*लुगड्याची गोष्ट .*


रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.


सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..


 ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. 


",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "

 

"सावीत्रीबाई:-आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." 


"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,


मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........



ज्योतिराव:-

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, 

तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',


सावित्रीबाई-

आहो, हा ताप औषधाने नाही जायचा.


" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.--मग?

                                 सावित्रीबाई म्हणाल्या:-" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." 


ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.


त्यांचे विचारचक्र सुरु झाले.

लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........


मग सावित्री असे का बरं बोलली?..........


तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........


आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....


बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............


पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........


विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.


दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.


बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........


लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, 


कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......


सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.

त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.


ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........


लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............


ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होत्या त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.


त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.


बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण ,चिखलाचे डाग, धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात. 


त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.


परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .


त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."


आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. 


सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!

 *राग आणि त्यांच्य श्रवणाचे लाभ*

*MUSIC IS MEDICINE*

१ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.


२ राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.


३ राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.


४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.


५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.


६ राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.


७ राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.


८ राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.


९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.


१०  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.


११  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.


१२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.


१३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.


१४ राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.


१५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.


१६ राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.


१७ राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.


*संगीतोपचार*


*विशेष सूचना:-*


डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.


*हृदयरोग* 


राग दरबारी व राग सारंग


१) झनक झनक तोरी बाजे पायलिया....८:१६

( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए....६:०६   ( काजल )

३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम....४:२४

( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ३:०६।    ( नागिन).


*विस्मरण*


 लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा 


१) मेरे नयना सावन भादों ....५:०६

 ( मेहबूबा )

२)ओ मेरे सनम....५:०९ ( संगम )

३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर ....४:४१

( ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन ....६:५३

( मेरा नाम जोकर )


*मानसिक ताण, अस्वस्थता*


ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत 

१) पिया बावरी....४:०२ ( खूबसूरत )

२)मेरे सूर और तेरे गीत ....३:११

( गूँज उठी शहनाई )

३)मतवारी नार ठुमक ठुमक चली ....६:२९

( आम्रपाली )

४) तेरे प्यार मे दिलदार ....४:०४

( मेरे मेहबूब )


 *रक्तदाब*


हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात 


 *उच्च रक्तदाब*


१) चल उड़ जा रे पंछी ....४:३५

( भाभी )

२) चलो दिलदार चलो ....३:३२

( पाकीजा )

३) नीले गगन के तले....४:१३

( हमराज )

४) ज्योती कलश छलके ....३:३०

( भाभी की चूड़ियाँ )


 *कमी रक्तदाब*


१) जहाँ डाल डाल पर ....७:२०

( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे ....४:३२

( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये ४:०८

( पोस्ट बॉक्स नं. ९०)


*रक्तक्षय, अनिमिया* 


अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.


१) खाली शाम हाथ आई है ....४:५५

( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये ....४:२७

( हँसते जख्म )

३)नदियाँ किनारे ....३:३४

( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया .....५:३४

( दुल्हन एक रात की)


 *अशक्तपणा*


शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी 


१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ....

( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे....३:५८

 ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै 

....५:३७

( चंद्रगुप्त 


 *पित्तविकार, अॅसिडीटी*


अॅसिडीटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत 


१) छूकर मेरे मन को ....२:३५

( याराना )

२) तुम कमसीन हो नादा हो ....४:२९

( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम....२:५९

( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये .....३:४४

( सेहरा )


*चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.*

 *बिनधास्त जगा मित्रांनो*


●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...

(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)


●पन्नाशीनंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 

(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )


●साठीनंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच

(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)


●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच

(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)


●ऐंशीनंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच

(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )


●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच

(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)


अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?


जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.


*एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा.

 *जावईबापूंच्या डोक्याचा ताप कमी करण्यासाठी भटजींनी झंडू बाम बनवला* 


१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. तो इंग्रजी राज्यसत्तेचा काळ होता. गुजरातच्या काठियावाड प्रांतात जामनगर संस्थानमध्ये राजवैद्य होते विठ्ठल भट. आयुर्वेदाचे ते मोठे अभ्यासक होते. त्यांचा हातगुण चांगला होता. त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत पसरलेली होती.


त्यांच्या मुलाचं नाव करुणाशंकर भट. पण त्याला झंडू भटजी म्हणून ओळखायचे.

हे झंडू भटजी देखील आयुर्वेदाचार्य होते. वैद्य विठ्ठल भट यांच्या हाताखाली ते तयार झाले होते. बाप से बेटा सवाई अशी त्यांची ख्याती झाली होती. स्वतःची औषधे तयार करण्यासाठी त्यांना रसशाळा सुरू करायची होती.


जामनगरचे महाराज जामसाहेब हे झंडू भट्टजी यांच्या ज्ञानावर प्रसन्न झाले,त्यांनी आपल्या संस्थानात रंगमती नदीच्या किनाऱ्यावर थोडीशी जमीन झंडू भट्टजींना बहाल केली.


येथेच १८६४ साली झंडू भट्टजींनी आपली आयुर्वेद रसशाळा स्थापन केली


आणि झंडू ब्रॅण्डचा जन्म झाला.

झंडू भटजींची औषधे फक्त जामनगर नाही तर अख्ख्या काठियावाड मध्ये फेमस होती. दुरदूरहून लोक त्यांच्याकडे आपल्या रोगाचे निदान होईल या आशेने येत असत. झंडू भटजींची रसशाळा भारतभर गाजू लागली होती.


या भट्ट कुटुंबाच्या ज्ञानाला आधुनिक रुपात आणायचे श्रेय मात्र त्यांचा नातू जुगतराम वैद्य यांना जाते.


झंडू यांचे नातू जुगतराम वैद्य यांनी केमिस्ट्री व फिजिक्सचे आधुनिक शिक्षण घेतले होते. त्यांनी राजकोट मधील ब्रिटिश प्रोफेसर ली यांच्या लॅबमध्ये काम केलं होतं. आपली पारंपरिक औषधे जर आधुनिक रुपात आणली तर ती जगभरात पोहचवता येईल हे जुगतराम वैद्य यांच्या लक्षात आलं.


पण आजोबा झंडू भटजी यासाठी तयार होत नव्हते.

एवढंच काय त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना साथ देत नव्हतं. फक्त एकजण तयार झाला ,


झंडू यांचा जावई प्रभाशंकर पट्टानी


हे प्रभाशंकर पट्टानी म्हणजे भावनगरच्या राजाचे पंतप्रधान होते. खरंतर त्यांचं देखील आडनाव भट्ट होतं. पण सुरवातीला त्यांची परिस्थिती गरिबीची होती. त्याकाळी डॉक्टर व्हायचं म्हणून ते मुंबईला गेले पण ते जमलं नाही.


राजकोटला परत आल्यावर मास्तरकी सुरू केली.

झंडू भटजींच्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं पण सासर कडच्या कोणीतरी त्यांचा डॉक्टर न झाल्यावरून अपमान केला व प्रभाशंकर यांनी पट्टानी हे आडनाव धारण केल.


प्रभाशंकर मुळात हुशार होते. राजकोटमध्ये शिकायला आलेल्या भावनगरचा राजकुमार भावसिंग याला त्यांची खाजगी शिकवणी लावण्यात आली.


हा भावसिंग कायम डोकेदुखीने त्रस्त असायचा. त्यामुळे चिडचिड होऊन स्वभाव रागीट बनला होता.


त्याच्या प्रकृतीचा पट्टानी यांच्या डोक्याला ताप होऊन बसला होता. त्याला बरे करण्यासाठी प्रभाशंकर यांनी आपल्या सासऱ्यांना सांगून बनवलेलं एक खास बाम आणून दिल.


ते बाम लावल्यावर राजकुमाराची डोकेदुखी पळून गेली. तेच ते आजचे सुप्रसिद्ध झंडू बाम.

त्यानंतर भावसिंग यांचा प्रभाशंकर यांच्या वरचा विश्वास वाढला. पुढे ते जेव्हा भावनगरच्या राजेपदी आले तेव्हा या आपल्या गुरूला पंतप्रधान बनवलं.


प्रभाशंकर पट्टानी यांनी पुढची तीस चाळीस वर्षे काटेकोरपणे राज्यकारभार चालवला. भारताच्या राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे वजन होते.


अगदी महात्मा गांधीजींचे ते खास मित्र होते.


अस सांगितलं जातं की जेव्हा असहकार आंदोलनावेळी चौरीचौरा प्रकरण घडलं तेव्हा पट्टानी यांनी गांधीजींचे तुमच्या आंदोलनात हिंसा होत आहे असं सांगून कान धरले व त्याचाच परिणाम गांधीजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच असहकार आंदोलन मागे घेतले.


ज्या जावयाचा झंडू भटजींच्या कुटूंबाने अपमान केला त्याचीच मदत घ्यायची वेळ त्यांच्या नातवावर आली.

पण मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रभाशंकर यांनी जुगतराम वैद्य यांना राजाकडून सर्वोतोपरी साहाय्य मिळवून दिले व या दोघांनी मिळून १९१० साली झंडू फार्मसिटीकल कंपनीची स्थापना केली.


अगदी काही काळातच झंडू बाम तुफान फेमस झाले. डोकेदुखी पासून अंगदुःखी पर्यंत प्रत्येक गोष्टीवरील रामबाण उपाय म्हणून त्याला पाहिलं गेलं.


पुढच्या ९ वर्षात ही कंपनी शेअर बाजारात देखील आली.

झंडू भटजींनी रस शाळा सुरू केली त्याला जवळपास १५० वर्षे झाली, या कंपनीचा विस्तार शेकडो कोटींचा बनला आहे. आता या कंपनीची मालकी झंडू भटजींच्या कुटुंबाकडे राहिलो नाही पण फक्त भारतातच नाही तर परदेशातही त्यांची उत्पादने पोहचली आहेत.


दबंग मधली मलायका अरोरा देखील झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए जेव्हा म्हणते तेव्हा या आयुर्वेदिक औषधीचा संबंध भारतीय समाजावर झालेला परिणाम दिसून येतो.


डॉक्टरच्या आधी मदतीला येणारा, प्रत्येक घरात हमखास दिसणारा झंडू भटजींचा झंडू बाम १५० वर्षांचा झाला तरी त्याचा इफेक्ट कमी झाला नाही हे नक्की.

 व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !!


1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!!


2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !! 


3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!

 कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !!

म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !!


4) जाळायला काही नसलं तर पेटलेली 

 काडीसुद्धा आपोआप विझते .... !!


5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब 

 लागला नाही की मग त्रास होतो .... !!


6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , 

कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !!


7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !!


8) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी 

 घाबरलेला असतो , बरा झाल्यावर

 शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो .... !!


9) घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते .... !!


10) माणूस अपयशाला भीत नाही .अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ....? याची त्याला भीती वाटते .... !!


11) बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण .... !!


12) कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे . ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे . 


13) पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते .... !!


14) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात !! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा .... !!


15) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही , पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .... !!


16) आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो .


17) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो . पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !!


18) संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला .... !!


19) ''अंत " आणि '' एकांत " ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो .... !!


20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं .... !! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस .... !!


21) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते . सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते .... !!


22) सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो .... !!


23) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस .... !!


24) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते .... !!


25) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या

 गरजेपेक्षा कमी घेणं .... !!


26) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले .... !!


27) अत्यंत महागडी , न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे " आयुष्य " ..... !!


28) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती ,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती .... !!


29) आपण किती पैसा मिळवला यापेक्षा , तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले , हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो .... !! ..... !!

 A forward...


आजकाल *देवांची* व *देवस्थानांची* अवस्था सुद्धा *डॉक्टरांसारखीच* झालीय,


म्हणजे *गावातला देव* किंवा *मंदीर* म्हणजे *BHMS* किंवा *BAMS* डॉक्टर.

किरकोळ सर्दी, पडसं, थंडीताप, छोटे मोठ्या तक्रारी अडचणी असतील तर या डॉक्टर कडे जायचे.


जरा *मध्यम आजार* असेल तर *अष्टविनायक,* *गणपती पुळे,* *पावस,* *चाफळ* वगैरे ठिकाणी गेलं म्हणजे कसं *MBBS* वाल्याकडं गेल्यासारख वाटतं.


 जरा *कडक आजार* असेल तर *मांढरदेवी,* *जेजूरी,* *पाली,* *शनी शिंगणापुर* असे जरा *प्रयोगशील डॉक्टरर्स,* डिग्री मोठी नसताना पण धाडसानं प्रँक्टीस करणाऱ्या डॉक्टरां सारखेच.


*शिर्डी,* *सिद्धीविनायक,*

*दगडूशेठ,* *लालबाग,*  म्हणजे *MS,* *MD.* थोडा खर्च जादा पण *स्पेशालिस्टकडे* गेल्यासारखा अनुभव येतो.


*तिरूपती,* *अमरनाथ,* *वैष्णवीदेवी,** म्हणजे *फॉरेन रिटर्न डॉक्टरच!* हे शक्यतो पैसेेवाल्यांचे डॉक्टर. पैसा कितीही गेला तरी चालेल पण गुण एकदम झकास आला पाहिजे. सगळे आजार बिजार एकदम गायबच झाले पाहिजेत. इथे सामान्य पेशंटना सहजासहजी प्रवेश नाही.


आणि एकीकडे


*पंढरीचा पांडूरंग* म्हणजे आपला *सरकारी डॉक्टर,*

कमी पैशात सगळ्या गोरगरीबांची दुखणी बरी करणार. कधीही जावा, कधीही उठवा, रागावणार नाही का आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करू असली भानगड नाही. पैसे द्या अथवा देवू नका, दारात येईल त्याच्यावर औषधोपचार करणार...

🙏🏻🌞शुभ सकाळ🌞🙏🏻

   🌹🙏आजची गोड सुरवात 🙏🌹


🌹🙏जय सदा आनंद 🙏🌹

        


अती कोपता कार्य जाते  लयाला, 

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।


अती लोभ आणी जना नित्य लाज,

अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।


अती मोह हा दु:ख शोकास मूळ, 

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।


अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,

अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।


अती दान तेही प्रपंचात छिद्र, 

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।


अती भोजने रोग येतो घराला, 

उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।


अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, 

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।


अती आळशी वाचुनी प्रेतरूप, 

अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।


अती द्रव्यही जोडते पापरास, 

अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।


अती भाषणे वीटती बुद्धिवंत, 

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।


अती वाद घेता दुरावेल सत्य, 

अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।


अती औषधे वाढवितात रोग, 

उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।


अती दाट वस्तीत नाना उपाधी, 

अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।


अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, 

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।


अती भूषणे मार्ग तो संकटाचा, 

अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।


स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, 

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।


अती भांडणे नाश तो यादवांचा, 

हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।। 


अती गोड खाणे नसे रोज इष्ट, 

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।


जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, 

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।


सदा पद्य घोकोनियां शीण येतो, 

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।


🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹