तुमच्या प्रेमाची हवी मला जोड

का हो चालवीली माझी छळणूक

काय माझी चूक झाली सांगा ?

तुमच्यासाठी मी फुलविली फुले

भांडार हे खुले तुम्हासाठी

तुम्हाला मिळावे सुखसमाधान

कष्ट रात्रंदिन करीत मी

जीवनरसाचा भरून मी प्याला

दिला तो ओठाला लावा तुम्ही

तुमच्या प्रेमाची हवी मला जोड

नका हिरमोड करू माझा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाही मज आशा उद्याच्या जगाची

का रे दाखवीसी पुन्हा तेच स्वप्न

कराया उद्विग्न चित्त माझे !

मृगजळाचे ते दावून आभास

का रे खोटी आस निर्मितोस ?

घेत न कधी जे वास्तवाचे रूप

वाटे न हुरूप त्याचेविशी

माझे सुखदुःख राहो ते माझेच

विश्व माझे हेच माझ्यापाशी

नाही मज आशा उद्याच्या जगाची

कालचीच ज्याची गती आज


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या
प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.

आप्पा महाराज

नाम जपता जपता

'जे जे रामकृस्न हरी'

आप्पा महाराज गेले

गेले आज देवाघरी

जसा पुत्रू 'रामदास'

आन सून 'सीतामाई'

तसा लोकावरी जीव

मनीं दुजाभाव नहीं

उभ्या गांवाचे कैवारी

खरे रामाचे पुजारी

आप्पा महाराज गेले

सोडीसनी देवाघरी

आंसू लोकाचे गयाले

जशा पावसाच्या सरी

आप्पा महाराज गेले

गेले आज देवाघरीं

आप्पाजींची दयामाया

किती पार नहीं त्याले

तुम्ही इचारा इचारा

'बावजीच्या समाधीले

तुकाराम, मुक्ता जना'

मरीसनी रे जगले

आतां कसं म्हनू तरी

आप्पा महाराज मेले?

किती भजन किर्तन

रामनामाची लहेर

केलं रामाचं मंदीर

संत लोकाचं माहेर

राम लक्षूमन सीता

बसवले रे मंदीरीं

त्याले सोन्याचा कयस

जागा संगमरवरी

दरसाल दहा दिसा

येतो उच्छावाले भर

वाहनावर्‍हे बशीसनी

येती दहा अवतार

दाही सरता वहनं

आली एकादशी मोठी

मंग सवारला रथ

झाली गांवामंधी दाटी

चार फोडले नारय

अरे, चार्‍ही चाकावरी

सर्व्या मयांतले फुलं

चढवले रथावरी

रस्त्यावर शीपडल्या

लाखो पान्याच्या घागरी

रथ चाले घडाघडा

लागे चाकाले मोगरी

सर्व्या बजाराचे केये

माझ्या रथाची वानगी

घरोघरीं ऐपतींत

मिये पैशाची कानगी

लोक आले दर्सनाले

लोक झुंड्यावर झुंड्या

रथापुढती चालल्या

किती भजनाच्या दिंड्या

ज्यांनीं केली कार्तीकीले

'जयगांवाची' पंढरी

आप्पा महाराज गेले

गेले म्हनूं कस तरी?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

अनंत काणेकर


चांदरात


सांत्वन

शरीर हे गेले रोगांनी गांजून

काळीज जळून काळजीने

जीव करमाया निसर्गी जाईन

गुण मी गाईन प्रभुजीचे

घरी आईबाप, लहान भावंडे

वात्सल्याचे धडे देतात की

जिवलग माझा मित्र भेट देतो

जीव माझा होतो उल्हसित

काही नाही माझ्या सांत्वनाला उणे

म्हणून हे जिणे कंठितो मी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना


कवी - आरती प्रभू

गंध

हिरव्याशा गवतात
हळदिवी फुलें,
हलकेंच केसरात
दूध भरूं आले.

उभ्या उभ्या शेतांमधें
सर कोसळली,
केवड्याची सोनफडा
गंधें ओथंबली.

बकुळीच्या आसपास
गंधवती माती,
उस्कटून रानपक्षी
काही शोधिताती.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

जोगवा

गंध

गोपाळगाणी


नक्षत्रांचें देणें

१. कविता
२. सरणार्थ
३. जाग आली
४. आधार
५. मुंग्यांची रांग
६. ही दोन बकरीचिं पोरें
७. दोन पोक्त पानं
८. संध्याकाळ
९. गवत असते गार हिरवें
१०. मनमोर हिचा
११. फिरो घाणा निरंतर
१२. एक वळसा
१३. पात वाकली भारान
१४. गुच्छ फुलांचे निरिच्छ
१५. भ्रमिष्ट
१६. लुटारू
१७. टप्पोर गजरा
१८. डहाळी
१९. पेरलेल्या दाण्यादाण्यांत
२०. अर्पण करतां येतंय तुला
२१. गाडा
२२. अर्थ
२३. कसा ?
२४. खार
२५. गाणें
२६. वाफ
२७. निस्तब्ध
२८. अर्थ
२९. उदासी
३०. चाहूल
३१. विळखे
३२. गाण्याच्या वेळा
३३. क्षमा केली म्हण न
३४. असो आच इंद्रियांत
३५. कहाणी
३६. सर
३७. गर्व
३८. असा एक  … अशी एक
३९. दूर दिवा
४०. सर्व ठिकाणी
४१. निसर्गचित्र
४२. भविष्य
४३. तुटलेला कडा
४४. सर्सर सर्सरवाजे
४५. ब्रह्मार्पण
४६. भूल
४७. श्रद्धांजली
४८. पुनश्र्य
४९. कुत्रा
५०. बभ्रा
५१. विरंगुळा
५२. कुणाच्या खांद्यावर
५३. रावबाच्या लेकीवरील दोन कविता
५४. राजाराणी
५५. एकत्र गाठू तळ
५६. कृष्ण
५७. आजची तारीख
५८. थोडे चोर थोडे साव
५९. ओंजळ
६०. भुतें
६१. दिवे
६२. वळण
६३.  सर्वत्र काय ?
६४. झाड
६५. तुं
६६. नको
६७. रत्न
६८. लव लव करी पातं
६९. कुठल्या कवितेसाठी
७०. तिसराच कुणी
७१. दुःख ना आनंदही
७२. पारवे
७३. सूर्यास्त
७४. विष
७५. सांजतारा
७६. दाद द्या
७७. अंतरिक्षाचा इषारा
७८. काय मां घ्यावे
७९. कां उदासी
८०. रंग
८१. निष्प्रेम
८२. कां असे येतां
८३. सूचना
८४. मृत्यूंत कोणी हासे
८५. ऊनओल्या
८६. तुं कुणाला मी म्हणू
८७. प्रीत फिरुनी मागते
८८. नवी….जुनी
८९. लकेरताना
९०. दोन मी
९१. जाईन दूर गावा
९२. कल्लोळ अन भ्रमंती
९३. पावरी
९४. टाहो
९५. सांगेल राख माझी
९६. सप्रेम द्या

आखजी

आखजीचा आखजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका

चालला भिरभिरी जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वार्‍यावरी जी
गेला झोका गेला झोका

चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका

जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वार्‍यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा

वार्‍यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले
झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले

नजर नहीं ठरे जी
झाली आता झाली आतां
धरती खालेवर्‍हे जी
आंगनांत आंगनांत

खेयती पोरीसोरी जी
झाल्या दंग झाल्या दंग
गाऊनी नानापरी जी
झाला सुरू झाला सुरू

पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा

चालला धांगडधिंगा जी
दारोदारीं दारोदारीं
खेयाची एक घाई जी
घरोघरी घरोघरीं

मांडल्या गवराई जी
गवराई गवराई
सजव सजवल्या जी
संगातीनी संगातीनी

बोलव बोलवल्या जी
बोलवल्या बोलवल्या
टिपर्‍या झाल्या सुरूं जी
टिपर्‍याचे टिपर्‍याचे

नादवले घुंगरू जी
कीती खेय कीती खेय
सांगूं मी काय काय जी
खेयीसनी खेयीसनी

आंबले हातपाय जी
चार दीस चार दीस
इसावल्या घरांत जी
आहे पुढें आहे पुढें

शेतीची मशागत जी
सन सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी

सांग सई सांग सई,
आखजी आतां कही जी?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

तिलगूळ

देणे घेणे इथे कुणी हो कुणाला ?

गुणांनी गुणांला गुणायचे !

अधिकाची पेठ इथे उण्यातून

इथे कडूतून गोडपना

पिकल्या शेताचे सुरू इथे खेळ

मापणार खूळे मापोते ते !

अवघ्या भावांचा झाला इथे काला

अवघ्यांचा धाला जीव इथे

तरी हा एवढा घ्यावा तिलगूळ

हवे तर खूळ म्हणा माझे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बळ

दुबळ्याचे बळ माझे ते कितीक !

तरी कवतुक झाले किती !

दरिद्र्याचे घरी लुटिले भांडार

देउन कुबेर-मोठेपना

अज्ञानाचा बुक्का लावून कपाळा

ज्ञानाचा सोहळा केला तुम्ही

वाळवंटी तुम्ही पिकविला मळा

माझी किती कळा जाणे मीच !

जड झाले भारी भलाईचे ओझे

कसे रीण माझे फिटणार?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाहीतर उरी फुटशील !

चिमुकल्या अरे गोजिर्‍या पाखरा,

झाला का पिंजरा नकोसा हा ?

का रे थरथर असा कापतोस?

का रे पाहतोस दीनवाणे ?

छळ होतो तुझा ठाऊक हे मला

परी तुझा गळा थांबला का?

कधीतरी तुझी होणार सुटका

निःश्वास असा का सोडितोस ?

गाऊ ह्रदय मोकळे तू करी

नाहीतर उरी फुटशील !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जिद्दी कोंबडी

चम्प्याने एकदा कोंबडी विकत घेतली..

आणि तिला एका पिंजर्यात बंद केलं..

पण कोंबडी तर जिद्दी होती..लगेच मागच्या बाजूने निघून गेली..

चम्प्याने तिला पकडला आणि परत पिंजर्यात टाकलं..

पण कोंबडी तर जिद्दी..परत मागच्या बाजूने निखून गेली..

चम्प्याला आला राग..त्याने त्या कोंबडीला पकडलं आणि कापून खाऊन टाकलं..

पण कोंबडी तर जिद्दी होती........

चुल्हा पेटता पेटेना !

घरीं दाटला धुक्कय

कसा हाटतां हाटेना

माझे डोये झाले लाल

चुल्हा पेटतां पेटेना

चुल्हा किती फुका फुका

लागल्या रे घरामंधी

अवघ्याले भुका भुका

आतां सांपडेना हातीं

कुठे फूकनी बी मेली

कुठे पट्टवकरीन-

'नूरी, पयीसन गेली.

आतां गेल्या सरीसनी

पेटीमंधल्या आक्काड्या

सर्व्या गेल्या बयीसनी

घरामधल्या संकाड्या

पेट पेट धुक्कयेला,

किती घेसी माझा जीव

आरे इस्तवाच्या धन्या !

कसं आलं तुले हींव !

तशी खांबाशी फूकनी

सांपडली सांपडली

फुकी-फुकीसनी आग

पाखडली पाखडली !

आरे फूकनी फूकतां

इस्तो वाजे तडतड

तव्हां धगला धगला

चुल्हा कसा धडधड

मंग टाकला उसासा

थोडा घेतला इसावा

एकदांचा आदयला

झट चुल्ह्यावर तावा

आतां रांधते भाकर

चुल्ह्यावर ताजी ताजी

मांघे शिजे वजेवजे

मांगचुल्हीवर भाजी

खूप रांधल्या भाकरी

दुल्ळी गेली भरीसनी

मंग हात धोईसनी

इस्त्यावर पडे पानी

इस्त्यावर पडे पानी

आली वाफ हात लासे

तव्हां उचलता तावा

कसा खदखदा हांसे !


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

कुर्‍हाडीच्या दांड्या

कुर्‍हाडीच्या दांड्या, सांभाळ सांभाळ

का रे होसी काळ गोतास तू ?

किती झाले ठार, किती जायबंद

तुझे भाईबंद शस्त्रे तुझ्या !

वृथा तुझी प्रौढी, गर्व-अहंगण्ड

उदंड तू दण्ड भोगशील !

देत मी इषारा, सावध सावध !!

नको आत्मवध करू ऐसा !

उलटेल शस्त्र उफाळून थंड

त्यात शतखंड होशील तू !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

उमर खय्यामा

उमर खय्यामा, गाऊन रुबाया

होशी कविवर्या अमर तू

जगाच्या फुलाचा घेतला आस्वाद

लुटिला आनंद तूच खरा !

जीवन-मद्याचा पेला काठोकाठ

भरून आकंठ प्यालास तू

तूच ठरविले वेडे शहाण्यांना

वेडा तू शहाणा ठरलास !

तुझे ते काव्यात्म, प्रसन्न सदय

विशाल ह्रदय देशील का?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

कवी - यशवंत

दर्शन

१. हे चित्र
२.
३. असा पाउस पडत असतांना
९. दर्शन
१०. सनई
पालखीचे भोई


मैफल

एक झुरळ
रेडिओत गेले;
गवयी होऊन
बाहेर आले.
                         एक उंदीर
                        तबल्यात दडला;
                        तबलजी होऊन
                         बाहेर पडला.
त्या दोघांचे
गाणे झाले
तिकीट काढून
मांजर आले!


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - अजबखाना

अजबखाना

१. राणीची बाग

स्वेदगंगा


जातक

अन्त्य 

१.
२. वेड्याचे प्रेमगीत
३. असेल जेव्हा फुलवयाचें 
४. फकिरी गाणे
५.
६.
७.
८.
९.
१०. दंतकथा


मध्य (गझल)

अर्धीच रात्र वेडी
साठीचा  गझल

निर्वाणीचे गझल 

परार्ध 

मृद्‌गंध

१. कसा मी कळेना !
२. हे माडांनो !
३. तेंच ते
४. शाप
५. पुन्हा एकदां
६. हीच दैना
७.
८.
९.
१०.
११. 
१२.

विंदा करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.




काव्यसंग्रह
स्वेदगंगा    इ.स. १९४९   
मृद्‌गंध    इ.स. १९५४
धृपद    इ.स. १९५९        
जातक    इ.स. १९६८
विरूपिका    इ.स. १९८१        
अष्टदर्शने    इ.स. २००३


संकलित काव्यसंग्रह
संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)



 बालकविता संग्रह
राणीची बाग    इ.स. १९६१        
एकदा काय झाले    इ.स. १९६१
सशाचे कान    इ.स. १९६३        
एटू लोकांचा देश    इ.स. १९६३
परी ग परी    इ.स. १९६५        
अजबखाना    इ.स. १९७४
सर्कसवाला    इ.स. १९७५        
पिशीमावशी आणि तिची भुतावळ    इ.स. १९८१
अडम्‌ तडम्    इ.स. १९८५        
टॉप    इ.स. १९९३
सात एके सात    इ.स. १९९३        
बागुलबोवा    इ.स. १९९३





ललित निबंध
स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)




समीक्षा
परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
उद्गार (इ.स. १९९६)


इंग्लिश समीक्षा
लिटरेचर अ‍ॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)



अनुवाद
अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
राजा लिअर (इ.स. १९७४)




अर्वाचीनीकरण
संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)





 



पुरस्कार आणि पदवी
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान १९९१
जनस्थान पुरस्कार १९९३
कोणार्क सन्मान १९९३
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)
केशवसुत पुरस्कार
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स








विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक--
इ.स. २०११ : विजया राजाध्यक्ष
इ.स. २०१२ : के.ज. पुरोहित
इ.स. २०१३ : ना.धों. महानोर

जयराम बुवाचा मान

तुझ्या लाडक्या लेकाचा
देता मान तुले
जाऊं आतां सम्दे जनं
लोडगे खायाले

च्यारे पुंजापत्री हातीं
उदबत्ती कापुर
वहा हात जोडीसनी
जयराम् बोवावर

'आज आली तुझ्या दारीं
मांगन रे तुले
दे जयराम बोवा आतां
आऊक्ष लेकाले'

आतां सांगते मी ऐका
एका रे काहानी
काय अवगत घडली या
पुन्यात्री ठिकानीं

"बारा वरसाचा मुंजा
वाटसरू कोनी
टिस लागीसनी गेला
पेयालेज पानी

त्याले सोंबर दीसली
येहेर मयांत
तांब्या शिकाई घेतली
टाकली गयांत

मंग वडांग कुदीसनी
येहरीजोय आला
तव्हां तितक्यांत कोनी
कोनी खकारला

जोय वडाच्या खालती
कोनी आवलिया
तढी व्हता देवध्यानीं
जयराम बोवा

म्हनें जयराम बोवा
'कोन तूं पोरगा
अरे, पानी पेयाआंधी
खाई घे लोडगा'

व्हत मुंजाबी भुकेला
बोवा पुढें आला
हातीं घेतला लोडगा
खायाले लागला

मंग खाऊन लोडगा
वाटली हुशारी
गेला पेयासाठीं पानी
आला येहरीवरी

त्यानं सोडली शिकायी
नित्तय पान्यांत
घेये भरीसनी तांब्या
घटाघट पेत

तव्हां पानी पेतां पेतां
वडाच्या खालुन
गेला सर्पटत साप
मुंजाच्या बाजुनं

तसा पाहे जयराम बोवा
डोये रोखीसन
आतां लागीन लागीन
मुंज्याले रे पान

पेत होता मुंजा पानी
पेयांत मगन
तो कशाले देईन
आठे तठे ध्यान ?

तसा उठे जयराम बोवा
तीराच्या सारखा
देला सापावर पाय-
सापावर देखा

साप चेंदता चेंदता
साप उलटला
आन् मुंजाच्या वाटचा
बोवाले डसला

तव्हां पयाला पयाला
मुंजा घाबरत
पडे जयराम बोवा
लह्यर्‍याज देत

गेली गेली रे बातनी
आवघ्या गांवाले
आला तठे 'हीराबाबू'
साप उतार्‍याले

गेला जयरामबोवा मरी
उपेग काय रे
काय चालीन मंतर
सापाले उतारे ?

अरे, उलटला मंतर
हीराबाबू वर्‍हे
गेलं चढीसनी ईख
सोताज लहरे

झडपला 'हीराबाबू'
गेला रे पयत
आन् मधींच पडला
सोंबरल्या शेतांत

मौत जयराम बोवाची
गेली नही हाटी
लोक आले रे पाह्याले
झाली तठी दाटी

देवमानूस शेवटे
देवाघरीं गेला
जिव धोक्यांत घातला
मुंजा वाचवला

देलं जयराम बोवानं
जीवाचं रे दान
आतां मुंजासाठीं लोक
देती त्याले मान

जारे 'बिढ्याच्या' वरते
'आसोद्याच्या' वाटे
तठी वडाच्या खालते
जयराम बोवा भेटे"


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

राणीची बाग

स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग

हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते

उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगित पुराण

सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत

जिराफ होता गात छान
मानेइतकीच लांब तान

कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार

मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे

त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग


कवी - विंदा करंदीकर

बी


फुलांची ओंजळ

१. नांवात काय आहे?
२.  काविवंदन
३. प्रणयपत्रिका
४. वेडगाणे
५. प्रमिला
६. पिंगा
७. प्रणयप्रयाण
८. माझी कन्या
९. दीपज्योतीस
१०. वात्सल्य
११. चाफा
१२. निवेदन
१३. आशादेवी
१४. मनोहारिणी
१५. डंका
१६. मार्गप्रतीक्षा
१७. जादू
१८. तीव्र जाणीव
१९. ह्यात काय संशय ?
२०. पूर्ण कि अपूर्ण ?
२१. कमळा
२२. आम्ही
२३. गिरीगान
२४. तू देशी न तुझे
२५. विचारतरंग
२६. अनुकार
२७. नागेश
२८. चांदणी
२९. प्रभात पोवाडा
३०. क्षणभर
३१. भगवा झेंडा
३२. काव्यानंद
३३. बंडवाला
३४. बकुल
३५. बुलबुल
३६. एक संवाद
३७. यमदुतास
३८. फुलांची ओंजळ
३९. पिकले पान
४०. गाविलगड
४१. दोन 'मी'
४२. स्वैर गीत
४३. भारतीय जीवन
४४. अध्यात्म
४५. आठवण
४६. एक दृश्य
४७. प्रीति
४८. रूपमुग्धा
४९. प्रतिमाभंग

वैदू

मच्छाई यो शंकासूर मारुनी चार्‍ही वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये ।

तुझ्या रूपाची थोरी काय वर्णू ये । बुरगुंडये माये बुरगुंडाये ॥ १ ॥

कच्छाई वो समुद्रमंथन केलीये । पाठन देउन महा मेरू तारियेले ।

दैत्यासी मारिलीये । देवासी रक्षिलीये । ऐसी तुझी थोरवी जग वाखाणिये ।

तुझे स्वरूपाची ऐकून बहु सुख पाविलिये । माये बुरगुंडाये ॥ २ ॥

वर्‍हाई वो पृथ्वी बुडिये । ते दाढे धरीये । विश्वजनासी तारिये ।

तुझे स्वरूपासी ब्रह्म वाखाणिये । न कळे तया सीमाई वो ॥ ३ ॥

नरसीमीयो प्रल्हादाकारणें । वैकुंठींहुनी प्रल्हाद रक्षिलीयो ।

तारिले भवभक्त तारिले प्रल्हादासी । हिरण्यकश्यपाकारणें आईयो ॥ ४ ॥

बळीराम दैत्य पृथ्वी माजलियो । त्या कारणें कैसी धावलीसे वामनरूप धरूनियो ।

तीन पाऊल पृथ्वी दान मागितलीयो । तिसरे पाउलीये बळी घालोनी पाताळीयो ।

तयाचे द्वारीं द्वारपाळ होउनी राहिलीयो । भक्तिकारणें देणें तुझी थोरी झालीयो । आईयो बुरगुंडे ॥ ५ ॥

परशरामाईयो । पित्याचे वचना धांवलीयो । रेणूकें मातेचें शीर उडविलीयो ।

पहा तिचें नवल केवळ थोरीयो । पित्याचे वचनें चौघे उठविलीयो । भक्तिभाव देखोनी निक्षेत्रीं पृथ्वी केलीयो ॥ ६ ॥

रामाईयो सीतकारणें रामें रावण वधिलीयो । देवगणा सोडून सुखी केलीयो । धन्य तुझी एक वृत्ती सकळ धर्म तारीयो ॥ ७ ॥

कृष्णाबाईयो । देवकी बंदीशाळे त्याकारणें धांवलीयो ।

धरून कृष्णलीला कंससामासी मारलीयो । भक्ति कुबजेची देखोनी तिसी भावें उद्धरलीयो ॥ ८ ॥

बोधाईयो भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातिरींयो । पुंडलिकाकारणें सकळ जग उद्धरीलीयो ॥ ९ ॥

कलंकी अवतार धरुनी सकळ पृथ्वी बुडविलीयो । वटपत्रीं राहिलीयो ।

एका जनार्दनीं देखिलीयो । आई वैदीण प्रसन्न झालीयो । सकळ सुख देखिलीयो ॥ १० ॥


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

त्याला इलाज नाही

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

                    
कवी - विंदा करंदीकर

हीच दैना

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

अर्धीच रात्र वेडी

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी


गीत – विं. दा. करंदीकर
कवितासंग्रह - जातक
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

ऋणाईत

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...


कवी - केशव तानाजी मेश्राम

ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !


कवी - वि. म. कुलकर्णी

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,

रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,

’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,

पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,

आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,

दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !


कवी - वि.म. कुलकर्णी

हरपलें श्रेय

( उदात्त बुद्धीला संसारांत राम नाही. अलीलिक असें जें कांहीं तिला
पाहिजे असतें, तें तिच्या हक्काचें असून देखील, त्याच्या प्राप्तीकरितां
तिला झुरत पडावें लागत नाहीं काय ? )

त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,
“ परि हरपलें तें गवसे ! ॥ध्रु०॥
हेत्यें अजाण माहेरीं
तों खेळ खेळल्यें परोपरी
लटूपटीच्या घरदारीं
लटकीच जाहल्यें संसारी;
तेव्हांचें सुख तें आतां
खर्‍या घरींहि न ये हाता !

चुकचुकल्यापरि
वाटे अन्तरि,
होउनि बावरि

निज श्रेय मी पाहतसें,
न परि हरपलें तें गवसे !
प्राप्त जाहले तें तुजला
तूं मागितलें जें देवाला,
ज्याचें मोल तुवां दिधलें
तेंच तुझ्या पदरी पडलें ---
या वचनें चुकला सौदा
उमगुनि ह्र्दया दे खेदा !

दिलें हिरण्मय,
हातीं मृण्मय;
हा हतविनिमय

परत मला मम मिळे कसें ?
न परि हरपलें तें गवसे !
किरण झरोक्यांतुनी पडे,
अणूंसवें त्यांतून उडे
परोक्षविषयीं मन माझें
विसरुनियां अवघीं काजें;
हयगय त्यांची मज जाची
परि न मला पर्वा त्याची !
वेडी होउन
बसल्यें अनुदिन
एकच घेउन ---

मज माझें लाभेल कसें ?
न परि हरपलें तें गवसे !
जेथें ओढे वनराजी
वृत्ति रमे तेथें माझी;
कारण कांहीं साक्ष तिथें
मम त्या श्रेयाची पटते;
म्हणुनी विजनीं मी जात्यें,
स्वच्छन्दें त्या आळवित्यें.

स्वभाव दावुनि
परि तें झटदिनिं
जाई लोपुनि !

मग मी हांका मारितसे !
न परि हरपलें तें गवसे !
भीडभाड माझी फिटली,
जग म्हणतें कीं, ’ ही उठली !’
जनमर्यादा धरुनि कसें
अमर्याद तें मज गवसे ?
एक शब्द बोलेन जरी
सकलीं कुष्ठित करिन तरी !

अशी आगळी
परी बावळी
आहे दुबळी ;

कांकीं त्याविण सुचत नसे !
न परि हरपलें तें गवसे !
स्वपतिचितेवरि उडी सती
संसृतिविमुखीं घेई ती;
दीपशिखेवरि पतंग तो

प्रेमें प्राणाहुति देतो;
मी न करिन का तेंवि तधीं
माझें मज लाभेल जधीं !

मजपासोनी

हाय ! हिरोनी
नेलें कोणीं !---

म्हणुनि जीव पाखडीतसे
न परि हरपलें तें गवसे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- चिपळूण, २५ मे १९०५

केशवसुत


हरपलें श्रेय

स्तबक : १
१. गोष्टी घराकडील
२. नैऋत्येकडील वारा
३. आईकरितां शोक

४. दुर्मुखलेला


स्तबक : २
५. फुकट दवडलेला तास
६. कविता आणि कवी
७. कवितेचे प्रयोजन
८. काव्य कोणाचे ?
९. सृष्टी आणि कवी
१०. दूर कोठे एकला जाउनिया
११.  शब्दांनो! मागुते या!
१२. दिव्य ठिणगी
१३. सृष्टी, तत्व आणि दिव्य दृष्टी
१४. क्षणात  नाहीसे होणारे दिव्य भास
१५. चिन्हीकरण अर्थात भाव आणि मूर्ती यांचे लग्न
१६. प्रतिभा
१७. कवि
१८. आम्ही कोण?
१९. धुमकेतू आणि महाकवी
२०. फिर्याद
२१. रुष्ट सुन्दरीस


स्तबक : ३
२२. थकलेल्या भटकणाराचें गाणें
२३. जरी तू ह्या इथे
२४. प्रीति
२५. प्रयाण - गीत
२६. माझा अन्त
२७. फार दिवसांनी भेट
२८. प्रणय - कथन
२९. मनोहारिणी
३०. राजा शंतनु


स्तबक : ४
३१. मयूरासन आणि ताजमहाल
३२. चिरवियुक्ताचा उद्गार
३३. वियुक्ताचा उद्गार
३४. स्मरण आणि उत्कंठा                                


स्तबक : ५
३५. अढळ सौदर्य
३६. एक खेडे
३७. भृंग
३८. फुलांची पखरण
३९. पुष्पाप्रत
४०. पर्जन्याप्रात
४१. फुलपांखरू
४२. फुलातले गुण
४३. संध्याकाळ
४४. फूलपांखरू
४५. दिवाळी

स्तबक : ६
४६.अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न
४७. मजुरावर उपासमारीची पाळी
४८. रूढी-सृष्टी-कलि(?)
४९. ‘पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास
५०. तुतारी
५१. स्फूर्ती
५२. मूर्तिभंजन
५३. नवा शिपाई
५४. निशाणाची प्रशंसा
५५. गोफण केली शान !
५६. गावी गेलेल्या मित्राची खोली लागलेली पाहून
५७. एका  भारतीयाचे उद्गार


स्तबक : ७      
५८. सिंहावलोकन
५९. निद्रामग्न मुलीस !
६०. रांगोळी घालताना पाहून
६१. दोन बाजी
६२. घुबड
६३. सतारीचे बोल
६४. वातचक्र
६५. दवाचे थेंब
६६. दिवस आणि रात्र
६७. घडयाळ
६८. विद्यार्थ्याप्रत
६९.पद्यापंक्ती
७०. स्फुट विचार 
७१. उत्तेजनाचे दोन शब्द

स्तबक : ८
७२. तत्वत: बघता नामावेगळा
७३. कोठे जातोस?
७४. स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य
७५. कल्पकता
७६. स्वप्नामध्ये स्वप्न!
७७. आहे जीवित काय?
७८. झपूर्झा
७९. “कोणीकडून ? कोणीकडे ?”
८०. म्हातारी
८१. हरपलें श्रेय
८२. तुझे नाम मुखी

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्‍त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू


गीत    -    ग. दि. माडगूळकर
संगीत    -    वसंत देसाई
स्वर    -    महेंद्र कपूर
चित्रपट    -    छोटा जवान

थोडं कन्फ्युजन

झंप्या: ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

पंप्या: अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या: म्हणजे?

पंप्या: अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या: हात्तिच्या…एवढंच ना.

पंप्या: हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी




गीत    -    कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
संगीत    -    वसंत प्रभू
स्वर    -    लता मंगेशकर

आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण


कवी - साने गुरुजी

कोणिकडे जादुगारिणि ?

कोणिकडे जादुगरिणि; आज सांग धावा ? ध्रु०

दडपित कां तरुणमनें चरण हा पडावा ?

आज खैर मज न दिसे बघुनि तुझ्या भावा,

ही गहिरी नजर जहर,

कवणावरि करिल कहर ?

तरुण कवण लक्षिशि जो चरणिं लोळवावा ? १


कवी - भा. रा. तांबे
जाति - परिलीना
राग - भैरवी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - सप्टेंबर १९२९

शुभं भूयात्

आज नृपराज ये दिव्यनिधि घरिं खरा
आर्त हांकेसरशि येशि देवी घरा ||ध्रु||०

शून्य जग तुजविणें विभव सारें सुनें
उगवतां तूं फुटे जीवनाचा झरा ! १

येइं येईं म्हणुनि सोत्कंठ बहुजनीं
बाहिलें ती महा- लक्ष्मि आली घरा ! २

आज चिंतामणी पाहिला लोचनीं
परिस लाभे अहो भाग्य येईं करा. ३

देवि मांगल्य तूं सत्य तूं सौख्य तूं
काय आतां उणें धन्य झाली धरा. ४

आज झालों कृती धन्य ही संसृती
नव फळांहीं भरो तव मळा नृपवरा ! ५

दणदणो दुंदुभी देव गाउनि नभीं
अक्षता वर्षुनी प्रीति येवो भरा. ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - रुद्र
ठिकाण - लष्कर- ग्वाल्हेर
दिनांक - १६ फेब्रुवारी १९४१

वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि
चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ।।ध्रु०।।

असशील तूं आंत घरकामधंद्यांत,
रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ।।१।।

छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग,
कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ।।२।।

डोळे तुझे जेथ पडति घरामाजि
सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ।।३।।

मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ,
कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ।।४।।

चाले असें येथ हें रोजच्या रोज,
सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ।।५।।

मी टाकितों येथ काळीज हें फूल;
वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ।।६।।


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - बागेसरी कानडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ८ जानेवारी १९३६

आबाद

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून


कवी - वसंत बापट