी मिळणार.

पटकन म्हणतो, “म्हणजे काय? चिकन-कोंबडी हा तर आपला न धरलेल्या उपवासाचा फराळ आहे फराळ.”

साठे : नाही. त्याचं काय आहे. हिने बनवलेल्या चहात माशी पडली होती. उगाच तुमचा उपवास मोडायला नको म्हणून विचारलं.

नाती


आजच्या काळातली व्याख्या :

यश म्हणजे काय?

..
..
..
..
..
..
..
..
..

जेंव्हा लोकं तुम्हाला फ़ेसबुक पेक्षा गुगल वर शोधायला लागतात.. त्याला म्हणतात यश.
एक मुलगा त्याच्या पाळीव कुत्र्याला हातात घेऊन फोटो काढतो व तो फेसबुकवर अपलोड करतो
.
.
मुलगी- या पैकी तु कोण?
.
मुलगा- ज्याने तुला हातात घेतल आहे तो
.

"अतिशहाना त्याचा बैल रिकामा.."
एकदा एका लग्नाच्या पार्टीत DJ विचारतो :-
"कितीवेळ वाजवायचं आहे?"
.
.
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
झंप्या :- 8-10 पेग पर्यंत वाजवं .....
नंतर हे सगळे.... जेनरेटर च्या आवाजावर पण नाचतील..

तू ठरवलं तसं सये
मलाही आज ठरवू दे
बोलक्या शब्दांवर माझ्या
तूझे थोडे मौन गिरवू दे

तू विसरली तसं सये
मलाही आज विसरू दे
आठवणीच्या हिरवळीवर
दवबिंदू म्हणून पसरू दे .....

तू जगतेस तसं सये
मलाही आज जगू दे
रित्या डोळ्यांमध्ये मला
भरलेलं आभाळं मागू दे

तू हरवतेस तसं सये
मलाही आज हरवू दे
मरणाचे दुख आपल्या
आज जगताना मिरवू दे .......

तू फसवलं तसं सये
मलाही आज फसू दे
आसवं पडद्याआड अन
व्यासपीठावर मला हसू दे
वाजता पैंजण कुणाची,
कुठे चंचल बांगड्यांचा आवाज,
ह्या माझ्या वेड्या मनास,
आता फक्त तुझाच आभास
वाळू सागराला भिजवते
की सागर वाळूत भिजतो
एक थेंब येऊन पावसाचा
शिंपल्यात हळूच निजतो

तारे आकाशातून तुटतात
की तुटण्याची मजा लुटतात
तुझ्या माझ्या पाऊलखुणा
आठवणी बनून उमटतात

सुगंध बरसवते रातराणी
की भ्रमराला तरसवते रातराणी
मिटून घेईल पापण्या
लाजाळूला पाहू नका कुणी

दवात भिजलेल्या पाकळ्या
होत्या धुक्याखाली झाकल्या
गंध माळला होता फ़ुलांनी
तुझ्या केसात मोकळ्या

- अमोल घायाळ

मराठी पाउल पडते पुढे !

खरा स्वधर्म हा आपुला
जरि का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला, भला देखे

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।

कोट छातीचा अभंग त्याला कधी न जातील तडे

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपाऊली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज:प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!


कवियत्री - शांता शेळके


प्रवाहा बरोबर तर सगळेच जातात.

प्रवाहाविरुद्ध जो जातो तोच जिवनात यशस्वी होतो…

हे मी ट्राफीक पोलिसला सांगितल,

तरि त्याने पावती फाडलिच.

पहिली चुक

झंम्प्या : साहेब ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत

साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते.

झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो.
"ब्रेकपच्या १ वर्षानंतर......

मुलगी :- काय तू अजूनही माझ्यावर प्रेम
करतोस ?

मुलगा :- प्रेमाचे माहित नाही, पण माझे मित्र
अजूनही तुझी शप्पथ घालून काम करून घेतात ...!

डिप्लोमा

आज्जी (लहान बाळाला) : झोप 'डिप्लोमा'.....झोप....
.
.
शेजारी बसलेली बाई आज्जी ला विचारते : आहो तुम्ही या बाळाला 'डिप्लोमा' का म्हणत आहात???
.
.
.
आज्जी : माझी मुलगी मुंबई ला 'डिप्लोमा' आणायला गेली होती......आणि हे घेऊन आली

हुशार मुली

काका सफरचंद केवढ्याला दिले ओ...?
.
.
काका - १०० चे १०...
.
मुलगी - काही कमी करा ना ..:-)
.
.
.
.
.
.
.
.
.
काका - ठिक आहे, ८० चे ८ घे ..
.
.
.
.
मुलगी - थॅंक्यु काका..
आजपासुन तुमच्या कडुनच सफरचंद घेईल ..

समजलचं नाही.......

शेणामातीच्या अंगणापर्यंत डांबर कधी आलं
समजलच नाही,
सुंदर पानफ़ुलांचं शेवाळं कधी झालं
समजलंच नाही,
पुर्वी अंगणात सारवुन त्यावर
रांगोळी सजायची
प्रसन्नता अंगणातुन सर्व घरात उतरायची
दिव्यांचा तो मिणमिणता प्रकाश प्रखर कधी झाला
समजलंच नाही,
चिऊकाऊच्या त्या गोष्टी,
पुस्तकां ­चा तो सुवास गोष्टींमधलं काही खास,
 जादुई दुनियेचा आभास
मनाच्या कोन्यात कधी दुरवर फ़ेकलं गेलं
समजलच नाही,
जास्तीचा हव्यास असा नड्ला,
माणुसमग एकटा पड्ला कागदाच्या बद्ल्यात सारं
काही कधी विकलं गेलं
समजलच नाही,
सारे कसे बदलुन गेलं,
जुनं आता स्वप्न झालं
काळासोबत आयुष्याचं गणित कधी बद्लत गेलं
समजलचं नाही.

इंदिरा संत

संत ईंदिरा नारायण ( जन्म ४ जानेवारी १९१४ ते १३ जुलै २०००)कवियत्री, कथाकार, ललित लेखिका.
मुळच्या इंदोर च्या इंदिरा दिक्षीत..
फर्ग्युसन मधे महाविद्यालयिन शिक्षण.. तेथेच प्रा. ना. मा. संत यांच्याशी परिचय ऊन पुढे विवाह झाला.
पहिला काव्य संग्रह:- १९४० मधे “सहवास”
१९४६ मधे वैधव्य आले.
१९५२ मधे “शामली हा कथासंग्रह
१९५५ मधे “कदली”
१९५७ मधे “चैतु “
१९५१ मधे प्रकाशित झालेल्या शेला ह्या कविता संग्रहा पासुन स्वतः ची ऒळख निर्माण झाली.शेला मधिल कविता अतिशय उत्कट ,भावपुर्ण, आणि प्रतिभा संपन्न होत्या.”विशुद्ध भाव कविता” लिहिणारी कवियत्री म्हणुन स्वतःची ओळख निर्माण केली.

१९५५ मधे मेंदी आणि १९५७ मधे म्रुगजळ ह्या कविता संग्रहात त्यांच्या कवितांचे सामर्थ्य पुर्णत्वाला पोहोचलेले दिसते..प्रिती, एकाकी पणाचे दुःख, विरह आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातुन भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दात बांधण्याची त्यांची किमया या संग्रहातुन जाणवते..

१९६४ मधे रंगबावरी, १९७२ मधे बाहुल्या, १९८२ मधे गर्भ रेशमी१९८९ मधे चित्कळा, आणि १९८९ मधे वंशकुसुम आणि निराकार हे त्यांचे संग्रह प्रसिध्द झाले.

गर्भ रेशमी ला १९८३ साली साहित्य अकादमी चे पारितोशक मिळाले.

सन्मान:-

१) अध्यक्ष , कविसंमेलन ,मुंबई मराठी साहित्य सम्मेलन १९५२ साली.
२) अध्यक्ष , महाराष्ट्र कवियत्री सम्मेलन कऱ्हाड १९७५ साली.
३) अध्यक्ष , कवियत्री साहित्य सम्मेलन , गदग १९८४ साली
४) अध्यक्ष , बालकुमार साहित्य सम्मेलन ,सावंतवाडी
५) अध्यक्ष , साहित्य सम्मेलन कदिली, कर्णाटक

पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठान्चा पुरस्कार, १९९५
’गर्भरेशमी’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार
’गर्भरेशमी’ साठी अनंत काणेकर पुरस्कार
’मेंदी ’,’मॄगजळ’ या संग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
सखे येईल चंद्र पाहण्या तुला ढगाआडूनी
देईल निरोप माझा तुला क्षणभर थांबुनी
घे ओंजळीत भरुनी ते चांदणे मन भरुनी
भेट तुझी नि माझी अंतरंगात स्मरूनी

अशीच एक सांज

अशीच एक सांज होती
डोळ्यात क्षीतज साठवलेली
अंताच्या शोधत फिरणारी
अन तुझ्यासाठी झुरलेली

अशीच एक सांज होती
आठवणीत तिच्या हरवलेली
मनातील त्या भरतीने
नयनाची किनारे गाठलेली

अशीच एक सांज होती
माझ्या एकट्याने मंतरलेली
अश्रुना सोबत घेवून
तुझ्या शब्दाने भरलेली

अशीच एक सांज होती
माझ्या एकट्याचीच झालेली
काळोख येण्यापुरी
तिनेच मला साथ दिलेली

प्रेम म्हणावं याला .... की भास

ती पाहते यार माझ्याकडे
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?

ते बाबा असतात.....

आपले चिमुकले हाथ धरून
जे आपल्याला चालायला शिकवतात....
ते बाबा असतात.....

आपण काही चांगले केल्यावर
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात..
ते बाबा असतात.....

माझ्या लेकराला काही कमी पडू नए
या साठी जे घाम गाळतात
ते बाबा असतात.....

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.....

आपल्या लेकराच्या सुखा साठी
जे आपला देह ही अर्पण करतात..
ते बाबा असतात......

वडील

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही
करंगळीला धरुन आम्हाला,
तु चालायला शिकवलंस,
बोट धरुन आमचं तु,
पाटीवरचं अक्षर गिरवलंस,
रडु आमचं आवरावं म्हणून,
...घोडा होऊन आम्हाला रिझवलंस,
आता पर्यंतचं आयुष्य तु,
आमच्या साठी झिजवलंस,
सासरी गेल्यावर आमची,
आठवण काढशील का रे...?
बाबा... आम्हाला माहीत आहे,
सासरी जाताना,
एका कोपर्‍यात जाऊन,
आमच्यासाठी लहान मुलासारखा,
रडशील ना रे.......??????


कवी - ऋषीकेश
चुली जवळ माय, तर कंपनीत तुम्ही राबत होता..
माझी वाट तुम्ही, ते नऊ महिने पाहत होता..
पाळण्यात मला पाहून, पेढे वाटायलाही तुम्ही पळाला होता..

बोटाला तुमच्या धरून, शाळेत दाखला मी घेतला होता..
फाटकी बनियन तुम्ही, तर नवीन गणवेश मी घातला होता..
बाबा, तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे होता...!

ताप मला असो का ताईला, रात्र-रात्र तुम्ही जागत होता..
शाळेचा खर्च वाढल्यामुळे, ओवरटाइमही तुम्हीच करत होता..
बाबा, तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे होता...!

ताईच्या लग्नासाठी, पी.एफ.ही तुम्ही काढला होता..
ताईला वाटी लावताना, तुम्ही मात्र ढसाढसा रडला होता..
बाबा, तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे होता...!

देवा, आता मात्र मला, त्यांच्यासाठी कष्ट करू दे..
तू फक्त आता, जगातील सर्व बाबांना, उदंड आयुष्य दे..


कवी - विकास

तोच आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे

लहानपणी धाकटयावर दाद्गिरी करायचो
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो

आत्मविश्वास

मला ति म्हणाली,
"मी तुझ्या जिवनाला स्वर्ग बनवुन टाकेल"...
.
.
.
.
.
.
.
मुळात तिला साधी ’मॅग्गी’ पण बनवता येत नाय
पण आत्मविश्वास पहा ना लोकांचा...
झंप्या एकदा दारू पिऊन
रात्री उशिरा घरी येतो.. बघतो तर वडील
हॉकी स्टिक घेऊन बसले असतात
.
.
.
झंप्या: काय पप्पा आज
"चक दे इंडिया"का ?
.
.
.
वडील : नाही आज"दे दना दन"
मला सांगा कोर्टात गांधीजींचा फ़ोटो कशाला लावतात ?
..
..
..
..

सांगा ?
..
..
..
..
..

सांगा ? सांगा ?
..
..
..
..
..

नाही माहिती ?
..
..

सोप्प आहे..
' खिळ्याला '

वेगळे अर्थ

चिंटू क्लास मध्ये उशिरा आला ...

शिक्षका - का उशीर झाला ???
.
.
.
.
.
.
.
.
चिंटू- मेडम ,
तुम्ही माझी इतकी काळजी करत जाऊ नका हो ......
.
.
.
मित्र वेगळे अर्थ काढतात ....

जबरदस्त पानउतारो...!

कंडक्टर :काय रे,
तु कायम दरवाज्यातच उभो रवतस तो,
तुझो बापुस काय वाचमन होतो कि काय..?
..
..
..
..
..
..
..
..
..
बंड्या : तुम्ही नेहमी पैसेच मागतास ता,
तुमचो बापुस काय भिकारी होतो कि काय...?
मुंगी(हत्तीला ) : र बाला चल आपण पकरा पकरी खेलुया

हत्ती : नको मान्झ्या आयेने पायल तर ती माना ओरडेल

मुंगी : हाट मेल्या घाबरतुस कयाला एवर? तुंजी आये आली तर तू गपकन मान्झ्या मांगे लपून बस...

चितळ्यांनी जर McD ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!


पुण्यातील चितळे मिठाई ने जर McDonalds ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!

आमचे येथे बर्गर व प्रकार मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विं
चरू नयेत. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)

गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय.
(व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे,ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस- या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.

परत १० मी. फोन येतो.

पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.

अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.

१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की..

शांतता

घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे ... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरें
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्या भोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन..गगन
शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!


कवी -  शंकर वैद्य

गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....

मला घरी यायला वेळ लागेल...

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....

दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

सगळे सापडले...
.
.
.
.
.
.
.
मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो.

मुला कडचे :- आम्हाला मुलगी पसंद आहे.
मुली कडचे -: पण आमची मुलगी अजुन शिकत आहे.
.
.
.
.
.
मुला कडचे :- मग आमचा मुलगा काय लहान आहे का पुस्तक फाडायला??

मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय

मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....

मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या. 

एक आरसा होता त्याच्यासमोर खोट बोलणारा मरत असतो,
फ्रेंच : मी असा विचार करतो कि मी सिगारेट पीत नाही, (लगेच फ्रेंची मरतो)
अमेरिकन : मी असा विचार करतो कि इराकी माझे बंधू भगिनी आहेत ( लगेच अमेरिकन मरतो)
..
.
.
.
.
.
.
सरदार : मी असा विचार करतो कि ...( आणि लगेच सरदार मरतो)

झंप्या दारू पिऊन झिंगून रस्त्याने जात असतो, समोरून एक कुत्रे येऊन खूप जोरात भुंकायला लागते, झंप्या रस्त्याच्या कडेच मोठा दगड कुत्र्याला मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न करतो, पण दगड जागचा हलत नाही....
शेवटी वैतागून म्हणतो....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"काय पण जमाना आलाय.....लोक कुत्र्याला मोकळे सोडतात..... आणि दगड बांधून ठेवतात...."