गांव

आभाळ जिथें घन 
गर्जे तें गांव मनाशीं निजलें 
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडलें....

अन् पाणवठ्याच्या पाशीं 
खचलेला एकट वाडा 
मोकाट कुणाचा तेथें
कधिं हिंडत असतो घोडा....

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो
पारावर पडला साधू 
हलकेच कुशीवर वळतो....

गावांतिल लोक शहाणे 
कौलांवर जीव पसरती 
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळीनें मळती....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा