रंगास्त

कलंडत्या सूर्याचीं रंगदर्शनें नाहींत
समुद्र नाहींत आणि लाटांचे 
आवाजहि नाहींत.
नारायणीचा विदेही मृत्यू :
त्या रात्रीं झाडांना सोडून जाणाऱ्या
अविनाशी फुलांची झड .... 
झडीच्या विलापांत थडीला
लागलेलीं शिवालयें ....
कित्येक वर्षांपूर्वीच्या श्रावणानें तिच्या
गळ्यांत गोंदलेल्या तुलसी रामायणाच्या
प्रतिमा....
दृष्टीला अतीव कारुण्यानें आंधळे
करणारें धुके पसरत असावें
गाभाऱ्यांत ....
अशा दिशा हरवतात आणि अशा
दिशा उगवतात.
मनाचे सर्व आभास, दुखाच्या एवढ्या
समर्थ वैभवांतही असतात
पराधीन, पोरके आणि सर्वस्वी
अनाथ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा