भिकारी : साहेब, अगोदर तुम्ही ५० रुपये देत होते. आता फक्त १० रुपये देता. असं का ? 🤔


मन्या : पहिले मी सिंगल होतो. अता माझं लग्न झालंय. 😇


भिकारी : वा साहेब! माझ्या पैशांनी बायकोसोबत मजा मारताय होय. 🫣


🤣😂🤣😂😊

 नवरा: मी एका समजूतदार स्त्रीशी लग्न करायला हवे होते.


पत्नी: एक समजदार स्त्री कधीच तुमच्याशी लग्न करणार नाही.


नवरा: मला हे सिद्ध करायचे होते. 🫣


🤣😂🤣😂😊

 *पुणेकर* - माझी बायको खूप खर्चिक आहे. रोज ५००-१००० रूपये मागत असते. 🤨


*मित्र*- इतक्या पैश्यांच काय करतात वहिनी ? 🤔


*पुणेकर* - माहीत नाही. मी कधी दिले नाहीत. 🥴


🤣😂🤣😂😊

 आज मी काही कामानिमित्त SXX बँकेत गेलो होतो....🏦

चार तासानंतर मला जाणीव झाली की🤔

.

.

.

विजय माल्या ने यांच्यासोबत योग्यच केले!!!🫣

 ✈️ कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारं विमान उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात अचानक कॉकपिटमधून पायलट जोरात ओरडला, "*Oh My God!*"🥴


विमानात भीतीने शांतता पसरली. अलीकडच्या घटना आठवून सगळे प्रवासी एकमेकांकडे घाबरत पाहू लागले. सगळ्यांचे चेहरे फिक्कट पडले.

😳😱


थोड्याच वेळात पायलटने माफी मागितली,"प्रवाशांनो, क्षमा करा... माझ्यावर गरमागरम कॉफी सांडली, आणि माईक चुकून चालू राहिला. त्यामुळे माझी आरोळी तुम्हाला ऐकू आली. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही इथे येऊन माझी पँट पाहू शकता..."🙏


तेवढ्यात एक काका उठले आणि म्हणाले, "*रांडच्या तू इथे ये आणि आमची पँट बघ*"🫣


🤣😂🤣😂😊

 एकदा आईनस्टाइन एकटा रेस्तराँमध्ये गेला. मेन्यू समोर आला.📃

 

आईनस्टाइनचा गोंधळ उडाला. 🥴मेन्यू पाहून आॅर्डर देण्याची त्याला माहितीच नव्हती. बराच वेळ मेन्यू उलटापालटा करून पाहिल्यावर त्याने वेटरला बोलावून सांगितलं, यातला एखादा बऱ्यापैकी पदार्थ माझ्यासाठी आॅर्डर कर तूच.😉


वेटर म्हणाला, मीही तुमच्यासारखाच निरक्षर आहे. शिकलो असतो तर इथे वेटरची नोकरी करत बसलो असतो का?

 एका गावात एक शेतकरी आणि एक व्यापारी राहात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दर आठवड्याला पाच किलो गहू जायचा आणि शेतकऱ्याकडून दर आठवड्याला पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व्यापाऱ्याकडे जायची. हा त्यांचा वर्षानुवर्षांचा व्यवहार होता.


दोघांमध्ये एकदा कडाक्याचं भांडण झालं. दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाकलं. पण, दोघांमधला व्यवहार सुरू राहिला.🤝


एक दिवस व्यापाऱ्याला शंका आली की शेतकऱ्याकडून आलेली ज्वारी पाच किलो नसावी. त्याने त्याच्याकडच्या काट्यावर तोलून पाहिली. ती साडेचार किलो भरली. पुढच्या वेळी चार किलोच ज्वारी आली. तो खूप संतापला. त्याने शेतकऱ्याला धडा शिकवायचा निर्धार केला. पंचायतीत तक्रार केली.😡


पंचायतीत जाहीर सुनावणी झाली. पंचांनी शेतकऱ्याला विचारलं, तू व्यापाऱ्याला का फसवतोस?🤨


शेतकरी म्हणाला, भांडण झालं म्हणून मी मापात पाप करीन हे शक्यच नाही.😊


व्यापारी भडकून म्हणाला, आता निदान खोटं तरी बोलू नकोस. माझ्याकडच्या काट्यावर तोलून पाहिलीये मी ज्वारी. पाच किलोच्या जागी कधी चार किलो, कधी साडेचार किलो.🤨


शेतकरी तरीही मानायला तयार नव्हता. तेव्हा पंच वैतागून म्हणाले, तुझ्याकडच्या वजनांमध्ये काही गडबड आहे का?🤔


शेतकरी म्हणाला, मी काय व्यापारी आहे का वजनं ठेवायला? माझ्याकडे वजनं नाहीत.


पंच म्हणाले, मग तू व्यापाऱ्याला पाच किलो ज्वारी कशी तोलून देतोस?⚖️


शेतकरी म्हणाला, त्याच्याकडून दर आठवड्याला जो पाच किलो गहू येतो, तीच पिशवी मी तागडीत एका बाजूला टाकतो आणि तेवढीच ज्वारी मापून पाठवतो. 🫣