ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परकं घर आपलं मानायचं?
तिच्याकडून का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची?
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे,
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून...
तो येतो का कधीतरी तिच्याकडे
आपली वाट मोडून,
तीचं पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती 
त्याचीच बनून जाते...
एकदा सागर विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते,
पण म्हणून नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं...
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं...!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा