एका थापाड्याने कडी केली. एकदा तो लोकांना म्हणाला, ‘‘अरे, कुत्री-मांजरं काय पाळता? माणसानं काहीतरी निराळं करण्यात गंमत.’’ एकाने विचारले ‘‘असं? तुम्ही काय पाळलं आहे?’’
‘‘मी एक मासा पाळला होता-’’ तो फुशारकीने बोलला, ‘‘त्या माशाला मी चांगला मोठा केला. पाण्याशिवाय राहायला त्याला शिकवलं. मी कुठंही निघालो की तो मासा टुणटुण उड्या मारीत माझ्या पाठीमागून चालत यायचा!’’
‘‘असं?’’ सर्वांना आश्चर्य वाटलं. कुणीतरी पृच्छा केली.
‘‘मग तो मासा अलीकडं दिसला नाही तुमच्या मागून येताना?’’
अत्यंत दु:खी चेहरा करून ते सद्गृहस्थ बोलले, ‘‘दुर्दैव माझं. दुसरं काय?’’
‘‘काय झालं?’’
‘‘परवा मी एका नदीच्या पुलावरून चाललो होतो. तो मासाही टुणटुण करीत माझ्या मागून उड्या मारीत येत होता. पावसाळ्याचे दिवस. एकदम त्याचा पाय घसरला अन् तो खाली नदीत पडला आणि बुडून मेला!...’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा