देवा तू खरच महान आहेस

एकदा बंड्याला
एक खूप गरीब आजारी म्हातारी भेटली..
जी खूप रडत होती...कारण तिचा मुलगा
आणि सून कार अपघातात वारले होते ..
आणि तिच्याकडे तिच्या तान्ह्या नातवाला
देण्यासाठी ना पैसे होते ना दुध ..

बंड्याला तिची दया आली .
.त्याने तिला १००० रुपयाची नोट दिली आणि सांगितले
तू डॉक्टरकडे जा...तुझी औषधे घे..
बाळासाठी दुध घे
आणि उरलेले पैसे मला परत आणून दे...

त्या म्हातारीने त्याला ६०० रुपये परत आणून दिले
..
..
बंड्या जाम खुश झाला ...
स्वताशी म्हणाला ...देवा तू खरच महान आहेस
दुसऱ्याला केलेली मदत नेहमी आपल्याला फायदा देऊन जाते
१. डॉक्टरला त्याची फीज मिळाली
२. दुधवाल्या त्याचे पैसे मिळाले
३. मेडिकल वाल्याला त्याचे पैसे मिळाले
४. म्हातारीचे उपचार झाले
५. उपाशी बाळाचे पोट भरले
आणि..
६. माझी नकली १००० रुपयाची नोट पण चालून गेली

भूताळकी

एक माणूस मुंबई हून पुण्याला गाडी घेऊन निघाला होता.
त्याने विचार केला कि आपण जुन्या रस्त्याने जरा निसर्ग बघत जावूया. तो ज्यावेळी डोंगरावर पोहोचला त्यावेळी त्याची गाडी बंद पडली.
तो आता अश्या ठिकाणी होता जिथून त्याला काहीही जवळ न्हवतं.
थोड्याच वेळात अंधार पडला आणि पाऊस सुद्धा चालू झाला.
रात्र पुढे सरकत होती पण त्या रस्त्याने कोणी सुद्धा जात न्हवतं.
... ... अचानक एक गाडी त्याच्याकडे येताना त्याला दिसली.
त्यांनी काही विचार न करता गाडीत पाठीमागच्या सीटवर बसला आणि धन्यवाद करण्यासाठी तो पुढे सरकला.
आणि पाहतो तर काय?
समोर कोणीच नाही..पण गाडी मात्र चालत होती. 
गाडी सरळ चालायची आणि वळणावर ज्यावेळी असे वाटायचे कि आता गाडी धडकतेय त्या वेळी अचानक एक हात खिडकीतून समोरून यायचा आणि गाडी वळवायचा.
तो खूप घाबरला.
त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. देवाकडे सतत प्रार्थना करू लागला.
अचानक एका वळणावर त्याला एक उजेड दिसला.
गाडी हळू झालेली पाहून पटकन गाडीतून उतरला आणि सरळ त्या उजेडाकडे धावत सुटला.
तो एक छोटा धाबा होता.
धाब्यावर जावून पाणी प्याला आणि तो सर्व लोकांना त्या खतरनाक अनुभवाबद्दल सांगू लागला.
धाब्यावर गाढ शांतता पसरली. आणि इतक्यात संता आणि बंता तेथे आले.
संता त्या माणसाकडे बोट दाखवून बंताला म्हणाला
' हाच बघ तो वेडा जो आपल्या गाडीत बसला होता ज्यावेळी आपण ती ढकलत होतो':

नाश्ता करून


शिक्षक : काही प्राणी १५-१५ दिवस काहीही न खाता जगू शकतात.
.
.
.
.
झंप्या : मी तर न जेवता ३० दिवस जिवंत राहू शकतो..
.
.
.
शिक्षक : कसं काय?
.
.
.
.
झंप्या : नाश्ता करून......

महात्मा


देव म्हणतो



गब्बरचे चरित्र

भारतातील महान व्यक्तीपैकी एक म्हणजे गब्बर सिंग होय. पण चरित्रकरांनी त्यांच्यावर नेहमीच अन्याय केला आहे.
गब्बर यांचे प्रेरणादायी जीवन लोकांना कळावे म्हणून गब्बरचे हे चरित्र लिहिले आहे.

►साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम,विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, 'जो डर गया, सो मर गया' या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.

►गब्बरची दयाळू प्रवृत्ती : ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.

►नृत्य आणि संगीताचा चाहता : 'मेहबूबा ओ मेहबूबा' यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.

►अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच वापस आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.

►हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा 'सेन्स ऑफ ह्युमर' होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूप हसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते. तो आधुनिक युगातला 'लाफिंग बुध्द' होता.

►नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितल असत.

►भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.

►सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात 'कोन बनेगा करोडपती' नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.

एकदा झम्प्याने पिंकीला प्रपोज
केलं...

ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..

अगदी लोळवला..

कपडे झटकत
तो उठला आणि म्हणाला..
. .
.
.
. .
.
. .
तर मग मी नाही समजू का..???