✨ *अति लघु कथा*

✨ लघु कथा  - - १

*आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.*

✨ लघु कथा ..२.

*शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.*

✨ लघु कथा  - -३.

*आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.*

✨ लघु कथा  - - ४.

*आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.*

✨लघु कथा  - -५.

*ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.*

✨लघु कथा  - -६.

*वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय.*

✨लघु कथा  - -७.

*काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .*

✨लघु कथा  - -८.

*खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनीला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे , तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की .* *सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते.* 

  *रिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता.*

✨लघु कथा  - -९.

*तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये , तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच*

*5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त*  *बरा झाला की छानसी साडी घ्या.*

*त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.*

✨ लघु कथा  - -१०.

*आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने , स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.*

✨  लघु कथा  - -११.

 *तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.*

 चेष्टा नाही पण गोष्टीत दम आहे


सकाळी कामं संपवून कामवाली बाई संध्याकाळी आपल्या नवऱ्याला घेऊन घरी आली.

तिचा नवरा : मॅडम उद्या पासून माझी बायको इथं कामाला येणार नाही.


मॅडमने विचारलं : का?  पगार कमी पडतो.  ठीक आहे तिसरा महिना संपल्यावर वाढवून देईन 

तिचा नवरा : मॅडम पगार बद्दल नाही, प्रॉब्लेम वेगळाच आहे.


मॅडम : काय प्रॉब्लेम सांगा मी दोन मिनिटात  सोडवते 

तिचा नवरा: मॅडम प्रॉब्लेम दोन मिनिटात सुटण्या सारखा नाही आहे, तुम्ही दुसरीकडे कामवाली बघा 


मॅडम जरा चरकली. तरी पण उसन्या अवसानानं तिनं विचारलं: प्रॉब्लेम काय आहे ते मला समजलंच पाहिजे. ते सांगितल्या शिवाय मी तिला कामं सोडायला देणार नाही म्हणजे नाही.  सांग काय प्रॉब्लेम आहे?  मॅडमने अल्टिमेटम दिलं.

तिचा नवरा : मॅडम तुम्ही दिवसभर तुमच्या नवऱ्याला ओरडत असता. टोमणे मारत असता.

घालून पाडून बोलत असता. वरून,

घरातली शंभर कामं त्यालाच सांगत असता....

हे सगळं बघून ही पण तसंच शिकायला लागलीय....


तुमच्या साहेबांच्या येवढी माझी सहन शक्ती नाही. माझ्या घरात मला शांतता पाहिजे, डोक्याला शॉट नको.

ऐकून मॅडमची जीभ टाळूला जाऊन लागली धप्प करून डोक्याला हात लावून सोफ्यावर बसली.


मॅडम: हे पहा. महिनाभर करुदे काम तिला. सुधारणा दिसली नाही तर पाहू.


कामवालीचा नवरा तयार झाला आणि परतला.


ॲाफिस मधून येता येताच साहेबांनी एक खंबा आणि पाचशे रूपये, कामवाल्या बाईच्या नवऱ्याला दिले....


🤣🤣🤣🤣🤣🤣

 🤣🤣🤣🤣🤣🤣🤦‍♂️🤦‍♂️


*तीन महिने दररोज 10 किलोमीटर सायकल वर फिरुन झाले पण वजन काही कमी झालेच नाही*


*_मला आता वाटायला लागलंय की_*................





*नुसतं मागे बसून भागणार नाही ,  सायकल स्वतः चालवावीच लागेल*


😂😂😂😂😂😂😂

 *_व पु एक विचार_* 


माणसं मनातली......


मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.


काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.

तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...


चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...


शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...


शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.

माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...


म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...


आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!


आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.


आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?

नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

 

 कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?


✍️व.पु.काळे

 सासू : सुनबाई हात मोकळे...

चांगलं नाही वाटत...


सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई...


सासू : अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे।  🤦🏻‍♂



🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

 एक पुरुष बसमध्ये एका सुंदर महिलेच्या शेजारी बसला होता.


बोलायला विषय हवा म्हणून त्यानं तिच्या परफ्युमच्या सुगंधाचं कौतुक सुरू केलं..


'तुम्ही लावलेल्या परफ्युमचा सुगंध अतिशय छान आहे. मला त्याचं नाव समजेल का..? मला तो माझ्या पत्नीला गिफ्ट देता येईल'


ती सुंदर महिला या पुरुषापेक्षा हुशार निघाली. तिनं लगेचच उत्तर दिलं.


'हा परफ्युम तुम्ही तुमच्या पत्नीला अजिबात देऊ नका..

अन्यथा काही चालू पुरुषांना तिच्याशी संवाद साधण्याचा बहाणा मिळेल..'


🙆‍♂😅😂😃😜😝🤦‍♂️🥳

 बायको – नेहमी माझं अर्ध डोकं दुखत असते…. डॉक्टरांना दाखवावं म्हणतेय.




नवरा – त्यात काय डॉक्टरांना दाखवायचं? जितकं आहे तितकेच दुखणार ना?


 


तेव्हापासून नवऱ्याचं सगळं अंग दुखतेय….🤕😂🤣🤣

 मी बायकोला म्हणालो ,,,  तिळगुळ घ्या गोडगोड बोला   तर म्हणते


ह्यांच आपलं काहीतरीच .... 😊😊😊


म्हणे *तिळगुळ घ्या गोडगोड बोला* 😢


तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....

😆😆😆

 😀  मालवणी तडका 😀


बाई : अरे एवढे दिवस खय होतस रे शाळेत नाय इलस तो?


पक्या : बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना ! म्हणून मी इलय नाय शाळेत.


बाई : पण यो तं पक्ष्यांका होता ना, तुका कसो झालो रे?


पक्या : गे तु कधी माका माणसात मोजलस ? बगुचा तेव्हा माका कोंबडो  बनवुन बाहेर उभी करतस.. 


🐔🐔

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.


घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."ब्राह्मण "हो" म्हणाला.ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.


*भोजनांते तक्रं पिबेत*  

*अस म्हणतात.नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."तिने शेजारणीला ताक मागीतले ,शेजारणीने भांडभर ताक दिलेआजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.ब्राह्मण तडकाफडकी मेला.*

    *चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.*

*म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.*

*शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.*

      *यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.*

     *प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?*

     *चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.*

 *हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"*

       *तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."*

            *चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.*

        *थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.*

       *म्हणून आजचा सुबोध दिला आहे.प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.*


 *तात्पर्य - जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*

♦️ मनाची अवस्था ♦️

एकदा  धनाढ्य व्यक्तीने एका गुरुजींना  निमंत्रित केले परंतु एकादशीचा उपवास होता म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत परंतु गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्ती कडे भोजन करण्यासाठी पाठवून दिले.


परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता.


गुरुजींना त्यांना बघून  आश्चर्य वाटले म्हणून गुरुजींनी एका शिष्याला विचारले,"बाळा दुःखी का आहेस. मालकाने भोजनात काही फरक केला का ?"


"नाही गुरुजी"


मालकाने बसण्यात फरक केला का ?


"नाही गुरुजी"


मालकाने दक्षिणेमध्ये फरक केला का ?


"नाही गुरुजी, दक्षिणा बरोबर २ रुपये मला व  आणि २ रुपये दुसऱ्याला " दिली


आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य झाले आणि विचारले मग कारण काय आहे ? जो तू दुःखी आहेस ?


तेव्हा दुःखी शिष्य बोलला, "गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे. कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल  परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे.


गुरुजींनी  दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस ?


तेव्हा दुसरा म्हणाला, गुरुजी मला माहित होते की ती धनाढ्य व्यक्ती खुप कंजूष  आहे. आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी प्रसन्न आहे.


हीच आपल्या मनाची अवस्था आहे. संसारात घटना या समान रुपी घडतात परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात तर कोणी दुःखी होते. परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे!

 एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटतात.

.

ते सर्वजण आपल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत असतात आणि भरपूर पैसे कमावत असतात.

.

एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर ते त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवतात.

.

प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर ते प्रोफेसर त्या सर्वांचे स्वागत करतात आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारतात.

.

हळुहळूगप्पा रंगतात आणि त्यादरम्यान ते जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करतात.

.

सर्वजण या मुद्दयाशी सहमत असतात की,जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.

.

ते प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत असतात...

.

आणि मग ते अचानक किचनमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणतात की,

.

मी सर्वांसाठी कॉफी आणली आहे पण तुम्ही किचनमध्ये जाऊन एक-एक कप स्वतःसाठी घेऊन या...

.

सर्वजण किचनमध्ये जातात.तिथे अनेक प्रकारचे कप असतात.

.

आपल्या आवडीप्रमाणे ते सर्वजण कप घेऊन येतात.

.

मग ते प्रोफेसर कॉफी येतात आणि म्हणतात की,

.

"तुम्ही सर्वांनी  जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे  म्हणून निवडला.... आणि.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षच दिले नाही.

.

जेव्हा एकीकडे आपण स्वतःसाठी चांगली इच्छा मनात ठेवतो तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते.

.

हे तर निश्चित आहे की,

कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाही.हा तर एक प्रकार आहे की,ज्याच्या माध्यमामधुन आपण कॉफी पित असतो.

.

तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती,

कपाची नाही.

तरीपण सर्वांनी महागातले महागच कप निवडले.

आणि आपला कप निवडल्या नंतर तुम्ही

दुसऱ्‍यांच्या कपाकडेच लक्ष दिले.

.

सर्वांनी जरी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती ,ती एकच रहाते !

.

तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.

....आपली नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.

.

म्हणून चांगल्या कॉफीची चिंता करा...भारी कपाची नाही.

.

जगातील सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं ......तर...... ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात व आहे त्यामध्ये आनंदी रहातात...!

.

म्हणून साधेपणाने जगा.

सर्वांशी प्रेमाने वागा.

सर्वांची काळजी घ्या.

सर्वांशी नेहमी संपर्कात रहा व शक्य असल्यास प्रत्येक्ष भेटा

शासन निर्णय

शासन :- मांजराला तिखट खायला लावायचे आहे.....
तत्काळ प्रस्ताव सादर करावा.

तहसील :- मांजराची मानगूट पकडून त्याचे तोंड उघडून त्यात तिखट कोंबायचे, की झाले.😀..

शासन :- याला म्हणतात "जबरदस्ती"

उपविभाग :- माशाच्या पोटात तिखट घालून तो मासा मांजराला खायला लावायचा, हे उचित होईल असे वाटते. 😀

शासन :- याला म्हणतात "फसवणूक"

सर्कल :- प्रथम विहित निविदा प्रक्रियेद्वारे उत्तम गुणवत्तेचे तिखट उपलब्ध करून घ्यावे. नंतर ते भरपूर प्रमाणात मांजराच्या शेपटीला चोळावे. काही कालावधी नंतर त्याच्या शेपटीची आग होऊ लागेल व मांजर स्वेच्छेने शेपटी चाटण्याचा विकल्प सादर करील......

शासन :- याला म्हणतात " शासन निर्णय".

ClBIL SCORE काय असतो

*सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?*

बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .


1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit) 


2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit) 


या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .


पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .


जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .


आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून 


या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .


*Credit Information Bureau Ltd.*


 या कंपनीची  स्थापना झाली.


आज या कंपनीचे नाव *TransUnion CIBIL Ltd* असे आहे.


ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे.


आणि यावर *RBI* ची मॉनीटरींग आहे.


समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला.


तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या ! 


आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? 


तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा *CIBIL* रिपोर्ट मागावते.


आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा *CIBIL* स्कोर चेक करते ? 


जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़. 


CIBIL स्कोर हा 


300- - - -- - - ते -- -- -- --900 


मध्ये मोजला जातो.


जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल.


पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! 


कर्ज मिळतच नाही.


म्हणजे समजलं ! 


कि बँका कर्ज  देणे का नाकारतात ? 


तर CIBIL Score नीट नसतो.


*CIBIL Score कमी का होतो ?*


1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे.


2) कर्जाची परतफेडच न करणे.


3) चेक बाऊन्स होणे 


4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 


5) स्वतःवर असणारे कर्ज *NPA* मध्ये जाऊ देणे 


6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.


यामुळे *CIBIL score* वर वाईट परिणाम होतात.


बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.


याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण  बँकांना मूर्ख बनवू शकत नाही


बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट  योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.


तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Score सुधारेल ?


1) *EMI* वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका.


2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट ) 


3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा.


4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या.


5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही.


6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा.


CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे  म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन  सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.


या मध्ये 


NA - No Activity.


NH - No History. 


असे पर्याय दिसू शकतात .

*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल 

इतकं जवळ जाऊ नये


चांगुलपणाचे ओझे वाटेल

इतके चांगले वागू नये


कुणाला गरज नसेल आपली

तिथे रेंगाळत राहू नये


नशीबाने जुळलेली नाती जपावी 

पण स्वतःहून तोडू नये


गोड बोलणे गोड वागणे

कुणास अवघड वाटू नये


जवळपणाचे बंधन होईल

इतके जवळचे होऊच नये


सहजच विसरून जावे सारे

सल मनात जपू नये


नकोसे होऊ आपण

इतके आयुष्य जगूच नये


हवे हवेसे असतो तेव्हाच

पटकन दूर निघून जावे

आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी

राहील इतकेच करून जावे.


*कारण*

जीवनाच्या वाटेवर 

साथ देतात,

मात करतात,

हात देतात,

घात करतात,

ती ही असतात..... *माणसं !*


संधी देतात,

संधी साधतात,

आदर करतात,

भाव खातात

ती ही असतात..... *माणसं !*


वेडं लावतात, 

वेडं ही करतात,

घास भरवतात,

घास हिरावतात

ती ही असतात..... *माणसं !*


पाठीशी असतात, 

पाठ फिरवतात,

वाट दाखवतात , 

वाट लावतात

ती ही असतात..... *माणसं !*


शब्द पाळतात, 

शब्द फिरवतात,

गळ्यात पडतात, 

गळा कापतात

ती ही असतात ...... *माणसं !*


दूर राहतात, 

तरी जवळचीच वाटतात,

जवळ राहून देखील, 

परक्यासारखी वागतात

ती ही असतात ...... *माणसं !*


नाना प्रकारची अशी 

नाना माणसं,

ओळखायची कशी 

*सारी असतात आपलीच माणसं !*🙏

 मुलगा – बाबा, आई कुठे गेली आहे.?


वडील – ईश्वरीय रचना फेरफार केंद्रात.!


मुलगा –  सत्संगाशी संबंधित काही विषय आहे का.?


वडील – नाही, ब्यूटीपार्लर आहे.!


😆😆

उसळ-चपाती: - भीमसेन जोशी

*एकदा भीमसेन जोशी (अण्णा)  गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.*


*तेवढ्यात अण्णा म्हणाले, "आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या..!"*


*रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली.*


*अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा..!*


*अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, 'काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..' अण्णा कानडीतनं बोलत होते.* 


*रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर  अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..*


*साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -*


*"इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.*


*स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली".*


*"उसळ-चपाती पाहिजे काय?", असं  तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.*


*रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"*


*"घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"*


*"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.*


*रामण्णा म्हणायचा, "तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?"*


*रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..*


*रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.*

*भाषेची अशीही गंमत*

खूप खटपटी केल्यानंतर बँकेकडून मला एकदाचे लोन मंजूर झालं.

 मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला.


मी डीडी घेताना कृतज्ञतेनं आभार मानत  त्यांना म्हटलं: "तुमचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही."


झाले, माझ्या हातातला डीडी त्यानं चक्क हिसकावून घेतला !


😂

*" चिटी  चावल  ले  चली,*

*बीच  में  मिल  गई  दाल।*

*कहे  कबीर  दो  ना  मिले,*

*इक ले , इक डाल॥"* 👌🏻


अर्थात : 


"मुंगी "तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.


तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'


तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.


माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात. 


साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, 'इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.'


विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण /शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.


ती बघून, 'घेशील किती दोन करांनी'  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांना हाकायला खूप सोपी पडतात. 


पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)


आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.


भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. *नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.*


देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर *एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं,* यासाठी आहेत. *नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.*


म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे "समतोल" तर टिकून राहतोच, माणसाचं "समाधान आणि आनंद"ही त्यामुळे टिकावू बनतो. 

*कबीरांच्या या दोह्यात असा मोठा "अर्थ "दडला आहे.*

*चला तर मग आनंदी जगुया....*

डिडरोट इफेक्ट

*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*

*रशियात डेनिस डिडरोट* नावाचा एक अभ्यासू वाचक होता. *इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष* होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. *त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय* होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी *रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या* गरीबीबद्दल कळले. तिने *डिडरोटला* त्याच्याकडील *लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला* देऊ केले. *डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले*.

*डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला*. त्याने त्या पैशातून लगेच *'स्कार्लेट रॉब'*;  म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच *मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect)* म्हणतात. 

*भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण *महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार*. 

घरात *मोठा टी.व्ही*. आणला की *चांगला टेबल, फर्निचर,टाटा स्काय, HD वाहिन्या सुरु करणार*. घराला *नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार*.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी  आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात *'डिडरोट इफेक्ट'* 

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

*सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने वापर करतात. 

एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. *कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत* माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

*आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी*. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच *'spiraling consumption'* म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) होय. ही सामान्य *मानवी प्रवृत्ती* (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण *नकळतपणे अनावश्यक खर्च* करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात. 

माणसाला *खर्च करताना भीती वाटत नाही*; पण नंतर *हिशोब लागत नाही*; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; *या वस्तूची मला कितपत गरज आहे?* असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं *उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा*. असा निर्णय घेतल्यावर त्या *वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां*? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. 

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. 


संदर्भ : डिडरोट इफेक्ट