भांजा – भतीजांना चिकटवून वशिलेबाजी करणे, लिंकनला अगदी नापसंत असे. तरी त्याचे नातेवाईक, गाववाले अनेकदा त्याला गराडा घालीत आणि आपली वर्णी लावण्यासाठी तगादे लावीत. त्या सर्वांना थोडा वेळ बसायला सांगून एकदा लिंकन म्हणाला, ‘मी तुम्हांला आधी एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी सगळे प्राणी आळीपाळीने एकेकाला आपला राजा करीत. होता होता गाढवाची पाळी आली. गाढवाचे भाईबंद आपल्याला अधिकार मिळावा म्हणून एकच हाकाटी करू लागले. तेव्हापासून जगात तीच पद्धत पडली. आजही त्याचेच भाईबंद हक्कानं वशिला लावायला येतात.’

 एकदा लिंकन आपल्या बुटांना पॉलिश करीत बसला असता, एक घमेंडखोर ब्रिटिश वकील तिथे आला आणि त्याने तुच्छतेने लिंकनला विचारलं – ‘काय प्रेसिडेंटसाहेब, तुम्ही तुमच्या बुटांना पॉलिश करता?’ त्याची टवाळखोरी आपल्या लक्षात न आल्याचा बहाणा करून लिंकन म्हणाला, ‘होय महाराज, मी माझ्या बुटांना पॉलिश करतो. आपण कुणाच्या बुटांना पॉलिश करता?’

अनर्थ - अच्युत गोडबोले

1. शेतीचा पाया भक्कम झाल्यावर उद्योगधंद्यांत वाढ होणं आणि उद्योगधंद्यांचा पाया भक्कम झाल्यानंतर सेवाक्षेत्र वाढीला लागणं ही नैसर्गिकरीत्या सुदृढ आणि टिकाऊ प्रक्रिया असते.


2. शेतीतल्या 1% वाढीमुळे जे दारिद्र्यनिर्मूलन होतं, तेवढं दारिद्र्यनिर्मूलन व्हायला इतर क्षेत्रांमध्ये 2-3% वाढ व्हावी लागते.

3. जेव्हा जीडीपी ओळीनं 6 महिने कमी होतो, तेव्हा त्याला ‘मंदी’ असं म्हणतात.

4. अमेरिकेत बीफला खूप मागणी आहे. तिथे हॅम्बर्गर सर्वात प्रिय आहे. त्यासाठी लाखो जनावरांना कमीतकमी 18 महिने खाऊ-पिऊ घालावं लागतं. त्यांना चरण्यासाठी आणि त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी जमीन मिळावी म्हणून अ‍ॅमेझोनमध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाली; आणि त्याचा पर्यावरणावर खूपच वाईट परिणाम होतो. म्हणूनच अमेरिकेत बीफ तयार न करता ते ब्राझील आणि इतर देशांमधून आयात केलं जातं. पण या प्रकारामुळे अ‍ॅमेझोनमधली लाखो हेक्टर सदारहित जंगलं नष्ट झाली आहेत. म्हणूनच याला ‘हॅम्बर्गर इफेक्ट’ म्हणतात.

5. प्रत्येक गोष्ट देवाच्या कृपेनं होत नसून त्यासाठी वैज्ञानिक कारण असतं आणि आपण ते शोधून काढलं पाहिजे, ही संशोधक वृत्ती आणि आपलं कुतूहलच तरुणपणापासूनच मारलं जात असेल तर काय करणार?

6. आर्थिक सल्लागार अरविंद पानिग्रहिया यांनी लिहिलेल्या लेखाप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. (22 लाख डॉलर्स) गुंतवले तर त्यामुळे फक्त 1 रोजगार निर्माण होतो. याउलट बंगलोरमधल्या श्लोक इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. गुंतवले तर 266 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे चक्क 266 पट!! थोडक्यात आपण यांत्रिकीकरण किती वापरतो, त्यावर रोजगार कसा अवलंबून असतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

7. प्रत्यक्ष किंवा थेट (डायरेक्ट) करांचे दर वाढवणं, वेल्थ आणि वारसाहक्काची संपत्ती यावर कर लावणं, कॉर्पोरेटस्ना करमाफी/करसवलती न देणं, टॅक्स हेवन्सवर नियंत्रण ठेवणं आणि काळा पैसा बाहेर काढणं या पाचही गोष्टींचा विचार केला, तर सरकारला जीडीपीच्या साधारणपणे कमीतकमी 20% जास्तीचं उत्पन्न दरवर्षी मिळू शकेल. तसं झालं; तर पुढची अनेक वर्षं शिक्षण, आरोग्य, पेन्शन, स्वस्त घरं, रोजगार, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज, टॉयलेटस् अशा अनेक कल्याणकारी गोष्टींवर डेफिसिट न वाढवता भरपूर खर्च करता येईल.

8. जीडीपीच्या मोजमापात कित्येक गोष्टी झाकल्या जातात. उदाहरणार्थ, समाजातली विषमता जीडीपीच्या आकड्यात दिसून येत नाही. प्रचंड विषमता असली, तरी गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या उत्पन्नांची जीडीपीमध्ये बेरीज केलेली असल्यामुळे राष्ट्रातली बहुतांशी जनता गरीब असली, तरी राष्ट्राचा जीडीपी मोठा असू शकतो. तसंच जीडीपीवरून राष्ट्रातलं शिक्षण, आरोग्य आणि एकूणच लोकांसाठीच्या सोयी, सुविधा, त्यांचं संगोपन, त्यांचं समाधान आणि त्यांचा आनंद यांच्याविषयी काहीच कल्पना येत नाही.

व पु काळे

 1. भावनाधीन होऊन चालत नाही. माणसानं विवेक धरावा, व्यवहारी बनावं. भावना फार काळ उपयोगी पडत नाहीत ह्या जगात.’


2. भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नाला जाग हवी.

3. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दु:खी होत नाही आणि पुष्कळदा स्वत:ला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवयीनं सुखी झालेली असतात. काही ठराविक गोष्टींचा लाभ होणारी, जशी शेकडा नव्वद टक्के माणसे असतात, त्यांचे संसार चालतात, त्यांच्यात व आपल्यात फरक नाही, ही जाणीव असणं, ह्यानंच कैक लोक स्वत: सुखी आहोत असं मानतात.

4. मानसिक अस्वास्थ्य हे प्रत्यक्ष भोगत असताना जाणवत नाही; तर त्याचा लोप झाल्यावरच, त्या औदासीन्याचा आपल्यावर केवढा पगडा बसला होता हे जाणवतं!

5. मुलं मोठी झाली की दुरावली. जोपर्यंत ती परावलंबी असतात तोवर ती आईवडिलांची असतात.

6. जी जागा आपल्याला खूप सुरक्षित वाटते तीच गोत्यात आणते.

7. उत्तरं मिळवायची असली की पाठ फिरवल्यानं ती मिळत नाहीत, परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात

8. असामान्य समस्या, असामान्य उपायांनी सुटतात.

9. एखाद्या गोष्टीचा काही विशिष्ट अर्थ आपल्या मनात असला की इतर सगळीजणं त्याच अर्थानं त्या गोष्टीकडे पाहात आहेत की काय असली शंका यायला लागते.

10. उत्तम स्मरणशक्ती असणं हा केव्हा केव्हा शापच! सगळं कसं वैशाखातल्या उन्हासारखं लख्ख आठवतं.

11. तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणजे बिघडला

12. पुरुष ही परमेश्वराची शक्ती, तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती

13. स्वास्थ्यापेक्षा आपत्तीच माणसाला अंतर्मुख बनवते, क्रियाशील करते.

तू भ्रमत आहासी वाया - वपू काळे

1. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.


2. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही

3. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.

4. सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.

5. प्रियकर परिपूर्ण असतो. नवऱ्याला मार्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. ‘मी’ उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’ ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.

6. प्रचिती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.

7. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित् लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.

8. रडताना कुणी फोटो काढत नाहीत. रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.

9. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी.

10. ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्‌भवत नाही

11. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो

12. ज्ञानी माणूस हयात असतो, तोपर्यंत तो धोकादायकच असतो. तो ढोंगांवर प्रहार करत राहतो. तो गेल्यावर त्याच्यापासून कसलाच वैचारिक उपद्रव नाही. मग त्याच्या आरत्या गायच्या, अभंग म्हणायचे, शेवटी पुतळे उभे करायचे. ज्ञानी माणसांना त्यांच्या हयातीत आणि मेल्यावरही कावळ्यांच्याच सहवासात राहावं लागतं. जिवंतपणी चोचा मारणारी माणसं आणि पुतळ्यांच्या नशिबी...

13. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकं खोटं बोलतात की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. अशी माणसं सतत मग तणावाखाली वावरतात.

14. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशोब नसतो, विचार नसतो, संयम नसतो, तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथं किनारे हरवतात. जिथं तर्क आहे, तिथं स्वतःचा बचाव आला.

15. वस्तुत्त्वानं असणं आणि अस्तित्त्वानं असणं ह्यात फरक आहे.

16. ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तुपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते.

17. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो. कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो, तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाह्यजे.

18. वस्तू वापरण्यापेक्षा, ती आपल्यापाशी आहे, ह्याचाच आनंद.

19. सर्वात मोठा धर्म कोणता ? -तर ‘प्राण आहे तोपर्यंत जगणं’ हाच धर्म मोठा.

20. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो, ह्याचं कारण काय ? -तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम. पार केलेलं दु:खही आठवत बसायचं

21. जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.

 नातरीं येथिचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।

 तो तेथें तरी पाडवा । दीपचि कीं ।।

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसऱ्या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म आहे. चहुकडे केवळ प्रकाशच देणारा जसा दिवा असतो

गुलमोहर - व पु काळे

1. आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही हेवा वाटावा इतरांना – आणि व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये – चांगलं दोनशे फुटांवरून पडावं. माणूस किती उंचीवर पोहचला होता ते तरी जगाला कळेल


2. प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.

3. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

4. पहिलं दु:ख येतं ते डोळ्यांवाटे. पहिला मोह नजरेचा. ही नजर एकदा बिघडली की माणूस बिघडला

5. बाह्य जगावर, सजावटीवर भुललेला माणूस स्वत:त डोकावून पाहूच शकत नाही. पापमार्गाकडे वेगाने नेते ती दृष्टी.

6. आपली सतत कीव केली जाते यासारखी दु:खदायक गोष्ट नाही.

7. पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.

8. चोरांना, दरोडेखोरांना किंवा खुन्यांना, एवढं माहीत असतं की देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही. तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काय भीती आहे ती माणसाची माणसाला. माणूसच माणसाला केव्हातरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं.

9. अनोळखी माणसंच ओळखीची होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न विचारून केव्हा केव्हा बेजार करतात.

10. देवाला दु:ख म्हणजे काय हे कळलं असतं तर त्यानं ते निर्माणच होऊ दिलं नसतं.

11. आपण वाहतो म्हणून ढग हालचाल करतात, समुद्रावर लाटा येतात, वणवा भडकतो, पाचोळा उडतो, त्याची जाणीव वाऱ्याला नसेल का? तो वाहतोच.

12. पळून जाणं एकदम सोपं. तेव्हा ते केव्हाही करता येतं. पळण्याची वाट केव्हाही हाताशी आहे हे गृहीत धर आणि परत आपल्या घरी जा. आधी जे अवघड आहे ते सोडवायचा प्रयत्न कर. कारण सोपी गोष्ट आपल्या मालकीची आहे

13. खरं प्रेम कमी पडतं; पण खोट्या प्रेमाला तूट पडायचं कारणच नव्हतं. अभिनयच करायचा हेच जिथं ठरवलेलं तेव्हा कमी पडायचं कारणच नव्हतं.

14. आजारी माणसाच्या बुद्धीवर ताबा असतो तो त्रासलेल्या शरीराचा. आजारपणातले माणसाचे निर्णय कधीच व्यवहार्य नसतात.

15. प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण फक्त स्टेशनपर्यंतच पोचवतो. पुढचा प्रवास त्यालाच करावा लागतो.

16. स्वत:च्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं.

17. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात.

18. जोडीदाराची निवड कानांनी करावी, डोळ्यांनी करू नये.

19. प्रेमाच्या राज्यात माणूस कधीच मोठा-वयस्कर होत नाही.

20. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वत:ला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

21. अति ऊ-तिला खाज नाही आणि अति ऋण त्याला लाज नाही.

22. मासळी आणि पाहुणा कितीही चांगला असला तरी तीन दिवसांनंतर वास मारू लागतात.

 चोखाळपण रत्नांचे । रत्नावरी किरणांचे ।

 तैसे पुढा मन जयाचें । करणें पाठी ।।

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रत्नाचे शुद्धपण जे असते तेच फार वेधक असते. त्यावर किरण पडल्यावर त्या शुद्धपणाला झळाळी प्राप्त होते. ती रत्नाची आभा अधिक चोखळ होते. अगदी तसेच काहींचे मन असते. शुद्ध, स्फटिकासारखे स्वच्छ आणि पारदर्शक, ते मन सतत प्रकाशत रहाते त्या रत्नासारखे. त्याची स्वयंप्रकाशी झळाळणारी कृती मग मागोमाग उमटतेच. पण प्रकाशाचा मार्ग ते रत्न पहिल्यांदा दाखवते.

 जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । 

तैसा सर्वस्वे जो मज भजें । तो मी होऊनि ठाकी ।।

दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवरचा पहिला कोणता तेच लक्षात येईनासे होते. तसे कृष्णभक्तीत सर्वस्वाने बुडून गेलेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.

 सुखी संतोषा न यावें । दुःखी विषादां न भजावे ।

 आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ।

सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये की दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये. मनातल्या अंतर्मनातसुद्धा लाभ आणि हानी यांची चित्रे उमटू देऊ नयेत,

वपू 85

1. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

2. जिथं आव्हान असतं, तिथंच ताजेपणा असतो.

3. भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असतात. म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्यानं होणाऱ्या अपमानांची शल्यं बोथट होतात.

4. स्वप्नं आपली काळजी घेतात. आपणही त्यांची देखभाल करायची असते.

5. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्यानं एकदा स्वतःची गती घेतली, की उरलेला प्रवास आपोआप होतो. तसंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात, की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

6. जी माणसं जाणिवेनं जगतात, ती नुसतीच दुःखाची कारणमीमांसा शोधून थांबत नाहीत, तर एखाद्या सौख्याचेही आपण भागीदार का झालो, याचाही ते वेध घेतात. अशी माणसं, ज्या सुखाला आपण पात्र नाही, त्याकडे पाठ फिरवतात. कधी-कधी.

7. सिंहगड पाहायचा असेल, तर तो पायी चढत चढतच बघायला हवा. मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टरमधून उतरलात, की विज्ञानाचा चमत्कार समजतो, इतिहास समजत नाही.

8. व्यक्तींच्या वृत्ती वास्तूंना व्यापून उरतात. काही काही वास्तू ‘याच’ म्हणतात. काही काही ‘यायचं असेल, तर या’ इथपासून ‘नाही आलात, तरी चालेल’ इथपर्यंत सगळं सांगतात.

9. प्रारंभासाठी सगुण-साकाराची ओढ ही महत्त्वाची बाब आहे; पण कितीही देखणेपणा-देखणेपणा म्हटलं, तरी त्याला सगुण-साकाराच्याच मर्यादा छळतात. नावीन्य आणि परिचय या दोन अवस्था एकमेकांच्या वैरिणी! मोर अधूनमधूनच, केव्हातरी दिसतो, म्हणून जास्त आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणे वाटतात, म्हणून; वृत्ती जुळतात, म्हणून! मैत्रीची वीण जास्त पक्की होते, ती वेदना आणि संवेदना एकच होतात; म्हणून! नावीन्याची ओढ ही एक सहजावस्था आहे.

10. पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते, हा बायकांचा चुकीचा समज आहे. आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत.

11. अर्थात परमेश्वराचं देणं असंच असतं. मोजमाप नाही, हिशेब नाही.

12. किंमत मोजल्यावरच एखाद्या गोष्टीचा लाभ होतो, असा दृष्टिकोन ठेवला, तर सौख्याला कडकडून भिडता येतं.7

13. फुप्फुसं तुडुंब होईतो प्राणवायू घेता येणं हे जगातलं सर्वश्रेष्ठ असं, इंद्रपदापेक्षा श्रेष्ठ सौख्य आहे

14. जे अमूर्त आहे, त्याला मूर्त करू नये. जे अमूर्त आहे, ते निराकार आहे. जे निराकार असतं, ते अनंत असतं. विश्व व्यापून उरतं. स्वप्नं तशीच असतात. ती तशीच ठेवा. तुम्ही स्वप्नांची छायाचित्रं बनवलीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत. छायाचित्रं सप्तरंगात कोंडता येतात. रंगांनी ओथंबलेली छायाचित्रं थोड्याच वेळात जुनी का वाटतात? आणि स्वप्नं कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो. त्याचं नाव अंतरंग. तुम्ही तुमची स्वप्नदृष्टी चौकटीत बांधायला निघालात, मग कोंडमारा का होणार नाही

15. प्रत्येकानं काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरीरानं जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे, ती सातत्यानं प्राणवायूच्या शोधात असते. पण तरीही, आपण घेतलेल्या वेडाला, कुणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे, असं म्हणावं, ही इच्छा असते. अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेनं चालू असतो.

16. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणेच कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, याचं उत्तर पण नियतीजवळच असतं.

17. कोर्टात न्याय मिळत नसून, कोर्टात जे मिळतं, त्याला न्याय म्हणावा लागतो.

18. वेगवेगळ्या मुखवट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो. सुख, शांती, समाधान या स्वयंप्रकाशित गोष्टी असतात. तृप्त माणसाला नैराश्याचा आव आणताच येत नाही.

19. गणित येत नसलं की त्याची भीती वाटते. मग घड्याळाचीही दहशत वाटते. कारण काळवेळाचं भान म्हणजेच गणित! पण आकडेमोडीतली गंमत कळायला लागली की गणित हा खेळ होतो. माझ्या मुलांना मी आयुष्य खेळायचं कसं हे पटवलं.

20. कारण सांगूच नका, सगळी गंमत निघून जाईल. पृथक्करणाच्या पलीकडे काही आनंद असावेत.

21. जाब न विचारणारी एक जागा प्रत्येक कर्तबगार व्यक्तीला हवी असते.

22. रंगलेल्या गप्पा संपल्या, की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरू करण्यात आणखी एक आनंद असतो. गप्पा चालू असताना शब्दाधीन असलेला आनंद मिळवायचा असतो, तर नंतरच्या स्वगत मैफलीत शब्दातीत आनंद शोधायचा असतो. पहिल्या मैफलीत नाद असतो तर दुसऱ्यात गंध!

23. आपलं आयुष्य, आपणच त्याचे साक्षी होऊन बघायचं असतं

24. पूजेला काहीही चालतं, याचा अर्थच हा, की धर्म सांगतो, साधनांसाठी थांबून राहू नकोस. कार्य करीत राहा. तो वरचा, आकाशातला बाप तर तुमच्याकडे काहीच मागत नाही. बाजारातून एकूणएक वस्तू जरी गायब झाल्या, तरी आपल्या धर्मात पूजाअर्चा होऊ शकते. दोन हात आणि एक मस्तक तर नाहीसं होत नाही ना?

25. जे आहे, ते लपत नाही. जे मुळातच नसतं, ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शब्द तिथं कमी पडतात.

26. प्रेमाची भावना ही इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे की, नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.

27. माणूस तसा हा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्त्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.

28. सांत्वनाच्या भाबड्या शब्दांच्या आधारापेक्षा एक नवी विचारांची दिशा जास्त धीर देते

29. रडण्याचं नातं दुबळेपणाशी जोडण्यात काही अर्थ नाही. रडण्यात कृतज्ञता असते.

30. कोणतीही संस्था प्रामाणिक व स्वाभिमानी सेवकांच्या जिवावरच चालते. पदाधिकाऱ्यांना मात्र तोंडपुजे लोक हवे असतात.

31. आपलं सामान काही काळच दुसरा माणूस उचलतो, हेच खरं! ओझं त्याच्या हातात, पण दडपण आपल्यावर!

32. ज्याच्यामागे चिकार कामं असतात, तोच आणखी काम घेऊ शकतो, कारण त्याला पहिली कामं संपवावी लागतात.

33. जो नवा विचार देतो, तो गुरू!

34. प्रेमाचा उत्स्फूर्त पुकार हा एकेरीच असतो.

35. प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं. अर्पणभावाचा कोंब त्याशिवाय फुटत नाही. देतं कोण, घेतं कोण, हा उखाणा न सुटण्यातच समागमाची लज्जत असते.

36. वर्तमानकाळ मानणारा माणूस अत्यंत अमानुष होतो, असा मला अनुभव येत होता. कारण या माणसाच्या गरजा क्षणांशी निगडित असतात. कार्यक्षेत्रच संकुचित निवडलं, की यशस्वी ठरायला वेळ लागत नाही. भूतकाळाचं ओझं पेलायलाही सामर्थ्य लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला भूतकाळ ओझंच टाकतो का? काही रम्य आठवणींचे नजराणे देण्याचं सामर्थ्यही भूतकाळातच असतं. अनेक माणसांचा उपयोग आपण शिडीसारखा केलेला असतो. ज्यांना हे मोठेपण नाकारायचं असतं, तीच माणसं गेलेल्या काळाचं काही देणं लागत नाहीत.

37. हेकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्व नसतं.

38. वृत्तीप्रमाणे माणूस समर्थन शोधतो

39. वेळेशी आणि काळाशी फटकून वागणाऱ्या गुणवान माणसांचा आक्रोश म्हणजे इतिहास!

40. वेळेवर न भेटणाऱ्या माणसांपेक्षा, मठ्ठ पण हव्या त्या क्षणी हजर होणाऱ्या माणसांवरच आपली मदार असते.

41. झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात, तेव्हा ती झाडांपेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाडं वाढतात, तेव्हा ती फक्त जगतात. वाढत नाहीत. फक्त दिसतात, पण त्यांची वाढ खुंटलेली असते.

संधी

मी काळाला एक संधी देतो आहे

आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे

तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे…

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी
की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे…!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे…

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे…

-संदीप खरे

तोल का जातो?

सावरावे रोज तरीही तोल का जातो?

कोणत्या तार्‍याकडे हा काफिला जातो?

उतरते रात्रीत अर्ध्या कोण स्वप्नांशी?
गाऊनी अर्धेच गाणे रोज का जातो?

एवढा शकुनांवरी विश्वास हा माझा?
रोज एका मांजराला आडवा जातो!

मोजतो माझे उसासे लावूनी काटे
बस जरासा वेळ माझा चांगला जातो!

कैक प्याले रिचवुनिही जो उभा त्याचा
देवळाच्या पायर्‍यांशी झोक का जातो?

-संदीप खरे
शिष्य म्हणे जी गुरुवर्या !! उदंड नवरे, असंख्य भार्या !!
वर्णन करावे त्यांचिया कार्या !! दुख हलके करावे !!
बायकांनी प्रगती केली जरी !! नवऱ्यांनी बसावे कैसे घरी ?
मार्गदर्शन करावे काही तरी !! उद्धार होईल नवऱ्यांचा !!
आपण विवाहित असल्यामुळे !! नवऱ्यांची व्यथा स्वानुभवे कळे !!
एका चुकीची एवढी फळे !! भोगावी का पुरुषांनी ?
बायको म्हणजे प्रकरण भारी !! नवऱ्याच्या मागे pemanent बिमारी !!
बायकोने झोडपल्याच्या तक्रारी !!वाढो लागल्या गुरुवर्या !!
म्हणौनी म्हणतो गुरुवरा !! अचानक चान्स आला बरा !!
नवी दुकानदारी सुरु करा !! ' फिफ्टी-फिफ्टी' करूया !!
शिष्याने सहजभावे विनंती केली !! ऐकोन गुरूला घेरी आली !!
म्हणे, " माझ्या घरातल्या हालचाली !! तुला कैशा कळल्या रे ?"


..ह.भ. प्रे. प . ज्ञानेश महाराज वाकुडकर
मध्यंतरी सहज वाटले, नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से  गोळा करावेत. त्या ‘नाटय़’मय छटांचा हा गुलदस्ता!
ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!
१) एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो.
बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास
मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो-‘‘आपल्या पत्नीस ‘तिळे’ झाले आहे.’’ नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''

२) एक अरेरावी नवरा ऑफिसमधून घरी येतो. नेहमी स्वच्छ दिसणारे घर आज अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. बिछाना तसाच, किचनमध्ये खरकटी भांडी, मुलांचे कपडे, खेळणी इकडेतिकडे and what not.
‘‘तू दिवसभर करतेस तरी काय?’’- तो पत्नीस फटकारतो.
बायको हुशार. ती म्हणते- ‘‘त्या प्रश्नाचेच हे उत्तर आहे! आज मी खरोखर काही काम केले नाही. वाटले, त्यामुळे तरी तुम्हाला कळेल की मी दिवसभर रोज काय करते!’’
३) रंगेल नवरा- संशयी बायको एका पार्टीत एक स्त्री Event Manager ला विचारते-
``Excuse me please! ती beautiful तरुणी drinks serve करत होती ती कोठे गेली? दिसत नाही इथे ती?’’
मॅनेजर- ‘‘आपणास काय हवे आहे, मॅडम? That girl or the drink?''
पत्नी- ‘‘दोन्ही नाही. Neither girl nor drink! I am searching for my husband!! माझा नवरा शोधते आहे मी!’’

४)Hen pecked नवरा- एका जोडप्याचा वादविवाद जोरात चालू असतो. शेवटी ते प्रकरण
संपवावे म्हणून नवरा ‘बरं! राहील!!’ असं म्हणून आपले ‘स्थान’ ग्रहण करतो व पुटपुटतो- ``I am a man of few words!'
पण त्यानेही बायकोचे समाधान होत नाही. ती टोमणा मारतेच- ``Yes! But you keep repeating them! समजलं?’’-

५) नवीन नवरा-
नुकत्याच लग्न झालेल्या नवरदेवाची त्याचे मित्र खूप तारीफ करतात- ‘‘तू खरंच भाग्यवान आहेस! तुझी बायको, आमची वहिनी, हरिणाक्षी आहे, her lips are like rose buds, तिचा आवाज
कोकिळेसारखा आहे, ती गजगामिनी आहे, सिंहकटी आहे!! you're very fortunate!' त्यावर नवरदेव काय म्हणतात- ``I am not so sure! she does not seem to have a single characteristic of a HUMAN BEING! नुसती जनावरे काय कामाची?’’


६) शेवटी.. हा प्रेमळ नवरा- प्रिन्सिपॉलसाहेबांशी झगडा झाल्यामुळे चिडलेली, नव्र्हस झालेली शिक्षिका टेन्शन घेऊन सायंकाळी घरी येते. नवरा तिला गरमागरम कॉफी देतो, इकडल्यातिकडल्या गमतीदार
गोष्टींनी तिला हसवतो, तिचा मूड change करतो व तिला ‘‘असं चालतेच गं! cheer up!' वगैरे म्हणून तिचे सांत्वन करतो. ती स्त्री उत्साहित होते व म्हणते- ``Dear! you are really MY STRENGTH!' नवरा हसतो व तितक्याच प्रेमाने म्हणतो- ``And you are really MY WEAKNESS!''

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर,कट रचले गेले पाहिजेत.

ते दिवस खूप छान होते
जेव्हा घड्याळ एखाद्या जवळच असायचं आणि वेळ सर्वांकडे.


संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही "गुण"लं" तरी "भागत" नाही  "गुणा"नं राहिलं तरच... "भागतं"


दोन विपरीत गोष्टी मुळे देशाची पायमल्ली होत आहे ..
1) शिक्षणात राजकारण जास्त
2) राजकारणात शिक्षण कमी !


"पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत,
 त्यांना वाचावं लागतं."


स्वतःवर विश्वास ठेवा,
कारण तुमच्या एवढं तुम्हाला
कोणीही ओळखत नाही.

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा *स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही....




"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंद

रजनीकांत

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.

’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’


 रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’

 रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात 

 ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? 
पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही. 

 रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो 

 एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’
पुरुषाचा जन्म कित्ती छान!! महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा! तुम्ही पुरुष असलात तर... 
 १. तुमचं आडनाव बदलत नाही. 
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही. 
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता. 
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता. 
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात. 
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही. 
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो. 
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात. 
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात. 
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो. 
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही. 
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं. 
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता. 
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता. 
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात. 
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता. 
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता. 
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही. 
 मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो, प्रत्येक गोष्टीत त्यांचाशी पुढे असण्याच भ्रमिक सुख आपल्याला खूपच प्रिय असते, त्यांची टिंगल उडवायला मुळीच काही वाटत नाही! आपल्या मते दोष म्हंटला तर नेहमी त्यांचाच असतो, होना ??? पण खरतर चुकतो आपण.. स्त्री च्या रुपात आई असो, बहिण, बायको, पुत्री किवा प्रेयसी त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा भावनांची कदर समजून घ्यायला पाहिजेच... खरच हो, त्यांचा इतपत धैर्य, सहनशक्ती आणि त्याग करण्याची शक्ती आपल्यात नाहीये हे नेहमी लक्षात ठेवून हे विचार केल पाहिजे कि आपण खूप खूप खूपच नशीबवान आहोत, पुरुष म्हणून जन्माला आलोय!

 सारे डोंगरांचे उतार, पर्वत उदास झाले आहेत

 बहरणाऱ्या वसंतऋतूने जणू आत्महत्त्या केली आहे

 बारुद पेरलेल्या सीमेवरच पाऊल ठेवले होते त्याने...

आळसावलेले ऊन खाली उतरले नाही अजून

 थंडीने गारठलेले ते छपरावर झोपून राहिले आहे

 आणि उत्साहाच्या पांघरुणाच्या तर कधीच फाटून चिंध्या झाल्या आहेत!