प्रामाणिकपणा

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?


नरू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.


बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ? 


नरू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच  समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.

इतके सोपे असते तर मग हसलो नसतो का ?

रोज सुखाच्या पारावरती दिसलो नसतो का ?


सात पिढ्या श्रीमंतच होत्या आठवी पिढी मी

नाहीतर मग नोटा मोजत बसलो नसतो का ? 


वैभव जोशी

 सूर्य नेहमी पूर्वेकडून उगवतो.


पण चंद्रावर विश्वास ठेवता येत नाही.


कोण कोणत्या 'ब्युटी पार्लर'मधून केव्हा बाहेर येईल काय सांगता येत नाही? 

 युद्ध नाही प्रेम करा 


आणि जर तुम्हाला दोन्ही करायचे असेल, 

.

.

.

तर लग्न करा.

एक धर्मगुरू आणि पाद्री रस्त्याच्या कडेला उभे आहेत. त्यांच्या हातात एक फलक आहे, ज्यावर लिहिले आहे, "शेवट जवळ आला आहे! खूप उशीर होण्यापूर्वी आताच मागे फिरा!"

एक जाणारा ड्रायव्हर ओरडतो, "तुम्ही लोक वेडे आहात!"  आणि त्यांना मागे टाकून वेगाने निघून जातो. वळणाच्या पलीकडून त्यांना टायरच्या कर्कश आवाजासह, मग गाडी पडल्याचा मोठा आवाज ऐकू येतो.

धर्मगुरू पाद्रीकडे वळून म्हणतो, "आपण त्याऐवजी 'पूल बंद आहे' अशी पाटी लावली तर कसं राहील?" 

पायाखालची वाळू सरकली

एकदा, बायकोबरोबर घ्यायला गेलो भाजी ! पिशव्या उचलून उचलून, जिरली होती माझी !

पिशव्या उचलणे म्हणजे, समजू नका थट्टा ! इकडे, चालू होता बायकोच्या तोंडाचा पट्टा !

इतक्यात मैत्रीण, छानश्या बाळाला आली हो घेऊन ! अले वा, खेळवू लागलो, त्याच्या गालावर हात ठेऊन !

हे घ्या तुमचे बाळ, मैत्रीण ओरडू लागली रागात ! तुमच्याशिवाय, कोण आहे आम्हाला या जगात !

ओरडलो, कोणाचं बाळ, तुझ डोकं बिकं फिरलंय का? बायको त्वेषाने, तरी वाटलंच, पाणी कुठं मुरलंय का?

बायको लाल झाली रागाने, जाऊ लागला तिचा तोल ! मैत्रिणीला म्हणालो, अगं ये बाई, आता तरी खरं बोल !

मैत्रीण हसतच, सॉरी सॉरी हे माझंच आहे मुल ! मला या वेड्याला, करायचं होतं हो एप्रिल फुल !

मैत्रिणीचं झालं एप्रिल फुल, पण माझी जाम टरकली ! बायकोकडे बघताना, पायाखालची वाळूच सरकली !


कवी - उमेश शां. श. ओवाळ

एका माणसाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की त्याला नोकर हवा आहे. तुम्हाला कोणताही पगार मिळणार नाही, फक्त जेवण मिळेल.

नशिबाने साथ दिलेला एक गरीब माणूस आला आणि त्याने विचारले,"साहेब, मला काय काम करायचं आहे?" 

तो काहीच बोलला नाही, फक्त दोन लोकांसाठी रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जवळच्या गुरुद्वाराच्या लंगरमधून आणावे लागते.


एक तुझं, एक माझं..!!!