पहिला:- तुम्हाला कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते ...
आपण फेसबुक फ्रेंड आहोत की व्हाट्सअप ग्रुपला ?
.

.

.


.

दुसरा:- ( शांतपणे) मी तुमच्या शेजारी राहतो.
बायको रात्री दोन वाजता उठून नवऱ्याला प्रश्न करते.

बायको -: त्रिदेव मधे तीन हिरोईन कोणत्या होत्या?

नवरा -: माधुरी दीक्षित, संगीता बीजलानी आणि सोनम

बायको -: 2003 वर्ल्डकप मधे पाकिस्तान विरुद्ध सचिनने किती रन्स केले?

नवरा -: 98 रन्स

बायको -: आपल्या बाजूची कविता आपल्या बिल्डिंग मध्ये कधी राहायला आली?

नवरा -: बुधवारी दोन महिने पूर्ण होतील....
पण तू असे प्रश्न का विचारतेस?

बायको -: काल माझा वाढदिवस होता!!!!!!

भयाण शांतता..........

बिच्चारा सकाळी उपाशी कामाला गेला….
हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते

आई : कुठे आहेस ... ...

मुलगी : परीक्षा देत आहे

आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन.,.
मॅडम : गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, गोदावरी, भिमा..
ह्या भारताच्या नद्या आहेत..
तर
पाकिस्तानाच्या नद्यांची नावे सांगा..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
 ..
बंड्या : रुक्साना , फ़र्झाना , रिझवाना , हसीना..!!!

मॅडमने नदीत उडी मारून जीव दिला..!!!
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने खातात,







भारतीय....
मुकाट्याने.
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर: "तुमच्या आजाराच नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय...
 कदाचित जास्त दारू प्यायल्यामुळे  हे होत असावं.......!!"


पेशंट: "हरकत नाही...  तुमची उतरल्यानंतर येतो  मी परत"
चार दोस्त एकदा हाॅटेलात जेवायला गेले.
जेवण झाल्यावर बिल द्यायला भांडण करू लागले.
सगळे म्हणत होते, मी बिल देणार.
कोणी ऐकायला तयार होईना.
शेवटी त्यांच्यात ठरलं.
हाॅटेलला एक चक्कर मारायची आणि जो पहिला येईल त्याने बिल भरायचं.
त्यांचं प्रेम पाहून मॅनेजर पण तयार झाला.
मॅननेजरने शिट्टी मारली.....
ते सगळे चक्कर मारायला पळाले...

ते अजून नाही आले...
मॅनेजर त्यांची आजपर्यंत वाट पाहतोय...
याला म्हणतात दोस्ती

मेडिटेशन का महत्वाचे ? 😌😌

बायका आपल्या नव-याच्या
छातीवर डोकं ठेऊन हळुच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे ?         

.
.
.
.
तुमचे ऊत्तर इथे महत्वाचे नसते

तर महत्वाचे असते, तुमच्या  हृदयाचे वाढणारे ठोके.
😳😳
.
.
.
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. मेडिटेशन करा. 😜

👍फक्त तू खचू नकोस 👍

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड,
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस..
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सूर्य रोजच उगवतो,
 त्याच  नव्या तेजाने
रोज मावळतीला जातो
रोजच्याच् नेमाने
येणे जाणे रितच् इथली
 हे तू विसरु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

प्रेम तुझ्यावर करणारे
 कितीतरी लोक आहेत
तुझ्यासाठी जोडणारे
खुप सारे हात आहेत,
अरे अशाच आपल्यांसाठी
तू ही थोड हसुन बघ
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

वाट तुझी बघत असतं
रोजच  कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं
आस लावून प्रत्येक क्षणी,
त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
अश्रु तू गाळु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

उठ आणि उघडून डोळे
पहा जरा  जगाकडे
प्रत्येकाच्या आयुष्यात
काहीतरी असतेच् थोडे,
नाही नाही म्हणून
उगाच कुढत तू बसु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

सामर्थ्य आहे हातात जर, 
स्वप्ने डोळ्यात घेऊन चल
परिस्थितीशी भिडवून छाती,
दोन हात करत चल,
विजय तुझाच असेल
 तेव्हा मागे वळून बघु नकोस
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस.

👉 फुल्ल पुणेरी : - 😳

५00 ची  नोट दुकानदार वेगवेगळ्या अँगलमधुन  पाहात चेकिंग करत होता *
.
.
.
.
जोशी :  तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला गांधीजीच्या जागेवर कॅटरीना नाही दिसणार.चला, राहिलेले पैसे द्या लवकर
बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.
तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला.
तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,

" सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!"

बंड्याची बदली पुण्याला झाली.
त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं.
आता पोपट म्हणतो,

" बाजीराव, उठा आता... लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!"

👉 बापाचं मन 👈

घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |

त्रासाचे झाड

दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. दादांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. दादांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद? दादांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन दादा निघाले. भाचा दादांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता दादांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘दादा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.
‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’

आपण ह्यातून कोणाला निवडाल?……

मोठ्यांच्या रात्रीच्या शाळेत एके दिवशी मानसशास्त्राचे शिक्षक विध्यार्थ्यांना एक खेळ खेळण्यास सांगतात.

सर्वजन उत्सुकतेने विचारतात
"कोणता खेळ सर?"

शिक्षक एका विध्यार्थ्याला
मदत करायला विनंती करतो.

 संगीता नावाची एक
स्त्री पुढे येते. .

शिक्षक तिला फळ्यावर तिच्या आयुष्यातील सर्वात
महत्वाच्या अश्या ३० व्यक्तींची नावें लिहायला सांगतात.

संगीता तिच्या घरातील, नातेवाईकांची,  मित्र-मैत्रिणींची
आणि शेजाऱ्यांची मिळून अशी ३० नावें फळ्यावर लिहिते.

शिक्षकाने नंतर तिला त्यातील तीन अशी नावें पुसून
टाकण्यास सांगितली कि जी तिच्या
दृष्टीकोनातून तेवढी महत्वाची नाहीत.
संगीताने
आपल्या मित्रांची नावें पुसली.

आता शिक्षकाने
तिला ५ आणखीन नावें पुसण्यास सांगितली आणि
ह्या खेपेस तिला आपल्या शेजाऱ्यांची नावें
पुसावायास लागली.

हा सिलसिला असाच पुढे
चालू राहिला जोपर्यंत फळ्यावर फक्त चार नावें
पुसायची बाकी राहिली होती.

जी चार नावें संगीताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची
ठरली ती होती - आई,वडील,नवरा आणि मुलगा.

संपूर्ण वर्ग आता निस्तब्ध झाला होता कारण
त्यांना कळून चुकले होते कि ह्यापुढचा खेळ
संगीताला फार कठीण जाणार आहे.

 तिला आता
सर्वात कठीण असा निर्णय घेणे भाग पडणार आहे.

शिक्षकाने आता तिला तिच्यापुढील दोन नावें
पुसण्यास सांगितली.

मोठ्या नाईलाजाने आणि जड अंतःकरणाने तिने
आपल्या आई वडिलांची नावें पुसून टाकली. "

अजून एक
नांव पुसून टाक" शिक्षकाने फर्मावले.

 संगीता आता
पूर्णपणे हवालदिल, निराश झाली होती.

थरथरत्या हाताने तिने मुलाचे नाव पुसले
आणि
ओक्साबोक्शी रडायला लागली.


शिक्षकाने संगीताला तिच्या जागेवर जाऊन बसायला सांगितले.

थोड्या वेळाने जेव्हा तिचे दु:ख
आवरले तेव्हा तिला विचारले कि आई, वडील वा
मुलगा ह्यापैकी एकाचे नाव तिने का नाही ठेवले

तिच्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती
म्हणून नवऱ्याऐवजी, ती आई किंवा वडिलांचे नाव ठेवू
शकली असती

कारण त्यांनी तिला जन्म देऊन
लहानाचे मोठे केले होते किंवा ज्याला तिने जन्म
दिला अशा तिच्या मुलाचे नाव ती शेवटी ठेवू
शकली असती.

मग नवराच का तिच्या जीवनातील
सर्वात महत्वाची व्यक्ती तिला वाटली?


टाचणी पडली तरी आवाज येईल अशी स्मशान
शांतता वर्गात पसरली होती आणि सर्वजण आता
संगीता काय उत्तर देते ह्याकडे कान टवकारून वाट बघत
होते.

संगीता तिच्या जागेवरून उठून उभी राहिली
आणि सावकाश म्हणाली

"एक दिवस माझे आई-वडील
मला सोडून जातील. माझा मुलगा सुद्धा मला सोडून
जाईल त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी,  लग्ना नंतर वा
तत्सम काही कारणांमुळे.

तेव्हा शेवटी माझ्याबरोबर
राहील तो माझा नवरा ज्याच्या बरोबर मी माझे
उभे आयुष्य व्यतीत केले आहे.

" सर्वानी उभे राहून
टाळ्यांच्या गडगडातात तिच्या उत्तराचे स्वागत केले.

आपण आपल्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, ते
आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.

काहीजण थोड्या वेळापुरते आपल्या बरोबर असतात तर
काहीजण शेवटपर्यंत आपल्या बरोबर असतात.

तेव्हा आपल्या सर्व नात्यांचा आदर राखणे हे आपले
आद्य कर्तव्य आहे पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या
कुठल्या नात्यांना प्राधान्य दिले पाहिजे हे सुद्धा
समजले पाहिजे.....    
एक बेवडा रात्रीची सायकल🚴 घेऊन कब्रीस्तान मधी घूसला
.
अन दूसर्या साईड ने बाहेर निघाला अन घाम पुसत बोलला…😰😰
.
.
च्यामायला कोनता रोड होता
काय माहीत…
येवढे स्पिड़ ब्रेकर असत्यात व्हय…
एक माणूस रात्री 2:00 ला डॉक्टरच्या घरी जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो...

"डॉक्टर साहेब, घरी यायची तुम्ही किती फी घेता..? "

डॉक्टर : फक्त 250 रुपये..!
   
माणुस : तर चला मग.

डॉक्टर गाडी काढतात आणि दोघेजण घराकडे निघतात.

माणूस: डॉक्टर साहेब..... इथे थांबा. माझे घर आले...!
             
डॉक्टर : OK, चला लवकर, मला पेशंट दाखवा..!

माणूस : हे घ्या 250 रूपये. रात्री रिक्षावाले घरी जायला 500 रुपये मागत होते  म्हणून तुम्हाला विचारले. ...!!
.
.
.



कोण म्हणतं दारू घेतल्यावर डोकं चालत नाही....!!

"पोटात दुखते"

एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो राधिका झोपलेली असते तिच्या पोटात दुखत असते ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते.

त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते "मलाच स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली,तिला कसला कंटाला येतो बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ?"

आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो ,"पोट दुखल्याने माणूस मरत नाही".

त्याची आई आऩंदी असते,"याला म्हणतात खरा पुरूष".
राधिका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते ७-८ लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवन न करता,पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही ,ती हुंदके देऊन रडत असतेआणि

पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो ,"काय सारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून "

राधिका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते ," बर झाल एकदाची झोपली आता मला शांत झोप येईल.
सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही ऊठत नाही पार्थ रूम मधून बाहेर येतो त्याच्या आईची बडबड सुरूच असते,पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो ,"अग आई तिला खरच बर नसेल,रोज सगळ करून जाते ना ती."

"शेवटी बायकोचाच झालास ना आiता आमच कशाला ऐकशील," आईकडे दुर्लक्ष करून पार्थ रूम मधे जातो राधिकाला प्रेमाने हाक मारतो ३-४ दा पण ती काही ऊठत नाही तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला response देत नाहीये.

तो लगेच तिला दवाखान्यात नेतो,डॉक्टर तिला मृत सांगतात पार्थला हादरा बसतो.
reports आल्यावर डॉक्टर सांगतात की ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती ,body मध्ये poision पसरल्यामुळे रात्री ११.३० ला तिचा मृत्यु झाला.

पार्थला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो.

" राधिका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो,माझ्यामुळे ती गेली" पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा.

मित्रहो:-
व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या ,त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात.

आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा...
आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील..
राग आल्यास शांततेने समाजवा..प्रेमात

आज ती सुन आहे..तुमची

उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सुन होणार आहे...हे विसरु नका....

सुखी व्हायचय ?

एका शहरातला एक तरुण मुलगा खूप मेहनती खूप विचारी खूप अभ्यासू त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर लग्न झाले. नवीन नवीन संसार. सुरुवातीचे दिवस छान गेले. पण हळूहळू घरात बारीक सारीक कुरबुर सुरू झाली. जेवणावरून बाहेर फिरायला जाण्यावरून. काहीवेळा कारणे खूप क्षुल्लक असायची पण वाद पेटायचा. मग घरात अबोला. एकूण वातावरण बिनसू लागलेले..
असाच एकदा तो वैतागून घरून ऑफिसात निघालेला होता. तर गाडी काढताना पार्किंग मध्ये एक तेजस्वी पुरुष समोर उभा दिसला. त्या पुरुषाने स्वतःहून या तरुणाला विचारले बेटा दुःखी दिसतोय. काय झालं ? मी काही मदत करू का ?
हळव्या स्वभावाच्या त्या तरुणाला एकदम गहिवरून आलं  त्याने कबुली दिली की होय महाराज मी दुःखी आहे. पण मला सुखी व्हायचं आहे. एक तरी क्षण एक तरी मिनिट मला सुख पाहायचे आहे काय करू?
तो तेजस्वी पुरुष म्हणाला नक्की सुखी होशील. मात्र त्यासाठी माझ्यासोबत आत्ता अर्धा  तास यावं लागेल जमेल का ?
तरुण म्हणाला हो चालेल
मग ते दोघे एकत्र पायी पायी निघाले जवळच एक बाग होती तिथे तेजस्वी पुरुष आत गेला मागोमाग तो तरुणही गेला गेट जवळच एक जडसा  दगड पडला होता तेजस्वी पुरुषाने तो दगड उचलून तरुणाच्या हाती देऊन मागोमाग चालत यायला सांगितले तरुण तो दगड हातात घेऊन निघाला. पाच मिनिटांनी त्याच्या हाताला रग लागली म्हणून त्याने दगड दुसऱ्या हातात घेतला अशीच पंधरा मिनिटे गेली आता तरुणाचे दोन्ही हात दुखू लागले तरी चालणे सुरू होतेच. शेवटी अर्ध्या तासाने तरुणाची सहन शक्ती संपली दगड दोन्ही हातानी पकडून  तो त्या तेजस्वी पुरुषाला म्हणाला आता सहन होत नाहीये.
यावर तो पुरुष म्हणाला आता तो दगड खाली ठेव..
त्याबरोबर तरुणाने दगड लगेच टाकला. हुश्श केले. घामाघूम झालेला चेहरा पुसला.ओझे कमी झाल्याने तो थोडा ताजातवाना झाला त्याच क्षणी तेजस्वी पुरुष म्हणाला हाच तो सुखाचा क्षण आहे. ओझे कमी झाल्याने तू आत्ता स्वःताला खूप सुखी समजतोय ना ?
तरुण म्हणाला होय महाराज
मग तो पुरुष म्हणाला जीवनाचे देखील असेच आहे तो दगड म्हणजे दुःख / निराशा आहे तो दगड एक मिनिट हातात ठेवला थोडे दुखले पाच मिनिटे अजून ठेवला अजून जास्त दुखले. अर्धा तास ठेवल्यावर सहन करण्या पलीकडचे दुखले.आता हे आपल्यावर आहे की आपण तो दगड कितीवेळ हातात ठेवणार ? तुम्ही तो दगड जितक्या लवकर खाली ठेवाल तितक्या लवकर सुखी व्हाल  आणि जमलेच तर असले दगड उचलूच नको आयुष्यात कधीच तू दुःखी होणार नाहीस..
जगात आपल्याला दुखवू शकेल अशी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपण स्वतः  दुसरे कुणीही कितीही ठरवले तरी दुःखी करू शकत नाही..

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला .
नेहमी छोट्या छोट्या
चुका सुधरायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.
ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
"बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना" आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
"ओ आजोबा नीट घेऊन खा की?" मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला.
"काळजी करू नकोस, बाबा सापडले!!" कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.

"काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???"
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
"हे आजोबा कोण आहेत तुमचे?" मी विचारले.
"वडील आहेत माझे." त्याचे उत्तर.
"त्यांना काही त्रास आहे का?" माझा पुढचा प्रश्न.
"हो त्यांना अल्झायमर आहे."
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
" मग हे आजोबा असे कुठेही जातात का?"
" हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत."
मी शॉकच झालो.
"मग तुम्ही यांना शोधता कसे?"मी विचारले.
"आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी."
"असे वारंवार होत असेल" मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला "महिन्याला एक दोन वेळेस"
"काळजी घ्याआजोबांची! बाप रे काय हा वैताग" मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, "बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं."

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.             

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो...               

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

माझी निवड चुकली तर नाही ना ?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.

प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे.

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे
सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हलवून टाकणारा प्रसंग

 गुरुजी ओळखलंत का मला  ?

हो ओळखलं ना 1987 ची बॅच ना ?

३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी ..
बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा :- खुप खुप खुप आवडते ग...
बायको :- असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...

बायकोने डोक फुटुुस्तर हाणला..
प्रेरणा कशास म्हणतात ??

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!

आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!

बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!

यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!

मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?

तुकोबा ज्ञानोबा तर कधी शाळेतच गेले नव्हते!!

शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती ?

तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या ?

डॉ. आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?

हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते !!

मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!

सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!

आणी आज आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!

आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!

भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!

पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!

पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!

माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?

कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?

वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?

लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?

आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?

निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!

शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!

आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो.
एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल..

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज प्रश्न केला....

वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत आणी नविन आईत काही फरक वाटतो का..?

मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीचन्र्दाची नातेवाईक...

वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल

वडील: कस...काय !                             

मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...
महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तिला मराठीत ''गारद'' म्हणतात. ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला ''अल्काब'' तर संस्कृतमध्ये ''बिरुद'' किंवा ''बिरुदावली'' म्हणले जाते...
छत्रपती शिवरायांची गारद व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात....

🚩#दुर्गपती → गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य ( राज्य ) आहे असे.

🚩#गज-अश्वपती → असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो.

🚩#भूपती प्रजापती → वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे, म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे.

🚩#सुवर्णरत्नश्रीपती → नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे,, शिवरायांच्या बाबतीत ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती.

🚩#अष्टावधानजागृत → आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा ).

🚩#अष्टप्रधानवेष्टीत → ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात निपूण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात त्यांचा सल्लाही घेणारे राजे.

🚩#न्यायालंकारमंडीत → कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज.

🚩#शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत → प्रत्येक शस्त्रविद्येत व शास्त्रात पारंगत ( निपूण ) असलेले राजे.

🚩#राजनितीधुरंधर → राजकारणात ( राजनितीमध्ये ) तरबेज असलेले राजे.

🚩#प्रौढप्रतापपुरंधर → पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे परमप्रतापी राजे.

🚩#क्षत्रियकुलावतंस → क्षत्रिय कुलात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे.

🚩#सिंहासनाधिश्वर→ जसा देव्हा-यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती.

🚩#महाराजाधिराज→ सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सा-या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजे.

🚩#राजाशिवछत्रपती →ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवराय.
मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"🙁

मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"☹

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मी "अहिल्या देवींवर" कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का?"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही....

शेवटी तर आपणच दोघं असु

पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही.
 ठरू देखील नये.
त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???

शेवटी तर आपणच दोघं असु

जरी भांडलो, रागाराग केला,
एकमेकांवर तुटून पडलो,
एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

जे बोलायचं ते बोल,
जे करायचं ते कर,
एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

मी रूसलो तर तु मला मनव,
तु रुसलीस तर मी तुला मनवीन,
एकमेकांचे लाड करण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा नजर कमी होईल,
स्मरणशक्ती पण कमी होईल,
तेव्हा एकमेकांना,
एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

गुडघेदुखी जेव्हा वाढेल,
कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,
तेव्हा एकमेकांच्या,
पायाची नख कापण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

"माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,
I am Alright",
असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा आपली साथ सुटेल,
अंतिम निरोपाची वेळ येईल,
तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,

शेवटी तर आपणच दोघं असु,

अति लाड म्हणजे प्रेम का?

माझा  एक वकिलमित्र सांगत होता की, त्याच्यांकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की, नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की , बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉंपिंगवर खर्च करुन मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले. त्यामुळे नवर्‍याचे आर्थिक गणित चुकले. तो तीला म्हणाला की, ‘‘पैसे जपुन खर्च करत जा!".
बस त्यावरुन भांडण करुन बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावायांना बोलावून सांगितली की, ‘‘तिची हौस-मौज करा, पैसे कमी पडले तर माझ्या कडून घ्या!’’ हे सासूबाईंचे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट पण झाला. आता यात नक्की काय घडले?.. नक्की चुक कोणाची होती?.. मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता. त्याने त्याचे करीयर स्वत:च्या हिमंतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढलेली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की, मुलगी एकुलती एक..
लहानपणी ही मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसतांना पालक विकत घेत असायचे. ‘‘काय हवे माझ्या शोनुलिला?.. बार्बी गर्ल?’’ ओके..! लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधुन एखादी मागणी आली की लगेच हट्ट म्हणून ती पुरवली जायाची.. या पध्दतीने ती लहानाची मोठी झाली. आणि लग्नझाल्यावर वर्षभराच्या आत माहेरी आली.
पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्यांशी लहानपणी कसे वागतात त्यावर अवलंबुन असते. पालक मुलांचे लाड करणच्या नादात कुठे थांबायचे हे सुध्दा विसरतात.
‘‘मागीतले की मिळतं’’ ही सवय जर मुलांना लागली की, पुढे हे जड जाते. अशा मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि तर मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेमभंग सुध्दा पचवता येत नाही,  ना ऑफिसमध्ये वरिष्ठांशी जुळवून घेता येते. याचे कारण पालक मुलांमुलीचे प्रत्येक प्रश्‍न स्वत: सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला-मुलांचे भांडण झाले तर आई लगेच शेजारच्यांशी भांडायला जाते. शाळेत थोडं टिचर रागावली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना भेटतात. मुलाला एका डान्समधुन काढून दुसर्‍या डान्समध्ये अथवा दुसर्‍या परफॉर्मन्स मध्ये टाकले की लगेच टिचर्सला फोन करुन जवाब विचारतात.. या सर्वामधुन मुलांना आयती उत्तरे मिळतात. नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.
पालक जेव्हा गरज नसतांना पाल्याचा हट्ट पुरवतात. पैसे नसतांना सुध्दा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्याला गोंडस शब्दांची झालर देतात आणि ती झालर म्हणजे ‘‘आमचे लहानपणी असे लाड झाले नाही, मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलां-मुलीला देईल’’ आणि या कृतीलाच पालक प्रेम करणे असे म्हणतात.
खरं तर प्रेम आणि काळजी यांचा समतोल साधायचा असतो, कारण दोघं जास्त झाले की, वाढ खुटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवढा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्यामध्ये होणे गरजेचे असते.
आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तवणुक ठरत असते. म्हणून मागीतले ते मिळते ही सवय मुलांना लावु नका. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी किंवा क्लास टीचर ने त्याच्या भल्यासाठी काही ऍक्शन घेतली असेल तर त्यावेळेस टिचर्सला सहकार्य करा. कारण शेवटी मुलं मोठ्यापणी सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहणं, उत्तम संवाद साधणे हे महत्वाच असते आणि याला अडथळा असतो अति लाड! अति प्रेम!! शिस्त ही प्रेमाची पहिलि कृति आहे.
गुरुजी : पुढील दोन वाक्यातील फरक सांगा ☝
१) त्याने भांडी घासली
२) त्याला भांडी घासावी लागली
गण्या : सर पहिल्या वाक्यातील तो अविवाहित आहे
आणि
दुसर्या वाक्यातील तो विवाहित आहे