कोणी गेलं म्हणून

कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...

आठवणींच्या वाटांवरून
आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...

आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही, रात्र तुझीच आहे.
त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं...

कोणी गेलं म्हणून..

दळिता कांडिता

दळिता कांडिता ।    तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी ।    तुझे नाम ग मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार ।    मुखी हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी ।    तू बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागले चरणासी ।    म्हणे नामयाची दासी ॥५॥


रचना     -    संत जनाबाई
संगीत    -    सुधीर फडके
स्वर       -    आशा भोसले
चित्रपट   -    संत जनाबाई (१९४९)
एक T.C पाच बायकांना पकडतो...
त्यातल्या पहिल्या बाईने साडी घातलेली असेत म्हणुनतो T.C.तीच्याकडुन 400 रु घेतो...
.
दुसर्या बाईन जीन्स घातलेली असतेतो TC. तीच्याकडुन 300 रु घेतो..
.
तीसर्या बाईने हाफ टॉप आणी स्कर्ट घातलेली असते तो T.C. तीच्या कडुन 200रु घेतो..
.
चौथ्या बाईने त्यापेक्षाही हाफ स्कर्ट घातलेला असतो तो T.C. तीच्याकडुन 100रु घेतो....
.
तर तो T.C. त्या पाचव्या बाईकडुन पैसे नाही घेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्या बाईकडे तिकीट असते..
.
विचार बदला...
देश बदला..
मित्राचे कोणते पाच शब्द आपले कॉलजचे
अक्खे वर्ष वाया घालवु शकते ?
.
.
.
.
.
.
.
.
- शप्पथ ! ती तुझ्याकडेच बघत होती

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपीतं पेरली !

माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत
पावसात समावतं, माटीमधी उगवतं !

अरे देवाचं दर्सन झालं झालं आपससूक
हिरिदांत सूर्याबापा दाये अरूपाचं रूप

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझं येणं-जाणं वारा सांगे कानांमधी


गीत       -     बहिणाबाई चौधरी
संगीत    -     यशवंत देव
स्वर       -     उत्तरा केळकर  

स्वप्‍न

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !

स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?

स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले

स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्‍त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले

स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले

जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले


गीतकार    -     विंदा करंदीकर
संगीत       -     यशवंत देव
स्वर          -     पद्मजा फेणाणी-जोगळेकर
गीतसंग्रह  -    ही शुभ्र फुलांची ज्वाला
ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परकं घर आपलं मानायचं?
तिच्याकडून का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची?
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे,
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून...
तो येतो का कधीतरी तिच्याकडे
आपली वाट मोडून,
तीचं पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती 
त्याचीच बनून जाते...
एकदा सागर विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते,
पण म्हणून नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं...
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं...!!