शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर

शिशिरागम हा बा. सी. मर्ढेकरांचा पहिला  काव्यसंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. 

कवितांना शीर्षक नाहीत, क्रमांक आहेत. 'शिशिरागम' ही पहिली कविता. बहुतेक कविता या शृंगाररसातील आहेत. चित्रदर्शी आणि गेय आहेत.

बहुतेक कविता 'सुनीत' वृत्तात रचल्या आहेत.

एकूण वीस कवितांचा हा संग्रह


मर्ढेकरांच्या शिशिरागम ह्या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितांवर रविकिरण मंडळाची−विशेषतः त्यातील माधव ज्यूलियन् ह्यांची−छाया दिसून येते.



शिशिरागम

 सूर कशाचे वातावरणी ?

सळसळ पानांची ? वा झरणी ?

खळखळ, ओहोटीचे पाणी ?

किलबिल शिशिरी केविलवाणी ?


कुणास ठाऊक ! डोळयां पाणी

व्यर्थ आणता; नच गार्‍हाणी

अर्थ; हासुनी वाचा सजणी

भास !- जरी हो खुपल्यावाणी.

शिशिरागम

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

फुलली असेल तुझ्या परी,
बागेंतली बकुलावली;
वाळूंत निर्झर-बासरी;
किति गोड ऊब महीतलीं !
येतील हीं उडुनी तिथे,
इवलीं सुकोमल पाखरें,
पानांत जीं निजलीं इथे.
निष्पर्ण झाडिंत कांपरे !
पुसतों सुहास, स्मरूनिया
तुज आसवे, जरि लागलें
एकेक पान गळाव्या
शिशिरर्तुच्या पुनरागमें.


कवी  - बा. सी. मर्ढेकर

 माळावरल्या बांधावरती विलोलनयना जरा

थांबली कटीं ठेवूनी करा.


पश्चिमभागीं बाल कुणि तरी देवदूत चिमुकला

चितारीत मेघावली रंगला.

नीलाकाशीं शुभ्र कापसी खांद्यावर जांभळी

झाक ही हलक्या हातें दिली.

डोळ्याखाली अफाट माळहि थेट पुढे लागला

तयावर आम्रवृक्ष एकला.

मोहर भरला, चूतमंजिरी उन्मादक परिमला

पसरवी लोभविण्या गे तुला.

चरतां चरतां दूर पांगल्या गाई कुरणावरी

चालल्या ओढ्याकाठुन घरी.


नजर नाचरी नागसुंदरी विलासिनी रोखुनी,

झरझरा जाताना हासुनी,

गालावरल्या गोड खळीने शराब जी सांडली

मुशाफिर-तृष्णा तिने भागली.

 तीरावरल्या भव्य शिलेवर एकाकी बैसुनी,

हाससी काय जलीं निरखूनी ?


मंद विखुरती मेघ गुलाबी गगनी, अवनीतली

गुलाबी पडली तत्सावली.

पादाग्राला चुंबुनि जातां झुळझुळणारे जल,

वाढवी कोमलता निर्मल.

तृणांकुरांवर बागडणारी बारिक पिवळी फुलें

पहुडलीं पदराखालीं पिले.

हिरवी राई पार पसरली हासत हलते तुला,

चालल्या कानगोष्टि कोठल्या ?

पल्लवभारे तव शीरावर लवलेल्या वेलिने

कांहि ना वनराणीला उणे !


मंजुल पवनी तरल लकेरी स्तब्ध करी पावलां,

सुचावा मार्ग कसा, जरि खुला ?

सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें

राहिले काय अता मागणें !

 वाचन-मग्ना पर्णकुटीच्या दारिं उभी टेकुनी,

कपोला अंगुलिवर ठेवुनी.


सडा शिंपुनी प्रातःकाळी, सुंदर संमार्जुनी,

काढली रांगोळी अंगणी.

कडेकडेने गुलाब फुलला टपोर कलिका किती

लाजुनी अर्ध्या तुज हासती.

बाल हरिण तव धावत येतां अनिमिष बघ लोचनीं

राहिला पाहत तुज थबकुनी.

तिरपा डोंगर-कडा भयंकर सरळ तुटे खालती,

मागुनी सूर्यकिरण फाकती.

झाडावरले पान हलेना, स्थिरचर संमोहुनी

जाहले मग्न तुझ्या चिंतनी.


पवनीं भरल्या अलकसुगंधे राणी बेहोषुनी

भारलो निश्चल त्वदर्शनीं !



 गुलाब जाई फुललेली । वाऱ्यावर करिती केली;

हास गडे त्यांच्यासंगे । सुमहृदया माला तूं गे;

नयनामधि निर्मल पाणी । सस्मित मधु अधरीं गाणीं;

गात गात आनंदूनी । नंदनवन बनवी अवनी.


मिटलेल्या कोमल कलिका । पानांमधि लपवी लतिका;

एकेकिस शोधुनि काढी । चुंबुनी ती फुलवी वेडी.

– हात नका लावूं कुणिही । कोमेजुन जातिल बाईं;

शब्द नका काढूं कुणिही । लपविल ही नाजुक जाई.


सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;

मंद गंध भवती भरती । पानपुष्प पुलकित करिती.

वर्षांच्या मागुनि वर्षे । जातिल तरि विसरुनि हर्षे;

पाहत तुज राहिन ऐसा । आनंदित वेडा जैसा.


चकित परि तन्मयता ही । प्रश्न करी आश्चर्यें की,

स्वर्गातिल सौंदर्याला । बहर कसा भूवर आला !

 दिव्यात्म प्रस्फूर्त हृग्दीत हें गोड गाईल कोणास गुंजारवी ?

आवेगुनी अंतरीचा उमाळा दाटून येतां कुठे ओतणे ?

उत्फुल्ल हृत्पुष्प ! आशादलांचा खुले रंग ! भोळी चढे टवटवी !

तत्केसरांच्या सुवासी परागां कुणां केस-भांगांतुनी पेरणे ?

उत्तुंग लाटा समुल्लोलुनी या सुहृत्सागराच्या नभीं चालल्या;

ही फेनमाला स्वर्गस्थिता कोण घेईल का तारका झेलुनी ?

मज्जीवनाच्या पहाटेस वृत्ती मनींच्या अशा तीव्र आतूरल्या;

शोधार्थ अदृष्ट रूपा ! म्हणूनी किती भागलों वाट ही चालुनी !

कुणी हासली; रम्य गोष्टी कुणांच्या; कुणी स्पर्शुनी अंग बेहोषवी;

कुणी लोभलीं; लोभ झाला कुणांचा; कुणी कीवलीं व्यर्थ रस्त्यावरी;

कित्येक ऐशी ! भ्रमिष्टापरी मी तरी – अंतरी एकला !- आळवी

रूपास ज्या, तें दिसेना कुठेही जरी थांबला सूर्य माथ्यावरी.


तें रूप येथे ! न् समुद्धारिणी भक्ति निशःब्द त्वल्लीन हो हर्षुनी

हा हाय ! निस्सार तों पार्थिवत्वांत निभ्रांत तूं राहसी गुंगुंनी.

कोणी नको अन् कांही नको, देवता तूं एकली !

हृदय जीतें अर्पिलें हें होउनी बद्धांजली !

वाटभर गे हा फुफाटा; पाय जाती पोळुनी;

सौंदर्य तूझें – सावली ही ! सार्थ झाली चालणी.

आग पोटी भावनेची ! ‘घाल तुकडी भाकरी’,

– हीहि परि गे, याचना ना आज तूझ्या मंदिरी.

मन्मनाच्या माळरानी भावना-झुडुपें जिथे

तग न धरती, प्रेम-तरु गे, फोफावणें कैचा तिथे !

जीविताचें ऊन विश्वीं जोंवरी हें तापतें,

फक्त तूझ्या दर्शनाची ही पिपासा लागते.


सौंदर्य-देवि सुहास, तूं ! मी फक्त आतुर दर्शना;

मेल्यावरी तर हीहि गे, उरणार नाहि तहान ना ! 

 सुन्न झालें मन, सुन्न भावना या,

भोवताली पसरली रात्र-छाया;

पावसाचा चुकविण्या मार घेती

पांघरूनी अंधार घरें रस्तीं.

“- व्यर्थ येतां का ? प्रेम कधी माझें

– शक्य नाही” – उतरिलें तिथे ओझें

बंद दाराशीं मग मुग्ध भावनांचे;

आणि धरिला मम मार्ग सिधा….

पावसाळी अंधार गारठ्यांत

काकडूनी हम-मार्ग-दिवे जात;

चिंब ओला जाहलों आणि थेट

दारूगुत्त्याला दिली प्रथम-भेट !

भेट शेवटली तशी प्रथम तीच,

झोपडीला परतावी माय-खेच.

माय असते, बाईल जरी नाही,

प्रेमवंतां तशि प्रेमवंचितांही.

दिवस झाले कित्येक त्या प्रसंगा;

आज आलों शोधीत गेह-रांगा;

बंद आहे तव दार; परि ओझें

आत नेलें उचलुनी कुणीं माझें !

 हां हां थांब ! नको सुहास, गमवूं तोंडातली मौत्तिके,

“देवाच्या घरचाच न्याय असला !” प्रश्नास दे उत्तर.

“झाला खेळ, अता पुरे !” वद असे धिक्कारुनी कौतुके,

जातांना उपहास-हास्य-ध्वनिही पाडीत कानांवर.


काळी भीषण रात्र कापित निघे हृत्स्वामिनी भेटण्या

काळा फत्तर तोंच होउनि पडे तारा सहाऱ्यावर.

स्वर्गाच्या मग मंदिरी चमकती जेव्हा सख्या चांदण्या,

किंचित् हासुनी तारका खुणविते – “आता कळे अंतर !”


झाला अंक समाप्त एक ! बदले ही भूमिका, वेष हा;

मी रस्त्यातिल गे भिकार कवि, तूं प्रासादशृंगीं रहा !

 आता अंत कशास पाहसि ? अता आभाळलें अंतरी;

विश्वाची घटना मला न उमगे; मानव्यता दुर्बळ.

केलें पाप असेल जें कधिं तरी मी जन्मजन्मांतरीं,

प्रायश्चित्त तदर्थ ना म्हणुनि गा, पाठीवरी हे वळ ?


न्यायाच्या निज मंदिरांत बसुनी साक्षीपुराव्याविना,

किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचुन,

न्यायाधीश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना;

देवाच्या परि न्यायरीति असलें पाळील का बंधन !


होवो तृप्त – तथास्तु ! – निर्घृण प्रभो, ही न्यायतृष्णा तुझी;

फासाला चढल्यावरी नच दया याची, जरी पामर;

भूतां अप्रतिकारिता भ्रमविते यंत्रापरी शक्ति जी,

तीतें एक सहिष्णुता अचल अन् निःशब्द हे उत्तर.


किंवा हार्दिक बेइमान ठरतो नित्यांतला सत्क्रम,

तेथे प्रेमच एकनिष्ठ घडते अक्षम्य दुर्वर्तन !

 मायावी गुजगोष्टि गुलगुल मुदे; आलंगनी तत्पर;

किंवा चुंबनलोलुप स्मित सदा ओठांवर नाचरे !

झाली दंग सुहास, प्रेम-युगुलें ऐशी मजेखातर;

– विश्वाच्या बगिच्यांत हीं भिरकिती कालांबरी पाखरे.


हासे ज्या क्षणभंगुरत्व विजयें वाखाणुनी कौतुकें,

लीला या लटक्या बघून निमिषोत्फुल्ला सुदैवानिलें;

माझेंही तुज प्रेम काय गमलें या टर्फलांसारिखे,

ज्यांच्यातील जिवंत जीवनरसा सौख्ये असे शोषलें ?


नाही -! मद्हृदयीं सुरा खुपसतां मी आत्महत्येस्तव,

रक्ताची चिळकांडि ही उसळुनी एका कमानींतुन

येवोनी भिजवील कोमल तशा या शुभ्र पायां तव;

अन् तो स्त्रोत अखंड वाहिल तसा दिक्काल ओलांडुन.


घेतां आचमुनी पवित्र जहरी ही रक्तगंगा लव,

विश्वाचे अभिषिक्त देव तरुनी होतील ते – मानव.

 जा जाई आता, परतुनि कां हाससी ?

कां उगाच वळवुनि मागे

आपुली नजर, भारिसी ?


स्थितधी नजरी मी, मानी तरि मानिनी,

नच अवाक्षरही एका,

काढीन कधी भाषणीं.


ये वीणारव मधु, मंजुळ पवनांतुनी,

डबडबती ऐकुनि डोळे

कारुण्य-सुधा-सिंचनीं.


परि एकहि भोळा अश्रू जो तेथुनी

पडणार, तोंच घेईल

हृदयाग्नि तया शोषुनी.


धगधगित निखारा हृदयीं हा कोंदुनी,

मत्प्रसन्नवदनीं छाया

वरि शीतल चंद्राहुनी.


ही पाझरते तव शांत शरच्चन्द्रिका !

निशिगंध दरवळे भोती,

पुलकिता मार्ग-वालुका.


अदृश्य अप्सरा अवनीवर येउनी,

घुमविती निशा-संगीत

या मिटल्या पुष्पांतुनी.


मी मानव ! – दुर्बळ ! – दिव्य, धवल माधुरी !

व्याकळून हृदयीं येतां

स्मृति होइल तव अंतरिं .


हृतकंप ! – तरल भावना ! गोड ती स्मृति !

परि निष्ठुर जबरेने मी

गाडीन गाढ मी विस्मृतीं.


बंबाळ जखम आतली दाबतों अशी,

बेहिम्मत आर्तरवाने

रडतील रडो दीनशीं.


निष्प्रेम-निराशा-दुःसह जीवन तरी,

याचना न केविलवाणी

मम वदेल कधी वैखरी.

 झाली चूक ! – क्षमस्व ! वेड असलें जन्मांतुनी लागतें,

तेंही एकच वेळ ! नेत्र उघडे ठेवून ना दोनदा :

मौर्ख्याचा जगणें कलंक न असा लावून घेतां कदा,

सर्वांनाच कुठे शहाणपण हे देवाघरीं लाभतें !

ज्यांना संकट,

 आलों -स्वतंत्र तव भाव !-स्वतंत्रतेने

आराधण्या प्रथम तन्मय आर्जवाने,

प्रेमार्तता उघड बोलुनि दाखवीली

-शब्दांत, जे ठरति बालिश अन्य वेळीं.

दोघेंच आपण सुहास, न पाहणारा,

निश्चिन्त- चित्त बघ मांडुनि हा पसारा

विश्वासपूर्ण बसलों मम भावनांचा,

रागानुराग नि विनोदमय स्तुतीचा.

किंचित क्षणांत वरती ताव दृष्टि जावी,

अन हासरी चमक लोचनिं वेड लावी !

होतें निवांत; मन संशयशून्य, भोळें;

अर्थविना सरस-वाक्पटुताहि वोळे.

किंचित पुन्हा नजर ही वरती करून

तूं हासतां बघितले फिरवून मान,

-भांबावलों-स्तिमित-बावरलों- कळेना

कोठे, कसा, कुठुनि मी……..


तों विश्वनाट्यगृहांतुन या दिगंत,

हास्य-ध्वनी दुमदुमून भरे हवेंत;

अन रंगभूमिवरला जगतांत खास

गेलों विदूषक पुरा ठरुनी सुहास !

 गेलों विदूषक जरी ठरुनी सुहास,

दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आसपास

कोठे तरी स्वमरणोत्तर भाग्यकालीं -!

हाही विचार न कमी मज शांतिदायी.

 जातेस तरि सुखाने । जा आपुल्याच ठायां;

हृदयांत साठलेलें । गेलें न रूप वाया.

ही एक मुग्ध कलिका । ताऱ्यास वेड लावी,

परि तत्प्रभात-अश्रू । हृदयी डुजीच ठेवी,

आधार या तरूचा । वरती चढावयाला,

आलिंगणें लतेने । स्नेहें वरी दुजाला.

ही रीत काय नाहीं । येथील कोमलांची,

अपवाद त्यास कैशी । होशील एक तूंची !


रेताड जीवनांत । भवितव्यता-किनारीं,

अति तीव्र वेदनांनी । व्याकूळतां जिव्हारीं,

सौंदर्यरूप ईशा । भावें बघून हृदयीं,

मम पोळल्या जिवाला । लाभेल दिव्य शांती.


तारुण्य-रूप जातां । बघशील बावरून,

शांती अशांततेची । तूतें न तीहि जाण.

 मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तव एकसारखी;

हुरहूर भरून ये हृदीं; भर संध्या करि त्यांत आणखी.

बसलों म्हणुनीच येउनी — जग-कोलाहल लांब मागुती —

दगडावर त्याच, ज्यावरी गतकालीं तव स्निग्ध संगती.


पसरे लहरींत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;

निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.

अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,

“जरि वाट कितीहि चाललां, नच आता तरि अध्व-खेद तो.”

विहरून नभांत स्वैरसें घरटयाला निज शेवटीं त्वरें,

चिंवचींवित सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें.

मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनी,

लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,

श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे !”

मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.

हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;

अपघात घडून देह हा पडला एक रुळावर इथे,

बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,

कुठुनी तरि शक्ति ;…………………

 प्रीतीची दुनिया सुहास, हसते वाऱ्यावरी भाबडी;

स्वानंदें रमते समुत्सुक जनीं निर्हेतुका बापुडी;

अद्वैतांतिल मंजु गीत-रव तो आलापुनी गुंजनीं,

राही मग्न अशीच गोड अपुल्या स्वप्नांत रात्रंदिनीं.

आशांची बकुलावली विकसली मंदस्मितें भोवती;

ईषत्कंपितकल्पनाकिसलयीं निष्काम डोलेल ती !

चाखावा मकरंद त्यांतिल जरा; जावें, झुलावें जरा;

शंकाही नच की कधी वठुनि हा जाईल गे मोगरा.

सौख्याभाव नि सौख्य एकच इथे संवेदनाजीवनीं;

नीती आणि अनीति संभ्रम फिटे स्नेहार्द्र संभावनीं;

संध्यादेवि उषेसह प्रगटते आकाल निलांबरीं;

येई गे, अजरामत्व मरुनी निर्वेध ताऱ्यांपरी.


नाही हें नशिबीं ! — नसोच ! — मिटती जागेपणीं पापण्या;

आई ! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या.

 सचिंत पारध गोड तत्वतः

सोडुनि देतों अता सुखाने !


सावज मागे, पुढे शिकारी !

गति-धुंदी ही भरे शरीरी;

नसानसातुंन वेग चढे शिरिं;

वळुनी बघणें आता कसले !


पाय लागले डोंगर-माथां,

गतिमत्वाने एकतानता,

प्रभू-पावलें लांब तेजतां –

अंधुक, पारध तिथे संपणें

 चंद्रकिरणांनो, तुम्हां

वाजते का कधी थंडी

स्वतःची ? मध्यरात्री

हिवाळ्यांत हुडहुडी !


नाही ना ? मीं म्हणुनीच

लांबवले मरणाला;

गारठून जाल जेव्हा –

चिता हवी शेगोटीला.



आई म्हणजे आई असते

आई म्हणजे आई असते

जगा वेगळी बाई असते.....


तिची हक़ म्हणजे
मन हराव्नरी असते......
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते.....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

घरातली तुलस तिच्या
मायेने वाढत असते....
बगिच्यातला निशिगंधा....
तिच्या हसण्याने फुलत असते....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

तिच्या सुरांवर
घर रमत असते.......
तिच्या तलवार
घर चालत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

आपल्या बलाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते....
आपल्या बलाला सुखाचे क्षण मिलावे.......
म्हणुन ती सतत तलमलत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

 जाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जावू शकतात... 

एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली... 



त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली.





एक मुलगी गाडीतून एका मुलाला ओव्हरटेक करते...

मुलगा : (जोरात ओरडून) ए....म्हैस...!!!

...मुलगी : तू गाढव.. मूर्ख.. बिनडोक...!
एव्हढं बोलत असतानाच
तिची गाडी म्हशीला धडकते व अपघात होतो..
तात्पर्य :
मुलींना मुलांनी त्यांच्या भल्याचे
सुद्धा सांगितलेले कळत नाही..

 एकदा दोन गुरुजी गप्पा मारत बसलेले असतात.

एक- ‘मला टाटा आणि बिर्ला या दोघांची मालमत्ता मिळाली तर मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावेन.’
दुसरे- कशाला उगाच फुशारक्या मारता? ते कसं शक्य आहे?
पहिले- का नाही? सकाळ-संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा घेईन.

आई म्हणजे .........

आई साठी काय लिहू

आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........

 लग्नाच्या पुजेवेळी-

नवरा: गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायच की उजवीकडे?


गुरूजी : बघ जमतय तस कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे..

 *दळण ,बायको आणि मी*


 😃😂🤣😜😃😂🤣


एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे या कामावरून वाजलं..


चांगलीच खडाजंगी झाली.


आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?.


पण शेवटी मी पडलो आपला *बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष*


गपगुमान जावून दळण आणावे लागले....दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो.....


मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही...


एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल....


दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली....


डोक्यात किडा वळवळायला लागला...

अन चेहराच खुलला....


प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो...माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली...


*मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर* तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या....


काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले, *अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं? 


तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला....डबा घेऊन मी दळण आणायला गेलो...


यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो...

बायको बुचकळ्यात पडली...!


हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला...


पुन्हा काही दिवस गेले ....मी पुन्हा विचारलं..

*दळण कधी आणायचं ?*...


यावेळी दळणाला जाताना जरा छान ठेवणीतला शर्ट घालून गेलो...आता मात्र बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता...


नवरा खुशीत, उत्साहाने दळण आणतोय म्हणजे काय तरी भानगड असणार ....संशयाचे बी आपोआप पेरलं गेलं होतं.....त्यात आता मला दळण आणायला नेहमी पेक्षा जास्त उशीर होऊ लागला....


आणखी पुढच्या वेळी जाताना मी मस्त छान आवरून, नीटनेटका भांग पाडून, जरा बऱ्यापैकी कपडे घालून, त्यावर स्प्रे वगैरे मारून दळण आणायला निघालो.....

माझा हा तामझाम पाहून तिची विकेट पडली....!


*काय हो, दळण आणायला कशाला एवढं आवरून जायला पाहिजे...काय एवढं आवरायचं कारण?*


तसं तिला म्हणालो.. "अगं असं कसं... त्या दळणाच्या गिरणीपाशी किती किती जण येतात....


तिथं दळणाची वाट पहात उभं असताना कोण कोण भेटतं...


काही गाठीभेटी होतात...


दळण आणायला आलेल्या गेलेल्या; आता सारखं जातोय म्हंटल्यावर ओळखीच्या झाल्यात....


बिचाऱ्या दोन शब्द बोलतात... 


मग असं सगळ्यांसमोर गबाळ जावून कसं चालेल...

जरा नीटनेटकं नसावं का माणसाने...!


असं म्ह्णून मी आपला मस्त शीळ वाजवत दळण आणायला गेलो....

यावेळी मुद्दाम जास्त वेळ लावला....


घरी आलो तर रागाच्या थर्मामीटर मधला पारा ग्लास तोडून थयथया नाचत होता...मी आपलं निरागसपणे दळणाचा डबा जागेवर ठेवला....


पुन्हा काही दिवस गेले...मी पुन्हा विचारले


*काय गं, ते दळण आणायला कधी जावू..?*


तसं फणकाऱ्याने माझे कान तृप्त करणारे शब्द कानी पडले !


*काही गरज नाही दळण आणायची, मी माझे बघते काय कसे आणायचे ते....तुम्ही नका पुन्हा लक्ष घालू त्यात...*


मी आपलं निरागसपणे  *बरं...* म्हणून सटकलो....


पहिला विश्वचषक जिंकल्यावर जो आनंद कपिलला झाला नसेल त्याच्या दुप्पट आनंद झाला...!


बेडरूममध्ये जाऊन मी मुठी आकाशात झेपावत, चुपचाप आनंद साजरा केला....


आता कित्येक वर्षे झाली, दळण काही मागे लागले नाही...

 

असे अनेक सल्ले ह्या संघटनेत दिले जातात; आजच सभासद व्हा 🙏🏻

    

                 संपर्क:-


  *बिचारे नवरे संघटना*

        😂😂😂😂

झडत्या

 विदर्भात पोळ्याच्या दिवशी सार्वजनिक झडत्या घेण्याची प्रथा असते।

झडत्या म्हणजे विरोधकांवर शेलक्या शब्दात टिका


 १) घुटी रे घुटी, आंब्याची घुटी !!

मुख्यमंत्र्यान देल्ली हो, कर्ज माफीची ‘‘जडीबुटी’!!

त्या जडी बुटीले, आरा ना धुरा !!

मुख्यमंत्री साहेब, ‘भिक नको हो, कुत्र आवरा !!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


२) पोई रे पोई,, पुरणाची पोई !!

मुख्यमंत्र्यान देल्ली हो,

कर्ज माफीची गोई !!

त्या गोईले चव ना धव, 

कास्तकाराचं आस्वासनात,मराच भेव!!

रकुन आला कागुद, तीकुन आला कागुद,

आश्वासनावर,कास्तकार बसला

जिवमुठीत दाबून !!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


३) वसरी रे वसरी, शम्याची वसरी,

पयलीले लेकरू, नाई झाल, 

मनुन श्यान ‘केली होदुसरी’ !!१!!

दुसरीच्या लग्नात वाजवला बीन,

जनता डोल्ली, म्हणे हो ‘आयेगे अच्छे दिन’ !!२!!

इकास जन्माले याची ‘वाट पाहून रायली जनता’

सरकारण देल्ला हो, ‘नोट बंदीचा दनका’ !!३!!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


४) पोया रे पोया, यवत्याचा पोया

आत्महत्ये पाई लागला हो.. काया टिया !! १!!

काया मातीत टोब तो बीया, 

तूर घेणारे घालतात हो.. आम्हाले शिव्या !! २!!

शिव्या घालणारे, खातेत आमच काय बिघडवल हो..

आम्ही तुमच !! ३!!

घामाचा पैसा, मागतो आम्ही 

थंड हवेत बसता हो.. तुम्ही !! ४ !!

घाम गाऊन पिकवतो शेती

नांदी लागाल तर होईल माती !! ५!!

एक नमनगौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...!


सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा।💐

 *🙏विचार धन🙏*


एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.


कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. 


त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.


 होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.


सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.


हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."


सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.


कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.


थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.


त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."


प्रवाशी हसून म्हणाला  "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.


*तात्पर्य*


*जो  पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....* 


*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय  पर्याय नाही हे जाणून शरण येतो ...*

 _*दोन चोरांची गोष्ट*_


_लेखक-अनामिक._


_*चोर १ –*_


     अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता. 

      एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता.

      तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं होतं.

     चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.

     त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला! 

      वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साधं जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.

     लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले. आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.

मुलाखत खुप रंगली,

     मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”

      “तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.

     “हो, हो!” एकच गलका झाला.

       “मी सर्वात मोठी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’. हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.” 

    सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.

     “मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं एक तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”


_*चोर २ –*_


     १८८७ चा एक पावसाळा. एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. 

      कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली. तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता. दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!

      नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली. तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,

      शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. 

     ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.

      पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले. 

      कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसान भरपाईचे आदेश दिले.

      तो जेलमध्ये असतांनाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला. त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. 

      विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा. 

*तात्पर्य*

    - आपली अंगभुत कला न

ओळखणारा, प्रत्येक जण चोर आहे.

     - तो प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.

     - तो व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.

     - तो प्रत्येक रिकामटेकडा व्यक्ती चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही.

     - आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

_*लेखक-अनामिक..*_

 कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाहि तरी चालेल पण एकदा "शरिरशास्त्र" चा अभ्यास करावा.

( वैज्ञानिक मानवी शरिराचं अभ्यास करुन थक्क झाले आहेत )

*मानव शरिर अदभुत आहे.*


*मजबुत फुफ्फुस*

आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.


*अशी कोणतीही फॅक्टरी नाही*

आपले शरिर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात.


*लाखो किलोमीटर चा प्रवास*

मानवाचे रक्त शरिरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो.


*धडधड*

तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयंच पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो कीरक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकतो.


*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ*


मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुन पर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 


*नाकात एअर कंडीशनर*

आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.


*ताशी ४०० कि.मी. ची गती*

चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.


*जबरदस्त मिश्रण*

शरिरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकोन आहे.


*अजब शिंक*

शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.


*बेक्टेरियाचे गोदाम*

मानवाच्या शरिराच्या १० %  वजन हे त्याच्या शरिरात असलेल्या बेक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरीया असतात.


*विचित्र विश्व*

डोळ्याचा विकास लहान पणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतो. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजाना ओळखु शकतो.


*दातांची काळजी घ्या*

मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.


*तोंडांतली लाळ*

मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.


*पापण्या झपकणे*

वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच  फरक जाणवतो.


*नखांची कमाल*


अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.


*दाढीचे केस*

पुरुर्षाच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.


*जेवणाचे गणित*

व्यक्ती सामान्य रीत्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.


*केस गळण्याचा त्रास*

एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.


*स्वप्नाची दुनिया*

बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करतो. वसंत रुतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.


*झोपेचे महत्व*

झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरिराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेरिंग) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे गरजु होर्मोन्स मुक्त होतात.


*तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.*

 बंड्या हॉस्पिटलमध्ये जातो


नर्स: आता एक दीर्घ श्वास घ्या


बंड्या: ....(श्वास घेतो)


नर्स: आता कसं वाटते?


बंड्या: मस्त वाटतंय एकदम 😍

कोणता परफ्युम आहे ? 🥰

*मास्कवर कविता लिहून आणा*


एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख

होती पडून छोटी, चिंधी तयांत एक


शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी

चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?

कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती

तेही न त्रास देती, चिंधीस काही एक


चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?

हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?

फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?

मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!


एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले

साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले

भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक

मिरवे बनून चिंधी, कोविड मास्क एक


😄 

 संध्याकाळी मामा फिरायला बाहेर गेले असता दुकानावरील सर्व फलक पाहिले.


 त्यामध्ये लिहिलेल्या सर्व फलकामध्ये


 अर्धा शब्द निश्चितपणे *इंग्रजी*" होता


 जसे: -


 संजय *सर्व्हिस* स्टेशन


 अजय *मेडिकल* स्टोअर


 विजय *फोटो कॉपी सेंटर*


 बबलू *हेअर कटिंग*


 शिवा *बार एन्ड हॉटेल*


 गणेश *लॉज*


 ज्योती *हॉस्पिटल* ... इ.


मामाचे मन खूप अस्वस्थ झाले,

 मातृभाषेची ही अवस्था पाहून !!


 पण मग एक बोर्ड आला आणि फक्त एकच बोर्ड जो नेहमीच मातृभाषेत लिहिलेला असतो ..


 ज्यामुळे आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो -


 *देशी दारूचे दुकान*


 मामाचे हृदय प्रसन्न झाले


 देशभक्ती शरीरात जागृत झाली आणि मामाने त्या दुकानातूनच वस्तू विकत घेतल्या .....😁😁🤪🤪


 *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*


 *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव.*


*२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील." - कर्ण.*


 *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल." - अश्वत्थामा.*


 *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*


 *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*


 *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते." - धृतराष्ट्र.*


 *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी* *घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."*  - *अर्जुन......¦*


 *८) ...."प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही"...- शकुनी......*


 *९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही"....- युधिष्ठिर....*


 *....या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे.....*


*....जो इतरांना संपविण्याची तयारी करतो..... तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो....आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.....तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.....*


*.....दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा....अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही......*


*..."माणसाचा दर्जा हा जात... धर्म व मिळकती वरून ठरत नसतो... तर तो विचारांवरून ठरत असतो . .....धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो....धर्माचा नाही".......*

 आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक  शोधाची गोष्ट सांगतो..


‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता..


अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं..


पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले..

दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या..

सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती..


समस्या फार मोठी होती असं नव्हे पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती..

जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली तिला जखम झालीच समजा..


टोमॅटो कापला लागला चाकू-दार बंद करायला गेली लागला खिळा-दुध गरम करायला गेली बसला चटका..

जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती..


नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं..


प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिके पण नसलो तर??काय करावं बुवा???

डिक्सन मोठ्या बुचकळ्यात पडला..


“वेंधळेपणा कमी होईल न होईल पण किमान जोसेफिनला तिला झालेल्या जखमेची काळजी घेणं यायला हवं”

डिक्सनला प्रकर्षानं जाणवलं..


‘एवढं काय त्यात?छोट्यामोठ्या जखमा तर असतात एवढं काय सिरियस त्यात?’असे विचार आपल्या किंचित निगरगट्ट भारतीय मानसिकतेमुळं येऊ शकतात पण इथं दोन मुद्दे येतात..


पहिला मु्द्दा म्हणजे पाश्चात्य देशात ढोबळ प्रेम-हक्क या पलिकडे वैयक्तिक पातळीवर एकमेकांची ‘परस्पर जबाबदारी’ म्हणून काळजी घेतात..

नाहीच जमलं तर एकवेळ नात्याला तिलांजली देतात पण नुसतीच चौकट पाळण्याच्या अट्टाहासात मेलेली नाती ओढत नाहीत..


आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा औषधांची उपलब्धता मर्यादित होती-प्रतिजैविकांचा फारसा विकास झालेला नव्हता त्यामुळं जखमा लांबायच्या-सेप्टिक व्हायच्या-अनेकदा मृत्यूही व्हायचे..


शेवटी डिक्सननं चौकोनी कापडाचे तुकडे,त्यांच्यावर एक चिकटपट्टी अन् वरनं क्रिनोलिन लावत जोसेफिनसाठी थोडी रेडिमेड तयारी करून दिली..

जुगाड यशस्वी झाला..

आता डिक्सन घरी नसला तरी जोसेफिन एकटी लिलया जखमेची देखभाल करू लागली..  


डिक्सन काम करत असलेल्या कंपनीत त्याच्या या घरगुती उद्योगाची चर्चा झाली..

अश्या प्रकारचं काॅम्बिनेशन असलेली कापडी पट्टी जखम विक्रमी वेळेत बरी करते हे ऐकून खुद्द कंपनीचा मालक नुसता चकित झाला नाही तर येडा व्हायचा बाकी राहिला..


या भन्नाट जुगाडची कल्पना सगळ्यांनाच जाम आवडली..

कंपनीनं याच पट्टीच्या धर्तीवर ‘बॅंड एड’ या नावानं बल्क प्राॅडक्शन करण्याचा निर्णय घेतला..

कल्पना नवी असल्यानं पहिली बॅच थोडी सावकाश पण विकली गेली..


हातानं बनवण्यात वाया जाणारा वेळ आणि घरोघरी असणारी मागणी यांचं व्यस्त समीकरण बघता कंपनीनं यासाठी मास प्राॅडक्शन व्हावं म्हणून यथोचित यंत्रसामग्री बसवली आणि बस्सऽऽ


‘बॅंड एड’ म्हणून तयार झालेल्या डिक्सनच्या या ब्रॅंडनं नंतर बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला..

कंपनीनं डिक्सनला थेट व्हाॅईस प्रेसिंडेटपदी नेऊन बसवलं..


जोसेफिनच्या स्वयंपाकघरात सुरू झालेला हा ‘बॅंड एड’ चा प्रवास आज आख्ख्या जगभर पसरलाय..

क्वचित अशी व्यक्ती असेल ज्यानं कधी आयुष्यात बॅंड एड बघितलं किंवा वापरलेलं नाही..

दोनेक रुपयाला मिळणाऱ्या बॅंड एडची आज मिलियन डाॅलर्संची उलाढाल होते..


अनेक ब्रॅंड्स आले-गेले पण आजही लोकं दुसऱ्या ब्रॅंडचं बॅंडेज मागतांनाही ‘अमुकतमुक बॅंड एड’ द्या असं म्हणतात हेच या प्राॅडक्टचं यश.


🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

 📒 *शरीरात रक्ताचे काम काय असते ?* 📒 

*************************************


शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते.  रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था.


 रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते.


 सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते.


 मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही.


 जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते.


 रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.


रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.

एका रेल्वे स्टेशन वर एक रेल्वे येऊन थांबते, जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता, तेवढ्यात एका शेठ ने त्याला आवाज दिला ये मुला, शेठ ने विचारल कितीला पाणी? मुलगा म्हटला २५ पैसे तर शेठ म्हंटला १५ पैशात दे, मुलगा गालात हसला व पाणी त्याने ज्या ग्लास मध्ये काढले होते ते जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले, हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिल, ते रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले तू #हसला का? 


मुलगा म्हंटला शेठला #तहान नव्हती लागली फक्त #किम्मत विचारायची होती, त्यावर त्या महाराजाने विचारल तुला कस माहीत शेठला तहान नव्हती लागली? त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले,

"जेंव्हा माणसाला खरच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे?"


 *एका घरात पाच दिवे लावले होते.*


*एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.. आणि तो विझून गेला.*


*तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक...*

 

*हे पाहून  दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानंही हाच विचार करून तो सुद्धा विझून गेला!!!*



*उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा -जो हिंमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझून गेला!!!*


*उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला!!*


*सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता.*


*जेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिलं.. घरात एकच दिवा जळतोय. तो खूप खूश झाला. चार दिवे विझून सुद्धा तो खूश होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालू आहे.!!!*


*त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले.*


*तो पाचवा दिवा कोण होता ?*

*तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील.*

 *जेव्हा एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्याने पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते; वाचा पुर्ण किस्सा*



ही गोष्ट आहे साल १९७९ ची. संध्याकाळचे सहा वाजले होते. एक शेतकरी ईटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस स्टेशनमध्ये मळलेला कुर्ता आणि चुरगळलेले धोतर घालून आला होता. त्याला त्याच्या हरवलेल्या बैलाची तक्रार नोंदवायची होती.

त्याने इन्स्पेक्टरला हरवलेल्या बैलाची तक्रार लिहून घेण्यासाठी विनंती केली. इन्स्पेक्टरने शेतकऱ्याला तीन-चार इकडचे तिकडचे प्रश्न विचारले आणि रिपोर्ट न लिहिताच जायला सांगितले. शेतकरी काहीच बोलला नाही तो खुर्चीवरून उठला आणि स्टेशनच्या बाहेर निघाला.

इतक्यात त्यातील एक हवालदार शेतकऱ्याला म्हणाला, बाबा रिपोर्ट लिहून घेतो पण काही पैसे द्यावे लागतील. शेवटी ३५ रुपयांमध्ये इन्स्पेक्टर तक्रार नोंदवायला तयार झाला. त्याकाळी ३५ रुपयांची किंमतही खूप होती. लेखापालने तक्रार लिहून घेतली आणि शेतकऱ्याला विचारले की, बाबा सही करणार की अंगठा लावणार?

शेतकरी म्हणाला सही करणार. मग लेखापालने शेतकऱ्याला रिपोर्टचा कागद दिला. रिपोर्टचा कागद घेतल्यानंतर शेतकऱ्याने पेनसोबत स्टॅम्प पॅडपण उचलले. हे पाहिल्यानंतर लेखापाल विचारात पडला की, ह्याला जर सही करायची आहे मग स्टॅम्प पॅडची याला काय गरज आहे?

शेतकऱ्याने सही करताना नाव लिहिले ‘चौधरी चरण सिंह’ आणि मळलेल्या कुर्त्याच्या खिशातून एक स्टॅम्प काढला आणि त्या निकालाच्या कागदावर मारला. स्टॅम्पवर लिहिले होते की, ‘प्रधानमंत्री भारत सरकार’. हा सगळा प्रकार पाहून पूर्ण पोलीस स्टेशन हादरले होते.

कारण जो माणूस मळलेला कुर्ता घालून पोलीस स्टेशनमध्ये बैल हरवल्याची तक्रार नोंदवायला आला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून शेतकरी नेते आणि त्याकाळचे भारताचे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह होते. त्यावेळी ते पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करायला आले होते. आपल्या गाड्यांचा ताफा त्यांनी पोलीस स्टेशनपासून लांब उभा केला होता.

त्यांनी येताना आपल्या कुर्त्यावर माती लावली होती. जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकले नाही. त्यांनी त्या वेळेस उसराहारचे पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते. 

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिह यांच्या जन्मदिवस 23 डिसेंम्बर हा *राष्टीय किसान दिन* म्हणुन साजरा केला जातो.

 ✈ *विमान* ✈ 

****************


आकाशात विमानाची घरघर ऐकली की, सभोवतालच्या सर्वांच्या नजरा अगदी सहजच वर जातात. आवाजाचा कानोसा घेत विमान कुठे दिसते आहे, त्याचा शोध घेतला जातो. विमानांचा वापर सुरू होऊन इतकी वर्षे झाली तरी औत्सुक्य अजून टिकायचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला पक्षाप्रमाणे भुर्रकन उडता उडणे शक्य नाही, हेच आहे. विमान प्रवास आता इतकी अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे आकर्षण टिकणार आहे.


 प्रत्येक विमानाची घडण सध्या ड्युरॅलियम धातूची असते. गोलाकार मुख्य भागाला फ्युसिलेज म्हणतात. मध्यावरती दोन्ही बाजूंना लांबलचक पंख पसरलेले असतात. काही विमानांचे पंख मागच्या बाजूला शेपटाकडे वळतात, त्यांना डेल्टा प्रकारचे पंख म्हणतात. या विमानांना शेपटीला पंख नसतात, तर फक्त त्रिकोणी उंचवटा मुख्य धडापासून शेपटापर्यंत जातो. (tail fin) इतर विमानांना शेपटालाही पंख असतात. आकार लहान एवढेच. पंखांचा उपयोग मुख्यत: हवेचा झोत मागे फेकतानाची झेप घेणे व तरंगणे यांसाठी केला जातो.


 विमानाची बांधणी हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. ड्युरॅलियमच्या सांगाड्यावरती पातळ पण कठीण पत्र्याचा सलग थर देत मध्ये पोकळी ठेवून एखाद्या ट्यूबसारखी ही बांधणी केली जाते. अतिशय पक्के पण हलके असे विमान त्यामुळे तयार होते. या पद्धतीला 'मोनोकॉक' पद्धत म्हणतात. विमानाची इंजिने पूर्वी मोटार इंजिनाप्रमाणेच पण अत्यंत वेगाने चालणारी असत. पण यासाठी मागेपुढे होणारा पिस्टन वापरावा लागे. त्याची झीज फार झपाट्याने होई व वेगावरही मर्यादा पडत. आजकाल तप्त वायूंचा फवारा अत्यंत दाबाने व वेगाने मागे फेकणारी इंजिने वापरतात. यामुळे विमान प्रतिक्रियेने पुढे फेकले जाते. या पद्धतीने पाहिजे तेवढा वेग वाढवणे शक्य होते.


 विमानांची प्रगती खऱया अर्थाने दुसऱया महायुद्धानंतरच्या दशकात सुरू झाली. जेट इंजिनांचा लांब पल्ल्यासाठी वापर सुरू झाला. प्रवाशांची संख्या, विमानाचा आकार व विमानाचा पल्ला या सर्वच गोष्टींत कल्पनातीत फरक पडत गेला. स्वनातीत (सुपरसॉनिक) प्रवासी विमान म्हणजे काँकॉर्डचा जन्म याच काळातला. तीन तासांमध्ये अटलांटिक समुद्र ओलांडून हे विमान (ध्वनीच्या दुप्पट वेगाने प्रवास करत) युरोपातून अमेरिकेत पोहोचू शके. पण याच दरम्यान वेगाचे वेड कमी होऊन सुरक्षितता व पैशांची बचत यांवर सगळ्या विमान कंपन्यांचे लक्ष केंद्रित होऊ लागले. त्यामुळे मोठ्या आकाराची बोइंग विमाने किंवा एअरबस यावर जास्त लक्ष देऊ लागले.


पूर्वापार पद्धतीप्रमाणे वैमानिकाने कंट्रोल्स वापरले की लगेच विमानाच्या हालचालींवर परिणाम अत्याधुनिक विमानात होत नाही. वैमानिकाच्या आज्ञा काँम्प्युटरकडे पोहोचतात व त्यानुसार कॉम्प्युटर स्वतःची 'बुद्धी' वापरतो. विमान उतरवणे, हवेत उडवणे वा सलग चालवणे याबाबतीत पायलटच्या हातून झालेल्या चुका 'सुधारून' घेऊन सर्वात उत्तम पद्धतीने तो सूचना देतो व त्यानुसार विमानाची हालचाल होते. याला 'फ्लाय बाय वायर पद्धती' म्हणतात.


 माणूस चुका करतो व करणारच. विमानाचे खूपसे अपघात वैमानिकांच्या चुकांमुळे होतात, या निष्कर्षावरून ही पद्धत शोधली गेली आहे. पण या पद्धतीने काम करणारी विमानेही अपघातात सापडून कोसळली आहेत. विमान प्रवास धोक्याचा अजिबात नाही. संख्याशास्त्रानुसार मोटारप्रवासापेक्षा कितीतरी पटीने तो कमी धोक्याचा आहे. फरक एकच, अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता जवळपास नाहीच.


गेल्या काही वर्षांत नागरी वापरासाठी हेलिकॉप्टर्सचाही उपयोग परदेशात मोठ्या प्रमाणावर होत आहे. विमानतळ शहरापासून खूप लांब. तेथे जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून एअर टॅक्सीसारखे हेलिकॉप्टर हल्ली वापरले जाते.


 अगदी नवीन मोठे बोइंग विमान जवळपास पाच मजल्यांएवढे उंच असते, तर वजनाने एकशेसव्वीस ते एकशेतीस टन असते. बत्तीस चाके असलेल्या या विमानात सहाशेपर्यंत माणसे बसू शकतात. सध्याची विमानविद्येतली प्रगती पाहता येत्या दशकात सुपरसाॅनिकच काय पण हायपरसाॅनिक म्हणजे आवाजाच्या तिप्पट वा चौपट वेगाने प्रवास करणारी विमाने वापरात आली तर नवल वाटायला नको.


 सुरुवातीच्या काळात विमानप्रवासाचा वेग जेमतेम ताशी १४० ते १६० नाॅट एवढाच होता. आजच्या जेट विमानांना त्यापेक्षा जास्त वेग घेतल्याशिवाय हवेत उड्डाणच करता येत नाही. हल्लीची जेट विमाने साधारण ६५० नॉट वेगाने व किमान पाच ते आठ किलोमीटर उंचीवरून प्रवास करतात. मुंबई ते दिल्ली बोईंग विमानाचा प्रवास असेल तर प्रवासाचा निम्मा वेळ उंची गाठणे व खाली उतरणे यातच जातो. ठराविक उंचीवरचा प्रवास जेमतेम निम्मा वेळच राहतो. सर्व जेट विमाने हवाबंद असून सर्वसाधारण हवेचा पुरेशा दाबाने पुरवठा त्यात केला जातो. जम्बोजेट विमान न थांबता पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास सहजपणे करू शकते. या विमानांमध्ये चार वैमानिक, एक नेव्हिगेटर व रेडिओऑफिसर असतो. फ्लाय बाय वायर पद्धतीत ही संख्या फक्त दोनवर येते. कुशल वैमानिकांची गरज इतकी कमी झाल्याने विमानांची किंमत वाढली, तरी वैमानिकांचा खर्च एकदम कमी होतो.


 प्रगत देशांमध्ये रेल्वेपेक्षा विमानप्रवास स्वस्त पडतो, यावर तुमचा विश्वास बसतोय काय ?


 नागरी विमान सेवेचा इतिहास:

१९०३ साली राईट बंधूंनी पहिले विमान उड्डाण केले.

१९१९ साली लंडन ते पॅरिस पहिली नागरी प्रवासी हवाईसेवा सुरू झाली.

१९२७ साली तब्बल तेहतीस तास प्रवास करून चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने अटलांटिक समुद्र पार करून दाखवला.

१९३९ साली हेंकेल जातीचे पहिले जेट विमान तयार झाले.

‍१९५२ साली डीसी कॉमेट हे नागरी जेट विमान वापरात आले.

१९६९ साली काँकाॅर्ड हे स्वनातीत विमान नागरी विमान सेवेत आले. सध्या त्याचा वापर थांबला आहे.

१९८३ साली फ्लाय बाय वायर पद्धतीची एअर बस वापरात आली.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

 *मोबाईल मूळे तयार झाल्या ह्या नवीन म्हणी*


१) स्वामी तिन्ही जगाचा, चार्जर विना भिकारी😳

२) बुडत्या बँटरीला चार्जरचा आधार😜

३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?😛

४) नको ते अँप आणि डोक्याला ताप 😳

५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर 🤔

६) आला मेसेज, केला फॉरवर्ड 😝

७) एक न धड आणि भाराभर ग्रुपमेंबर 😂

८) खाली मुंडी आणि whatsapp धुंडी .

😂😜😝😛😂😜😝😛

 खुप दिवसांपूर्वी मी ही 

राजकीय वात्रटिका लिहिली होती 


आजही परिस्थिती 

जैसे थे आहे


ना ‘शरदा’चे चांदणे

ना ‘सोनिया’चे दिस

‘घडय़ाळा’चे ओझे ‘हाता’ला

म्हणून ‘आय’ कासावीस

 

‘कमळा’च्या पाकळ्यांची

यादवी छळते मनाला

‘धनुष्य’ केव्हाच तुटलय

पण जाणीव नाही ‘बाणा’ला


 

' विळा, हातोडा अन् कंदिलाला'

आजच्या युगात स्थान नाही

डब्यांना ओढू शकेल एवढी

‘रेल्वे इंजिना’त जान नाही

 

मन आहे ‘मुलायम’

पण ‘माया’ कुठं दिसत नाही

‘हत्ती’वरून फिरणारा

‘सायकल’वर बसत नाही

 

कितीही उघडी ठेवा ‘कवाडे’

पण ‘प्रकाश’ आत जाणार नाही

विसरलेले ‘आठवले’ तरीही

‘गवई’ गीत ‘गाणार’ नाही

 

‘बंडखोर’ ‘पक्षां’चा थवा

‘पार्टी’साठी आतूर

कुंपणच खातंय शेताला

अन् बुजगावणही फितूर


काही नव्या ओळी


' स्वाभीमाना 'चे चिन्ह दिसेना

कुणाचे करावे पारायण ?

काय थट्टा चालवली 'नमो ' नमो

' नारायण '! नारायण !!


विनंती केली ईशारे दिले

तरी अवहेलनेची गाथा

कधी पावणार ' मुक्ताई ' ?

हुंदका आवरा ' एकनाथा '


ज्यांनी आणले 'स्वराज '

त्यांची 'मुरली ''मनोहर' वाटेना

संतापाने 'लाल' झाले 'कृष्ण '

ग्रहण सुटता सुटेना


अॅड, अनंत खेळकर

बिर्ला काॅलनी

जठारपेठ 

अकोला


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 रात्री सहजच नवरा बायकोला म्हणाला...


*नवरा*:-

पुन्हा जावे शाळेत 

पुन्हा ती दिसावी🙎‍♀

भले लागू दे शिकाया 📕

लसावि, मसावि 🔢


*बायकोचे उत्स्फूर्त उत्तर*:-

बनून आता गोसावी 👳‍♂

जी आहे ती सोसावी 🧕

विसरून आता लसावि, मसावि 😡

आठवणीने उद्या भांडी घासावी 

जमलंच तर फरशी पण पुसावी !!!


😬😉😬😝

 आई


आई माझा देव। आई माझा गुरू।

आई कल्पतरू। आई माझी॥ १॥


गर्भात तुझिया । वाढले निवांत ।

भासली ना भ्रांत । कशाचीच॥ २॥



थोर उपकार। आई जन्म दिले।

सोने माझ्या झाले। जीवनाचे॥ ३॥


आईचे वात्सल्य । जगाहून मोठे।

जीवनाच्या वाटे। अडले ना॥ ४॥


अमृताची धार। पाजलेस आई।

होऊ उत्तराई । सांग कशी॥ ५॥


प्राणाहूनी प्रिय। धन्य माझी आई।

नांव हो विजाई। आई माझी॥ ६॥


माझ्यासाठी देव। असे माझी आई।

आईची पुण्याई। लाभतसे॥ ७॥


स्वामी तिन्ही जगी। आईविना दीन।

सुवचन छान। सांगतसे॥ ८॥


कसं फेडू सांग। तुझे उपकार।

जीवना आकार। तुच दिले॥ ९॥


धन्य पुंडलिक। केली सेवा खरी।

पांडुरंग हरी। पाहतसे॥ १०॥


आईचे रे छत्र। सोन्याचे झालर।

मायेचा पदर। लाभलासे॥ ११॥


धन्य तोच जगी। आई ज्यास आहे।

डोळा भरू पाहे । माऊलीस॥ १२॥


आई माझी राही। थंडगार छाया।

अविरत माया । अखंडीत। १३॥


आईचे काळीज । तुटते लेकरा।

गाय रे वासरा। हंबरते॥ १४॥


संस्काराची खाण।आई रे महान

देगा देवा दान। जन्मभर॥ १५॥


वृद्धाश्रमी नका । पाठवू आईस।

आईच परीस। जीवनाची॥ 16

 🔔  *मंदिर /शाळा* 📖🖋


मंदीराचे कळस 

गगनाला भिडले

शाळेचे बांधकाम 

देणगीवाचुन अडले


दुधाचा अभिषेक 

दगडाच्या देवाला

शालेय पोषण आहार 

नुसताच नावाला


देवाचा दरवाजा 

चांदीने मढला

शाळेचा दरवाजा 

पाण्याने सडला


मंदीरातील झुबंराला 

हि-या मोत्यांचे खडे

शाळेच्या भिंतीना 

पडु लागलेत तडे


मंदीरात जाऊन 

लोक पोथी पुराण वाचतात

शाळेच्या ग्रथांलयात 

उंदीर मामा नाचतात


मंदीराच्या दानपेटीत 

गुप्तदान करतात

शाळेच्या देणगीची 

पावतीच मागतात


दरवर्षाला देवाची 

भरवतात यात्रा

पालक मेळाव्यात 

फक्त पालक सतरा


पुज्या-यांच्या गळ्यात 

सोन्या चांदीचे हार

कंत्राटी शिक्षकांची 

होऊ लागली उपासमार


न खाणाऱ्या देवाला 

पंचपक्वान्नाचा घास

शाळेत खीचडी भाताचा 

अहो येईना वास


आता तुम्हीच सांगा 

कधी संपेल इथला अंधविश्वास

शिकले - सवरलेले तरुण- तरुणीच

करु लागले आता उपवास


🙏🏻 *नवीन पिढीला समर्पित* 🙏🏻

 *"शेंगा आणि टरफलं"*

😂😂😂😂😂😂😂😂✌🏻✌🏻✌🏻



लोकमान्य टिळक 

लहानपणी म्हणाले होते:

"मी शेंगा खाल्ल्या नाहीत,...

मी टरफलं उचलनार नाही"









आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा:


*महात्मा गांधी:*

"मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलनार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलनार"



*बाळासाहेब ठाकरे:*

"यांच्या बापाचा माल आहे काय?

शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली तर त्याला सरकार जबाबदार असेल" 

जय महाराष्ट्र!



*शरद पवार:*

"महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने कुणी कुणाला शेंगा खान्यापासून रोकू शकत नाही...

यात शेतकरयांचं भलं आहे आणि उरलेल्या टरफलांपासून alcohol बनवता येईल का याबद्दल विचार करण्यासाठी सरकार लवकरच समिति नेमेल"



*नरेंद्र मोदी:*

"मित्रोंssss....

शेंग खाने का वर्णन तो हमारे वेदों में भी किया हुआ है....

चाहे हिन्दू हो या मुस्लिम या सीख़ हो या ईसाई हो सबने शेंग खानी चाहिए...

और सबने अपने आसपास का टरफल उठा के भारत को स्वच्छ रखना चाहिए"



*सोनिया गांधी:*

"अमने चार साल पहले एक सपना देका ता की देश के हर एक नौजवान को शेंग खाने का मौका मिलना चाइये...

और कांगरेस ने ये सपना पूरा किया.

और "

दिग्विजय जी ये तरफल कौन सा फल होता है??"

दान्यवाद...



*मनमोहन सिंह:*

"..........

...........

...........

...........

...........

............

.....!!!"



*देवेन्द्र फडणवीस:*

"हे बघा....

महाराष्ट्रात शेंगा खायच्या की नाही याचा निर्णय आम्ही आदरणीय मोदीजींना विचारून उदया जाहिर करू आणि टरफलांबाबत नाथाभौ काय ते लवकरच सांगतील"



*नितिन गडकरी :*

"विदर्भाच्या लोकांवर वेळोवेळी अन्याय झाला आहे त्यामुळे आता आम्हाला खाण्यासाठी आमच्या वेगळ्या शेंगा पाहिजेत आणि टरफलांपासून आम्ही ऊर्जा निर्मिति करता येईल का याचा विचार करू "



*किरीट सोमय्या:*

"या चेंगा काण्याच्या कामात प्रछंड ब्रष्टाचार जाला आहे असा माजा पश्त आरोप आहे आणि प्रमाणा पेक्चा जास्त तरफलं जमा केल्याबद्दल बुजबलांना अटक ज़ालीच पायजे"



*छगन भुजबळ:*

"या शेंगा आमच्या वडिलोपार्जित असुन माझ्याकडे सर्व शेंगा आणि टरफलांचा हिशोब आहे आणि शेंगा खायचा निर्णय सर्वांचा असताना मला एकट्यालाच लक्ष्य केले जात आहे तरीही मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे"



*अण्णा हजारे:*

"हे पहा असं आहे की .... 

 या शेंगांच्या कामात खुपच अनियमितता आढळून येत आहे ,एका शेंगेत एकच दाना दुसऱ्या शेंगेत तीन तर तिसरीत दोन....

आणि टरफलं पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत....

तर असं आहे आणि याची चौकशी तर झालीच पाहिजे नाहीतर मी उपोषणाला बसणार"



*उद्धव ठाकरे:*

"आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे पालन आम्ही करू आणि सर्व शिवसैनिकांना शेंगा खाने बंधनकारक करू आणि टरफलां बाबत संजय राउत "सामना" मध्ये लिहितील"

की आम्ही टरफले उचलायला तयार आहोत पण टरफलांची तयारी आहे का उचलून घ्यायची,

शेंगा खाणे एक कला आहे आणि टरफले उचलणे एक शास्त्र.



*राज ठाकरे:*

"या सर्व परप्रांतियांनी इथे येऊन शेंगांचे भाव वाढवून ठेवलेत आता काय करायचं आपल्या मराठी मुलांनी, सरकारला मराठी मुलांसाठी शेंगा राखीव ठेवल्याच् पाहिजेत नाहीतर राज्यभर खळ्ss खट्याक होईल....

आणि टरफलं फेका त्या अबु आजमी च्या बंगल्या बाहेर...

जय महाराष्ट्र"



*अबु आजमी:*

"देखिये इस्लाम में किधर भी नहीं लिखा है की मुस्लिमो ने शेंग खाना जरुरी है.....

और ये टरफल क्या होता है 

मुझे नहीं पता"



*अजित पवार:*

"ज्या शेतात या शेंगा आढळून आल्या, ते शेत माझ्या मालकीचं असल्याचा खोटा नाटा आरोप उगाचच होतोय...

आरोप सिदध झाल्यास शेंगा खायच् सोडून देईल"



*तटकरे:*

"जसं दादा म्हणतिल, 

 तसं"



*राहुल गांधी:*

"देखो भैया...

आज देश का गरीब क्या चाहता है ...

वो खाली शेंग ही तो खाना चाहता है ...

और ये सरकार क्या कर रही है ...

हमारे सामने टरफल फेक रही है ....

हमे इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए....

बोलो हाँ - आवाज उठाना चाहिए ..."



*रामदास आठवले:*

"मी नक्की खानार शेंगाsss...

"मी नक्की खानार शेंगाsss...

कॉँग्रेस-राष्ट्रवादीला देणार ठेंगा...

और किसीने टरफलं नहीं उचल्या...

और किसीने टरफलं नहीं उचल्या...

तो विनाकारण करुंगा मैं दंगा ."



*साध्वी प्राची:*

"हर हिंदु ने चार चार गोनी शेंग खानी ही चाहिए और जिसको नहीं खानी वो पाकिस्तान चला जाये"



*अरविंद केजरीवाल:*

"सुनो भई....

ये शेंग खाने का सवाल नहीं है ...

ये आम आदमी के हक़ का सवाल है ..

और कोई अगर आपको दिल्ली में शेंग खाने के लिए मना करे तो हमारे helpline पर फोन करो...

और इस काम में अण्णाजी भी हमारे साथ है"



*निखिल वागळे:*

"भाई जगताप तुम्ही शांत रहा....

मी शेंगा खायच्या की नाही याबाबत प्रेक्षकांची मतं मागवनार आहे आणि टरफलांचा विषय आपण ब्रेक नंतर घेऊ...

पाहत रहा point blank"



*प्रसन्न जोशी:*

"एकूणच काय...

तर शेंग खान्यापासून सुरु झालेला हा विषय गंभीर वळणावर येऊन पोचलाय, बघुया सरकार काय करतय ...

तुर्तास येथेच थांबूया,

 " एकदा असं झालं की उत्तर भारतातनं एक खानसामा फिरत फिरत पोटासाठी नौकरीच्या शोधात कोल्हापूरला आला. येऊन असाच कुठंतरी राहिला असेल, महाराजांची भेट व्हायची वाट बघत होता. तो अतिशय निष्णात होता. त्याच्या हाताला मोठी चव होती. नबाब रईसांच्या हवेल्यातल्या रसोईखान्यात बरीच वर्षे त्याने इमानेइतबारे काम केलं होतं. पदार्थाच्या नुसत्या वासानं तो सांगू शकत होता की त्यात काय कमीजास्त झालेय ते.

           तरूणपणी त्यानं नवाब, खानदानी रईस यांच्या दरबारात हवेल्यात मोगलाई पद्धतीचे अस्सल जेवण तो बनवायचा.

       त्याच्या या गुणामुळे एका नवाबाची एक चिठ्ठी घेऊन तो कोल्हापूर दरबारात काम मिळतेय काय ते बघायला आला होता.

     त्याच्या या गुणामुळे कुणीतरी त्याला मग महाराजांकडे नेले. हत्तीखान्याच्या समोरच्या मोठ्या दरवाजासमोर खुर्चीत नेहमीच्या लोकांबरोबर महाराज बसले होते.

     खानसाम्याने मुजरा केला... "आदाब महाराज, मी उत्तर भारतातून आलोय. महाराजांची कृपा झाली तर मला कोल्हापूर संस्थानची सेवा करण्यात धन्यता आहे. पोटासाठी फिरतोय. मी कोणत्याही प्रकारे हुजुरांची इतराजी करणार नाही...."

     " बरं बरं

      काय काय करतोस तु??"

       महाराजांनी त्याच्याकडे निरखून पाहत विचारले.

    " महाराज, मी कोणत्याही प्रकारचे अस्सल चवीचे पदार्थ बनवू शकतो. शाकाहारी, मांसाहारी, गोड पदार्थ, मोगलाई चवीचे अस्सल मोगल दरबारातल्या पंगतीसारखे... "

   " बरं बरं उद्या संध्याकाळी करा मग बेत सगळ्यांसाठीच.. ह्यासनी घेऊन जावा आपल्या मुदपाकखान्यात अन काय लागंल ते द्या... जेवल्यावरच ठरवू.... या आता... "

  " आदाब महाराज येतो "

.

    दुसऱ्या दिवशी खानसाम्याने आपले पाककलेचे कौशल्य पणाला लावले. पहाटेपासून कामाला लागला. त्याने सांगेल ते ते सगळे पदार्थ मागवले गेले. मटनाचा, शाकाहारी, गोडाचा असे सगळे पदार्थ त्याने रांधले.

     मग पंगत बसली.

  सगळे लोक नुसत्या वासाने दंग झाले असा दरवळ सुटला होता. कधीच न खाल्लेले जायकेदार पदार्थ खानसामा वाढू लागला. प्रत्येकाने एखादा घास खाल्ला की खानसामा उत्सुकतेने बघायचा मग वाहवा मिळाली त्याचा चेहरा फुलून यायचा.

      महाराजांचेही ताट वाढले, एक - दोन वाट्यात बोटं बुडवून महाराजांनी चव घेतली. अगदी थोडा गोडा पदार्थ खाल्ला "हं झ्याक"

   खानसाम्याचा चेहरा उजळला.

पण लगेचच महाराजांनी ताटाला हात लावून नमस्कार केला व ताट पुढे सरकवले...

     "महाराज घ्या, काय झालं???"

    महाराजांनी हातानेच काही नाही या अर्थी खुणावले.

  तोवर रोजचा माणूस महाराजांचे ताट घेऊन आला, आणि मग खरं महाराज जेवायला बसले.

    ज्वारी बाजरीची भाकरी अन तांबडा, पांढरा रस्सा...

    एकदम साधा जेवण....

   महाराज पोटभर जेवले.

        तोवर सगळ्यांचे जेवण उरकले.

   सगळे पुढे आले. "महाराज, असं जेवण कधी झालं नव्हतं. याला आपल्या मुदपाकखान्यात ठेवून घेतलेच पाहिजे....."

     महाराजांनी त्या खानसाम्यास बोलावले " ह्यांचा फेटा बांधून सत्कार करा अन योग्य ती बिदागी देऊन पाठवणी करा..."

  " पण महाराज माझं काय चुकलंय का??

   मला नोकरीत घ्या."

 " नाही तुमचं काय चुकलं नाही.. "

   असं म्हणत महाराजांनी खिशातनं एक लांबलचक यादी काढली ज्यावर काल मागवलेल्या पदार्थांची नावे अन किमती होत्या.

   " मी या संस्थानचा सेवक आहे अन माझ्या लोकांसाठी कामे करताना आम्हाला हे मोठे चोचले पुरवणे सोपे नाही. एवढा खर्चात माझ्या संस्थानातील कितीतरी कष्टकरी लोक खाऊन निघतील. आम्हाला हे परवडणारे नाही. या आता....."

.

#शाहू_जयंती

#अभिवादन........

 *मी हा प्रयत्न करू शकतो का?*



     आपण रोज सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन आपली पूजा, प्रार्थना करतो, पण खरोखरच आपले मन त्यावेळी एकाग्र असते का? उद्या सकाळी पूजा करताना आठवून पहा, त्यावेळी तुमच्या डोक्यात कितीतरी वेगवेगळे विचार कसे रुंजी घालत असतात, ते!


किमान मिनटभर तरी आपण आपले चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करू शकतो का? विचार करा…


*इतर व्यक्तींबरोबर बोलताना तुम्ही अतिशय सौम्य आवाजात, हळुवारपणे बोलता.*

 पण तीच सौम्यता आणि हळूवारपणा तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बोलताना दाखवता का? नीट आठवून पहा, तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा तुम्ही त्यांच्याशी कठोरपणे आणि रागीट आवाजात बोलत असता.


आपल्या कुटुंबियांबरोबर देखील तसाच व्यवहार करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*तुम्ही तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा नेहमीच सन्मान करता आणि त्यांना आदराची वागणूक देता.*


 पण ते निघून गेल्यावर त्यांना दूषणे देता, त्यांच्या स्वभावाची, बोलण्याची टिंगल करता!


आपल्या स्वभावातील हा दुटप्पीपणा दुर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*बरेचजण, रोज धार्मिक पुस्तकांचं वाचन करतात, कीर्तन ऐकतात, तासनतास पूजा करतात!*

 पण नंतर दिवसभरात इतरांना शिव्या देतात, दूषणे देतात, त्यांचा अपमान करतात!


*हे दुहेरी जीवन जगण्याचा अट्टाहास सोडण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


आपण इतरांना अडचणीच्या काळात मदत करतो. पण बऱ्याचदा ही मदत, त्या बदल्यात काहीतरी मिळविण्याच्या हेतूने केली जाते, आपण हे सर्व नि:स्वार्थपणे करत असल्याचा आव आणत!


*आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पैशाचं लेबल न लावण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


बऱ्याचदा आपण इतरांना पुष्कळ गोष्टींत सल्ले देत असतो  एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे, याचे! पण जेव्हा तीच पाळी आपल्यावर येते, तेव्हा मात्र आपण नेमकं यांच्या विपरीत वागतो!


"लोका देती ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण" ही उक्ती स्वतःला लागू न करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


*जेव्हा तुम्हाला इतरांची मते आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांचा द्वेष करता, त्यांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करता!*


इतरांनाही आपल्या सारखीच स्वतंत्र मते असू शकतात हे उमजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…


एखाद्याच्या केवळ बाह्य व्यक्तिमत्वावरून आपण त्याला जोखतो, स्वतःला त्याच्यापेक्षा मोठे समजू लागतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.


*"जे दिसतं, तितकंच नसतं" हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*


आपण सर्वच ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमणा करत आहोत. म्हटलं तर आयुष्य खूप मोठं आहे आणि इतका मोठा रस्ता पार करताना थोडेबहुत अडथळे तर येणारच! पण जर हे अडथळे अंतर्गत अथवा मानसिक असतील, तर ते सोडविण्यासाठी माझ्या इतका सक्षम माणूस दुसरा कोणीच नसेल!

🙂🙏🏻🙂

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖

 *लुगड्याची गोष्ट .*


रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.


सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..


 ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. 


",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "

 

"सावीत्रीबाई:-आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." 


"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,


मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........



ज्योतिराव:-

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, 

तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',


सावित्रीबाई-

आहो, हा ताप औषधाने नाही जायचा.


" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.--मग?

                                 सावित्रीबाई म्हणाल्या:-" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." 


ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.


त्यांचे विचारचक्र सुरु झाले.

लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........


मग सावित्री असे का बरं बोलली?..........


तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........


आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....


बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............


पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........


विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.


दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.


बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........


लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, 


कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......


सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.

त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.


ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........


लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............


ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होत्या त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.


त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.


बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण ,चिखलाचे डाग, धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात. 


त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.


परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .


त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."


आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. 


सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!

 *राग आणि त्यांच्य श्रवणाचे लाभ*

*MUSIC IS MEDICINE*

१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.


२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.


३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.


४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.


५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.


६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.


७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.


८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.


९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.


१०  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.


११  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.


१२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.


१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.


१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.


१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.


१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.


१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.


*संगीतोपचार*


*विशेष सूचना:-*


डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.


*हृदयरोग* 


राग दरबारी व राग सारंग


१) झनक झनक तोरी बाजे पायलिया....८:१६

( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए....६:०६   ( काजल )

३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम....४:२४

( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ३:०६।    ( नागिन).


*विस्मरण*


 लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा 


१) मेरे नयना सावन भादों ....५:०६

 ( मेहबूबा )

२)ओ मेरे सनम....५:०९ ( संगम )

३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ....४:४१

( ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन ....६:५३

( मेरा नाम जोकर )


*मानसिक ताण, अस्वस्थता*


ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत 

१) पिया बावरी....४:०२ ( खूबसूरत )

२)मेरे सूर और तेरे गीत ....३:११

( गूँज उठी शहनाई )

३)मतवारी नार ठुमक ठुमक चली ....६:२९

( आम्रपाली )

४) तेरे प्यार मे दिलदार ....४:०४

( मेरे मेहबूब )


 *रक्तदाब*


हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात 


 *उच्च रक्तदाब*


१) चल उड़ जा रे पंछी ....४:३५

( भाभी )

२) चलो दिलदार चलो ....३:३२

( पाकीजा )

३) नीले गगन के तले....४:१३

( हमराज )

४) ज्योती कलश छलके ....३:३०

( भाभी की चूड़ियाँ )


 *कमी रक्तदाब*


१) जहाँ डाल डाल पर ....७:२०

( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे ....४:३२

( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये ४:०८

( पोस्ट बॉक्स नं. ९०)


*रक्तक्षय, अनिमिया* 


अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.


१) खाली शाम हाथ आई है ....४:५५

( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये ....४:२७

( हँसते जख्म )

३)नदियाँ किनारे ....३:३४

( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया .....५:३४

( दुल्हन एक रात की)


 *अशक्तपणा*


शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी 


१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ....

( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे....३:५८

 ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै 

....५:३७

( चंद्रगुप्त 


 *पित्तविकार, अॅसिडीटी*


अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत 


१) छूकर मेरे मन को ....२:३५

( याराना )

२) तुम कमसीन हो नादा हो ....४:२९

( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम....२:५९

( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये .....३:४४

( सेहरा )


*चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.*

 *बिनधास्त जगा मित्रांनो*


●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...

(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)


●पन्नाशीनंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 

(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )


●साठीनंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच

(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)


●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच

(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)


●ऐंशीनंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच

(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )


●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच

(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)


अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?


जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.


*एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा.

 *जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला* 


१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.


त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे.

हे झंडू भटजी देखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बाप से बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.


जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले,त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भट्टजींना बहाल केली.


येथेच १८६४ साली झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली


आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला.

झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दुरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.


या भट्ट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.


झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोट मधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येईल हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं.


पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला ,


झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी


हे प्रभाशंकर पट्टानी म्हणजे भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचं देखील आडनाव भट्ट होतं. पण सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले पण ते जमलं नाही.


राजकोटला परत आल्यावर मास्तरकी सुरू केली.

झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं पण सासर कडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.


प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली.


हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता.


त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.


ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली. तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्या वरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला पंतप्रधान बनवलं.


प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते.


अगदी महात्मा गांधीजींचे ते खास मित्र होते.


अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं तेव्हा पट्टानी यांनी गांधीजींचे तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे असं सांगून कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच असहकार आंदोलन मागे घेतले.


ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.


अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखी पासून अंगदुःखी पर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.


पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रस शाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली, या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिलो नाही पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.


दबंग मधली मलायका अरोरा देखील झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा संबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.


डॉक्टरच्या आधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा झंडू बाम १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

 व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !!


1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!!


2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !! 


3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!

 कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !!

म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !!


4) जाळायला काही नसलं तर पेटलेली 

 काडीसुद्धा आपोआप विझते .... !!


5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब 

 लागला नाही की मग त्रास होतो .... !!


6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , 

कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !!


7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !!


8) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी 

 घाबरलेला असतो , बरा झाल्यावर

 शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो .... !!


9) घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते .... !!


10) माणूस अपयशाला भीत नाही .अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ....? याची त्याला भीती वाटते .... !!


11) बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण .... !!


12) कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे . ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे . 


13) पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते .... !!


14) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात !! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा .... !!


15) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही , पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .... !!


16) आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो .


17) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो . पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !!


18) संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला .... !!


19) ''अंत " आणि '' एकांत " ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो .... !!


20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं .... !! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस .... !!


21) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते . सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते .... !!


22) सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो .... !!


23) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस .... !!


24) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते .... !!


25) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या

 गरजेपेक्षा कमी घेणं .... !!


26) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले .... !!


27) अत्यंत महागडी , न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे " आयुष्य " ..... !!


28) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती ,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती .... !!


29) आपण किती पैसा मिळवला यापेक्षा , तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले , हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो .... !! ..... !!

 A forward...


आजकाल *देवांची* व *देवस्थानांची* अवस्था सुद्धा *डॉक्टरांसारखीच* झालीय,


म्हणजे *गावातला देव* किंवा *मंदीर* म्हणजे *BHMS* किंवा *BAMS* डॉक्टर.

किरकोळ सर्दी, पडसं, थंडीताप, छोटे मोठ्या तक्रारी अडचणी असतील तर या डॉक्टर कडे जायचे.


जरा *मध्यम आजार* असेल तर *अष्टविनायक,* *गणपती पुळे,* *पावस,* *चाफळ* वगैरे ठिकाणी गेलं म्हणजे कसं *MBBS* वाल्याकडं गेल्यासारख वाटतं.


 जरा *कडक आजार* असेल तर *मांढरदेवी,* *जेजूरी,* *पाली,* *शनी शिंगणापुर* असे जरा *प्रयोगशील डॉक्टरर्स,* डिग्री मोठी नसताना पण धाडसानं प्रँक्टीस करणाऱ्या डॉक्टरां सारखेच.


*शिर्डी,* *सिद्धीविनायक,*

*दगडूशेठ,* *लालबाग,*  म्हणजे *MS,* *MD.* थोडा खर्च जादा पण *स्पेशालिस्टकडे* गेल्यासारखा अनुभव येतो.


*तिरूपती,* *अमरनाथ,* *वैष्णवीदेवी,** म्हणजे *फॉरेन रिटर्न डॉक्टरच!* हे शक्यतो पैसेेवाल्यांचे डॉक्टर. पैसा कितीही गेला तरी चालेल पण गुण एकदम झकास आला पाहिजे. सगळे आजार बिजार एकदम गायबच झाले पाहिजेत. इथे सामान्य पेशंटना सहजासहजी प्रवेश नाही.


आणि एकीकडे


*पंढरीचा पांडूरंग* म्हणजे आपला *सरकारी डॉक्टर,*

कमी पैशात सगळ्या गोरगरीबांची दुखणी बरी करणार. कधीही जावा, कधीही उठवा, रागावणार नाही का आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करू असली भानगड नाही. पैसे द्या अथवा देवू नका, दारात येईल त्याच्यावर औषधोपचार करणार...

🙏🏻🌞शुभ सकाळ🌞🙏🏻

   🌹🙏आजची गोड सुरवात 🙏🌹


🌹🙏जय सदा आनंद 🙏🌹

        


अती कोपता कार्य जाते  लयाला, 

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।


अती लोभ आणी जना नित्य लाज,

अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।


अती मोह हा दु:ख शोकास मूळ, 

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।


अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,

अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।


अती दान तेही प्रपंचात छिद्र, 

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।


अती भोजने रोग येतो घराला, 

उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।


अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, 

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।


अती आळशी वाचुनी प्रेतरूप, 

अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।


अती द्रव्यही जोडते पापरास, 

अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।


अती भाषणे वीटती बुद्धिवंत, 

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।


अती वाद घेता दुरावेल सत्य, 

अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।


अती औषधे वाढवितात रोग, 

उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।


अती दाट वस्तीत नाना उपाधी, 

अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।


अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, 

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।


अती भूषणे मार्ग तो संकटाचा, 

अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।


स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, 

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।


अती भांडणे नाश तो यादवांचा, 

हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।। 


अती गोड खाणे नसे रोज इष्ट, 

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।


जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, 

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।


सदा पद्य घोकोनियां शीण येतो, 

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।


🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹 

 *मराठी माणूस "मागे"*

*असण्याची २२ कारणे...*


मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले *'संशोधन'* व *"निरीक्षणाअंती २२ कारणे* दिसून आली, जी *मराठी माणसांनी "स्वतःला" विचारावीत व त्यावर "स्वतःच" उपाय योजना* करावी. ह्या बाबी *प्रत्येक मराठी माणूस 'सकारात्मकतेने'* घेईल हिच अपेक्षा...! (वाद नको.! कारण, *'नाहक वादविवाद'* मराठी माणूसचं घालतो..!!)


*हिच ती २२ कारणे : -*


१) *कमी प्रवास -* प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.


२) *अति राजकारण -* मराठी समाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ? 


३) *दोनच हाथ कमवणारे -* सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. 


४) *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला -* कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.


५) *खोटं बोल पण रेटून बोल -* सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते.


६) *आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष -* आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, देशी व थातुरमातुर उपचार केले जातात.


७) *आर्थिक निरक्षरता -* पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते. 


८) *दूरदृष्टीचा अभाव -* पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात. 


९) *ऐतिहासिक स्वप्नात -* अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. तेव्हा सत्य परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे. 


१०) *गृहकलह, कोर्टकचेरी -* गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.


११) *समाज अर्थपुरवठा पद्धत -*  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही. 


१२) *जनरेशन गॅप -* खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही. 


१३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट -* प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार.... व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो. 


१४) *धरसोड वृत्ती -* हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी... कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती... अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.


१५) *कष्टाची लाज -* विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरात कामं करण्यास लाजं वाटते. 


१६) *फालतू बाबींना महत्व -* एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला... पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे. 


१७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद -* भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची  नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात... अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे *"आश्चर्य"...!!!*  मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे...!!! 


१८) *इंग्रजी कच्चे -* मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. 


१९) *संवादकौशल्याचा अभ्यास -* जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.


२०) *चाकोरी मोडत नाही -* अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी - पंचायत - ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.


२१) *जाती प्रथा -* (फालतू प्रथा) जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म - पंथ - जात - पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. 


२२) *वेळेची किंमत -* वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.


*हिच आहेत मराठी माणूसं मागे असण्याची २२ कारणे...!

 1)  मंथरा सारख्या शुल्लक दासीने कैकयी चे कान भरले,आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात जावे लागले.

२)  वनवासात असतांना मारिच नावाच्या राक्षसाने घेतलेल्या सुवर्णमृगाच्या" आकर्षणास सीता माता बळी पडतात आणि श्रीरामास त्याच्या शिकारीस पाठवतात

3)  साधुच्या वेशात आलेला रावण, सीतेला लक्षमण रेषा पार करायला भाग पाडतो, आणि तिचे अपहरण करतो

४)  आणि सर्वात कहर  म्हणजे, एका गणू नावाच्या सामान्य नागरिकाच्या वक्तव्याने व्यथित होऊन, *"लोक काय म्हणतील"* या भावनेने श्रीराम *परत* आपल्या प्राणप्रिय सीतेचा त्याग करतात

५)  अंतिमतः स्वतःचे पावित्र्य सिध्द करण्यासाठी सीतामाता धरणीभंग करून त्यात स्वतःला झोकून देते, तर पुढे तिच्या विरहाने प्रभू रामचंद्र नदी मध्ये प्राणत्याग करतात.


 *लोकांच्या नादी लागून देवाची ही दशा होऊ शकते, तर आपणा सामान्यांची काय गत होत असेल.  ?  ? ?* 


*आयुष्य एकदाच मिळते, आपल्या आयुष्यातील मंथरा मारिच रावण आणि गणू ओळखायला शिका*,


 *गैरसमज पुर्वग्रह व अनठायीभिती  टाळुन मोकळा संवाद साधा हीच जगण्याची खरी रीत.😊*

 *प्रगल्भता म्हणजे काय ?*

(MATURITY)


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.      


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.    


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.   


आणि शेवटी अती महत्वाचे 


*प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.*


🌸 ( संग्रहालयातील)

 काय चूक काय बरोबर......?

=================

काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. 

एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची.

पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात.

लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,.


एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळांचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही......

दुसरी मुलाखत होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची

मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....!


गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत.

तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं आयुष्य कस काय प्रिफर करता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिल ते अस :-


त्या म्हणाल्या, 

समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्याच्याशी फक्त एकाच ब्रिजद्वारे रिलेट होऊ शकता तो ब्रिज म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद.......!

नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची.

पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची ठरते


मी एका उच्च शिक्षित पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि नंतर समाज सेवेत रुजू झाले. मी समाजातील इतकी दुःख बघितली की माझी पैशा प्रतीची आसक्ती निघून गेली. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळत. मला श्रीमंतीच प्रदर्शन करण्याची गरजच वाटत नाही. अशा प्रदर्शनातून काय दाखवायचं आणि कुणाला दाखवायचं आहे ? जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आपल्या हिंदू  धर्मात भगवत गीतेत  आणि गौतम बुद्धांनीही सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी......!


एकीकडे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणारी एक स्त्री जी त्या श्रीमंतीचं स्टॅंडर्ड मेंटेन करताना लाखोंचा चुराडा सहज करते. 

एकदा घातलेली लाखोंची चप्पल ती पुन्हा वापरतही नाही. आणि दुसरीकडे काही हजारांसाठी देशातील गरीब शेतकरी आणि त्यांचं कुटुंबीय स्वतःच आयुष्य संपवतात. 

एकीकडे एक वेळ जेवून उपासमार सहन करणारा समाज तर दुसरीकडे पैशाचा अक्षरशः अपव्यय करत जगणारी मंडळी.


माननीय श्रीमती सुधा मूर्ती ह्या खरोखरीच आदरणीय आहेत

कारण आज त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पैसा त्यांची समाज हिताकडे वळवला आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत जी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणून जगत आहेत.. ....


आपल्याच देशात असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध विचारसरणीच्या स्त्रियांना वाचून मन विचारात पडलं..........!!

क्षणभर काय चूक काय बरोबर हा प्रश्न पडला........!

मग एकच मनात आलं की

माझं उर्वरित आयुष्य श्रीमती सुधा मूर्ती यांच्या सारख जगण्याची बुद्धि दे.

त्यांचे जीवन हे "चरित्र" आहे. ते पाठ्यपुस्तकात "धडा" रुपाने पुढील पिढीला "ज्ञात" होवो हिच अपेक्षा.