*महाभारताचे "नऊ सार सूत्र".*


 *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव.*


*२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील." - कर्ण.*


 *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल." - अश्वत्थामा.*


 *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*


 *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*


 *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते." - धृतराष्ट्र.*


 *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी* *घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."*  - *अर्जुन......¦*


 *८) ...."प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही"...- शकुनी......*


 *९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही"....- युधिष्ठिर....*


 *....या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे.....*


*....जो इतरांना संपविण्याची तयारी करतो..... तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो....आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.....तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.....*


*.....दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा....अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही......*


*..."माणसाचा दर्जा हा जात... धर्म व मिळकती वरून ठरत नसतो... तर तो विचारांवरून ठरत असतो . .....धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो....धर्माचा नाही".......*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा