नरक.

मॄत्युनंतर एका इंजिनीयरची नरकात रवानगी झाली. तिथे त्याने मेहनत करुन रस्ते, शौचालये, गटारं आदिंची नेटकी व्यवस्था निर्माण केली. अशिच व्यवस्था करण्यासाठी स्वर्गाच्या मॅनेजरने फोन लावला.

स्वर्गाचा मॅनेजर : त्या इंजिनीयरला स्वर्गात पाठवा.

नर्काचा मॅनेजर : अजिबात नाही.

स्वर्गाचा मॅनेजर : मी सांगतोय ते ऎक ! नाहीतर तुला भगवंताच्या न्यायालयात खेचेन.

नरकाचा मॅनेजर : काही हरकत नाही ! मी देखील पाहून घेईन. सगळे टॉपचे वकिल तर माझ्या इथेच आहेत.

भलेही तुम्ही आपल्या पत्नीला दोन सिमकार्ड
असलेला फोन घेउन दिला असला तरी चुकुनहि तीचा नंबर
wife 1 अणि wife2 असा सेव्ह करु नका ...

अति भयंकर पीजे

एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार की घरी नेणार?
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
..
.
.
.
.
.
.
..

.
.
...
..
.....
pack pack!!
गंपु : सुरक्षित राहायचं असेल तर..,एक सल्ला लक्षात ठेव-...

कितीही कटु असलं,तरी नेहमी सत्य बोल आणी.........

झंपु: आणी काय?
.
.
.
.
.
.
.
.
.
.

गंपु: आणी पळुन जा!!

"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो "

चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो  ।।१।।

कोरडा डोळा , कोरडी विहीर
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।२।।

वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।३।।

या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।४।।

बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।५।।

असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।६।।

योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।७।।

Unpossible....!!!

एकदा एक मुलगी आपला रिझल्ट बघून म्हणते....

काय??? मी नापास झाले????
आणि ते पण इंग्रजी सारख्या विषयात???
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
Unpossible....!!!

धवळे

आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।
पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥

- समर्थ रामदास

मंगलाष्टक

स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् । मोरेश्वरम् सिद्धीदम् ।
बल्लाळम् मुरुडम् विनायक महम् । चिंतामणिम् थेउरम् ।
लेण्याद्रीम् गिरिजात्मजम् सुवरदम् । विघ्नेश्वरम् ओझरम् ।
ग्रामे रांजणनामके गणपतीम् । कुर्यात सदा मंगलम् ।।

…….अंन पुढारी मेला

ऐकदा एका गावातला पुढारी अचानक मेला.गावात पोलिस येतात आणी पुढारी कसा मेला याची चौकशी करु लागतात.यावेळी लोक सांगतात पुढारी पाय घसरुण खड्यात पडलेले होता आणी मदतीसाठी गावातील लोकांना हाका मारत होता .त्यानंतर लोक येतात.आलेल्या लोकांपैकी काही लोक बोलतात पुढारी मेला. हे एकताच पुढारी जोरात म्हणतो नाही मी जिवंत आहे. पण लोक त्याच्या अंगावर माती टाकतात आणी त्याला गाडतात.याबर पोलीस विचारतात अहो तो सांगत होता ना तो जिवंत आहे तरी माती का टाकली? लोक सांगतात अहो तो पूढारी आहे. त्याच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल.

संताची इंग्लीश

संता एका संध्याकाळी बायको, छोटा 3 वर्षाचा मुलगा आणि छोटी 4 वर्षाची मुलगी असा आपल्या पुर्ण कुटुंबाला घेवून एका पार्टीला गेला. संताने हल्लीच इंग्लीश स्पिपींगचा कोर्स लावला होता त्यामुळे त्याने आपली आणि आपल्या कुटूंबाची ओळख सगळ्यांना इंग्रजीत करुन दिली -

आय ऍम सरदार ऍन्ड शी इज माय सरदारनी - सरदारजीने स्वत:ची आणि आपल्या बायकोची ओळख करुन दिली.

हि इज माय किड ऍन्ड शी इज माय किडनी - सरदारजीने आपल्या छोट्या मुलाची आणि मुलीची ओळख करुन दिली.
रिक्षा चालवणारे लोक कधीही Football खेळू शकत नाहीत...

का??
...
.
.
कारण
.
१. ते हातानी "किक" मारतात..

२."कॉर्नर" मिळाला कि ते गप्पा टाकत उभे राहतात..

३. शिट्टी ऐकली की थांबायचे सोडून हे लोक RTO वाला समजून पळून जातात..

एक दिन का प्यार

मुंगी आणि हत्तीचे लव मॅरेज झाले.

मात्र लगेचच दुस-या दिवशी हत्तीचे दुःखद निधन झाले.

मुंगी दुःखी झाली व म्हणाली, "वाह रे मोहब्बत... एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र कबर खोदने में बितेगी..."

संताचा व्हॅक्युम क्लिनर

व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून संता उत्साहात होता, भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी काढुन त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि

म्हणाला : "मॅडम ह्या व्हॅक्युम क्लिनरने हे जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन टाकेन."

भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर?

संता (दचकून) : का ?

भिमाकाकुं : कारण आता लाईट गेले आहेत..

आदीवाशी शाळा

एकदा एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते.

तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो : 
मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते?

सगळी मुले एका स्वरात उत्तर देतात : 


"स्वादिष्ट!!"

देवा, स्त्रीहृदयीं

देवा, स्त्रीहृदयीं मनोरमपणा केव्हा कुणीं ओतिला ?
गङगौघापरि भूवरी वरुनि ये ओढाळ ओढा कसा !
भूमीतें पहिल्या रसें सजवितां हा सार्थ होऊ रसा;
हा दिव्याभिमुखी करी ऊजळुनी चेतोभवज्योतिला.
नेत्रें तीं वळतां ऊठे प्रथम त्या वृष्टींतलें वादळ,
गालींचीं अरुण स्मितें झळकतां प्रीति त्वरें अङकुरे,
ऐकाकी फुलतांच वाक्सुमन तें वेडा पतङग स्फुरे,
त्या आलिङगनचुम्बनांत पहिली ऐकी पटे मङ्गल.
कैशी घेत अनेक रम्य वळणें जाऊ वरी हा पथ,
भासे मन्दिर न्हाणिलें गिरिशिरीं की सोनियाच्या रसें !
प्रीतीची अधिदेवताच वसशी तू त्या स्थळीं राजसे,
देवी, अन्तर तोडुनी तव पदीं आलोंच मी धावत.
म्हतारीं म्हणुं, देत की भवपथीं काटेकुटे मातले -
काटयांची क्षिति कां गुलाब फुलतां हे ध्येयलोकांतले ?


कवी - माधव ज्युलियन
१ फेब्रुवारी १९१२

कशी तुज समजावू सांग

कशी तुज समजावू सांग
का भामिनी उगिच राग ?

हास्याहुन मधु रुसवा
हेमंती उष्ण हवा
संध्येचा साज नवा
हा का प्रणयानुराग ?

चाफेकळी केवी फुले
ओष्ठ-कमल जेवी उले
भोवती मधुगंध पळे
का प्रसन्न वदन राग ?

वृत्तींचा होम अमुप
त्यात जाळू गे विकल्प
होवुनिया निर्विकल्प
अक्षय करु यज्ञ-याग

ओठांचे फेड बंध
गा इकडे मुक्तछंद
श्वासांचे करू प्रबंध
हृदयांचे मधु प्रयाग


 - बा.भ.बोरकर

दीपका ! मांडिले तुला

दीपका ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
जडविला घडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्यांची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात कालविला हा जिरेसाळ भात

गा रे राघू, गा ग मैने बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतु काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याते थोर करी माये ! कुलदेवी !


  - बा.भ.बोरकर

दिव्यत्वाची जेथ प्रचिती

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती


 - बा.भ.बोरकर

नाही पुण्याची मोजणी

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी

कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग

आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप

पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा

  - बा.भ.बोरकर

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥


  - संत चोखामेळा

ऊंस डोंगा परी

  ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥

  कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

  नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
  काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥

  चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

  -  संत चोखामेळा

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


 - संत चोखामेळा

झिणि झिणी वाजे बीन

झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदीन चीज नवीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अति लीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण

  - बा.भ.बोरकर

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो ।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥


 - संत चोखामेळा

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥


 -  संत चोखामेळा

 आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
 विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
 उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
 भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
 चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

  - संत सेनान्हावी
माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

- बहिणाबाई चौधरी

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही,
हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही,
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही,
नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही,
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही,
जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही,
एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही,
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही,
जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही,
ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही


 - बहिणाबाई चौधरी

"टणक ऊस"

स्थळ : पुणे,  वेळ दु. 1 ते 4 मधली..

एक पुण्याबाहेरील माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिहि अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच. "टणक ऊस" ???

हे नाव का ठेवले असेल?

उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने बेल मारलीच.
एका म्हातार्याने पुणेरी चेहर्‍याने दरवाजा उघडला.

"काय्ये ?" म्हातारा खेकसला

"अहो ते... या बंगल्याचे नाव "टणक ऊस" का ठेवलय ?"

म्हातारा विस्कटलाच... "हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही"

" साॅरी... पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना "टणक ऊस" काय प्रकार आहे?"  चाचरत त्या  माणसाने विचारलं...

"निलाजरे आहात तुम्ही"

"ते झालंच पण "टणक ऊस"....

"अहोssss..." म्हातारा फिस्करला
"अक्षर जुनी झाली की तुटून पडतात..... सगळ्यांना माहिती आहे हे 'पाटणकर हाऊस' आहे....

🔶 दगड 🔶

शब्द एक तो 'दगड' रांगडा
परंतू त्याची रूपे पहा
वृत्ती, दृष्टी जैसी असते
अर्थ लाभतो त्यास महा

अ, आ, इ, ई लिहीण्यासाठी
'दगडा'ची ती पाटी असते
सरस्वती नाखूष ज्यावरी
त्याला जग हे 'दगड'च म्हणते

बालपणी जी केली चोरी
कैर्‍या पाडून दगडांनी
संसाराचा आरंभ होतो
तीन 'दगडां'च्या चुलीतूनी

ऐतिहासिक शिल्पे म्हणजे
दगडावरती कोरीव काम
सेतू बांधिला वानरांनी त्या
'दगड' घेऊनी मुखात राम

'दगडा'ची ती शिला होते
वास्तू बांधण्या आरंभ होतो
अशुभ वार्ता ऐकण्याआधी
हृदयावरती 'दगड ठेवतो

मैलाचा तो 'दगड'च असतो
आयुष्याचे वळण सांगण्या
'दगडा'ची ती भिंत बांधती
नात्यामधले वैर दावण्या

'दगड' घालूनी डोक्यामध्ये
कुणी कुणाचा जीवच घेतो
या 'दगडा'तूनी शिल्पकार तो
सुंदर, मोहक मूर्ती घडवतो

निर्धाराचा शब्द म्हणजे
काळ्या 'दगडा'वरची रेघ
संप, बंद आंदोलन म्हणजे
क्रूर, अमानुष 'दगड'फेक

'दगडा'तूनच जन्मां आले
पाटा-वरवंटा अन् जाते
पाथरवट निर्माते  परंतू
आज त्यांस ना कुणी पुसे

मूर्ख माणसां अर्थ सांगणे
'दगडा'वरती डोके फुटणे
विनाश घेता  ओढवून कधी
पायावरती 'दगड' पाडणे

ज्याचा त्याने विचार करणे
'दगड'घ्यावा हाती कशास
नावच अपुले राहील मागे
'दगडा'वरती कोरून खास.


- सौ.शुभांगी श्री. नाखे (अलिबाग)
कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला । कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥
मनेंचि आरती केला नमस्कार । पूजिला साचार मनामाजीं ॥ ३ ॥
बहिणी म्हणे त्याचे मनांतील हेत । ओळखे निश्चित पांडुरंगा ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई 

गांव

खरं खरं सांगतो राव् ,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाईलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललय?कस चाललय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झाेके हाेते,
आेढ्याच्या डाेहात पाेहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसुन,
कच्चे-पीकलेले आंबे खायची मजा हाेती...

विटी-दांडु,खेळाच मैदान होतं,
इतर अनेक मैंदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे हाेते,ऊस हाेता...

गोठाभर ढोरं होती...
ढाेरां बराेबर पाेर हाेती....

जिवाला जीव देनारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गानं होतं.…

शाळेतल्या कवितेले,
आनंदाचं उधान होतं...

पण..............

जसं गावात हा काेठुन,
मोबाईल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेटआलं...

गजबजलेलं गाव माझ,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणस,
टीव्हीलाच चिटकुन राहीली..

रस्तावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैंदानावरील मुल सारी,
देवळामागच्या अंधारात...

माेबाईल मध्येच,गुंतली सारी......

सुनेसुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खर-खर सांगताे राव.....
या माेबईलनच बीघडवल माझ सार गाव !


कवी - सतिश आहेर
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥
तृषितांसी जैसें आवडे जीवन । तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं । ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥

- संत बहिणाबाई

मित्रा , हा भारत आहे

एक म्हैस जंगलात घाबरून पळत होती .

एका उंदराने,विचारले " अगं, इतकी का पळतेस ?"

म्हैस: जंगलात पोलिस आलेत हत्ती पकडायला.

उंदीर : पण , तू तर म्हैस आहेस . तू का पळतेस ?

म्हैस :  मित्रा , हा भारत आहे .
एकदा त्यांनी पकडले की पुढची वीस वर्ष कोर्टात सिद्ध करावं लागेल की मी हत्ती नाही , म्हैस आहे .
ऐकून उंदीरही पळू लागला .

** आम्ही असे शिकलो **

"आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ..
             त्यावर करतो
             तांब्यानी प्रेस,
             तयार आमचा
             शाळेचा ड्रेस..
       
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग..
       
            धोतराचं फडकं
            आमचं टिफीन,
            खिशात ठेवुन 
            करतो इन..
करगोटा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
            मिरचीचा ठेचा
            लोणच्याचा खार,
            हाच आमचा
            पोषण आहार..
            
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज..
             काट्यांच रूतणं
             दगडांची ठेच,
             कसा सोडवायचा
             हा सारा पेच..
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट..
             जुन्या पुस्तकांची
             अर्धी किंमत,
             शिवलेल्या वह्यांची
             वेगळीच गंमत..
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची..
             केस कापण्याची
             एकच शक्कल,
             गप्प बसायचे
             होईपर्यंत टक्कल..
गेले ते दिवस,राहिल्या त्या फक्त आठवणी....

पाषाण विठ्ठल

पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका । प्रत्यक्ष कां सुखा अंतरावें ॥ १ ॥

घेईन उदंड सेवासुख देहीं । साक्ष या विदेही आहे मज ॥ २ ॥

भ्रताराची सेवा पतिव्रता करी । तरी ती उद्धरी उभय कुळें ॥ ३ ॥

बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांति । भ्रतारें समाप्ती जन्ममृत्यु ॥ ४ ॥


- संत बहिणाबाई

न बोलवे शब्द अंतरींचा


न बोलवे शब्द अंतरींचा धावा । नायके तुकोबा काय कीजे ॥ १ ॥

अदृष्ट करंटें साह्य न हो देव । अंतरींची हांव काय करूं ॥ २ ॥

तेरा दिवस ज्यानें वह्या उदकांत । घालोनियां सत्य वाचविल्या ॥ ३ ॥

महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ । बोलिला लोकांत सर्वद्रष्टा ॥ ४ ॥

अंतर साक्ष आहे निरोपणीं हेत । जडे परी चित्त वोळखेना ॥ ५ ॥

बहिणी म्हणे मीच असेन अपराधी । अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा ॥ ६ ॥


- संत बहिणाबाई

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत.
झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...

" नेमाडपंथ "


ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या "कोसला" या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच…! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले."

तर हिंदू कादंबरी बाबत बोलायचे झाले तर कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृती' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापू  टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ'. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, मिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे.

प्राध्यापक ते सडेतोड समीक्षक या त्यांच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप...

* प्रा. डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे
* जळगाव जिल्ह्यात सांगवीत १९३८ मध्ये जन्म
* पुणे विद्यापीठातून बी.ए. (१९६१)
* मुंबई विद्यापीठातून एम.ए. (१९६४)
* १९६५ ते १९७१ या काळात नगर, धुळे, औरंगाबादमध्ये इंग्रजीचं अध्यापन
* गोवा विद्यापीठात इंग्रजीचे विभागप्रमुख
* तौलनिक साहित्याभ्यास विषयाच्या प्रमुखपदावरून मुंबई विद्यापीठातून निवृत्त

साहित्यसंपदा-

* छंद, रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व या नियतकालिकांमधून भालचंद्र नेमाडेंनी कविता लिहिल्या.
* १९६३ मध्ये, उमेदवारीच्या काळात 'कोसला' कादंबरी प्रकाशित... या कादंबरीनं कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडले...
* 'कोसला'नंतर तब्बल एका तपानं, समकालीन मराठी समाजावर भाष्य करणाऱ्या 'बिढार', 'जरीला', 'झूल', 'हूल' या कादंबऱ्यांनी मराठी रसिक वाचकांना वेगळी अनुभूती दिली.
* 'मेलडी' आणि 'देखणी' हे काव्यसंग्रह प्रकाशित... विंदा करंदीकरांच्या शैलीशी साधर्म्य साधणाऱ्या कविता... व्यवहारी, अमानुष जगातल्या वास्तवावर उपरोधिक भाष्य...
* मराठी समीक्षेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं श्रेय नेमाडेंना जातं... 'साहित्याची भाषा' हे भाषाविज्ञानपर पुस्तक आणि 'टीकास्वयंवर' हा समीक्षा लेखसंग्रह प्रकाशित. 
* २०१० मध्ये 'हिंदू' या महाकादंबरीचे प्रकाशन.  

पुरस्कार- 

* "साहित्य अकादमी पुरस्कार - १९९०"
* "पद्मश्री पुरस्कार"' - २०११"
* कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा "जनस्थान पुरस्कार" व नुकताच जाहीर झालेला "ज्ञानपीठ पुरस्कर"… 


आपल्याला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कराने अवघे मराठी जन आनंदून गेले आहे, आज पुन्हा एकदा मराठी साहित्यक्षेत्रात एक मनाचा तुरा खोवला आहे.  आपले मनपुर्वक अभिनंदन व पुढील आयुष्यास अनेक शुभेच्छा…!!

-
अभिनय महाडिक 
रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?

सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.

रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून?

सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.
एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले:- अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??

पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......

दुसरी मुंगी:- का काय झालंय??

पहिली मुंगी:- अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते,

आलों, थांबव शिंग !

आलों, थांबव शिंग दूता, आलों ! थांबव शिंग !

किति निकडीनें फुंकिशि वरिवरि ! कळला मला प्रसंग ध्रु०

जरि सखे जन हाटा निघती,

आर्जवुनी मजला बोलविती,

परोपरी येती काकुळती,

पहा सोडिला संग. दूता० १

जरि नाटकगृह हें गजबजलें,

जरि नानाविध जन हे सजले,

मजविण त्यांचें कितीहि अडलें,

पहा सोडिला रंग. दूता० २

जरी खवळलें तुफान सागरिं,

मार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,

पहा टाकिली होडी मीं तरि

नमुनि तिला साष्टांग. दूता० ३

अतां पुकारो फेरीवाला,

गवळी नेवो गाइ वनाला,

कारकून जावो हपिसाला,

झालों मी निस्संग. दूता० ४

विसर्जिली मीं स्वप्नें सारीं,

आशा लावियल्या माघारी,

दुनियेच्या आतां बाजारीं

माझा न घडे संग दूता० ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - अंजनी
राग - हिंदोल
ठिकाण - अजमेर
दिनांक - १४ ऑगस्ट १९२१

तृणाचें पातें

तृणांचे पातें हालतें डोलतें वातें. ध्रु०

झगा मख्मली हिरवा गार,

मुकुटहि रत्‍नजडित छान्दार,

तुरा तयावर झुपकेदार,

हलवि ह्रदयातें १

यावरि तेज कसें रसरसतें;

जीवन नसांतुनी थबथबतें,

चिमणें इंद्रचाप थयथयतें.

दंवीं जइं न्हातें. २

तुम्हापरि सूर्य किरणिं या न्हाणि !

तुम्हापरि वरुण पाजि या पाणि,

तुम्हापरि पवन गाइ या गाणिं,

बघा हें नातें. ३

मग या पायिं कसें तुडवीतां ?

खड्‌ग यांतलें उद्यत बघतां

भरे कांपरें स्मरतां सत्ता

झुलवि जा यातें. ४

यांतुनि कृष्ण मुरलि वाजवितो,

वामन बलीस यांत दडवितो,

यांतुनि नारसिंह गुरगुरतो,

भ्या रे यातें. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२७

कोण रोधील ?

या भविष्याचिया दिव्य कारागिरा
कोण रोधील ? दे कोण कर सागरा ? ध्रु०

शूल राजा, तुझा रक्त त्यांचे पिओ,
गृध्रगण भक्षण्या पुण्य गात्रां शिवो,
दुर्गिं त्यांचिं शिरें अधम कुणि लोंबवो,
अंत त्याचा नको समजुं हा नृपवरा ! १

ज्योति मृत्युंजय प्रबळ पिंडाहुनी
समज दावाग्निशा चहुंकडे पेटुनी
देशकालांसि रे टाकितिल व्यापुनी,
अंतिं फडकेल रे ध्वज तयांचा खरा. २

ज्यावरी भार तव, ज्यावरी गर्व तव,
विफल तोफा तुझ्या, पलटणी सर्व तव,
विफल बलदर्प तव, यांत का शर्व तव ?
उघड लोचन, पहा दूर राजा, जरा. ३

भव्य ते स्तंभ बघ तुंग अट्टालिका,
त्या कमानी पहा, त्या गवाक्षादिकां,
सौध ते, कळस तो सोनियाचा निका,
ध्वज तरी प्रीतिचा मोहवी भास्करा. ४

तेथ त्या रत्‍नमय दिव्य सिंहासनीं
लखलखे भरतभूजननि बघ विजयिनी !
प्रणय, नय, सत्य हे सज्ज गण रक्षणीं,
बघ भविष्याचिया दिव्य त्या मंदिरा. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - वरमंगला
राग - भूप
ठिकाण - अजमेर
दिनांक - १८ ऑगस्ट १९२२

मिळे ग नयनां नयन जरी

मिळे गे नयनां नयन जरी-

नयनमोहिनी, मनीं उसळती लहरींवर लहरी. ध्रु०

काय घुसळिला यापरि सागर मंथनकालिं सुरीं ?

विजेपरी लखलखतां अवचित दिपविशि नेत्र खरी.

पिटाळुनी स्मृति, धृति, मति ह्रदया व्यापिशि तूंच पुरी.

निलाजरे हे नयन पाहतिच, हासति लोक तरी.

नयनगवाक्षीं सकलेंद्रियगण एकवटे सुंदरी.

पापदृष्टि ही म्हणति, त्यांहिं मज ओळखिलें नच परी.


कवी - भा. रा. तांबे
जाति - पतितपावन
राग - भीमपलासी
ठिकाण - आग्रा रेल्वेस्टेशन
दिनांक - २२ जुलै १९२२

अवमानिता

कां मज आज तुम्हीं बोलविलें ?
बहु दिवसांनीं स्मरण जाहलें,
आज कसें हें घडलें ? ध्रु०

बालपणांतिल बालिश वर्तन,
तरुणपणांतिल तें भ्रूनर्तन,
स्वप्निं आज कां दिसलें ? १

चित्रगुप्त लिहि वह्या आपुल्या,
वरी धुळीच्या राशि सांचल्या,
त्यांस कुणीं हालविलें ? २

ह्रदयपटावरि सुंदर चित्रें
आपण रचिलीं पूर्वि पवित्रें,
बघुनि आजवर जगलें. ३

स्मराल कधिं तरि या आशेवरि
उदासवाणे दिवस कसे तरि
आजवरी घालविले. ४

परि समजूं का हा भाग्योदय,
भाग्यास्तचि कींपूर्ण तमोमय ?
ह्रदय तरल खळबळलें ! ५

सोक्षमोक्ष घेइन करुनी मी,
जगेन कीं जाइन मरुनी मी,
कांपत येण्या सजलें ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - भूपदंड
राग - तोडी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर,
दिनांक - १५ मे १९३४

दुर्गा

छेड सखे, दुर्गा मधु रागिणि;
बीनलयीं घर टाक थरारुनि. ध्रु०

लालन लालडि, लोचनमोहिनि
अमृत झरूं दे निजकंठातुनि. १

उन्मादक सुर-मोत्यांच्या सरि
उधळ, थरारीं मैफल भारुनि. २

धवल चांदणें स्रवे अमृतरस,
कशी पसरली शांत यामिनी ! ३

धीरोदात्त गभीरा दुर्गा,
ओत ओत सुर गभीर साजणि ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

चरणाखालिल हाय मीच रज !

सांगुं कुणा गुज साजणि, मनिंचे ?

बोलहि वदण्या चोरि समज मज;

मी पतिविरहित, शंकित नयनें

बघुति लोक मज, अशुभ गणुनिया टाळतात मज. ध्रु०

कुणाजवळ करुं ह्रदय मोकळें ?

कोंडमार किति ! दिवस कंठितें गिळुनि दुःख निज १

मी न मनुज का ? काय न मज मन ?

नच विकार का? लहरि उठति मनिं, काय सांगुं तुज ! २

पुरुष वरिति नव नवरि कितितरी,

सकल शुभच तें ! असहायच मी मुकेंच सावज ! ३

कशास जाई तो या मार्गी ?

बघुनि दुरुनिया पाणी पाणी होतें काळीज. ४

दुसर्‍या मिरविति युवति पतिशिरीं,

तुडविति पाउलिं चरणाखालिल हाय मीच रज ! ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - श्रीमती
राग - तिलककामोद
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

कवनकमळें

सखिलोचनकसारीं सारीं माझीं कवनें फुलति बहारीं ध्रु०

मूळ धरुनि तळिं गहन, जळावरि नाचति ठुमकुनि सारीं !

अथांग तुळ तुज न कळे रसिका, सुषमा वरिल निहारीं. १

सुरांगनांचें क्रीडास्थळ हें ह्या कमळांमाझारी,

इंद्रासह त्या उतरुनि या जळिं केलि करिति शृंगारीं. २

सुरासुरांची झुंज कमळिं या, रमति इथे नरनारी;

उषा-निशा नाचती, न उठती काळाच्या ललकारी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - लवंगलता
राग - काफी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १९ सप्टेंबर १९३५