मावळत्या संधिप्रकाशांत मी शून्यपणें
बसून आहें.
मागचें आणि पलीकडचें मला
कांहीच दिसत नाहीं,
शेवटच्या कांही क्षणांसारखे स्मृतीचे
दिवे अंधुक झाले आहेत.
उंदरांनी कुरतडलेल्या कवितांचे कागद
माझ्या उशाखाली आहेत.
माझी एकच इच्छा आहे आतां ;
तुझ्या विटलेल्या पदराच्या ओबडधोबड
धाग्यांनी एक चित्र विणावें
आणि रंगीत तावदानांच्या कांचांना फोडून
येणाऱ्या चिमणीच्या धक्क्यानें, गर्द शाईचा
निळा सागर त्यावर कलंडून जावा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा