सुख-दुख

       आयुष्य हे असच असतं,
       कधी फुंकर तर कधी वादळ असतं.

              कधी सुखाची शाल ओढून,
                दु:ख दबकत येत
                 तर कधी दु:खाचे काटे लावून,
                    सुख धावत येत.


                        सुखाचा उपभोग घेताना,
                            दु:ख कधी आलं हे कळत नाही
                               अन दु:खाचे काटे टोचत असताना,
                                    सुखाची वाट साहवत नाही.


                                          सुख नेहमी पाहुणा बनून येत,
                                              दोन दिवस राहून लगेच निघून जातं
                                                दु :ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
                                                 अन हृदयाला चरे पाडून जातं.

                                   दुखाची सावली सदैव जीवनाची पायवाट होते,
                                  तर सुखाची सावली उन-पावसाचा खेळ खेळते,
                                   तर कधी सुखाचा झरा वाहतो,
                                   तर कधी दुखाचा पावस होता
                                  आयुष्यात हे सुख-दुख चा खेळ चालता राहतो
                                   तर कधी आठवणी म्हणून छळत असतो,

पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.

असे काही घडेल

"कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा 'ती' माझी नव्हती,

ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,
नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,

तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,

काय कराव तेच कळत नव्हते,
कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,

महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,
होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,

शेवटी करायला नको ते धाडस मी केले,
होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
'तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,

एकून तिचे उत्तर, 'मन' बेभान होउन नाचले,
अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,

आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,
स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी..."

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा

या साजी-या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा


गीत     -     सुधीर मोघे
संगीत     -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर     -     महेंद्र कपूर
चित्रपट     -     हा खेळ सावल्यांचा (१९७६)

सुंदर तरुणी दिसल्यावर

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू?
चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू'
तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी
'तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली
चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली
घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले…
(दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!)
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता…
परिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही
मला आवडे तिचा असा हा फणकाराही
चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते!
म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

ती

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..

तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..

तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..

तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..

तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..

तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..

तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..

जहर खाऊ नका..!


घोर मनाला लाऊ नका..
पाठ जगाला दावू नका..
तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा..
जहर खावू नका..!


आली लग्नाला लाडाची ताई..
हुंड्यावाचून जमेना काही..
असे लाचार होवू नका..
टोपी गहाण ठेवू नका..
ताई तयार आहे लढायला बाबा ..
जहर खाऊ नका..!

कर्ज घेवून दिवाळी आली..
वार यंदाही नापिकी झाली..
नवे कपडे घेवू नका..
काही खायाला देवू नका..
पाणी पिवून दिवाळी करू ना बाबा..
जहर खावू नका..!

आहे साथीला सोन्याची शेती..
घाम गाळून पिकवू मोती
तीर्थ यात्रेला जावू नका,,
चुना खिशाला लावू नका..
आमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..
जहर खावू नका..!!

... स्पर्श तुझा ...


पाहणे तुझे म्हणजे आभास चांदण्याचा,
स्पर्श तुझा बेधुंदी जीव घेतो माझा..

तुझे हासणे गं फुले मालतीची,


घायाळ करते मजला अदा ही खुणेची... 

हात तुझा हाती घेता विसर जगाचा पडतो,
मिठीत तुझ्या गं सखये, मी सांजवेळी बुडतो... 

फारच जुलमी तुझे, नितळ निळे डोळे,
पाहुन होई वेडे, मन हे माझे भोळे... 
तूच कविता माझी, श्वास जीवनाचा,
पाहणे तुझे म्हणजे आभास चांदण्याचा.....