सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा