विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 तीन दरोडेखोर एका घरात शिरले. ते त्या बाईला म्हणाले, "आम्हाला तुमच्या घराची व्यवस्था बिघडवायची नाही आणि तुम्हाला इजा करायची नाही, म्हणून आम्ही इथे सोफ्यावर बसलो आहोत. तुमच्याकडे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते घेऊन या."


त्या बाईने पैसे आणि दागिने आणले. दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या पतीने भेट म्हणून दिलेली हिऱ्याची अंगठी कुठे आहे?"


ती गप्प राहिली आणि अंगठी आणून त्यांना दिली.


"तुमच्या बहिणीने दुबईहून पाठवलेले घड्याळ घेऊन या." बहिणीने दिलेली भेटवस्तू देताना तिच्या डोळ्यात अश्रू होते.


"आता तुमच्या परवानगीने आम्ही 'नेस्कॅफे'ची इन्स्टंट कॉफी पिऊ."


कॉफी प्यायल्यानंतर दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "आता कालचा उरलेला अननसाचा केक घेऊन या."


 जेव्हा दरोडेखोरांनी सर्व सामान नेले, तेव्हा ती बाई संकोचून म्हणाली, *"तुम्ही लोक खूप व्यावसायिक आणि नीतिमत्ता असलेले दरोडेखोर आहात. आमच्या घरातल्या वस्तूंबद्दल तुम्हाला कसे कळले?"*


*दरोडेखोरांच्या म्होरक्याने चेहऱ्यावर मास्क नीट करत म्हटले, मॅडम, आम्ही तुमचे 'फेसबुक फ्रेंड्स' आहोत.*


आम्ही तुमच्या पोस्ट्स नियमितपणे वाचतो. आम्ही तुमचा स्टेटससुद्धा तपासतो. 🫣


सोशल मीडियावर सर्व काही पोस्ट करणाऱ्या सर्वांना समर्पित


🤣😂🤣😂😊

 रात्री सहज नवरा बायकोला म्हणाला..


नवरा :-


पुन्हा जावे शाळेत

पुन्हा ती दिसावी

भले लागू दे शिकाया

लासावी मासावी


बायकोचे उत्स्फूर्त उत्तर:-


बनून आता गोसावी

जी आहे ती सोसावी

विसरून आता लसावी, मसावी आठवणीने उद्या भांडी घासावी जमलचं तर फरशी पण पुसावी..🫣


🤣😂🤣😂😊

जावईबापूंचे प्रकार

आपल्याकडे जावईबापूंचे पाच प्रकार सांगितले जातात. ते पुढीलप्रमाणे -

*१) साखऱ्या जावई* 

साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि.मी.पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, कुठे बसवू अन् कुठे उठवू ? अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना *'साखऱ्या जावई'* असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे... 


*२) भाकऱ्या जावई* 

या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची  आठवण आली तर तिच्या सोबत सुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हे नेहमीचेच आहेत, *'नित उठे, अन् कपाळ बसे.'* या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे, म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना *'भाकऱ्या जावई'* असं म्हटलं जातं.


*३) ढोकऱ्या जावई* 

या प्रकारात २% जावई मोडतात. हे *'घरजावई'* असतात. या जावयांना घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तू सुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना *'ढोकऱ्या जावई'* असं म्हटलं जातंय्.


*४) दयावान जावई* 

हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात म्हणून यांना *'दयावान जावई'* असं म्हटलं जातंय्.


*५) बेरकी जावई*   

हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाही, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना *'बेरकी जावई'* असं म्हटलं जातंय्.


शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी *'जात्यावरच्या ओवीत'* म्हटलंच आहे, की

*१) जावाई, जावाई नको करू तू मायबाई,*

*जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.*


*२) जावयाची जात फार बेईमान सांगती,*

*'लक्ष' गं केलं दान, तरी माझ्या 'ताई' ला गांजती.*


शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,

*"शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,*

*म्हणून 'दादासले' पुण्य काशीतून सवाई."*

 *आई ही आई* असते...

● *आयझॅक-न्यूटनची आई* : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??


● *आर्किमिडीजची आई* : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?


● *एडिसनची आई* : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!


● *जेम्स वॅटची आई* : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!


● *ग्रॅहम बेलची आई* : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!


● *मोनालीसाची आई* : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!


● *गॅलेलियोची आई* : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??


● *कोलंबसची आई* : कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!


● *मायकल अँजेलोची आई* : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!


● *बिल गेट्सची आई* : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!


● *फॅरेनहाइटची आई* : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!


आणि शेवटी..


● *अलबर्ट आईनस्टाइनची आई* : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!


😊😝

 ही लंडनमध्ये 2015 मध्ये घडलेली सत्य घटना आहे....

लंडनमध्ये एक उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबीय सहलीला गेलेलं असताना त्यांच्या घरात जबरी चोरी होते. CCTV च्या फुटेजचा आधार आणि कुटुंबाशी संबंधित इतर सर्वांची माहिती घेऊन पोलिस काही संशयित तरुणांना पकडून आणतात. परंतु CCTV फुटेज मध्ये चोरांनी चेहरा घट्ट झाकला असल्याने पोलिसांना त्यांना ओळखणं अवघड जात होतं. त्याच वेळी त्यांना एक खबर मिळते की लंडनमध्ये एक भारतीय युवक आहे तो या कामी तुम्हाला मदत करु शकेल. हे समजताच पोलीस त्या युवकाला पाचारण करतात आणि CCTV फुटेज पाहून संशियत ओळखायला त्याची मदत मागतात. तो तरूण आपल्या लौकिकास जागतो आणि काही वेळातच ते फुटेज पाहून त्या संशियातांमधील नक्की चोर कोण आहे हे ओळखतो. पुढे अर्थात पोलीस त्या चोराची लीगल ट्रायल घेऊन, त्याच्या घराची तपासणी करून मुद्देमाला सकट ही केस सोडवतात.

पुढे यथावकाश त्या चोराला शिक्षा होते आणि आपल्या घरातला मुद्देमाल परत मिळाला म्हणून त्या श्रीमंत कुटुंबियांतर्फे एक पार्टी आयोजित केली जाते. त्यामध्ये चोर ओळखणाऱ्या त्या तरुणालासुद्धा आंमत्रित केलं जातं आणि त्याला सर्व जण विचारतात की, "तुझे आम्ही अत्यंत आभारी आहोत, तुझ्यामुळेच आमची चोरी पकडली गेली. पण हे एक प्रश्न आहे, त्या चोरांनी इतकं घट्ट तोंडाला बांधलं होतं. अक्षरशः पोलिस सुद्धा CCTV फुटेज पाहून ओळखू शकले नाहीत. पण तू हे कसं काय ओळखू शकलास ?"

यावर अत्यंत विनम्रपणे तो मुलगा उत्तर देतो, "ॲक्चुअली माझं नाव विनय आहे. माझा जन्म पुण्यातला. तिथे आम्ही लहानपणापासून मुलींना स्कार्फमध्येच पाहतो. हळू हळू वाढत्या वयाबरोबर हे स्कार्फ प्रकरण मनात इतकं घट्ट रुजत जातं की आम्ही कोणी कितीही घट्ट स्कार्फ बांधला असला तरीही त्या मुलीला आम्ही सहज ओळखू शकतो इतका आमचा खोल अभ्यास होतो. कारण जगाच्या पाठीवर आमचं पुणे हे एकमात्र शहर असं आहे की जिथे ऋतु कोणताही असला तरीही "स्कार्फ" बांधणं हे सक्तीचं असतं....!!!!"😜

शिष्य म्हणे जी गुरुवर्या !! उदंड नवरे, असंख्य भार्या !!
वर्णन करावे त्यांचिया कार्या !! दुख हलके करावे !!
बायकांनी प्रगती केली जरी !! नवऱ्यांनी बसावे कैसे घरी ?
मार्गदर्शन करावे काही तरी !! उद्धार होईल नवऱ्यांचा !!
आपण विवाहित असल्यामुळे !! नवऱ्यांची व्यथा स्वानुभवे कळे !!
एका चुकीची एवढी फळे !! भोगावी का पुरुषांनी ?
बायको म्हणजे प्रकरण भारी !! नवऱ्याच्या मागे pemanent बिमारी !!
बायकोने झोडपल्याच्या तक्रारी !!वाढो लागल्या गुरुवर्या !!
म्हणौनी म्हणतो गुरुवरा !! अचानक चान्स आला बरा !!
नवी दुकानदारी सुरु करा !! ' फिफ्टी-फिफ्टी' करूया !!
शिष्याने सहजभावे विनंती केली !! ऐकोन गुरूला घेरी आली !!
म्हणे, " माझ्या घरातल्या हालचाली !! तुला कैशा कळल्या रे ?"


..ह.भ. प्रे. प . ज्ञानेश महाराज वाकुडकर

 काल कटिंग सलूनच्या  दुकानावर एक पाटी वाचली.. ..


"आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू "..🤣


इलेक्ट्रिकच्या  दुकान वाल्याने फलकावर लिहिलं होतं.....


"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣


चहाच्या टपरीवर असा फलक होता...


"मी  साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो."

🤣


एका उपाहारगृहाच्या  फलकावर वेगळाच मजकूर होता  ..


"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या" 😀


इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..


"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..

😂


पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..


"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं, म्हणजे जबडा मोठा उघडा" ..🤣


फळं विकणाऱ्या माणसाने कमालच केली. ..


"तुम्ही फक्त कर्म करा, फळ आम्ही देऊ ".. 🤣


घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता  ..?


"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."

🤣


ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं.....😅


"या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."

🤣

मिसळ - एक रसग्रहण एक अमृतानुभव ( आणि काही उपयोगी टीप्स )

मिसळ खाणे हा एक आनंद सोहळा असतो.

मिसळ हा खरं तर गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत. अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

म्हणजे बघा, उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी. मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं  तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.

अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघुन आपली बैठक मारावी आणि मिसळ ऑर्डर करावी.

काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखुन बघतात. असं कधीही करु नये.

हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.

हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जिभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

तर, मिसळ समोर येवु द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.

समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. नसेल, तर सरळ निषेध नोंदवा. कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं.

त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे. नुसत्या त्या वासाने जिभेत उत्साह सळसळला पाहिजे.

सर्व मांडामांडी झाली की लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.

प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. ती व्यवस्थित मिसळून घ्यावी. मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा. मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी.

सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये.

आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.

पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.

पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!

हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा.

खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये.

मिसळ खाणं हे एक योगसाधन आहे.

प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.

पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

हा रस्सा भांडयातून मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही असा अर्थ होतो.

पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही. त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं.

खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत.

खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!

आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.

समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा.

मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते!

भंगार

एखादीदोघीजणी साठीतल्या
पार्लरमधे गेल्या
दोन तासांनी बाहेर
तरुण बनून आल्या

पहिली:

मी इतकी नटते सवरते
पण ’हे’ भारीच रुक्ष
’तो’ पहा, एकटक बघतोय
जसा तो शिकारी अन मी भक्ष्य

दुसरी:

पुरे, नकली सौंदर्याने
मिळणार नाही मोक्ष
तो आहे कबाडी, त्याचं
जुन्या भंगाराकडेच लक्ष


कवी - निशिकांत देशपांडे

चितळ्यांनी जर McD ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!


पुण्यातील चितळे मिठाई ने जर McDonalds ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!

आमचे येथे बर्गर व प्रकार मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विं
चरू नयेत. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)

गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय.
(व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे,ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस- या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.

प्रेमाला उपमा नाही

प्रेमाला उपमा नाही ,
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पम्प नाही,
पम्पाला पैसे नाही,
पैस्याला नौकरी नाही,
नौकरीला डीग्री नाही,
डीगरीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन्शीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा

पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशिष्ठे !!

1. आपण तिला गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी ओळख करून दिली कि ती रागावते . :/

2. जर आपण पब्लिक मध्ये तिला मिठी मारली किंवा पकडले तर ती जोरात जन-गण-मन म्हणायला सुधा सुरवात करते .

3. आपण तिच्या आईला “मावशी” किंवा “काकू” बोलू शकतो.

4. जेव्हा ती दुखी असते तेव्हा ती “काही नाही झाले” म्हणून सांगते आणि आपल्याकडे बघत राहते.

5. तिच्या लहानपनीच्या फोटोस मध्ये किमान एका तरी फोटो मध्ये तिने परकर-पोळका घालून तिने फोटो काढलेला असेल.

6. एकदम जोरात पाऊस कोसळत असेल आणि विजा चमकत असतील तरीही ती फिल्म मध्ये मुली कशा मिठी मारतात त्याप्रकारे ती बिलकुल मिठी मारणार नाही.

7. जर आपल्याला तिच्या वडिलांनि कुठे बाहेर फिरायला बोलावले असेल तर ती जागा नक्कीच एक नाट्यंदीर असते आणि तिथे “संगीतनाट्य” हाच कार्यक्रम असतो.

8. जर आपण तिला एका गार्डन मध्ये कामानिमित्त भेटायला बोलावल असेल तरीहि ती त्याला एक “डेट”चं समजनार.

9. तिला कोणी जर आपल्याबद्दल विचारले तर ती लाजते .

10. ती जीन्स किंवा टी-शर्ट घालणे आवडत नाही पण हे सर्व आपल्याला आपल्या करीअर् घडवायचे असेल तर त्या रुपामध्ये दिसणे आवश्यक असे असे मानून ती ते कपडे घालते.

11 तिला आजही त्या शाळेतील लहानपणीच्या कविता आठवतात .

12. ती नेहमीच “अमके सर् ,तमके सर् ” बद्दल बोलत असते त्यांचे किस्से सांगत असते आणि आपण मनातल्या मनात त्या साराची आई बहिण एक करत असतो.

13. रक्षाबंधन च्या दिवशी ती तुमच्या आसपास पण दिसणार नाही .

14. तुम्ही आणि तिचा भाऊ कधीच मित्र बनू शकणार नाही .

15. घरी जर तिने किंवा तिच्या आईने जर आपल्या आवडतीचा पदार्थ बनवलेला असेल तर ती नक्कीच डब्यात घेवून येते .

16. चतुर्थीच्या दिवशी ती तुम्हाला फक्त दगडूशेठ हलवाई गणपती किंवा तळ्यातला गणपतीच्या इथे भेटायला बोलावेल .

17. आपण तिच्याबरोबर एकदा तरी तुळशी बाग ला गेलेलो असणार पण ती आपल्याबरोबर कधीही तुळशी बाग ला यायला राजी होत नाही .

18. ति एम.जी.रोड पेक्षा लक्ष्मी रोड जवळ यायला तयार होते .

19. मुली वापर करतात ते काही खास शब्द :
__ १.ईश….
___२.वात्रटच आहे मेला .
____३.आता हि कोण बया?
____४.चल ना रें .
____५.गेलास उडत .
____६.नाहीतच मुळी .
____७.माझी आई रागावेल रें .
____८.आता हा काय नवीन अवतार?
____९.येडा झालायस कि काय?
____१०.त्या जोशी काकू सांगत होत्या .
____११.काय हे वेंधलाच आहेस
____१२.माझ्या भावाला कि नाही
____१३.माझ्या त्या मैत्रिणीकडे ना हे आहे ,ते आहे …..
____१४.आईशपथ

अशी आहे आमची पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशिष्ठे

एका मराठमोळ्या बाईची दैनंदिन संभाषणं…

दुधवाल्यासोबत- क्या भैय्या… आज कल आप दुध में बहोत पाणी ‘मिसळ’ रहे हो.. ये दुध की चाय एकदम ‘पाणचट’ बनती है फिर हमारे ये सुबह सुबह ‘खेकसते’ है मेरे पे …

भाजीवाल्यासोबत-
बाई- कैसे दिया भाजी..
भाजीवाला- जी ये आलू १२ रु., बैंगन १६ रु. और शिमला मिर्च १० रु. पाव…
बाई- सोळा रु. के वांगे !! क्या भैय्या.. रोजके ‘गिऱ्हाईक’ होकेभी जास्ती भाव लागते.. तुमसे तो वो ‘कोपरेवाले’ भैय्या सस्ता देते.. चलो.. पावशेर ‘ढोबळी’ मिरची और आतपाव आलं-लसून दो…

रिक्षावाल्यासोबत-
रिक्षावाला- हां madam .. ये आ गया आपका विठ्ठलनगर..
बाई- अरे नई नई यहा नई.. वो आगे वो ‘चिंचेका’ झाड दिखता है ना वहासें ‘उजवीकडे वळके’ थोडा आगे…
रिक्षावाला- अरे madam .. २० रु. मै यहा तक ही आता…
बाई- क्या आदमी हो… अरे कुछ ‘माणुसकी’ है की नही… थोडा आगे छोडोंगे तो क्या ‘झीझेंगा’ क्या तुम्हारा रिक्षा..

शेजारच्या हिंदी भाषी बाईसोबत-
बाई २- अरे भाभीजी आप मुझे वो मुंगफली की चटणी बनाना सिखाने वाले थे… मेरे बेटेको बहोत पसंद है…
बाई- अरे ‘वैणी’ एकदम ‘सोपी’ है… पेहले शेंगदाणे लेके उसका एकदम बारीक ‘कुट’ करनेका और फिर उसमे जीरा, आलं-लसून और तिखट डालके उसको ठीकसे ढवळ लेनेका… और झणझणीत चटणी तैय्यार………. !

श्यामले

तू छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
काळा कडा मी फत्तरी । तू काश्मिरांतिल गुल-दरी !
पाताळिंचा सैतान मी । अल्लाघरींची तू परी,
तू मद्रदेशिय श्यामला । मी तो फकीर कलन्दरी !
मैदान मी थरर्पाकरी । तू भुमि पिकाळ 'गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी । तू कुद्रती रसनिर्झरी !
आषाढिंचा अन्धार मी । तू फाल्गुनी मधुशर्वरी !
खग्रास चंद्र मलीन मी । तू कोर ताशोव सिल्व्हरी !
बेसूर राठ 'सुनीत' मी । कविता चतुर्दश तू खरी,
'हैदोस' कर्कश मी जरी । 'अल्लाहु अक्बर' तू तरी!
माजूम मी, तू याकुती । मी हिङ्ग काबुलि; तू मिरी,
अन् भाङ्ग तू चण्डोल' मी, । गोडेल मी, तू मोहरी !
मी तो पिठ्यातील बेवडा । व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू । तू बालिका खडिसाखरी
पँटीस तू, कटलेट मी । आँम्लेट मी, तू सागुती,
कांदे-बटाटे-भात मी । मुर्गी बिर्‍यानी तू परी !
अक्रोड मी कन्दाहरी । तू साहर्‍यातील खर्जुरी,
इस्तम्बुलीय अबीर मी । नेपाळची तू कस्तुरी !
मी घोङ्गडे अन् लक्तरी । मख्मूल तू मउ भर्जरी,
बेडौल वक्र त्रिकोण मी । तू लम्बवर्तुळ गे परी ।
तू वाढली कितीही जरी । मज वाटसी पण छोकरी,
जरी मूल हे कमरेवरी । तरी तू मला छकुल्यापरी !
गाम्भीर्य आणि वयस्कता । जरि ही तुझ्या मुखड्यावरी,
स्मरते मला तव सानुली । मूर्ती मनोहर पर्करी !
लव हासरी, लव लाजरी । लव कावरी, लव बावरी,
चिनिमातिची जणु बाहुली । मउ शुभ्र, सफेत नि पांढरी !
चल सोनुले, छकुले, घरी । वात्सल्य गे दाटे उरी,
निर्दोष तो देशील का । पापा छुपा फिरुनी तरी?
तू दोन इच्च जरी दुरी । फलाङ्ग भाससि गे परी,
चल श्यामले, म्हणूनी घरी ! बसु खेटुनी जवळी तरी !
घे माडगे, घे गाडगे । घे गुलचमन् घे वाडगे,
ताम्बूल घे, आम्बील घे, । घे भाकरी, घे खापरी !
किति थाम्बु मी? म्हण 'होय' ना । खचली उमेद बरी उरी,
झिडकारुनी मजला परी । मत्प्रीतिचा न 'खिमा' करी !


कवी - प्रल्हाद केशव अत्रे
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो सुविचार
११. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
१२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
१३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
१४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!!
१५. अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका !
१६. मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

प्रेमाचे राजकारण

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की,
कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत..
आणि, ती मुलाकडे पाहून हसली की,
त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत
आणि, लग्नाला एक वर्ष झाल की, मग,
" आदर्श घोटाळl " केल्यासारख वाटत !!!

गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.

२. झोप चांगली लागते.

३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.

४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.

५. मध्यरात्री,उत्तर-मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे भलत्याच वेळांना एसेमेसवाजत
नाहीत आणित्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.

६.महिन्यातून 100दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.

७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.

८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं.

नशाबंदी

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........

"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
... ...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो............

त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......

"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७ ८ वेळा जाळ काढतो........

हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"

सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भंग पितो तेव्हा असाच बोलतो.

पवित्र चिकन मटन

प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते ... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने शुक्रवारी चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू शुक्रवारच्या रात्री संताच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.

धर्मगुरु संताला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनन्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची खुप मनधरणी केल्यानंतर संता सिंग अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने संताच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, '' तु धर्माने सिख होता, आणि सिख म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस ''

संताचे शेजारी खुप खुश होते - पण पुढील शुक्रवार येई पर्यंतच.

पुढील शुक्रवारच्या रात्री पुन्हा संताच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला. शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा संताच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्या घरात शिरले आणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, जेव्हा ते अचानक थांबले आणि आश्चर्याने संताकडे पाहू लागले.

तिथे संता एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम्ही आलू आणि टमाटर आहात ''
आयुष्य आपल्याला खूप काही शिकवते

एका प्रसिद्ध चायनीज कवीने लिहिलेच आहे

“शिंगुया ची चोन्गो इतिमा शिन शून् उना पिन पिंगो चिंग चुआ”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

मनाला लागले नं अगदी...???

वाचून तर डोळ्यात अगदी पाणी आले...!!!