😃 मजेशीर कविता 😃


बशी म्हणाली कपाला

श्रेय नाही नशिबाला 

पिताना पितात बशीभर

अन म्हणताना म्हणतात कपभर...!


कप म्हणाला बशीला 

तुझा मोठा वशिला

धरतात मला कानाला

अन् लावतात तुला ओठाला...!!!

 

☕ या चहा प्यायला. ☕

 🍁 कप - बशी🍁


स्त्री आणि पुरुष यांचे प्रतीक असलेली कप बशी. स्त्रीआणि पुरुष कप-बशीप्रमाणे एकरूप, परस्पर पूरक आहेत. त्यांना एकटे अस्तित्व नाही. दोघे जोडीनेच वावरतात. बशी ही स्त्रीचे तर कप हे पुरूषाचे प्रतीक आहे. कप भर चहाने घटकाभर उत्साह वाटला तरी बशीभर चहाने अंतरात्मा शांत राहतो. कपाप्रमाणे पूरूष ताठ तर स्त्री बशीप्रमाणे विनम्र असते. कप पोरकट असतो, म्हणून त्याचा कान धरावा लागतो. पण कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते. एकमेकांना सांभाळण्यास पूरक जन्मभर टिकणारी अन्यथा फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी

 "कप - बशी".

🙂🙃

फक्त हिमतीने लढ👊


घरटे उडते वादळात  

बिळा, वारूळात पाणी शिरते 

कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊

म्हणून आत्महत्या करते ?


प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही 

शिकार मिळाली नाही म्हणून 

कधीच अनूदान मागत नाही 🐅


घरकुला साठी मुंगी 

करत नाही अर्ज 

स्वतःच उभारते वारूळ 

कोण देतो गृहकर्ज ?🎭


हात नाहीत सुगरणी ला 

फक्त चोच घेउन जगते 

स्वतःच विणते घरटे छान 

कोणतं पॅकेज मागते ?🕴


कुणीही नाही पाठी 

तरी तक्रार नाही ओठी 

निवेदन घेउन चिमणी 

फिरते का कोणत्या योजनेसाठी ?


घरधन्याच्या संरक्षणाला 

धाऊन येतो कुत्रा 

लाईफ इन्शुरन्स काढला का ? 

अस विचारत नाही मित्रा

🐕

राब राब राबून बैल 

कमाउन धन देतात 

सांगा बरं कुणाकडून 

ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂


कष्टकर्याची  जात आपली 

आपणही हे शिकलं पाहिजे 

पिंपळाच्या रोपा सारखं 

पाषाणावर टिकलं पाहिजे🤕


कोण करतो सांगा त्यांना 

पुरस्काराने सन्मानित 

तरीही मोर फुलवतो पिसारा 

अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧


🐝मधमाशीची दृष्टी ठेव 

फुलांची काही कमी नाही 

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 

कोणतीच रोजगार हमी नाही


घाबरू नको कर्जाला 

भय, चिंता फासावर टांग 

जिव एवढा स्वस्त नाही 

सावकाराला ठणकाऊण सांग😎


काळ्या आईचा लेक कधी 

संकटापुढे झुकला का ? 

कितीही तापला सुर्य तरी 

समुद्र कधी सुकला का ?🌊💦


निर्धाराच्या वाटेवर 

टाक निर्भीडपणे पाय 

तु फक्त विश्वास ठेव 

पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑


निर्धाराने जिंकु आपण 

पुन्हा यशाचा गड 

आयुष्याची लढाई 

फक्त हिमतीने लढ👊

 एका आजीच्या १०० व्या वाढदिवशी तिला व्हीलचेअर मध्ये बसवून लॉन वर सर्व कुटुंबियांसमवेत आणतात.

  

आजीला फारसं बोलता यायचं नाही. पण शक्यतो ती आवश्यक तेव्हा लिहून आपले म्हणणे सांगत असे.


लॉनवर खुर्चीवर बसल्याबसल्या थोड्या वेळाने आजी उजवीकडे कलंडू लागली,


म्हणून काही कुटुंब सदस्य तिच्या जवळ तत्परतेने गेले,


आणि तिच्या उजव्या बाजूला ऊशा ठेऊन तिला नीट बसती केली.


थोड्यावेळानंतर ती पुन्हा तिच्या डाव्या बाजूला कलंडू लागली, 


घरच्यांनी आता डाव्या बाजूस ऊशा लाऊन तिला सरळ बसविले.


लवकरच ती पुन्हा पुढे झुकू लागल्याने कुटुंबातील सदस्यांनी पुन्हा तिला पुढे मऊशार तक्का लावला.


आणि नंतर तिला नीट बसवण्यासाठी तिच्या कंबरेखाली एक आणखी ऊशी बसवली.


उशीरा आलेला आजीबाईंचा भाचा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,


'हाय, आज्जी,

तू तर अगदी महाराणी शोभते आहेस! 


सगळे अगदी छान बडदास्त ठेवतायत ना?' 


आजीने हळूहळू तिच्याकडील नोटपॅड बाहेर काढून भाच्याला एक नोट लिहिली:


"कसली मरणाची बडदास्त?


 मेले पादायला पण देत नाहीयेत."😩😩😂😂😂😂😂

 मेट्रीक पास झालो तेंव्हा


नंबर पेपरात घावला

अन सारा गांव कसा

माह्या स्वागताले धावला


कोनं केला सेकहेंड

कोन घेतला मुका

सार्याईन पोटात घातल्या

माह्यावाल्या चुका


गांवची मरीमाय

तवाच मले पावली

मामाची एक पोरगी

मह्यावर भावली


एका हाती हेंडल

एका हाती पेपर

सायकवर निंघाला

गांवातला टॉपर


मी पुळे अन माग पोट्टे

अशी निघाली वरात

पेलता पेलेना गर्दी

होती माह्या घरात


पास झालो तवा

सहावी सप्लीमेंट्री

होनार होती आता

कॉलेजात एंट्री


तवाच गर्दीतुन

नम्या आला हापत

मी चरकलो मनात

आनली काय आफत


नम्या म्हने पेपरात

जांगळबुत्ता झाला

पासच्या यादीत तुवा

चुकुन नंबर आला


~~सतीष देशमुख,पणज

९६०४९१२३५१

माणूस होशील का ?

ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कै. महाश्वेता देवी यांची एक सुंदर कविता. कुणीतरी भल्यामाणसाने त्याचं केलेलं अतिशय सुरेख मराठीत भाषांतर. 

✒️✒️

आलास..?

ये, दार उघडंच आहे ...आत ये.

पण क्षणभर थांब....!!


दारातील पायपुसण्यावर 

अहंकार झटकून ये...!!


भिंतीला बिलगून वर चढलेल्या 

मधुमालतीच्या वेलावर

नाराजी सोडून ये...!!


तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये,

बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये...!!


पायातल्या चपलांबरोबर 

मनातली नकारात्मकताही काढून ठेव ..!!


बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून

थोडा खेळकरपणा मागून आण,

गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू

चेहेऱ्याला लावून आण...!!


ये...


तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न 

माझ्यावर सोपव.

तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला

प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते...!!


ही बघ....


तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.

सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि 

आकाशी गुलालाची उधळण केलीयं...


अन्


प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर

चहा उकळत ठेवलाय.

तो घोट घोट घे....


ऐक ना ...

इतकंही अवघड नाहीये रे जगणं !          

फक्त, तू *माणूस* बनून ये...!!


*_पूर्वीचा काळ बाबा,_*

*_खरंच होता चांगला,_*

*_साधे घरं साधी माणसं,_*

*_कुठे होता बंगला ?_*


                     *घरं जरी साधेच पण,*

                     *माणसं होती मायाळू,* 

                     *साधी राहणी चटणी भाकरी,* 

                     *देवभोळी अन श्रद्धाळू.*


*_सख्खे काय चुलत काय,_* 

*_सगळेच आपले वाटायचे,_*

*_सुख असो दुःख असो,_* 

*_आपुलकीने भेटायचे._*


                    *पाहुणा दारात दिसला की,* 

                    *खूपच आनंद व्हायचा हो,*

                    *हसून खेळून गप्पा मारून,*

                    *शीण निघून जायचा हो.*


*_श्रीमंती जरी नसली तरी,_*

*_एकट कधी वाटलं नाही,_*

*_खिसे फाटके असले तरीही,_*

*_कोणतंच काम रुकलं नाही._*


                    *उसनं पासनं करायचे पण,* 

                    *पोटभर खाऊ घालायचे,*

                    *पैसे आडके नव्हते तरीही,*

                    *मन मोकळं बोलायचे.*


*_कणकेच्या उपम्या सोबत,_* 

*_गुळाचा शिरा हटायचा,_*

*_पत्रावळ जरी असली तरी,_*

*_पाट , तांब्या मिळायचा._* 


                    *लपाछपी पळापळी,* 

                    *बिन पैशाचे खेळ हो,*

                    *कुणीच कुठे busy नव्हते,*

                    *होता वेळच वेळ हो.* 


*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*

*_खळखळून हसायचे,_*

*_निवांत गप्पा मारीत माणसं,_* 

*_ओसरीवर  बसायचे._*


                    *सुख शांती समाधान " ते "*

                    *आता कुठे दिसते का ?*

                    *पॉश पॉश घरा मधे,*

                    *" तशी " मैफिल सजते का ?*


*_नाते गोते घट्ट होते,_*

*_किंमत होती माणसाला,_*

*_प्रेमामुळे चव होती,_*

*_अंगणातल्या फणसाला._* 


                    *तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*

                    *राहिला आहे का राम ?*

                    *भावाकडे बहिणीचा हो,* 

                    *असतो का मुक्काम  ?*


*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_* 

*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*

*_मृदंगाच्या ताला वरती,_*

*_गाव आता का डोलत नाही._* 


                    *प्रेम , माया , आपुलकी हे,*

                    *शब्द आम्हाला गावतील का ?*

                    *बैठकीतल्या सतरंजीवर,*

                    *पुन्हा पाहुणे मावतील का ?*


*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*

*_मजा आता कमी झाली,_*

*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*

*_सुदामाची सुट्टी झाली._* 


                    *हॉल किचन बेड मधे,*

                    *प्रदर्शन असतं वस्तूंचं,*

                    *का बरं विसर्जन झालं,* 

                    *चांगुलपणाच्या अस्थीचं ???*

🙏🏻🙏🏻🙏🏻

ब्रेक्स

एकदा फिजिक्सच्या टिचरने मुलांना प्रश्न विचारला,

" कारमधे *ब्रेक्स* का लावलेले असतात ? "


त्यावर निरनिराळी उत्तरे आली,

*थांबण्यासाठी*


*वेग कमी करण्यासाठी*


*अपघात टाळण्यासाठी*


परंतू सर्वात चांगले उत्तर होते,

*"जास्त वेगाने जाता येण्यासाठी..!!"*


गोंधळले असाल ना अशा उत्तराने..... मग असे कसे..? जरा विचार करा.....!


जर तुमच्या कारमधे *ब्रेकच* नसते तर तुम्ही जास्तीत जास्त किती वेगाने गाडी चालवाल..?

कारला *ब्रेक* आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने गाडी चालवण्याचे धाडस करू शकता, तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता.


      जीवनातही तुम्हाला *आई* *वडील, सासु सासरे* , *कुटुंब* इ. रूपात *ब्रेक्स* मिळतात. तुम्हाला वाटते की, ते तुम्हाला वेळोवेळी टोकतात , अडवतात, शंका कुशंका उभ्या करतात, तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात. म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी चिडचिडे होतात.


परंतु लक्षात ठेवा, जीवनात वेळोवेळी आलेल्या अशा *ब्रेक्समुळेच* तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात. असे *ब्रेक्स* नसते तर तुम्ही कुठतरी भरकटला असता, अपघातात किंवा संकटात सापडला असता.


म्हणूनच जीवनात अधुनमधून येणाऱ्या अशा *" ब्रेक्सची "* जाण ठेवा.....