जगातले समर्थ !

न कळे काय हे शांततेचा अर्थ

लाविती 'समर्थ' जगातले?

विश्वबंधुत्वाची करिती घोषणा

न कळे कल्पना काय त्यांची !

दुबळ्यांच्या माथा ठेवूनीया हस्त

म्हणती हे, 'स्वस्थ बसा आता!'

पिंजर्‍याचे दार करूनीया बंद

म्हणती हे, 'नांदा सौख्यभरे!'

बोलती, 'जगाचे कराया रक्षण

लढतो भीषण महायुद्ध!'


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा