🌳🌳पापाचा गुरू कोण🌳🌳


एक पंडित काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले.

संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक पंडित, शास्त्रांचे

अध्ययन करून आला आहे आणि ते धर्मासंबंधी

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.


ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्याच्याकडे आला

आणि त्यांना विचारू लागला की

"पंडितजी तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरू कोण आहे?" 

प्रश्न ऐकून पंडित गडबडले.....


त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरुंबद्दल तर ऐकलं होतं.

पण पापचाही गुरू असतो हे त्यांच्या समजण्याच्या

आणि ज्ञानाच्या पलीकडे होते.


पंडितजींना वाटलं की त्यांचे अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे.

त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले.

अनेक गुरूंना भेटले, पण त्यांना

त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही.


अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी (वेश्येशी) झाली.

तिने पंडितजींना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले,

तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली. गणिका म्हणाली, 

"हे पंडित! ह्याचं उत्तर आहे तर अत्यंत सोप्पं,

परंतु उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही दिवस

माझ्या बाजूच्या घरात राहावे लागेल.


पंडितजी ह्या ज्ञानासाठीच तर भटकत होते.

ते लगेच तयार झाले.


गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली.


पंडितजी कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत.

ते आपले नियम-आचार आणि धर्म प्रपंचाचे कट्टर अनुयायी होते.

गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते.


अशा प्रकारे दिवस जात होते.


परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नव्हते.

ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले.


एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, "पंडितजी! आपल्याला स्वतः जेवण

बनवण्यात अनेक अडचणी येत असतील.

इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही.

आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन

तयार करून देऊ शकते.


ती म्हणाली "जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत,

तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणांस पाच सुवर्णमुद्रा देईन".


स्वर्णमुद्रांचे नाव ऐकून पंडित विचार करू लागला.

शिजवलेले अन्न आणि त्याबरोबर पाच सोन्याची नाणीही !


अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत.


तो म्हणाला जशी आपली इच्छा."


पंडित तिला म्हणाला, "फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत

जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये."


पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवून

गणिकेने त्या पंडिताच्या समोर ठेवली.


पण जेव्हा पंडित खाण्यास हात घालू लागला तेव्हा

तिने लगेच पंडितांचे ताट स्वतःकडे खेचले.


तिच्या या वर्तनामुळे पंडित क्रुद्ध झाला

आणि म्हणाला "हा काय मूर्खपणा आहे?"


त्यावर गणिका म्हणाली "हा मूर्खपणा नाही, तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.


इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच,

पण कोणाच्या हातातले पाणीही पित नव्हतात,


पण स्वर्णमुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या

अन्नाचाही स्वीकार केलात !


तुमच्या प्रश्नाचं हेच तर उत्तर आहे की 'लोभ' हाच पापाचा गुरु आहे..

 *चिटी चावल ले चली,*

*बीच में मिल गई दाल।*

*कहे कबीर दो ना मिलै,*

*इक ले डाल॥* 


अर्थात : 


मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.


तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'


तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.


माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. 


साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'


विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.


ती बघून, 'घेशील किती दोन करांनी'  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 


पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)


आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.


भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*


देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*


म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. 


*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.*

 🕸🕸🕸🕸🕸🕸🕸


*.⛏.खणता राजा.⛏.*


आयुष्यभर जुगाड केले,

सत्तेसाठी *कोलांटउड्या,*

हातचं सगळंच गेलंय आता, 

रिकामपण सलतंय *गड्या।*


चव्हाणांचा लाडका म्हणून

तिकीट मिळताच राहीलो *ऊभा*

पहिल्याच फटक्यात निवडून येत

गाठली सरळ *विधानसभा।*


नंतर मात्र स्वार्थच साधला,

तत्वे-आदर्श ठेवले *टांगून,,*

लोकांत द्वेष पेरत गेलो

ऐकमेकांची 'जात' *सांगून।*


मग साऱ्या देशामध्ये

पाठीत खुपसलेला खंजीर *गाजला,*

राजकारणाच्या मार्केट मध्ये

शिक्का माझा तिथेच *वाजला।*


तीन वेळा नेतृत्वाची

गळ्यात पाडून घेतली *माळ,*

सत्तेचे मग व्यसन जडले

सामान्यांशी तूटली *नाळ।*


काळही मोठा अनुकुल होता

कुणी न धूर्त माझ्या *खेरीज,*

नितीमत्तेला वजा करित

सत्ताकारणाचीच केली *बेरिज।*


मोठ्या बाईचा अडसर जाताच

बस्तान हलवत गाठले *दिल्ली,*

महाराष्ट्रभर पेरुन ठेवली

आमच्याच जातीची *चिल्ली पिल्ली।*


त्यांना मोकळे रान दीले,

रोज करविला नवा *ऊच्छाद,*

सेक्यूलेरिझमचे ढोल बडवत 

पसरविला फक्त *जातियवाद।*


फडणवीस, शेट्टी, छत्रपती

सगळ्यांचीच मी काढली *जात,*

मोर्चे, संप आंदोलनात

माझीच कुमक, काडी नी *वात।*


धूर्तपणे वाटचाल करीत 

सिंहासनावर रोखली *नजर,*

निवडणूकांचा नेम धरुन

'विदेशी'पणाचा लावला *गजर।*


पून्हा एकदा पक्ष फोडून

सत्तेसाठी पिसला *डाव,*

ईथे मात्र अंदाज चूकला 

तोंडावरतीच पडलो *राव।*


खुर्चीसाठी यू-टर्न मारुन

त्यांचेच पून्हा धरले *पाय,*

मतदारांना कळलेच नाही

माझे नेमके चाललेय *काय।*


पन्नास वर्षे लावल्यात आगी,

कोणतीच अजून शमली *नाही,*

सत्तेसाठी अशी क्लृप्ती

कुणालाच अजून जमली *नाही।*


झोपलेली जनता एकदम

कशी कळेना जागी *झाली,*

सत्तेमधून बाहेर काढले

दिल्ली पाठोपाठ मुंबई *गेली।*


लोक असे शहाणे होता,

होतील आमचे सगळेच *वांधे,*

चव्हाट्यावर अब्रू येईल,

बंद होतील 'उद्योग' *'धंदे'।*


शेतकरी नी मराठ्यांचे,

विषय जणू *अमृततुल्य,*

दोन्हीला मग हवा देऊन,

वाढवून पाहीले *उपद्रवमुल्य।*


तेही डाव फेल झाले

तुरीचीही न शिजली *डाळ,*

उपसून उपसून पार थकलो,

'धरणात' होता एवढा *गाळ।*


राष्ट्रपतीच्या पदाचीही आता 

लागली होती *आस,*

मीरा, कोविंद पुढे आले

तोंडचा गेला तो ही *घास।*


आताशा काहीच काम नसते,

देत सुटतो वावदुक *सल्ले,*

दुकान कुठलेही असले तरी

भरत ठेवतो आपलेच *गल्ले।*


राजकारणाची आवक-जावक 

रोज घरीच मांडत *बसतो,*

'जाणता राजा' कुणी म्हणता,

मनातल्या मनात खुदकन *हसतो।*


*(जे कुणी कवी आहेत*

*त्यांना त्रिवार सलाम)*


 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

 कालाय तस्मै नमः...


परवा कुठल्यातरी स्पोर्ट्स चॅनलवर 100 मीटर ची पळण्याची शर्यत पहात होतो. त्यातील विजेता हार्डली काही सेकंदाच्या फरकाने ती शर्यत जिंकला. मी माझ्या धाकट्या मुलाला विचारलं की तो किती फरकानं जिंकला रे, तर तो म्हणाला 3.2 मिली सेकंदानं जिंकला. मी त्याला विचारलं की अजून कुणी त्यापेक्षा कमी फरकानं जिंकलाय का ? तो म्हणाला त्याला माहित नाही पण एखादा जिंकला असेल, तर तो फरक काही मायक्रो सेकंदाचा असेल. मी त्याला परत विचारलं त्याहूनही कमी फरकाने कोणी जिंकलं असेल का, ह्यावर मात्र त्यानं मला एक टिपिकल लुक दिला आणि म्हणाला बाबा तुम्हाला काय म्हणायचंय? मी त्याच्या लूक कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून म्हणालो, की सेकंदाच्या कितव्या भागापर्यंत टाईम मोजता येतो किंवा टाईम मोजू शकतो? ह्या साठी मी विचारतोय ह्यावर मात्र त्यानं ताबडतोब "अलेक्साला" हाक मारून मला डिटेल्स दिली. ती म्हणजे मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेमटो, अटो, झेप्टो आणि योक्टो सेकंद. ते पाहून मी त्याला म्हणालो, अरे लेका ही तर डेसिमल युनिट्स आहेत. त्या सेकंदाच्या प्रत्येक भागाला काय म्हणतात ? त्यावर तो म्हणाला बाबा, आत्ताच्या जमान्यात आपण हे इथपर्यंत मोजू शकतोय ते बघा ना उगाच काहीही काय विचारताय ? सेकंदाच्या पलीकडं तुम्हाला देखील माहितीय का ? त्यानं आव्हानात्मक सुरात मला विचारलं. मी पण कॉन्फिडेंटली त्याला म्हणालो येस, मला माहितीय, रादर मी परवाच वाचलं, तुला माहीत करून घ्यायचंय की आपल्या पूर्वजांना 'टाईम' किंवा 'कालाची' सुक्ष्मता किंवा महानता किती माहिती होती ? ती सुद्धा 5000 वर्षांपूर्वी! हे ऐकल्यावर त्याच्या डोळ्यांत मला अविश्वास दिसला, पण मी कॉन्फिडेंटली सांगतोय म्हंटल्यावर त्यानं होकारार्थी मान डोलावली.


मी म्हणालो, हल्ली पुराणातली वानगी (वांगी ?)पुरणातच राहू दे असंच म्हणायची फॅशन झालीय. पण वेदांमध्ये, महाभारतात किंवा श्रींमद्भागवतात अगदी व्यवस्थित माहिती दिलीय, फक्त ती अंधश्रद्धेचा चष्मा बाजूला ठेऊन नीटपणे बघायला हवी. असो, अनायासे आलेली संधी मी थोडाच सोडणार होतो, शिवाय आपल्या वैदिक (हिंदू नव्हे) परंपरेबद्दल अधिक माहिती करून देण्यासाठी ची ही सुवर्ण संधीच होती. मग मी त्याला म्हटलं हे बघ, आपण एक दिवस म्हणजे 24 तासा पासून सुरु करू.


तर 24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र

1 अह म्हणजे 1 रात्र म्हणजे 12 तास किंवा 4 प्रहर

1 प्रहर म्हणजे 3 तास किंवा 6 नाडीका

2 नाडीका म्हणजे 1 तास किंवा 60 मिनिटे किंवा 1 मुहूर्त

1 नाडीका म्हणजे 30 मिनिटे किंवा 15 लघु

1 लघु म्हणजे 2 मिनिटे किंवा 120 सेकंद म्हणजे 15 काष्ठा

1 काष्ठा म्हणजे 5 क्षण म्हणजे 8 सेकंद

1 क्षण म्हणजे 3 निमेष म्हणजे 1.6 सेकंद

1 निमेष म्हणजे 3 लव म्हणजे 0.53 सेकंद

1 लव म्हणजे 3 वेध म्हणजे 0.17 सेकंद

1 वेध म्हणजे 100 त्रुटी म्हणजे 0.056 सेकंद

1 त्रुटी म्हणजे 3 त्रसरेणू किंवा 0.00057 सेकंद

1 त्रसरेणु म्हणजे 3 अणु म्हणजे 0.00019 सेकंद

1 अणु म्हणजे 2 परमाणू म्हणजे 0.000063 सेकंद

1 परमाणु म्हणजे 0.000032 सेकंद अर्थात सेकंदाचा बत्तीस दशलक्षांवा भाग.


महाशय अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते त्यामुळे त्यांची विस्फारित नजर आणि वासलेला आ s  बघून मीच म्हणालो, हा सेकंदाचा इतका छोटासा भाग आपल्या पूर्वजांनी का बरं शोधला असावा? म्हणजे एकतर त्यांनी त्या काळी म्हणजे हजारोंवर्षांपूर्वी अतिवेग धारण केलेला असावा किंवा पेशी विभाजन किंवा अणु विभाजन यांसारख्या अतिसूक्ष्म हालचाली ते निरीक्षित असावेत नाही का ?

त्याला तश्या संभ्रमावस्थेत सोडूनच मी फ्रेश होण्यासाठी उठलो.


अपेक्षेप्रमाणे प्रमाणे चिरंजीव माझ्या मागे आले आणि म्हणाले आपण कालाची सुक्ष्मता बघितली आता मला कालाची महानता पण नक्कीच ऐकायचीय ते सुद्धा जेवायच्या आधी. मला समाधान वाटलं. किचन मध्ये डोकावून जरा अंदाज घेतला आणि त्याला सांगायला  सुरुवात केली.


आपण बघितले की 

24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र

अश्या 15 अहोरात्री म्हणजे 1 पक्ष (कृष्ण आणि शुक्ल)

अश्या दोन पक्षांचा 1 मास (चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन)

असे 2 मास मिळून 1 ऋतु (वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शरद आणि शिशिर)

3 ऋतूंचे 6 मास म्हणजे 1 अयन (उत्तरायण आणि दक्षिणायन)

असे 6 ऋतु मिळून 12 मास म्हणजे 1 संवत्सर

अशी 100 संवस्तरे म्हणजे सामान्य मनुष्याच्या आयुष्याची परम मर्यादा !

मी असे म्हंटल्यावर तो म्हणाला हा, म्हणजे 100 च्या पुढे त्यांना मोजता येत नव्हते. पण आत्ता आपल्याला तर किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा, एक्सा,झेटा आणि योट्टा पर्यन्त मोजता येतंय. त्यावर मी त्याला हसून म्हटले अरे ही डेसिमल्स युनिट्स आहेत, त्यांना स्पेसिफिक नावं आहेत का ? मी असं विचारल्यावर परत एकदा त्यानं मला आव्हानात्मक सुरात मला विचारलं मग पूर्वीच्या लोकांना तरी नावं ठाऊक होती का ? मी हसलो आणि म्हणालो तेच तर सांगत होतो मी पण तूच मध्ये थांबवलेस. जरासं वरमून तो म्हणाला बरं बरं सांगा.


तर मानवाचं 1 वर्ष किंवा संवत्सर म्हणजे देवाचा 1 दिवस

असे 360 देव दिवस म्हणजे देवाचे1 वर्ष

देवाचं1 वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्षं

अशी देवांची 1200 वर्ष म्हणजे 1 कलियुग अर्थात मानवाची 4,32,000 वर्ष

देवांची 2400 वर्षं म्हणजे 1 द्वापारयुग म्हणजे मानवाची 8,64,000 वर्ष

देवांची 3600 वर्ष म्हणजे 1 त्रेतायुग म्हणजे मानवाची 12,96,000 वर्ष

देवांची 4800 वर्ष म्हणजे 1 कृतयुग किंवा सत्ययुग म्हणजे मानवाची 17,28,000 वर्ष

देवांची 12000 वर्ष म्हणजे 1 चौकडी अर्थात मानवाची 43,20,000 वर्ष

अश्या 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष

अश्याच 1000चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 रात्र म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष

अश्या 2000 चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 अहोरात्र म्हणजे मानवाची 8,64,00,00,000 वर्ष (8 अब्ज, 64 कोटी वर्ष)

थोडक्यात म्हणजे मानवाची 8.64 अब्ज वर्ष. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या दासबोधात (दा.६.४.१ ते ४) पण हेच सविस्तर सांगितलंय. चिरंजीवांची अवाSक झालेली अवस्था बघून त्याला म्हटलं आज आपण इथंच थांबू, बाकीचं नंतर कधीतरी सांगीन काय ? त्यानंही मुकाटपणे मन हलविली.


आपल्या पृथ्वी निर्माणाची वर्ष एव्हढीच असावीत का आणि त्याची पूर्ण जाणीव आपल्या पूर्वजांना होती का? त्या मुळेच त्यांनी इतकं कालमापन आपल्या वेदां मध्ये, पुराणात विस्तृतपणे पुढील पिढ्यांसाठी लिहून ठेवलंय का असा विचार करून मी पण जेवायला उठलो. 


ऋण निर्देश : १) श्रीमद्भागावतातील विज्ञान दर्शन (रामकृष्ण गोविंद जानकर आणि डॉ. विजय भटकर)

                  २) वैदिक विज्ञान आणि वेदकालनिर्णय (डॉ. प. वि. वर्तक)


महेश मंडलीक

*मनव्यवस्थापन!*

  ☺


आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.

*वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!* 


*1) भुतकाळात घुटमळणे बंद करा –* 


बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 

- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 

- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 

- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 

- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”

 व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, 

टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा 

*भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!


*2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –* 


बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,


*ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे,*

गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.

आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..


*3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –*


आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 

आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 

*आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!*


जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!


माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 


 अ) अपेक्षा

 ब) अपुर्ण स्वप्ने,

 क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!


*बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.* 

तो कसा सुखी आहे, 

ती कशी मस्त जगते, 

त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना !


बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!


आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 


*आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!* 


*4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -*


बघा! किती मजेशीर आहे हे,


- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,

- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? 

आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.


ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो, 

*लॉ ऑफ अट्रेक्शन!*

मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया,  

सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो,

 ह्या मनस्वी प्रार्थनेसह, 



🙏💐🙏 

 📳📖📳📃📳📃📳📖📳


            

                  




    


*एक_ग्लास_पाणी*


सरकारी कार्यालयात लांबच लांब रांग लागलेली होती. खिडकी वर जो क्लार्क बसला होता, तो रागीट स्वभावानं सतत डाफरत होता आणि सर्वांशी रागावून मोठ्या आवाजात बोलत होता...


त्या वेळेसही एका महिलेला रागावत म्हणत होता, "तुम्हाला थोडंही समजत नाही, हा फाॅर्म भरुन आणला आहे, यात सर्वच चुकले आहे. सरकारने फॉर्म फुकट दिला आहे तर काहीही भरावं का? खिशातून पैसे द्यावे लागले असते तर दहा लोकांना विचारून भरला असता तुम्ही."


एक व्यक्ति रांगेत उभा राहून बऱ्याच वेळेपासून हे पहात होता. तो रांगेतून बाहेर पडून, आॅफिसच्या मागच्या रस्त्याने त्या क्लार्क जवळ जाऊन उभा राहिला आणि तेथे ठेवलेल्या घागरीतून पाण्याचा एक ग्लास भरून त्या क्लार्क समोर धरला.

क्लार्क ने त्या व्यक्ति कडे डोळे वटारून पाहिले 

 मान वेळावून 'काय आहे' चा इशारा केला.

त्या व्यक्तीने क्लार्क ला म्हटले, "साहेब, खूप वेळेपासून तुम्ही बोलत आहात, घसा कोरडा झाला असेल, पाणी पिउन घ्या."

क्लार्क ने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्याकडे असे बघितले जसे काही दूसऱ्या ग्रहावरचा प्राणी पाहीला आहे.


आणि म्हणाला, "माहीत आहे, मी कटु सत्य बोलतो, म्हणून सर्व माझ्यावर नाराज असतात. शिपाई पण मला पाणी पाजत नाही."

तो व्यक्ति हसला आणि परत रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला.


आता त्या क्लार्क चे वागणे बदलले होते. अगदी शांत मनाने तो सर्वांचे ऐकून घेत व्यवस्थीत बोलत होता आणि सर्वांचे काम त्याने व्यवस्थीत पार पाडले.

सायंकाळी त्या व्यक्ति ला एक फोन आला. दूसऱ्या बाजूला तोच क्लार्क होता.


 तो म्हणाला, "भाऊ, तुमचा नंबर तुमच्या फॉर्म मधून घेतला होता, आभार मानायला फोन केला होता.

माझी आई आणि बायकोचे अजिबात जमत नाही. आज ही जेव्हा मी घरी पोहोचलो तर दोघींमध्ये वाद सुरू होता, परंतु तुमचा गुरुमन्त्र कामी आला.

तो व्यक्ति एकदम स्तिमित झाला, आणि म्हणाला, "काय? गुरुमंत्र?"


"हो, मी एक ग्लास पानी माझ्या आईला दिले आणि दूसरा ग्लास बायको ला, आणि म्हटले की घसा कोरडा पडला असेल, पाणी पिउन घ्या. बस, तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि आम्ही तिघे हसत-खेळत गप्पा मारत बसलो आहोत. भाऊ, आज जेवायला आमच्या घरी या."


"हो! पण, जेवायला का?"


क्लार्क ने गदगदल्या स्वरात उत्तर दिले, "गुरू मानले आहे तर एवढी दक्षिणा तर बनतेच ना आपली, आणि हे पण माहित करायचे होते की, एक ग्लास पाण्यात इतकी जादू आहे तर जेवणात किती असेल?"

 धोंडोपंत रेल्वेत पेपर वाचत वाचता वैतागून पेपर बाजूला आपटून म्हणाले, .......        "साले सगळे राजकारणी भामटे आहेत."

त्यामुळे शेजारचा प्रवासी डाफरून, "ओ साहेब, तोंड सांभाळून बोला."


धोंडोपंत चपापले. "माफ करां हं. तुम्ही राजकारणी आहात का?"


"नाही. मी भामटा आहे."


😛😜😁😁

 *भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस साल्वादोर अल्वारेन्गा*


अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. 

जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे.

   एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र!


जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५०० किलोहुन अधिक मासळी पकडली. दोघेही खूप खुश होते.


पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. अचानक भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरजोरात पाऊस कोसळू लागला. त्यांनी लगबगीने किनारा गाठायचा प्रयत्न केला. पण वादळामध्ये रस्ताच सापडत नव्हता. जोरदार पावसामुळे किनारा दिसायचा बंद झाला आणि त्यांची बोट खोल समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली. हे वादळ पुढे ५ दिवस तसेच सुरु राहिले.


वादळामुळे बोटीला खूपच मार बसला. बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली, मोटर वाहून गेली. त्यांनी रेडिओवरून स्वतःच्या मालकाशी संपर्क करायचा प्रयत्न केला. पण त्यांचे अचूक स्थान निश्चित न करता आल्यामुळे आणि वादळ दीर्घकाळ टिकल्यामुळे बचाव पथक माघारी परतले. दोन्ही मच्छिमार समुद्रामध्ये बुडून मृत्यू पावले असतील असा समज करून त्यांनी शोधकार्य थांबविले.


बोटीवर असलेले खाद्य अवघ्या काहीच दिवसांत संपले. पावसाचे पाणी साठवून त्यांनी ते प्यायला सुरुवात केली. खूप दिवस पाऊस न पडल्यास त्यांना स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माश्यांचे रक्त पिऊन दिवस ढकलावे लागायचे. ( समुद्राच्या पाण्याचा एक थेंब म्हणजे 0.001 ग्रॅम मीठ. आपले शरीर या  सोडियमला सहन करण्याइतपत सक्षम नसते. मूत्रपिंडावर दबाव येऊन ते निकामी होण्याची शक्यता , मज्जासंस्थेचा नाश, अंतर्गत अवयवांना विषबाधा, निर्जलीकरण अशा अनेक शक्यता असतात त्यामुळे अत्यन्त संकटात सुद्धा हे पाणी माणूस पिऊ शकत नाही ) जोस अल्वारगेन्गा हा एक तरबेज मच्छिमार होता. मासे, कासव आणि समुद्रपक्षी ह्यांना तो अगदी शिताफीने पकडायचा.


तासामागून तास जाऊ लागले, दिवसामागून दिवस जाऊ लागले, महिन्यांमागून महिने सरू लागले पण त्याना किनारा काही सापडत नव्हता. कोणतीही बोट किंवा विमान पण दृष्टीपथात पडत नव्हते आणि जरी पडले तरी सगळी उपकरणे खराब झाल्यामुळे संपर्क करता येत नव्हता. एव्हाना दोघांनाही कळून चुकले होते कि आता परत घरी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. या अथांग समुद्रामध्येच भरकटत असताना एखाद्या दिवशी मृत्यू कवटाळेल अशी अगतिक परिस्थिती निर्माण झालेली होती


जोस स्वतःला दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचा पण कॉर्डोबा मात्र निराशेच्या गर्तेत लोटला जात होता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होत होता. ४ महिने समुद्रामध्ये अडकून पडल्यामुळे आणि रोज रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला आणि त्याने खाणेपिणे सोडून दिले. काही दिवसांमध्ये त्याचा भुक आणि निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला.


आपल्या सहकाऱ्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला जबर मानसिक धक्का बसला. त्याने कॉर्डोबाचा मृतदेह ५-६ दिवस तसाच ठेवला. काय करावे त्याला सुचेना. त्याच्या मनात पण आता आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याने मनाशी काही तरी दृढनिश्चय केला आणि सहकाऱ्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला.


पुढे अजून ७ - ८ महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता. तब्बल ४३८ दिवसानंतर त्याला पहिल्यांदा आशेचे किरण दिसू लागले. समोरच मार्शल बेटाचा किनारा दिसत होता. लगबगीने तो किनाऱ्यावर पोचला आणि तेथील एका झोपडीचे दार ठोठावले. झोपडीतील माणसांना सुरुवातीला तो जे सांगत होता त्यावर विश्वास बसेना. पण नंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली.


मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क 9650 किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता. 


अश्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारगेन्गाने भरकटलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये सर्वांत जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम केला आणि जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे पण सिद्ध केले.


     आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये मश्गुल असल्याने जीवन मरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा कविता आणि मनोरंजनाचा विषय किंवा फारतर चित्रपटाचा विषय असू शकतो. त्यामुळे साधे-साधे अडचणीचे प्रसंगसुद्धा आपण अत्यन्त आक्रस्ताळेपणाने किंवा चीडचीड करत हाताळतो. सहज आणि संघर्षरहित जीवनाची इतकी सवय आपण स्वतःला लावून घेतली आहे की घरात भाजीपाला नसेल , किराण्यातला एखादी वस्तू सम्पली असेल तरी आपण कासावीस होतो. कोरोना सारख्या संकटाने घरात बंदिस्त झालेले अनेक आत्मे लहानसहान गोष्टींसाठी तळमळतांना पाहिलं की अशा गोष्टींची आठवण होते.

स्त्रोत: गूगल : The Incredible story of Alvarenga- Who Survived 438 Days Adrift In The Pacific.

 Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .

लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .


एक डॉक्टर म्हणाले " याला  काय झालं असेल हो ? "


डॉक्टर १ :left knee arthritis  ."


डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ".


डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ."


डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे  lower motor neurons बिघडले असणार ."


डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .


डॉक्टर ६.............काही बोलणार....


 तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,

.

.

.

.


 *इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय*?????        

 आजची मीडिया देखील आशेच अंदाज लावत बसते

 काल कटिंग सलूनच्या  दुकानावर एक पाटी वाचली.. ..


"आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू "..🤣


इलेक्ट्रिकच्या  दुकान वाल्याने फलकावर लिहिलं होतं.....


"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣


चहाच्या टपरीवर असा फलक होता...


"मी  साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो."

🤣


एका उपाहारगृहाच्या  फलकावर वेगळाच मजकूर होता  ..


"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या" 😀


इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..


"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..

😂


पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..


"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं, म्हणजे जबडा मोठा उघडा" ..🤣


फळं विकणाऱ्या माणसाने कमालच केली. ..


"तुम्ही फक्त कर्म करा, फळ आम्ही देऊ ".. 🤣


घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता  ..?


"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."

🤣


ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं.....😅


"या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."

🤣

 परवा एक बातमी वाचली : 

*एच डी एफ सी बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही खात्यांची माहिती दुसऱ्यांना दिली*


या बाबतीत मी अगदी निश्चिंत आहे. कारण माझे अकाउंट एस बी आय मध्ये आहे. 


ते पन्नास चकरा मारल्याशिवाय  माझ्या अकाउंट ची माहिती मलाच देत नाहीत तर दुसऱ्याला काय देतील.


😂😂😂😂

नवरा

नवरा  म्हणजे समुद्राचा 

भरभक्कम काठ 

संसारात उभा राहतो

पाय रोवून ताठ      


कितीही येवो प्रपंच्यात

दुःखाच्या लाटा

तो मात्र शोधीत राहतो

सुखाच्या वाटा       


सर्वांच्या कल्याणा करता

पोटतिडकीने बोलत राहतो

न पेलणारं ओझं सुद्धा 

डोक्यावर घेऊन चालत राहतो  


कधी कधी बायकोलाही

त्याचं दुःख कळत नसतं

आतल्या आत त्याचं मन 

मशाली सारखं जळत असतं  


नवरा आपल्या दुःखाचं 

कधीच प्रदर्शन मांडत नाही 

खूप काही बोलावसं वाटतं

पण कुणाला सांगत नाही   


बायकोचं मन हळवं आहे

याची नवऱ्याला जाणीव असते 

दुःख समजून न घेण्याची 

अनेक बायकात उणीव असते  


सारं काही कळत असून

नवऱ्याला अपमान गिळावे लागतात 

वेदनांना काळजात दाबून

पुन्हा कष्ट उपसावे लागतात    


सगळ्यांच्या आवडी जपता जपता 

मन मारीत जगत असतो 

बायको , पोरं खूष होताच

तो सुखी होत असतो  


इकडे आड तिकडे विहीर 

तशीच बायको आणि आई 

वाट्टेल तसा त्रास देतात 

कुणालाच माया येत नाही 


त्याने थोडी हौसमौज केली तर

धुसफूस धुसफूस करू नका

नवऱ्या विरुद्ध विनाकारण

दारू गोळा भरू नका  


दोस्ता जवळ आपलं मन

त्यालाही मोकळं करावं वाटतं

हातात हात घेऊन कधी

जोर जोरात रडावं वाटतं 


समजू नका नवरा म्हणजे

नर्मदेचा गोटा आहे

पुरुषाला काळीज नसतं

हा सिद्धांत खोटा आहे  


मी म्हणून टिकले इथं

दुसरी पळून गेली असती

बायकोनं विनाकारण

नवऱ्याला धमकी दिलेली असती 


घरात तुमचं लक्षच नाही

हा एक उगीच आरोप असतो

बाहेर डरकाळ्या फोडणारा

घरी म्यांव म्यांव करीत बसतो 


सारख्या सारख्या किरकिरीनं

त्याचं डोकं बधिर होतं

तडका फडकी बाहेर जाण्यास

खूप खूप अधीर होतं  


घरी जायचं असं म्हणताच

त्याच्या पोटात गोळा येतो

घरात जाऊन बसल्या बसल्या

तोंडात आपोआप बोळा येतो 


नवरा म्हणा , वडील म्हणा

कधी कुणाला कळतात का ?

त्यांच्या साठी कधी तरी 

कुणाची आसवं गळतात का ?  


पेला भर पाणी सुद्धा

चटकन कुणी देत नाही 

कितीही पाय दुखले तरी 

मनावर कुणी घेत नाही  


वेदनांना कुशीत घेऊन 

ओठ शिउन ' तो ' पडून राहतो 

सर्वांच्या सुखासाठी 

एकतारी भजन गातो  


बायको आणि मुलांनी 

या संताला समजून घ्यावं

फार काही नकोय त्याला 

दोन थेंब सुख द्यावं    


मग बघा लढण्यासाठी

त्याला किती बळ येतं

नवऱ्याचं मोठेपण हे 

किती जणांच्या लक्षात येतं ? 

चुलीवरची स्कॉच

 चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा,

चुलीवरची कोंबडी, चुलीवरचीभाकरी,चुलीवरचं अमुक, चुलीवरचं तमुक वगैरे वगैरे, बरीच क्रेझ आहे हल्ली चुलीवरच्या पदार्थांची... 

असंच पुण्यात एक बोर्ड वाचला.. 

*"चुलीवरची स्कॉच मिळेल"*

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

हौसेने मित्रांसह आत गेलो तर हरामखोर *हातभट्टीची* विकत होता...🥴


😂😂😛😛😂😂

 डॉक्टर मनकवडे: अहो, तुमचा मुलगा माती खातो यात गंभीरपणे विचार करण्यासारखं आणि माझ्यासारख्या मानोचिकित्सकाकडून उपचार करून घेण्यासारखं काहीही नाही. अगदी सर्वसाधारण मुलांसारखा आहे तो असं मला वाटतं.

बाबुराव: पण डॉक्टर, हे नॉर्मल नाही असं मला तरी वाटतं आणि त्याच्या बायकोचंही तेच मत आहे

कविता

 विदर्भ गीत – डा. निलेश हेडा


आलापल्ली एटापल्ली

नाही जंगलाची वाण

शेती पिकवते मोती

आहे समृद्धीची खाण.


काट्याकुट्यातुन वाहे

मायी काटेपुर्णा माय

वरदेच्या या पाण्याला

आहे अमृताची साय.


मेळघाटातुन वाहे

नवी नवरी सीपना

इथे मोरणेच्या काठी

पावा वाजवी किसना.


विपुल दर्भाच्या प्रदेशा

तूच “कठाणीला” पोसं

दुध दुभत्याची गंगा

कोणी राहु नये ओसं.


तुकड्याच्या प्रार्थनेत

वसे गावातली गिता

गाडगेबाबाची कहाणी

सांगे गावो गावी विठा.


ग्रेस, भट, उ.रा. गिरी

ना.घ., वाघ वाचे गाथा

शब्द खेळती अंगणी

इथे टेकवावा माथा.


आमचा “मुसळे” वाहतो

नव्या कथेची “पखाल”

कंचनीच्या महालात 

ना. घ. वसतो सताडं.


सातपुड्याच्या संगती

माहुराचा गड शोभे 

पाड्यापाड्यातुन येथे

कोरकुचा डफ वाजे.   


बाबासाहेबाने दिला 

इथे मानुसकीचा धर्म

दिक्षाभुमीच्या तिर्थाने

शिकवले आम्हा कर्म.


गोंड राजांचे मावळे

आम्ही सुराज्य उभारु

अन विदर्भाचा झेंडा

अटकेच्या पार रोऊ.


निलेश हेडा


नोट

कठाणी – गायीचं एक वाण

ना. घ. – सुप्रसिद्ध कवि ना.घ. देशपांडे

मुसळे – सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे

पखाल - बाबाराव मुसळेंची एक कादंबरी

 *नागरीक मी भारत देशाचा*

*हातात सगळं आयतं पाहिजे !* 


वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे !

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे !


तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे !

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे !


कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे !

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे !


धर्माच्या नावाने भले काहीही करीन

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे ! 

मतदान करताना जात पाहीन

म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे !


कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात पाहिजे !

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे !

 देव मानावा की मानू नये 

या भानगडीत मी पडत नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही


ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे

ज्यांना देव नकोच आहे

त्यांच्यासाठी तो  भास आहे..

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही....

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही....


हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही...

पाव किलो पेढ्याची लाच 

मी देवाला कधी देत नाही

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही...


जे होणारच आहे ....

ते कधी टळत नाही...

खाटल्यावर बसून

कोणताच हरी फळत नाही

म्हणून मी कधी ...

देवास वेठीस धरीत नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही...


देव देवळात कधीच नसतो

तो शेतात राबत असतो

तो सीमेवर लढत असतो

तो कधी आनंदवनात असतो

कधी हेमलकसात असतो...

देव शाळेत शिकवत असतो

कधी देवच  शिकत असतो

म्हणून ....

मी देवळात कधी जात नाही

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काय अडत नाही...



(कवी अज्ञात. आवडली म्हणून आपल्या आनंदासाठी पाठवली)

 😃 मजेशीर कविता 😃


बशी म्हणाली कपाला

श्रेय नाही नशिबाला 

पिताना पितात बशीभर

अन म्हणताना म्हणतात कपभर...!


कप म्हणाला बशीला 

तुझा मोठा वशिला

धरतात मला कानाला

अन् लावतात तुला ओठाला...!!!

 

☕ या चहा प्यायला. ☕

 🍁 कप - बशी🍁


स्त्री आणि पुरुष यांचे प्रतीक असलेली कप बशी. स्त्रीआणि पुरुष कप-बशीप्रमाणे एकरूप, परस्पर पूरक आहेत. त्यांना एकटे अस्तित्व नाही. दोघे जोडीनेच वावरतात. बशी ही स्त्रीचे तर कप हे पुरूषाचे प्रतीक आहे. कप भर चहाने घटकाभर उत्साह वाटला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पूरूष ताठ तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो, म्हणून त्याचा कान धरावा लागतो. पण कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक जन्मभर टिकणारी अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी

 "कप - बशी".

🙂🙃

फक्त हिमतीने लढ👊


घरटे उडते वादळात  

बिळा, वारूळात पाणी शिरते 

कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊

म्हणून आत्महत्या करते ?


प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही 

शिकार मिळाली नाही म्हणून 

कधीच अनूदान मागत नाही 🐅


घरकुला साठी मुंगी 

करत नाही अर्ज 

स्वतःच उभारते वारूळ 

कोण देतो गृहकर्ज ?🎭


हात नाहीत सुगरणी ला 

फक्त चोच घेउन जगते 

स्वतःच विणते घरटे छान 

कोणतं पॅकेज मागते ?🕴


कुणीही नाही पाठी 

तरी तक्रार नाही ओठी 

निवेदन घेउन चिमणी 

फिरते का कोणत्या योजनेसाठी ?


घरधन्याच्या संरक्षणाला 

धाऊन येतो कुत्रा 

लाईफ इन्शुरन्स काढला का ? 

अस विचारत नाही मित्रा

🐕

राब राब राबून बैल 

कमाउन धन देतात 

सांगा बरं कुणाकडून 

ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂


कष्टकर्याची  जात आपली 

आपणही हे शिकलं पाहिजे 

पिंपळाच्या रोपा सारखं 

पाषाणावर टिकलं पाहिजे🤕


कोण करतो सांगा त्यांना 

पुरस्काराने सन्मानित 

तरीही मोर फुलवतो पिसारा 

अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧


🐝मधमाशीची दृष्टी ठेव 

फुलांची काही कमी नाही 

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 

कोणतीच रोजगार हमी नाही


घाबरू नको कर्जाला 

भय, चिंता फासावर टांग 

जिव एवढा स्वस्त नाही 

सावकाराला ठणकाऊण सांग😎


काळ्या आईचा लेक कधी 

संकटापुढे झुकला का ? 

कितीही तापला सुर्य तरी 

समुद्र कधी सुकला का ?🌊💦


निर्धाराच्या वाटेवर 

टाक निर्भीडपणे पाय 

तु फक्त विश्वास ठेव 

पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑


निर्धाराने जिंकु आपण 

पुन्हा यशाचा गड 

आयुष्याची लढाई 

फक्त हिमतीने लढ👊

 एका आजीच्या १०० व्या वाढदिवशी तिला व्हीलचेअर मध्ये बसवून लॉन वर सर्व कुटुंबियांसमवेत आणतात.

  

आजीला फारसं बोलता यायचं नाही. पण शक्यतो ती आवश्यक तेव्हा लिहून आपले म्हणणे सांगत असे.


लॉनवर खुर्चीवर बसल्याबसल्या थोड्या वेळाने आजी उजवीकडे कलंडू लागली,


म्हणून काही कुटुंब सदस्य तिच्या जवळ तत्परतेने गेले,


आणि तिच्या उजव्या बाजूला ऊशा ठेऊन तिला नीट बसती केली.


थोड्यावेळानंतर ती पुन्हा तिच्या डाव्या बाजूला कलंडू लागली, 


घरच्यांनी आता डाव्या बाजूस ऊशा लाऊन तिला सरळ बसविले.


लवकरच ती पुन्हा पुढे झुकू लागल्याने कुटुंबातील सदस्यांनी पुन्हा तिला पुढे मऊशार तक्का लावला.


आणि नंतर तिला नीट बसवण्यासाठी तिच्या कंबरेखाली एक आणखी ऊशी बसवली.


उशीरा आलेला आजीबाईंचा भाचा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,


'हाय, आज्जी,

तू तर अगदी महाराणी शोभते आहेस! 


सगळे अगदी छान बडदास्त ठेवतायत ना?' 


आजीने हळूहळू तिच्याकडील नोटपॅड बाहेर काढून भाच्याला एक नोट लिहिली:


"कसली मरणाची बडदास्त?


 मेले पादायला पण देत नाहीयेत."😩😩😂😂😂😂😂

 मेट्रीक पास झालो तेंव्हा


नंबर पेपरात घावला

अन सारा गांव कसा

माह्या स्वागताले धावला


कोनं केला सेकहेंड

कोन घेतला मुका

सार्याईन पोटात घातल्या

माह्यावाल्या चुका


गांवची मरीमाय

तवाच मले पावली

मामाची एक पोरगी

मह्यावर भावली


एका हाती हेंडल

एका हाती पेपर

सायकवर निंघाला

गांवातला टॉपर


मी पुळे अन माग पोट्टे

अशी निघाली वरात

पेलता पेलेना गर्दी

होती माह्या घरात


पास झालो तवा

सहावी सप्लीमेंट्री

होनार होती आता

कॉलेजात एंट्री


तवाच गर्दीतुन

नम्या आला हापत

मी चरकलो मनात

आनली काय आफत


नम्या म्हने पेपरात

जांगळबुत्ता झाला

पासच्या यादीत तुवा

चुकुन नंबर आला


~~सतीष देशमुख,पणज

९६०४९१२३५१

माणूस होशील का ?

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता. कुणीतरी भल्यामाणसाने त्याचं केलेलं अतिशय सुरेख मराठीत भाषांतर. 

✒️✒️

आलास..?

ये, दार उघडंच आहे ...आत ये.

पण क्षणभर थांब....!!


दारातील पायपुसण्यावर 

अहंकार झटकून ये...!!


भिंतीला बिलगून वर चढलेल्या 

मधुमालतीच्या वेलावर

नाराजी सोडून ये...!!


तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये,

बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!


पायातल्या चपलांबरोबर 

मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!!


बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून

थोडा खेळकरपणा मागून आण,

गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू

चेहेऱ्याला लावून आण...!!


ये...


तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न 

माझ्यावर सोपव.

तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला

प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!


ही बघ....


तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.

सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि 

आकाशी गुलालाची उधळण केलीयं...


अन्


प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर

चहा उकळत ठेवलाय.

तो घोट घोट घे....


ऐक ना ...

इतकंही अवघड नाहीये रे जगणं !          

फक्त, तू *माणूस* बनून ये...!!


*_पूर्वीचा काळ बाबा,_*

*_खरंच होता चांगला,_*

*_साधे घरं साधी माणसं,_*

*_कुठे होता बंगला ?_*


                     *घरं जरी साधेच पण,*

                     *माणसं होती मायाळू,* 

                     *साधी राहणी चटणी भाकरी,* 

                     *देवभोळी अन श्रद्धाळू.*


*_सख्खे काय चुलत काय,_* 

*_सगळेच आपले वाटायचे,_*

*_सुख असो दुःख असो,_* 

*_आपुलकीने भेटायचे._*


                    *पाहुणा दारात दिसला की,* 

                    *खूपच आनंद व्हायचा हो,*

                    *हसून खेळून गप्पा मारून,*

                    *शीण निघून जायचा हो.*


*_श्रीमंती जरी नसली तरी,_*

*_एकट कधी वाटलं नाही,_*

*_खिसे फाटके असले तरीही,_*

*_कोणतंच काम रुकलं नाही._*


                    *उसनं पासनं करायचे पण,* 

                    *पोटभर खाऊ घालायचे,*

                    *पैसे आडके नव्हते तरीही,*

                    *मन मोकळं बोलायचे.*


*_कणकेच्या उपम्या सोबत,_* 

*_गुळाचा शिरा हटायचा,_*

*_पत्रावळ जरी असली तरी,_*

*_पाट , तांब्या मिळायचा._* 


                    *लपाछपी पळापळी,* 

                    *बिन पैशाचे खेळ हो,*

                    *कुणीच कुठे busy नव्हते,*

                    *होता वेळच वेळ हो.* 


*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*

*_खळखळून हसायचे,_*

*_निवांत गप्पा मारीत माणसं,_* 

*_ओसरीवर  बसायचे._*


                    *सुख शांती समाधान " ते "*

                    *आता कुठे दिसते का ?*

                    *पॉश पॉश घरा मधे,*

                    *" तशी " मैफिल सजते का ?*


*_नाते गोते घट्ट होते,_*

*_किंमत होती माणसाला,_*

*_प्रेमामुळे चव होती,_*

*_अंगणातल्या फणसाला._* 


                    *तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*

                    *राहिला आहे का राम ?*

                    *भावाकडे बहिणीचा हो,* 

                    *असतो का मुक्काम  ?*


*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_* 

*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*

*_मृदंगाच्या ताला वरती,_*

*_गाव आता का डोलत नाही._* 


                    *प्रेम , माया , आपुलकी हे,*

                    *शब्द आम्हाला गावतील का ?*

                    *बैठकीतल्या सतरंजीवर,*

                    *पुन्हा पाहुणे मावतील का ?*


*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*

*_मजा आता कमी झाली,_*

*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*

*_सुदामाची सुट्टी झाली._* 


                    *हॉल किचन बेड मधे,*

                    *प्रदर्शन असतं वस्तूंचं,*

                    *का बरं विसर्जन झालं,* 

                    *चांगुलपणाच्या अस्थीचं ???*

🙏🏻🙏🏻🙏🏻

ब्रेक्स

एकदा फिजिक्सच्या टिचरने मुलांना प्रश्न विचारला,

" कारमधे *ब्रेक्स* का लावलेले असतात ? "


त्यावर निरनिराळी उत्तरे आली,

*थांबण्यासाठी*


*वेग कमी करण्यासाठी*


*अपघात टाळण्यासाठी*


परंतू सर्वात चांगले उत्तर होते,

*"जास्त वेगाने जाता येण्यासाठी..!!"*


गोंधळले असाल ना अशा उत्तराने..... मग असे कसे..? जरा विचार करा.....!


जर तुमच्या कारमधे *ब्रेकच* नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल..?

कारला *ब्रेक* आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.


      जीवनातही तुम्हाला *आई* *वडील, सासु सासरे* , *कुटुंब* इ. रूपात *ब्रेक्स* मिळतात. तुम्हाला वाटते की, ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी चिडचिडे होतात.


परंतु लक्षात ठेवा, जीवनात वेळोवेळी आलेल्या अशा *ब्रेक्समुळेच* तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे *ब्रेक्स* नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.


म्हणूनच जीवनात अधुनमधून येणाऱ्या अशा *" ब्रेक्सची "* जाण ठेवा.....

 हाडे गोठवून टाकणाऱ्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री, एक अब्जाधीश रस्त्यावर एका वृद्ध गरीब माणसाला भेटला. त्याने त्याला विचारले, " तुम्हाला बाहेर थंडी वाटत नाही का? तूम्ही तर थंडीचे स्वेटरही घातलेले नाहीये?"


तेव्हा त्या गरीब म्हाताऱ्याने उत्तर दिले, "माझ्याकडे गरम स्वेटर नाही परंतु मला थंडीची सवय आहे." अब्जाधीश म्हणाला, "थांबा मी आता घरी जातो आणि तुमच्यासाठी एक चांगले गरम स्वेटर घेऊन येतो"


थंडीपासून संरक्षण देणारे स्वेटर मिळणार या विचाराने तो गरीब म्हातारा खूप आनंदित झाला आणि म्हणाला की "साहेब खूप उपकार होतील " अब्जाधीश घरी गेल्यावर काही तरी कामात स्वेटर चे विसरून गेला.


सकाळी त्याला त्या गरीब म्हातार्‍याची आठवण .झाल्यावर तो स्वेटर घेऊन तो म्हातारा रात्री ज्या जागी भेटला तिथे गेला. परंतु म्हातारा जीवघेण्या थंडीने कडकडून मरण पावला होता.


अब्जाधीश माणसाला त्याच्या प्रेताजवळ एक चिट्ठी दिसली. त्याने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिले होते, “ साहेब जेव्हा माझ्याजवळ गरम कपडे, स्वेटर नव्हते तेव्हा माझ्याकडे थंडीविरुद्ध लढण्याचे मानसिक शक्ती होती. परंतु जेव्हा तुम्ही मला गरम स्वेटर देण्याचे आश्वासन दिले तेव्हा आता थंडी पासुन संरक्षणासाठी एक छान गरम स्वेटर मिळणार या आशेने माझी थंडी विरुद्ध लढण्याची मानसिक शक्ती संपली"


तात्पर्य: 

 जर आपण एखाद्याला दिलेला शब्द, आश्वासन, वचन पाळू शकत नसू तर ते देऊ नका. दिलेला शब्द आपल्यासाठी जरी महत्वाचा नसला तरी तो दुसर्‍या एखाद्या गरीब, लाचार व्यक्तीसाठी बरंच काही असू शकतो.

..🙏🏻

सपन


       येक दिवस सपनात मी

       झालो गावचा सरपंच

       झोपीतच माह्यी राज्या

       छाती फुगली दोन इंच


        ग्रामपंचायतच्या अंदर

        सभा माह्यी थाटली 

        सरपंचाची सभा मले

        इंद्रा सारखी वाटली


        मी कपडे घालो भारी

        रेमंड कंपनीचा कोट

        मले सरपंच पाहुन

        काई लोकाइचं दुखे पोट


        माह्या बुढा म्हने मले

        तु हिसोबात राय बाबु

        कोनतीही असो योजना

        सारा पैसा आपुनच दाबु


        कागदावरचा कारभार

        खराखुरा पाह्याचा

        भाताच्या पयले बाबु

        गुई नाही खायाचा


         वरून रायजो चांगला

         अंदरून करजो बिगाळ

         ठेकेदारासंग लावजो

         कमिशनचं जुगाळ


         ठेकेदारासंग बाबु तु

         पैशाचं बोल कडक

         पयले करजो आपल्या

         घरा पुढची सडक


         पुढच्या पाच वर्षात 

         मुश्किल हाये येनं

         म्हणुन म्हनतो बाबु 

         आपलं सरकं करून घेनं


         मिटींगीत म्हन फक्त

         पैसा विकासाले लावु

         तुमच्या येटायातला रोड

         दुसर्या टप्पयात पावु


         कागद दाखोजो खरा

         बाकी चालू दे खोटं

         आपलं जुनं घर पाळुन

         तथी मकान बांधु मोठं


         ग्रामसेवकाच्या सल्ल्यानं

         माह्यी बाजु झाली दमदार

         मले घरी येवुन भेटत

         खासदार अन् आमदार


         झोपीतच राज्या म्या

         बुलेट गाळी काळ्ळी

         गाळीले किका मारू मारू

         आंगावरची सातरी म्या 

         फाळ्ळी


        सपनात मी वसनावलो

        पावला आपल्याले देव

        मुत्यासाठी झोपीतुन मले

        येकदम आला चेव


        झोपीतुन उठल्या बरोबर

        बायको मले भेटली

        खरंखुरं सांगा म्हने

        सातरी कशी फाटली


        सरपंचाच्या नांदात मले

        सपन दिसलं भेसुर 

        झोपीत सातरी फाटली

        त्यात माह्या काय कसुर


        बायकोसंग बोलुन म्या

        कसतरी निपटलं

        बुढ्यानं माह्ये पाय धरून

        खाली मले आपटलं


        बुढा राज्या माह्या 

        लयच् होता तापड

        कानाखाली देली माह्या

        उलट्या हाताची झ्यापड


        इनाकारन मले तु

        दाखु नोको पावर

        सरपंचाच्या नांदात लेका

        इकुन बसला वावर


        त्या दिवसा पासुन म्या

        दोनी कान धरले हाती

        चुकूनही सरपंचाच सपन

        मले दिसु नोको राती

        चुकुनही सरपंचाचं सपन

        मले दिसु नोको राती

 *आजचा विचार*

           (व.पु.काळे)

-----------------------------


आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !!

जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी फाटावी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!


परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा. कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.!!

अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!!


"ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय" या एकाच तत्वावर.!!"

भीतीने फाटली, अपमान पदरी आला, फसवणूक झाली तरी हारण्याच्या, मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही.!!


ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो "साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं!!" और हटनेका भी नहीं !!

पण कसंये एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात. जीवनाचा एक अध्याय... एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ.!!

त्यातूनच तर माणूस शिकत असतो, आणि घडतही असतो.

नवरात्रीतले_नऊ_रंग_धार्मिक_नाहीत, #हा_तर_होता_मार्केटिंग_फंडा!

नवरात्र आली की सगळीकडे नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.


पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट, ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही.


महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात. अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. पण असं कां केल्या गेलं? २००३ साली मटाचे संपादक असलेल्या भरतकुमार राऊतांचं या प्रश्नाचं उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं. ते म्हणतात, यात धार्मिकता वगैरे काही नाही, तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्‍या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. प्रत्येक दिवस एका देवीचा असे नऊ देव्यांमध्ये नऊ दिवस वाटून टाकले. आणि मग प्रत्येक देवीला एक रंग दिला. म्हणजे असं पाहा, दुर्गेची दुर्गाष्टमी, म्हणून तिचा एक रंग.  असा रंगोत्सवाला मस्त धार्मिकतेचा रंग चढत गेला. मग काय, महिलांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज, छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं....पसरले नवरंग मुंबईवर. 


२००३च्या सुमारास  महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं. 


२००३-०४ साली फक्त जाहिरातींतूनच नाही, तर अशा फोटोजमधूनही बातम्या हुडकून हुडकून वाचाव्या लागत होत्या. बघा, केवढं दिव्य होतं ते!!


ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली. आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणार्‍या मध्यमवयीन बायकाच काय, घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं-मुली देखील हे कलर कोड्स पाळतात. सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा उपाय आज १७ वर्षांनंतरही तितक्याच यशस्वीपणे चालू राहिलाय. 


आता तर हे लोण इतके पसरले की, मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे लोण पसरलं. 


मार्केटिंग गिमिक असो का काही असो, रंगीत शहरं बघायला छान वाटतात हे नक्की.


.....आणि हो रूढी व परंपरा सांगिवांगी कशा निर्माण होतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण. काही वर्षांनी ही परंपरा संपूर्ण भारतात बघायला मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. नंतर नंतर तर ही परंपरा कधी व कशी सुरू झाली हे सुद्धा कुणाला कळणार नाही.


https://www.maayboli.com/node/63962


https://www.bobhata.com/lifestyle/secret-behind-navratri-colors-551?amp

हिशोब काय ठेवायचा

काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..

आपल्या थोड्या वर्षांचा..

हिशोब काय ठेवायचा ..


आयुष्याने भर भरून दिले असताना..

जे नाही मिळाले त्याचा..

हिशोब काय ठेवायचा..! !


मित्रांनी दिले आहे,

अलोट प्रेम ईथे...

तर शत्रूंच्या बोलण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


येणारा प्रत्येक दिवस,

आहे प्रकाशमान ईथे..

तर रात्रीच्या अंधाराचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


आनंदाचे दोन क्षण ही,

पुरेसे आहेत जगण्याला..

तर मग उदासिनतेच्या,

क्षणांचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


मधुर आठवणींचे क्षण,

ईतके आहेत आयुष्यात..

तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


मिळाली आहेत फुले इथे,

कित्येक सहृदा कडुन..

मग काट्यांच्या टोचणीचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


चंद्राचा प्रकाश आहे,

जर ईतका आल्हाददायक..

तर त्या वर डाग आहे,

ह्याचा हिशोब काय ठेवायचा..!!


जर आठवणीनेच होत असेल,

मन प्रफुल्लित ..

तर भेटण्या न भेटण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


काही तरी नक्कीच..खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..

मग थोड्याशा वाईट पणाचा,

हिशोब काय ठेवायचा..!!

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..

सुरकुतलेला चेहरा माझा  

पिकलेली असेल दाढी,

ओढून ताढून बांधलेली 

पैजाम्याची ढिल्ली होईल नाडी.. 


सांग कौतुक करून मनापासून   

तेव्हाही हँडसम म्हणशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


सैल झालेला झंपर 

अंगावर नावाला असेल साडी,

तुझाच नसेल भरवसा तुला 

आधाराला हाती येईल छडी...


लाजत मुरडत माझ्यासमोर 

ठुमकत ठुमकत तरी चालशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


थकलेल्या खांद्यावरती माझ्या  

आयुष्य लादेल जेव्हा ओझं,

जिद्द वगैरे नावापुरतं  

जगणं होईल पुरतं खूज..


समाधान द्यायला माझ्या मनाला 

तेव्हाही मदत मागशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


गोळ्या शोधत धडपडत असतील 

थरथरणारे तुझे हात,

आजोबा पडले पाय घसरून 

निरोप आणेल जेव्हा नात...


आधार शोधत भिंतीचा मग  

याच त्वेषाने उठशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


तरुणपणाची सावली सरेल  

छळेल वार्धक्याचं ऊन,

केविलवाण्या चेहऱ्याने

पाहत राहील मुलगा सून...


गालात हसून आतासारखं

तेव्हाही सोबत चालशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना ?......💖

 एकदा एका बायकोने नवऱ्याला मेसेज केला :-


Yetana mazyasathi 5 gajare aanaa


नवरा 5 गाजरे घेऊन घरी गेला


बिचारा रात्रभर उपाशी राहिला😳😳, कारण बायकोला *गजरे* हवे होते, *गाजरे* नको होती


म्हणून मराठीतच टाइप करा😄😄

पढत मूर्ख

आठ वर्षांचा घेलाराम कच्छमधून बापाचे बोट धरून पुण्यात आला. बापाने किराणामालाच्या दुकानात नोकरी केली. हळूहळू घेलारामच्या बापाने स्वतःचे दुकान टाकले. दुकानाच्या मागेच राहायला लागले. दुकान बंद करताना गिऱ्हाईक आले तर पुन्हा दार उघडून त्याला माल देत. पुण्याच्या प्रसिद्ध पेठामधल्या पाट्या त्याच्या दुकानावर नव्हत्या. तसेच एक पैसा नफ्यावर ते धंदा करत. घेलाराम लहान वयातच दुकानावर बसायला लागला. कोणती गोष्ट केवढ्याला विकायची हे सांगून बाप माल आणायला, येणी वसूल करायला जायचा. पाढे पाठ करायला घेलारामला शाळेत जावे लागले नाही. दुकानाचा जम बसला. घेलारामच्या बापाने त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने करून दिली. घेलारामचेही लग्न कच्छमधील मुलगी पाहून करून दिले.


घेलारामच्या बरोबरीने त्याची नवपरिणित पत्नीही दुकानात पुड्या बांधू लागली. ही गोष्ट आहे 1955 सालामधली. घेलारामने दुकान आणखी वाढविले. दुकानामागची राहण्याची जागाही वाढवली. पैसा मिळाला आणि वाढला तरी त्याच्या गाठी मारलेले धोतर नवीन धोतरात बदलले नाही. घेलाराम घेलाशेठ झाला. दुकान उघडायची व बंद व्हायची वेळ कधीही बदलली नाही. तुफान पाऊस असो, कडाक्‍याची थंडी असो, सकाळी सात वाजता त्याचे दुकान उघडत असे. इतर लोक गाजावाजा करून जंक फूडचे स्टॉल टाकतात. सुरुवातीचा हुरूप संपल्यानंतर दुकानाच्या वेळा आकुंचन पावतात. खूप पाऊस असेल तर गिऱ्हाईक येणारच नाही अशा ठाम समजुतीने दुकान उघडले जात नाही. थंडीत दुकान लवकर बंद होते. असे होत होत दुकान दुसऱ्या कुणालातरी चालवायला दिले जाते.


वर्षांमागून वर्षे गेली. आसपासचा परिसर बदलला. घेलाशेठच्या दुकानाच्या आजूबाजूला त्याच्याच धंद्यातील इतर दुकाने आली. घेलाशेठ मजेत. माल कुठून, कसा स्वस्त मिळवायचा, त्याची प्रतवारी कशी करायची व तो कसा विकायचा हे ज्ञान घेलाशेठच्या मुठीत बंद होते.

घेलाशेठने त्याच्या मुलाला शाळेत घातले. मुलगा मॅट्रीकपर्यंत पोचला. नंतर दुकानावर आला. घेलाशेठचे समोर एकाने किराणामालाचे दुकान टाकले. घेलाशेठचा मुख्य धंदा तेल विक्रीचा होता; वाणसामान जोडधंदा. समोरच्याने दुकानाची भरपूर जाहिरात केली. दुकानाच्या ओपनिंगला घेलाशेठला बोलावले. ते आवर्जून गेले.


“”आओ, जी घेलाशेठ आओ” “”जय गोपाल हरिराम” “”मारो डिकरा बिझनेस मॅनेजमेंट की शिक्षा पुरी करके आयो” हरिरामचं पॉश कपड्यातलं शिक्षित पोरगं घेलाशेठकडे बेरकी नजरेनं पाहत होतं. हरिरामचे दुकान सुरू झाले आणि त्याच्या मुलाने दहा दिवसांत “प्राइस वॉर’ सुरू केले. घेलाशेठच्या दुकानात तेलाच्या भावाची पाटी होती “साठ रुपये किलो’. समोरच्या दुकानात पाटी लागली 58 रुपये. गिऱ्हाईकाला किमतीशी सोयसुतक असतं. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 58 रुपयांची पाटी लागली. जुने गिऱ्हाईक परत आले. काही दिवस गेले. समोरच्या दुकानात 55 रुपयांची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठचे दुकानातही 55 रुपयांची पाटी. लक्षण ठीक दिसत नव्हते. ही व्यापारी पद्धत नसते. हरिरामच्या दुकानात पन्नासची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 48 रुपयांची पाटी. घेलाशेठचं पोरगं गडबडलं.


“”बापू अपना धंदा बंद हो जायेगा” घेलाशेठने त्याला गप्प राहायला सांगितले. आता हरिरामची पाटी 45 वर आली. घेलाशेठने 40 ची पाटी लावली. पुन्हा हरिरामने 35 ची पाटी लावली. घेलाशेठचे गिऱ्हाईक तुटले. घेलाशेठ निवांत. पोरगं गडबडलेलं. हरिरामचे दुकान पंचक्रोशीत स्वस्त म्हणून रांगा लागल्या. चार महिन्यानंतर हरिरामच्या दुकानाचे दिवाळे निघाले. घेलारामने पुन्हा 60 रुपयांची पाटी लावली. हरिरामने त्याच्या बिझिनेस मॅनेजमेंटवाल्या मुलाला चांगलेच धारेवर धरले. बिनशिकलेल्या घेलाशेठने कोणाचा सल्ला घेतला हा विचार हरिरामला छळू लागला.


एक दिवस हरिराम घेलाशेठच्या दुकानावर आले. “”आओ, आओ भाई” व्यापारी चहा झाला. हरिरामने हळूच विषयाला हात घातला. “”थारो कन्सलटंट कौन छे, तू तो पढा लिखा नही” घेलाशेठ मिश्‍कील हसले. “”अरे हरिराम आपल्या धंद्यात आपला कन्सलटंट आपले जीवन असते.”

“”मी समजलो नाय.” “”अरे, तुझ्या पोराने आपल्या व्यापारी वर्गातल्या रितीला सोडून धंदा केला. तू भाव पाडले आणि वस्तू मूळ खरेदी किमतीपेक्षा कमी भावाने विकलेस मी फक्‍त पाटीवरचे भाव बदलले. पण…” “”पण काय शेठ?” हरिराम अधिर झाला. “”मी फक्‍त पाट्या कमी भावाच्या लावल्या. वस्तू विकलीच नाही. गिऱ्हाईक आले की, माझ्याकड नाही सांगून तुझ्याकडे पाठवले” हरिरामचं पोरगं अजूनही पुस्तक चाळतच बसलंय.

😊

 *पुणेरी डोके* 😊😄 

कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले *महाभारत* आणि *रामायण* मध्ये काय फरक आहे?

वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..

*महाभारत* मध्ये जमिनी बद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर *रामायण* मध्ये अपहरणची ( क्रिमिनल ) केस होती.

🤣😂

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,

तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..

*हरणा* चं *वस्त्र* बनवण्या वरून झाले ते *रामायण*

आणि

*वस्त्रा* चं *हरण* करण्या वरुन झालें ते *महाभारत*


😂🤣😂😂😂😂😂😃😃

 मी जेव्हा नववीत होतो तेव्हा ती आठवीत होती...


आता ती नवविवाहित आहे आणि मी तिला आठवीत आहे !!!

😁😁😁मराठी भाषा