दुःखाला सामोर जाण्यातच खर कौशल्य असत ...
त्यात जमिनीवरच राहून आकाशात उडायचं असत ...
आपल्या मनासारख कधीच घडत नसत ...
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असत ....
उन एकट कधीच येत नाही
ते सावलीला घेऊनच येत
फक्त ....
सावलीला प्रकट व्हायला ...
झाडाचं अस्तित्व लागत ....
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येत
दुःखाच अन सुखाच हेच नात असत .......
दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ....?
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का.....?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा