रम्या : अहो चम्या शेठ, ही रिसिट बघा. पाच वर्षांपूवीर् मी माझे फाटलेले बूट तुमच्याकडे शिवायलादिले होते. मी ते विसरूनच गेलो होतो.
चम्या : नो प्रॉब्लेम. मी शोधून काढतो.थोड्या वेळाने चम्या धुळीने माखलेला एक बॉक्स घेऊन येतो.
रम्या : अरे वा, मला तर विश्वासच बसत नाहीय की तुम्ही एवढ्या आठवणीने माझे बूट ठेवले असतील.
चम्या : इट्स ओके. ग्राहकांचं समाधान हेच तर आमचं उद्दीष्ट आहे. असो, आता ८ दिवसांनी बूट न्यायला या. अजून त्याची शिलाई बाकी आहे.
२०७०- एपीजे अब्दुल कलाम
२०७० मध्ये लिहिलेलं एक पत्र
मी नुकतच ५० पूर्ण केलय भासतो मात्र ८५ चा मला किडनीचा त्रास आहे पाणी कमी पिण्यामुळे वेळ नाही जास्त आता माझ्यापाशी जगण्याचा मी ५० पूर्ण केलय सर्वात वयस्क व्यक्ती मी या समाजाचा...
लहानपणी माझ्या परिस्थिती वेगळी होती हिरवळ होती पाऊस होता भिजण्यातली मजा होती आज सारं मी फक्त स्मरतो कृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...
लहानपणी आयाबायांचे सुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी घरीपाण्याचे पाईप असतआता केसच नाही कुणाला पाणीच नाही कुठे वापरायला पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुनाजागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..
आठवतं मला आज "पाणी वाचवा"चे फलक असायचेत लोक मात्र फलक म्हणून फक्त वाचायचेत आता नद्या तलाव सारं काही सुकलं आहे उरलं सुरलं असेल काही दुषित होऊन बसलं आहे..
उद्योग धंदे संपले आहेत वाढलीय बेरोजगारी खा-या पाण्याला पिण्याजोगं करण्याचीच सारी तयारी तोच एक उद्योग आहे कामगार आहेत "पाणी" पगारी
पाण्यासाठी सगळी कडेदंगे सतत सुरू आहेत आजचे दिवस खरच खूप वेगळे आहेत "दिवसाला ८ पेले" आधी पाणी आवश्यक असे आज फक्त अर्धा पेला माझ्यासाठी उरला आहे...
कसा दिसतोय माणूस आज? सुकलेला, सुरकुतलेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनीपुरता पोळलेला त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजारमृत्युच्या कारणांने ग्रासलेला...
पाण्याच्या अभावी विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो कळलय न कारण "पाण्याचा अभाव" पण उपाय काहीच आमच्याजवळ नसतो..पाण्याचं उत्पादन अशक्य झाडे नाही.. हवा दुषित पुढची पिढी अशीच असणार रापलेली, पोळलेली, त्रासित
आज श्वास घेण्यासाठी हवा विकत घेतो आम्ही "१३७ मी क्युब" हवा विकत घेतो आम्ही जे घेऊ शकत नाही कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात दुषित हवा घेत बिचारे मरेस्तोवर जगत जातात
जिथे कुठे असेल पाणी कडेकोट जपल्या जाते पाउस पडलाच कधीतर आम्लवृष्टी होते विसाव्या शतकाचा निष्काळजीपणा भोगतोय बजावलं होतं वाचवा पाणी? फळ आता आम्ही साहतोय
माझ्या बालपण ऐकताना मुलगा माझा विचारतो "कुठेय हो पाणी आता"? मी फक्त आवंढा गिळतो...दुखी होण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाहीमी देखिल कारणीभूत या सगळ्याला मी ही त्याच पिढीचा अंश असतो
आता माझीच मुलं बाळं माझी चुक भोगताहेत फार फार मोठी किमंत माझ्या चुकिची देताहेत अशीच भोगत राहतील कारण मागे जाणं शक्य नाहीपुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही
कसं तरी करून मला मागे जायलाच हवं माझ्या पुर्वजांना मला मला कळकळीनं सांगायला हवं"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं" अजून वेळ गेली नाही त्यांनी समजायला हवं
मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम
मी नुकतच ५० पूर्ण केलय भासतो मात्र ८५ चा मला किडनीचा त्रास आहे पाणी कमी पिण्यामुळे वेळ नाही जास्त आता माझ्यापाशी जगण्याचा मी ५० पूर्ण केलय सर्वात वयस्क व्यक्ती मी या समाजाचा...
लहानपणी माझ्या परिस्थिती वेगळी होती हिरवळ होती पाऊस होता भिजण्यातली मजा होती आज सारं मी फक्त स्मरतो कृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...
लहानपणी आयाबायांचे सुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी घरीपाण्याचे पाईप असतआता केसच नाही कुणाला पाणीच नाही कुठे वापरायला पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुनाजागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..
आठवतं मला आज "पाणी वाचवा"चे फलक असायचेत लोक मात्र फलक म्हणून फक्त वाचायचेत आता नद्या तलाव सारं काही सुकलं आहे उरलं सुरलं असेल काही दुषित होऊन बसलं आहे..
उद्योग धंदे संपले आहेत वाढलीय बेरोजगारी खा-या पाण्याला पिण्याजोगं करण्याचीच सारी तयारी तोच एक उद्योग आहे कामगार आहेत "पाणी" पगारी
पाण्यासाठी सगळी कडेदंगे सतत सुरू आहेत आजचे दिवस खरच खूप वेगळे आहेत "दिवसाला ८ पेले" आधी पाणी आवश्यक असे आज फक्त अर्धा पेला माझ्यासाठी उरला आहे...
कसा दिसतोय माणूस आज? सुकलेला, सुरकुतलेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनीपुरता पोळलेला त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजारमृत्युच्या कारणांने ग्रासलेला...
पाण्याच्या अभावी विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो कळलय न कारण "पाण्याचा अभाव" पण उपाय काहीच आमच्याजवळ नसतो..पाण्याचं उत्पादन अशक्य झाडे नाही.. हवा दुषित पुढची पिढी अशीच असणार रापलेली, पोळलेली, त्रासित
आज श्वास घेण्यासाठी हवा विकत घेतो आम्ही "१३७ मी क्युब" हवा विकत घेतो आम्ही जे घेऊ शकत नाही कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात दुषित हवा घेत बिचारे मरेस्तोवर जगत जातात
जिथे कुठे असेल पाणी कडेकोट जपल्या जाते पाउस पडलाच कधीतर आम्लवृष्टी होते विसाव्या शतकाचा निष्काळजीपणा भोगतोय बजावलं होतं वाचवा पाणी? फळ आता आम्ही साहतोय
माझ्या बालपण ऐकताना मुलगा माझा विचारतो "कुठेय हो पाणी आता"? मी फक्त आवंढा गिळतो...दुखी होण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाहीमी देखिल कारणीभूत या सगळ्याला मी ही त्याच पिढीचा अंश असतो
आता माझीच मुलं बाळं माझी चुक भोगताहेत फार फार मोठी किमंत माझ्या चुकिची देताहेत अशीच भोगत राहतील कारण मागे जाणं शक्य नाहीपुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही
कसं तरी करून मला मागे जायलाच हवं माझ्या पुर्वजांना मला मला कळकळीनं सांगायला हवं"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं" अजून वेळ गेली नाही त्यांनी समजायला हवं
मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
आई-भाऊसाठी परी मन खंतावत,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||१||
विसरली का ग? भादव्यात वरस झाल
माहेरीच्या सुखाला ग मन आसावल,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||२||
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
आई-भाऊसाठी परी मन खंतावत,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||१||
विसरली का ग? भादव्यात वरस झाल
माहेरीच्या सुखाला ग मन आसावल,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||२||
थांब जरासा
मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा ! ॥धृ.॥
वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा ! ॥१॥
ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा ! ॥२॥
नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा ! ॥३॥
गीत : ना. घ. देशपांडे
संगीत : यशवंत देव
स्वर : कृष्णा कल्ले
थांब जरासा ! ॥धृ.॥
वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा ! ॥१॥
ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा ! ॥२॥
नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा ! ॥३॥
गीत : ना. घ. देशपांडे
संगीत : यशवंत देव
स्वर : कृष्णा कल्ले
चेहर्यावर चेहरे
चेहर्यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.
कॉपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.
मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?
एका वर्षात अनेक वॆळा
इथे वाढदिवस साजरे होतात.
शुभेच्छा लाटणारांच्यासमोर
इथे शुभेच्छुकच लाजरे होतात.
नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.
कॉपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.
मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?
एका वर्षात अनेक वॆळा
इथे वाढदिवस साजरे होतात.
शुभेच्छा लाटणारांच्यासमोर
इथे शुभेच्छुकच लाजरे होतात.
नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!
याल्गार
नशीबास ’कर हवे तेवढे वार’ म्हणालो
’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो
केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो
खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो
रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो
कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते...
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो
रडलो नाही... लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन् ’याल्गार’ म्हणालो
-गुरु ठाकूर
’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो
केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो
खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो
रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो
कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते...
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो
रडलो नाही... लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन् ’याल्गार’ म्हणालो
-गुरु ठाकूर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)