*दोन बायकांचा ऑफिस मधील संवाद :*

पहिली : अगं, माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली, तुझी कशी गेली?

दुसरी : एकदम नकोशी. काल माझा नवरा घरी आला 3 मिनिटात जेवला आणि दोन मिनिटात झोपला. तुझं?
पहिली : एकदम मजेत. माझा नवरा घरी आला आणि मस्त जेवायला बाहेर घेऊन गेला. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत तासभर चालत घरी आलो. घरी आल्यावर त्याने घरभर पणत्या लावल्या. खरोखर एखाद्या परिकथेसारखंच वाटलं मला.

*त्याचवेळी कामावर नवर्यांचा संवाद*

पहिला : कशी गेली कालची संध्याकाळ?
दुसरा: उत्तम. घरी आलो जेवण तयारच होतं, मी जेवलो आणि पटकन झोपलो. तुझं?

पहिला : अरे एकदम भयानक. घरी आलो, जेवण तयार नव्हते, वीजबिल न भरल्यामुळे घरात वीज नव्हती; म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतके महाग होते की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही. मग पायीच घरी चालत आलो, घरी वीज नसल्याने घरभर पणत्या लावल्या.

**तात्पर्य *: तुम्ही जगाला कसं भासवता हे महत्वाचे.... मग वस्तुस्थिती काही का असेना? .....*

*चाणक्य म्हणतो,*
*जर तुम्हाला नवऱ्याबरोबर आनंदात राहायचे असेल तर त्याच्यावर प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला पूर्ण समजून घ्या.*
*आणि*
*जर तुम्हाला बायकोबरोबर आनंदात राहायचे असेल तर तिच्यावर मनापासून भरपूर प्रेम करा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करू नका.*

*सर्व विवाहित दाम्पत्यांना समर्पित**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा