सेल

1.जीवशास्त्राचे चे शिक्षक : सेल म्हणजे शरीरातील पेशी.

2. भौतिकशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे बेटरी (battery)

3. अर्थशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे 'विक्रि'.

4.ईतिहासाचे शिक्षक : सेल म्हणजे तुरूंग.

5. इंग्रजीचे शिक्षक : सेल म्हणजे मोबाईल फोन.

मी तर शिक्षणच सोडून दिले हे समजून की ज्या शाळेत पांच शिक्षकांचे एकमत होत नाही त्या शाळेत शिकून काय होणार..

आणी आत्ता खर ज्ञान मिळालं जेव्हा...

बायकोने सांगितलं की 'सेल' म्हणजे 'डिस्काऊंट'
चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो.

शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला...

मी हिला म्हणालो...  "तुझे गुढघे दुखत असतील ना ?"

तेवढ्यात...

शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला...


स्थळ : पुणे...

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तेच योग्य आहे असे म्हणतात. काय योग्य,काय अयोग्य, हा प्रश्न वेगळाच; पण काळानुसार खूपच शब्द अडगळीत गेले आहेत हे खरे.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, पडवी, परसू, माजघर, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

 ‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.घरात माळा असायचा.  त्याला ‘आटळा’ म्हणायचे.जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली.सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल,वैल,निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. ‘काथवट’हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन में चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव,जाजम,सुताडे सगळे हरवून गेलेले.सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,  पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची‘ धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या,ढोल्या-ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे-त्या गडप झाल्या.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकाच्या पूर्वी विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेचः।।
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
   🏻🏻🏻🏻🏻🏻
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही
🏻🏻🏻🏻🏻🏻
जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
     
🏻🏻🏻🏻🏻🏻
     आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही

🏻🏻🏻🏻🏻🏻
जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
  🏻🏻🏻🏻🏻🏻   

         जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही

🏻🏻🏻🏻🏻🏻
जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....

🏻🏻🏻🏻🏻🏻
* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...  जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *

माझ ही तुझ्यावर खूप प्रेम आहे

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...
मी म्हणलो..." माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे..."
तू विचारलस "ते काय असत ..?"
आठवतंय..?
💕
मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो
"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर नाही ना सोडणार..?"
आणि अलगद माझ्या मिठीत विरघळलीस...!!
💕
३५ व्या वर्षी ...
जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो.. तू आणि मी सोबतच डिनर घेतलं... मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love you...!!"
तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस.." I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...
उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!
💕
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,
मी हळूच म्हणालो..."I love you very much"
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे, २० वर्ष आधी पासून माहित आहे.."
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!
💕
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो. "छान दिसतेस आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो, तू मला खूप आवडतेस...आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक आहे हो...!! पण सगळ वेवस्थित अरेंज झालाय ना..?"
💕
मी आता ७५ वर्षाचा..,
आराम खुर्चीवर बसून, आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस नातवांसाठी मी म्हणालो "माझं तुझ्यावर अजून ही तितकचं प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस,
"माझं पण तुझ्यावर आजही तितकचं प्रेम आहे जितक तुला होकार देताना
होत.."
माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला... डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते कारण आज इतक्या वर्षांनी तू स्वतः म्हणाली होती तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!
💕
फक्त प्रेम पुरेसे नसते. कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत... त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात.. "हो माझ पण तितकाच प्रेम आहे तुझ्यावर जितकं तुझ माझ्यावर आहे, म्हणून जेव्हा पण संधी मिळेल तेव्हा सांगायला चुकू नका.” नवरा तो नवराच असतो .
.
कितीही रागवला
तरी मायेन तोच जवळ घेतो…
कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..
मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..
किती दुःखी असला तरी सार गिळून घेतो कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो …
नवरातो नवराच असतो….
.
काळजी का करतेस मी आहे न तुला
म्हणून किती धीर देतो
सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे
हास-या नजरेन पाहतो…
.
जस घरावर छत असत तसच आपल्या डोक्यावर नव-याच झाकण असत
किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या
सावलीत …
ऊन्हाचे चटके तो खातो
पण सावली आपल्या डोक्यावर देतो..
नवरा तो नवराच असतो….
.
आपन चार अलंकार घालून म्हणतो
मान माझी मंगळसुत्र तुझ
कपाळ माझी बिंदी तुझ्या नावाची ..
.तो कधी म्हणतो का ?
कष्ट माझे पगार तुझा…
शरीर माझ आयुष्य तुझ …..
जन्म आईच्या उदरात पडलो तुझ्या पदरात ..
तू जिवन संगिनी म्हणून गोड मानत असतो ….
नवरा शेवटी नवराच असतो…
.
संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो….
एक चाक डगमगल तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं

.
बायको शिवाय घराला घरपण नाही तसच नव-या शिवाय बायको पूर्ण नाही
तो कळस आहे घराचा छत आहे
परिवाराचा…
चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो
नवरा तो नवराच असतो ..
.
आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही…..
म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या
प्रेमाची साथ द्या जिवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या….

शासन निर्णय

शासन :- मांजराला तिखट खायला लावायचे आहे.....

तात्काळ प्रस्ताव सादर करावा
.
.
.
सब डिवहीजन :- मांजराची मानगुट पकडुन त्याचे तोंड उघडुन त्यात तिखट कोंबायचे, कि झाले.😈..
.
.
.
शासन :- याला म्हणतात " जबरदस्ती
.
.
.

डिव्हीजन :- माशाच्या पोटात तिखट घालून तो मासा मांजराला खायला लावायचा, हे उचित होईल असे वाटते. 😈   

.
.
.
शासन :- याला म्हणतात " फसवणूक

.
.
.
सर्कल :- प्रथम विहीत निविदा प्रक्रियेद्वारे उत्तम गुणवत्तेचे तिखट उपलब्ध करून घ्यावे. नंतर ते भरपुर प्रमाणात मांजराच्या शेपटीला चोळावे. काही कालावधी नंतर त्याच्या शेपटीची आग होउ लागेल व मांजर स्वेच्छेने शेपटी चाटण्याचा विकल्प सादर करिल...... 

.
.
.
शासन :- याला म्हणतात " शासन निर्णय ".
नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो.

चार दिवस उलटल्यानंतरही मूल आई कुठे आहे विचारत नाही. बापाच्या हृदयात चर्र होतं.

बाप- तुला काही विचारायचं का?








मुलगा- आई सतत तुमच्यामागे का उभी असते?

*********************************************************************************

बायकोने रात्री उठवलं. कोणीतरी घरात शिरलंय हे सांगताना ती पांढरीफटक पडली होती.











दोन वर्षांपूर्वी रात्री एका दरोडेखोराने तिचा खून केला होता.

*********************************************************************************

मुलाला उठवायला त्याच्या बेडरूममध्ये गेलो. त्याला हलवलं तर तो म्हणाला, पापा या कॉटखाली एक राक्षस आहे तो मला टोचून, टोचून बेजार करतोय.

मुलाच्या समाधानासाठी मी कॉटखाली पाह्यलं.








 तिथे माझाच मुलगा होता. चेहरा पांढरा फटक, थरथर कापत त्याने विचारलं,






पापा कॉटवर कोण झोपलंय?

गाव नमुना

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
ग्रामपंचायत
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.
शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.

पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे.
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये.
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.
---------------------------------------
पुवीॅ   माणूस   जेवण   घरी 
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे. _________
पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या.
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या.  आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात. आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.
_________
पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा    तो    गरीब   समजला   जायचा.
आता    माणूस   कारने 
जिममध्ये  जातो  अन् सायकल
चालवतो !
---------------------------------------------
पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा  मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला ढाबा शोधायला जातो !
---------------------------------------------
पुर्वी वायरीच्या फोनने लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!
--------------------------------------------
पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन् हातातले फोन स्मार्ट झालेत !
-----------यालाच -----------म्हणत्यात --------------------परिवर्तन--------
दृष्टीकोन

एक (तरुणी) आई डायनिंग टेबलाजवळ चिंतीत होऊन बसुन होती. कारण नेहमीचेच!
मार्च एंड असल्यामुळे इनकम टॅक्स भरणे भाग होते.
घरातील सर्व कामे तर करायचीच होती वर उद्या होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.

जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती.
तिने मुलीला विचारले, "काय करतेयस?"
मुलगी म्हणाली,
"आज teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे 'negative thanks giving आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा ज्या आपल्याला सुरूवातीला आवडत नाहीत पण नंतर आवडायला लागतात"

आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली! बघुया आपल्या मुलीने काय लिहीलय!
मुलीने लिहीलं होतं;

- मी माझ्या वार्षिक परिक्षेला धन्यवाद देते कारण त्या नंतर उन्हाळी सुट्टी चालू होते ..

-मी त्या सर्व कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.

- मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .

वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की "अरे माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की; ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते"
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या

"income tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे"

"घरी भरपूर काम करावं लागतं, म्हणजेच माझ्याकडे एक घर, एक हक्काचे आश्रयस्थान आहे .."

" सणासुदिला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते म्हणजेच माझ्या कडे भरपूर नातेवाईक आहेत जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत."

गोष्टीचे तात्पर्य -
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ..

चला आपणही असाच positive attitude ठेऊन आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.
👳🏼‍♀ पुणेकर: ही शाई पाण्याने जाईल?
👴🏼 मतदान केंद्र अधीकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: तेलाने?
👴🏼 अधीकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: साबणाने?
👴🏼 अधिकारी : नाही

👳🏼‍♀ पुणेकर: किती दिवस अशीच राहणार?
👴🏼 अधिकारी : साधारण वर्षभर..

👳🏼‍♀ पुणेकर: मग माझ्या केसांनाही लावाल? दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय.
दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो. तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.

त्याच्या गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.

मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.

मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून, पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.

पाहता पाहता झोपीही गेला.

मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.

तासाभराने तो उठून दाराकडे निघाला. मी ही उठून दार उघडले.

तो सरळ कंपाउंड बाहेर गेला. बहुधा, त्याच्या घरी गेला असावा!

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.

तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला. तासाभराने उठून निघून गेला.

मग हे रोजचेच झाले.

तो यायचा, झोप काढायचा अाणि निघून जायचा. असे कित्येक आठवडे झाले.

मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?

मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,
"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहीत आहे का?"

दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला. पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....

"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच राहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड वायफळ बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासुन मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?
चिठ्ठी लावून कळवणे!"
सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला बंधू : खराब ???

सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !

बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या...

सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !

आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला
एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो.

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला,
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.
सगळ्या बायकांना हात जोडून नमस्कार.

आजही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडताना दिसतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून त्याला दोरे बांधणाऱ्या या निरागस बायका बघितल्या की सांगावं वाटतं, बाई त्या फांदीच आयुष्य का संपवलं? वड जास्त कामाचा आहे. औषधी आहे. हजारो लोकांना सावली देतो. तुझा नवरा पगार तरी घरी देतो का? पण मी असं बोलत नाही. आणि मला माहित आहे असं बरच काही डोक्यात येऊन पण बायका सुद्धा शांत बसतात.

खरतर जगात कुठलाच अर्थशास्त्रज्ञ देशाची अर्थव्यवस्था सांभाळायला सल्ला देण्यापलीकडे काही करू शकत नाही. घराची आर्थिक घडी बसवण्यात मात्र स्त्रीचं योगदान शंभर टक्के असत. तरी अर्धे नवरे बायकोला म्हणतात. तू गप्प बस. तुला व्यवहारातल काही कळत नाही. बायकांना गाडी चालवता येत नाही हे दहा वेळी गाडी ठोकलेले पुरुषसुद्धा तोंड वर करून बोलतात. तरी कशा ऐकून घेतात बायका?

हे सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या बायकांनो, सात पिढ्यात एकदाही तुमच्या नवऱ्याच्या खानदानात कुणाचंही नाव पेपर मध्ये आलं नसलं तरी तो न चुकता रोज पेपर घेऊन अर्धा तास toilet ला जातो. तेंव्हा बाहेरून कडी लावून त्याला दिवसभर कोंडून ठेवावं वाटतं तुम्हाला. पण तुम्ही एवढ्या दयाळू की तसं कधी करत नाही. तुम्हाला बघायची असते मालिका. पण नवरा खुशाल क्रिकेट बघत बसलेला असतो पाय पसरून. रागात रिमोट घालावा नवऱ्याच्या डोक्यात असं डोक्यात येतं. पण तसं तुम्ही करत नाही.

कधी छान आभाळ आलेलं असत, बाहेर पडावं, नवऱ्यासोबत पावसाचे थेंब झेलावेत अंगावर असं तुमच्या डोक्यात येतं. आणि नवरा सोफ्यावर पडल्या पडल्या म्हणतो ‘ मस्त कांदा भजी कर गं जरा.’ तेंव्हा आज कांद्या ऐवजी नवऱ्यालाच बेसनाच पीठ लावून कढईत टाकावं असं वाटून जातं. पण तरी तुम्ही भजी तळता. खमंग. उभ्या राहता खिडकीतल्या पावसाचे थेंब झेलत. तुमच्या मनातलं आभाळ मात्र डोळ्यात येतं. नवऱ्याला पत्ता नसतो त्या भरून आलेल्या आभाळाचा. नवरा मग आठवेल तेंव्हा भजी छान झालीत म्हणतो. आणि तुम्ही पण सुखात न्हावून निघाल्याचा अभिनय करता. नाहीतरी तुमच्या पैकी कित्येक जणींना पिझ्झाचे डोहाळे वडा पाववर भागवावे लागलेले असतात.

हे देशातल्या तमाम सोशिक बायकांनो,

कधी तुम्ही खूप राबून मोठ्या कौतुकाने सुरमई बनवलेली असते. वाटत असतं वासानेच वेडा होऊन मिठी मारेल नवरा. आणि दार उघडत तेंव्हा फक्त दारुचाच वास पसरलेला असतो घरभर. तेंव्हा सुरमईचा काटा काढावा त्या सहजतेने या नालायकाचा काटा काढावा असं वाटून जातं. पण असं काहीच तुम्ही करत नाही म्हणून आभारच मानले पाहिजेत. नवरे खुशाल म्हणतात ‘आजकालच्या बायका साधा फराळ पण करत नाहीत दिवाळीत. माझी आई काय काय बनवायची फराळाला.’ तेंव्हा तुम्ही ‘ तुमची आई फराळ बनवायची कारण तुमचे वडील रोज बिअर बार मध्ये चखन्याला शेव आणि चकली खाऊन येत नव्हते.’ असं का म्हणत नाही? तुम्ही रविवारी आराम करायचा ठरवलेलं असत. पण चार मित्र जमल्यावर पत्ते खेळता खेळता नवरा मोठ्या थाटात ‘ चहा टाक गं चार पाच कप आणि खायला दे काहीतरी..’ असं सांगतो. ओठावर येतं ‘नौकर आहे का मी?’ पण ते तुम्ही ओठातच ठेवता. का? आणि तरी सगळं जग म्हणत बायकांच्या पोटात काही रहात नाही. खरंतर ही पुरुषांनी सोयीस्करपणे स्वतःची समजूत घातलेली आहे. बायकांनी आपले काय काय अपराध पोटात घातलेत, बायकांचं नवऱ्या बद्दल खरं खरं मत काय आहे? हे जर त्या स्पष्ट बोलल्या तर कित्येक पुरुषांना पुन्हा आईच्या पोटात परत जावं वाटेल. या जगाला पुन्हा कधीही तोंड न दाखवण्यासाठी. तरीही हे सहिष्णू बायकांनो, मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे मनात साचलेलं नक्की बोलणार. पण आज एक पुरुष म्हणून मनापासून माफी मागतो तुम्हा सगळ्यांची. सगळ्या पुरुषांच्या वतीने.

ता.क. काही बायका म्हणतील मी असली बाई नाही. मी नाही ऐकून घेत. सरळ शिव्या देते नवऱ्याला. एकदा तर थोबाडीत पण ठेवून दिली. तर कृपया गैरसमज नसावा. हे पत्र तुमच्यासारख्या रणरागिणी साठी नाही. तमाम सोशिक, सहनशील आणि चोवीस तास घरात बिन पगारी राबणाऱ्या गृहिणींसाठी.

- अरविंद जगताप.
एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो.

शेजारचे काका : काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे?

मुलगा  : काही नाही काका, टाकि भरली की मोटार बंद करीन.

जमलेच नाही

एकटे राहणे जमलेच नाही
माणसांना टाळणे जमलेच नाही.

कष्टाची भाकरी गोड लागली
लुटावे कुणाला कधी जमलेच नाही .

चेहरा आरशासारखा स्वच्छ होता
मुखवटा लावणे जमलेच नाही .

जे लाभले ते  आनंदाने स्वीकारले
कष्ट नाकारणे जमलेच नाही .

जिंदगी साधी सरळ होती
भूल थापा मारणे जमलेच नाही
अंदमान  वर जाताना दोनरांगा  लागले होते. ..

वीणा वर्ल्ड वाले senior citizens. .आणि make-my-trip वाले  हनिमून  couples. ..

त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद . ..

" केसांना मेंदी लावलेले या बाजूला या. .. हाताला मेंदी लावलेले..त्या बाजूला जा... "

फक्त हिमतीने लढ👊

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂

कष्टकर्याची  जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊
मुंबईहून पुण्याला येताना नेमकं काय  होत❓













तापमानात घट होते...

आणी

अपमानात वाढ होते.
मुलीने आपल्या माहेरी तिच्या आईला फाेन केला:- 
            " आई यांनी माझ्यासाेबत भांडण केले, मि ३-४ महिन्यासाठी माहेरी येत आहे रहायला..

यावर आईने अगदी हदयस्पर्शी उत्तर दिले.


आई म्हणाली: - 
                 "भांडण तुझ्या नवर्याने केले आहे मग शिक्षा पण त्यालाच मिळायला हवी, तु तिथेच थांब मिच ५-६ महिन्यासाठी तिकडे येते...!
...बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाहीं देत हो?
.
नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो
.
बायको (रागात): हे काय..?
.
नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।
.
नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे
अश्विनी मॅडम: बोला मुलांनो, गंगा नदीचा उगम
चिंचवड येथे आहे.

विद्यार्थी: पण मॅडम, गंगा नदीचा उगम तर
चिंचवड येथे नाही. 

प्राचार्य: अश्विनी मॅडम, हे आपण मुलांना काय
शिकवत आहात? गंगा नदी चिंचवड वरून
नाही तर गंगोत्रीतून निघते.

अश्विनी मॅडम: प्राचार्य महोदय, गंगा नदी
चिंचवड वरूनच निघते आणि जोपर्यंत माझा
सात महिन्यांचा पगार मला मिळत नाही
तोपर्यंत चिंचवड वरूनच निघत राहणार !!!
आजचा विचार:-

दररोज एंजॉय करण्याचा ग्राफ  वाढवा...

म्हणजे एंजियोग्राफी करायची गरजच नाही पडणार ..
आई : उठ बेटा तूझी शाळेची वेळ झालीय ...
लक्ष्मण ( झोपेतच ) : माझे मन नाहीये शाळेत जायचे ...

आई : मला तू अशी दोन तरी कारणे सांग की ज्यामुळे तुला शाळेत जायचे मन नाही होत आहे ...

लक्ष्मण : एक तर कोणाही मुलांना मी आवडत नाही आणि दुसरं कुठल्याही मास्तरांना मी आवडत नाही ...

आई : ही काही कारणं नाही झाली शाळेला बुट्टी मारायला , चल उठ , शाळेत तर जावेच लागेल तूला ...

लक्ष्मण : बरं आई तू मला कोणतीही दोन कारणे सांग की मी शाळेत का जायला हवं ?...

आई : एक तर तू 45 वर्षांचा झाला आहेस तुला तूझी जबाबदारीची जाणीव असायला हवी..
आणि...
 दुसरे तू शाळेचा मुख्याध्यापक आहेस .....
शेजारीण : तुमचा 'बंडू' खूप वाईट शिव्या देतो


बंडूची आई :असू द्या हो? अजून तो 'लहान' आहे मोठा झाला की, देईल चांगल्या..
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,

शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,

राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
आज परत एकदा नकळत
मुंगी तळ्यात पडली
स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली

मीच का सतत हिला वाचवावे
हा कबुतराचा अहंकार आड आला
झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

कबुतराने मदत करावी म्हणून
मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला नीशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी नीशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला.

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपनाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच .....
पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.

अहंकार नाशाकडे नेतो तर
सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते,
गुरूजी : हाॅस्पिटल म्हणजे काय सांग...!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
विद्यार्थी : पृथ्वी आणि स्वर्गामधला टोलनाका आहे...!