गंगुबाई

एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......

डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात.

लेडीस डब्बा

रेल्वे स्टेशन वरून लोकल सुटत असते....

झंप्या घाई घाईत नेमकी "लेडीस" डब्ब्यात चढतो...

टी.सी :- अरे मुर्खा, दिसत नाही तुला हा लेडीस डब्बा आहे ते..
...
झंप्या :- अरे बाप रे... सॉरी हा.. मला वाटलं तुम्ही "पुरुष" आहात...

माणसाचे चार मित्र

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाडप्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....
तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभागअसतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो,""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हामाझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडेयेते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्यासंपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्तझालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

व्हॅलेन्टाईन्स चा दिवस

व्हॅलेन्टाईन्स डे चा येऊन गेला दिवस |
पोरा पोरियनं धरले होते प्रेमाचे नवस ||
गावभर हिंडून फुल देत फिरावं |
जो फसन जाळ्यात त्याले नाही सोडावं ||
काय आहे नियम खरचं का कयते |
आय लव्ह यु म्हणाले बापाचं काय जाते ||
सेम टू यु म्हणून झंडी दाखवावं हिरवी |
लफडेबाज पुस्तके वाचून घ्यावं सारी ||
मंग कानी प्रेमाचा सुरु होतो खेल |
दुपारी सिनेमा, संध्याकाळी भेल ||
आतंकवाद्यावानी बांधून तोंडाले |
मोकये यायले रानं गाडीवर मंग फिराले ||
लाज, शरमिले पार मंग सुट्टी |
शाळा, कॉलेजचे रोजच मंग गट्टी ||
फेशनचा जमाना रापचिक कपडे |
एकानं दहासंग खुशाल करावं लफडे ||
नवीन पिढीचं दिमाग लागले फिराले |
हृदयाले करून जमीन, प्रेम लागले पेराले ||
प्रेमाच्या नावावर नुसते मजे |
गरम तेल एकाचं दुसर्यान् तयाव भाजे ||
सरता वर्षे अजून धरावं नवसं |
व्हॅलेन्टाईन्स डे चा केव्हा येनं दिवस ||

बस आणि बायको

बस गच्च भरली होती.
आता ती सुरु होणार तोच ड्रायव्हर म्हणाला," गाडीचा टायर पंक्चर आहे"
ताबडतोब कंडक्टर उतरला. त्याच्या मागोमाग गण्या उतरला,
दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला,
बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली
कंडक्टर गण्या ला म्हणाला," मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे.
आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत ,
पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत.
मी खरच खूप आभारी आहे.

गण्या म्हणाला," मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही .
माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे,
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीच रद्द होऊ नये म्हणून...........
नासा मंगळावर पाठवण्यासाठी सर्व उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेत होते
त्यात ३ देशाचे लोक इंटरव्यू साठी आलेले
फक्त एकाच व्यक्ती मंगळावर जाऊन पुन्हा पृथ्वी वर येणार असते
पहिला उमेदवार एक रशिया चा इंजिनिअर असतो,त्याला विचारले जाते कि मंगळावर जाण्यासाठी त्याला किती रुपये हवे
रशियन इंजिनिअर: एक करोड रुपये,कारण मी ते सर्व पैसे संशोधनासाठी दान करेल

दुसरा उमेदवार होता अमेरिकेचा इंजीनिअर
त्याला पण हाच प्रश्न विचारला गेला
त्याने दोन करोड रुपये मागितले
अमेरिकन इंजिनिअर : मी एक करोड रुपये माझ्या परिवाराला देईल तर उरलेले एक करोड रुपये समाजसेवेसाठी दान करेल

आणि सर्वात शेवटचा उमेदवार होता भारताचा "लालू प्रसाद यादव "
जेव्हा त्याना विचारले गेले कि त्याला मानधन म्हणून किती रुपये हवे तेव्हा तो हळूच इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या कानात बोलतो फक्त “तीन करोड रुपये”
इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आश्चर्य चकित होऊन विचारतो कि इतर सर्वांपेक्षा जास्ती का बरे
लालू प्रसाद यादव : साहेब एक करोड तुम्ही ठेवा, मी एक करोड ठेवतो आणि उरलेले एक करोड त्या इंजिनिअरला देऊ आणि देऊ कि पाठवून त्याला मंगळावर
चम्प्या आणि त्याचा मित्र
दुपारी जेंव्हा एका गाड्यावर पराठे
खायला गेलेले असतात ,

तिथे दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत
येतात ..!!!

त्यांनी ऑर्डर दिली आणि गप्पा मारत
राहिल्या,

बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर त्यांची ऑर्डर
आली...!!!

आणि जसे त्यांनी खायला स्कार्फ
काढला आणि एकमेकांकडे पहिले
...
...
...
....
....
...
...
...

पहिली: अय्या तू चिंगी नाहीस...!!!

दुसरी:अय्या तू पण मिनी नाहीस....!!!
चम्प्या डॉक्टर - काय झालाय तुम्हाला?

झंप्या - मला ताप आलाय..

चम्प्या डॉक्टर - एक काम करा..घरी जा..एकदम थंड पाण्याने आंघोळ करा..
आणि पंख्याखाली झोप बिना शर्टच..आणि उद्या ये..

झंप्या - ह्याने मी बरा होईल का?

चम्प्या डॉक्टर - नाही रे येड्या..तुला निमोनिया होईल..
आणि मी निमोनिया चा डॉक्टर आहे....
मैत्रीण आपल्या मित्रला
दारू पिऊन गाडी चालू नको आज काल खूप accidents होत आहेत
मित्र :थान्क्स डीअर तू खूप काळजी करतेस .
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
मित्र आपल्या मित्रला
दारू पिऊन गाडी चालू नको आज काल खूप accidents होत आहेत
मित्र:साल्या कुत्र्या बापाला जास्त अक्कल शिकाऊ नको .
बायको : "अहो एक सांगू का? पण मारणार.
तर नाही ना?"
नवरा : "हो सांग ना.
बायको : मी गरोदर आहे."
नवरा : "अग हि तर आनंदाची बातमी आहे
मग तू एवढी घाबरतेस का?"
बायको :
"कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मारलं
होत

शिक्षण

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.

वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू
उभारतात आणि त्यात झोपी जातात.

काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात
व म्हणतात-

वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय?

मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.

वडील: ते तुला काय सांगत आहेत?

मुलगा: खगोलशास्त्रानुसार, ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.

वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत
आहेत कि आपला तंबू चोरीला गेला....
(शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)
बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''

नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''

प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.''

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.''

आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''

सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.''

नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.''

प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''

विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''

आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ''माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता...'' ....!!

झाड

"साला एक झाड नाही या रस्त्यावर! लाजिरवाणी गोष्ट आहे",
भरधाव सुटलेल्या बसचा ड्रायव्हर स्टीअरिंग व्हीलवर मूठ आदळत ओरडला.
भाबडे बाई डोळे मोठ्ठे करून पापण्यांची पिट पिट पिट पिट करीत म्हणाल्या,
"कौतुकच आहे हो तुमचं. पर्यावरणाचा, सामाजिक हिताचा इतका विचार कोण करतं आजकाल!"
" पर्यावरण?" ड्रायव्हर संतापून म...्हणाला, "अहो, बाई, ब्रेक फेल झालाय बसचा !!!!"

पुणेरी भाषांतरे !!!!

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
.............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
................ ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..

Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client
............... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.

Avoid speaking in regional languages within the office premises
.............. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette butts only into ash pans provided for
............... ही जागा तुम* तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडीचा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही ..

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries
............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

भीती

चम्या आणि रम्या जंगलात फिरयला गेले असतात.
रात्र होते, आणि दोघेही रस्ता चुकतात.
दोघांना हि पोटात कळ येते,
पण दोघे घाबरून एकमेकांना पाठ करूनच बसतात.
झाल्यावरती
चम्या:- काय रे भीती वाटते का ?
रम्या:- नाय बा.
चम्या:- मग माझ मी धुईल कि रे, तू का मदत करतोस रे.

एक प्रेम कथा...

एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते, मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता, मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले. ...
मुलगा : मला आई लव यु बोल...
मुलगी : आई लव यु, आता तरी हळू चालव.
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आता तरी हळू चालव....
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.
मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले.
दुसरा दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला पण ती मुलगी Helmet मुळे काहीहि इजा न होता वाचली.. कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता.

❂❂❂ शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार ❂❂❂



▶मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

▶इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."

▶मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

▶प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

▶ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

▶एन्टोनियो (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

▶मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

▶डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."
दुःखाला सामोर जाण्यातच खर कौशल्य असत ...
त्यात जमिनीवरच राहून आकाशात उडायचं असत ...
आपल्या मनासारख कधीच घडत नसत ...
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असत ....
उन एकट कधीच येत नाही
ते सावलीला घेऊनच येत
फक्त ....
सावलीला प्रकट व्हायला ...
झाडाचं अस्तित्व लागत ....
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येत
दुःखाच अन सुखाच हेच नात असत .......
दुखं नसेल आयुष्यात तर ....
सुखाची मजा घेता येईल का ....?
ओल न होता कधी
पावसात भिजता येईल का.....?

प्रश्न??????

तेच ते... नेहमीचे...
तरीही सारे काही नवीन....
उगाचच धावत राहतो आपण...
त्याच आखुन दिलेल्या रिंगणात....
कारणाशिवाय......
दमलो की विचारात पडतो....
का धावलो.... काय मिळवण्यासाठी......
पुन्हा एक नवा प्रश्न....
प्रश्न पाचवीलाच पुजलेला....
असेच प्रश्नांमागुन प्रश्न...
फक्त सतावणारे......
गुंता करुन विचारांचा,
स्वतःमध्ये गुंतवणारे.....
उगीच जिवाला घोर लावणारे......
गुरफटलो.... अडकलो .....
की एकटे सोडुन जाणारे....
नकळत फसवणारे...
ओक्साबोक्षी रडवणारे...
अवचीत हसवणारे.....
शब्दगंध खुलवणारे.....
सकाळच्या कोवळ्या उन्हात,
दवबिंदुंसम ओघळणारे....
प्रश्न कणांकणाने मारणारे.......
धावत्या वाटेवरती,
ओळखीच्या पाऊलखुणा शोधणारे......
अलगद अडखळणारे....
त्या कान्ह्याच्या मोरपिसासम,
मंजुळ तानेवर डोलणारे......
प्रश्न मनात कल्लोळ उठवणारे......
काहीसे बोलके....... बरेचसे मौन.....
प्रश्न तुला नी मला व्यक्त करणारे.....
प्रश्न मनातली गुपीते फोडणारे.....
प्रश्नांत दडलेले प्रश्न....
विचार करायला लावणारे.....
प्रश्न आयुष्याला नवे ध्येय देणारे...
अंधा-या वाटेवर दिपस्तंभासम दिशा दाखवणारे.....
प्रश्न हरणारे.... हरवणारे...
प्रश्न संपणारे.... संपवणारे......
प्रश्न तुला नी मला दुर नी जवळ आणणारे...
प्रश्न आयुष्य बनुन जाणारे.....
आयुष्य बनुन जाणारे....

पहिल्या मिलनाचि रात्र

पूनवेची रात्र
त्याला चांदण्याची झालर
बहरलेला प्राजक्त
त्याला सुगंधाचा पाझर

जवळच कुठे तरी…
सजलेली एक परी
वाट बघते तिच्या रायाची
आज आहे रात्र पहिली
तिच्या अन् त्याच्या मिलनाचि

नजर खीळलेली पाऊलावर
चले कांकणाशि खेळ
क्षण किती सरले
भान नाही तिला
वाट पाहता रायाची
जाता जात नाही वेळ

मनी भावनांचा कल्लोळ
मुखी लाजेचा रक्तिमा
अर्धोन्मिलित डोळ्यात तरळे
मिळनाची आर्तता

राया, राया….. आता नको पाहूस
तू असा अंत
डोळे शिणले माझे
पाहुनिया वाट
तहानलेले मन माझे
आसुसलेला देह
ये, मिठीत घे मला
कर माझ्याशी संग

रायाने तिच्या जणू तिची साद ऐकलि
तो खोलीत आला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला

अन्…. शहारले शरीर
चेतले तिचे अंग
उष्ण झाले श्वास
धडधडले उरोज
घायाळ झाले दोघे
लागला मदन बाण
एक झाले दोन देह
पुनवेच्या रात्रीला चढला प्रणयाला बहर ...
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं, मला घटस्पोट हवाय." तिने शांतपणे विचारल,- "का?" तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे, हे तिल जाणून घ्यायचं होत; पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो. माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला. तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती. तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती. लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली. घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नित बघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय, असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता. आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी परत आयुष्यात येत होती. महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही. जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

काही तरी मिसिंग आहे...

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी मिसिंग आहेच...

असून पैसे आज माझ्या कडे,
पण तो 'कुल्फीवाला मामा' मिसिंग आहे...

खूप मित्र आहेत माझे पण,
ती 'कंचे खेळायची जागा' आज मिसिंग आहे...

आज ही ती शाळा तिथेच आहे,
पण माझा तो 'बाक' आज मिसिंग आहे...

सकाळी तर दर रोज उठतो मी,
पण ती झोप मोडणारी 'चिमण्यांची जोडी' आज मिसिंग आहे...

आईच्या हातची आंघोळ,
ती आजीच्या गप्पांनी रंगलेली रात्र,
आज कुठे तरी मिसिंग आहे..

आज बरंच काही कदाचित खूप काही आहे माझ्या कडे ...
पण तरी काही तरी खरच आज मिसिंग आहेच...

भेट आपली शेवटची

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील |
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील |

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल |
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल |

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही |
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही |

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही |
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही |

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल |
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल |

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील |
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील |

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही |
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही |

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही |
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.......!!!!!

पोरी म्हणजे पोरीच असतात

या पोरी म्हणजे पोरीच असतात,
कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात...

जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...

ज्यांना आपल्यात इंटरेस्ट अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज असतात...

नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे नसतात,
आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.२५ ची कॉफी घेऊन असतात...

सांभाळतात आम्हाला म्हणून
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात,
पण काही हि म्हणा....या पोरी एकदम भारी हसतात...
घायाळ करतात....परवानगी न घेता एकदम मनात बसतात....
झंप्या नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी झंप्याला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सांगता आले नाही.

झंप्याची आई : काय रे मास्तरड्या, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाक पोराला पास.
एक परदेशात कामाला असलेला मुलगा स्थळं बघण्यासाठी भारतात आलेला असतो.
कांदे-पोह्यांच् या कार्यक्रमासाठी तो आणि आई-बाबा एका मुलीच्या घरी येतात.
औपचारिक गप्पा-टप्पा झाल्यावर मुलाला आणि मुलीला जरा ओळख वाढावी यासाठी बाल्कनीत एकांतात पाठवतात.
मग असेच १-२ प्रश्न-उत्तरे झाल्यावर मुलगा विचारतो , "इंग्लिश जमते का ? "
.
.
.
.
.
.
.
मुलगी - हो ,पण सोड्याबरोबर
झंप्या : मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार

गर्लफ्रेंड : का ?

झंप्या : घरचे विरोध करत आहेत.

गर्लफ्रेंड - घरी कोण कोण आहे?

झंप्या : बायको आणि २ मुले
एकदा एक सरदार मरण पावला.

त्याच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली. बॅंड बोलावण्यात आला. घरुन निघाल्यावर अंत्ययात्रेत सर्व बॅंडच्या तालावर नाचू लागले. भांगडा करु लागले.

रस्त्याने बघणारे नवल करत होते कि अशी अंत्ययात्रा कधी बघितली नाही.
...
राजाभाऊंनी एका सरदाराला बाजूला घेऊन विचारले," अरे ही अंत्ययात्रा असताना तुम्ही लोक असे का नाचताहात ?"

सरदार म्हणाला," पहिल्यांदाच कुणी सरदार ब्रेन ट्युमरने मेला, आता कोणी म्हणणार नाही सरदारांना ब्रेन नसते." आणी तो परत नाचायला लागला.
चम्या : माझे स्वप्न आहे मी माझ्या वडिलांसारखच महिन्याला ५००००० रुपये कमवावेत.

पम्या : तुझे बाबा महिन्याला ५००००० रुपये कमावतात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चम्या : नाही रे, त्यांचही स्वप्न आहे कि महिन्याला ५००००० रुपये कमवावेत !
मिथुन चक्रवर्ती ला जर

दोन मुले असतील तर त्यांची नावे काय आहेत?

.

.

.

.

इथुन आणि तिथुन !!!
ज्या मुलाच्या वडिलांना ४ बहिणी आहेत, त्या मुलाचे नाव काय?
.

.

.

.

.
आत्याचार....!!!

बोलणारे घड्याल

एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो,
भिंतीवर एक घड्याळाच चित्र
काढलं होत.

मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ?

बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो.
बघ आता.
बेवडा जमिनीवर
पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात
मारतो.
.
.
.
.
.
.
शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३
वाजलेत, झोप आता.

बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना.
दोन बायका एका बस मधे जागेवरुन भांडत होत्या. बराच वेळानंतर चम्या आला व म्हणाला," तुमच्या पैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.आणि ती एक सीट रिकामीच राहिली !
एका आरोपीला कोर्टात २ खुनांच्या आरोपात हजर केले जाते...

जज : तूम्ही तूमच्या बायकोला हातोड्याने मारल्याचा आरोप तुमच्यावर आहे..

(पब्लिकमधून आवाज येतो, "हरामखोर...")

जज: (दुर्लक्ष करून) तसेच तूमच्या सासूला सुद्धा तूम्ही हातोड्याने मारून निर्घृण हत्या केली आहे...

(पुन्हा मागून आवाज येतो, "अरे दगाबाज साल्या....")

जज: (त्याच्याकडे पाहून) हे पहा तुमचा राग मी समजू शकतो... पण तूम्ही असे कोर्टात ओरडू शकत नाही.. अथवा मला तुमच्यावर पण खटला भरावा लागेल... मी ह्या आरोप्याला योग्य ती शिक्षा देणार आहे. तूम्ही कृपया शांत रहा...

तो ओरडणारा माणूस: अहो तस नाही ओ, मी ह्याचा शेजारी आहे आणि आत्तापर्यंत ३-४ वेळा ह्याच्याकडे हातोडा मागितला... आणि हा हरामखोर माझ्याकडे नाहीये अस बोलला...

सांग आठवतोय ना तुला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....

..... सांग आठवशील ना मला ?



सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?


कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?

अवघड वळणावरचा वेडा बहाणा


तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला

तुजवर रचलेल्या कवितांमधून


जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

राहूनच गेलं...

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.


तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.


हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...
सरदार सांतासिंग ज्योतिषाला :माझे लग्न कधी होणार ?"

ज्योतिषी : तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही."

सांता : कां ?

ज्योतिषी : अरे तुझ्या नशिबात अपार सुख लिहीलय !
बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले," जाहिरातीत छापा "बळवंतराव आज सकाळी अचानक गेले."
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो, तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली, तर छापा,"बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे."

कोलंबसची मराठी बायको

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला


नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

... काय शोधायला जाताय?

इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मी पण येऊ का?

कोलंबस: जाउ दे नाही जात...

आयला आयटम

मराठीचा वर्ग सुरू होता
बाईंनी वाक्य सांगितलं,
' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.'
या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.'
हात वर करून विन्या लगेच उद्गारला,
' आयला आयटम!!!'
परीक्षेच्या निकालानंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...

जर नापास झाला तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .

पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....

सगळे बदलतात पण मित्र नाही.
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते....

नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : अय्या !!!!
सासूबाई !!!!!
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...!
.
.
.
.
....
.
घरमालक:- अरेSSS.....!१५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!
मुलगा - बाबा माझ्या वर्गातला एक मुलगा मला gay असं चिडवतो.

बाबा - मग २ सणसणीत कानाखाली दे ना त्याच्या.
.
.
....
.
.
.
मुलगा - नको बाबा, तो फ़ार cute आहे!!!!!!!!!!
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ......
त्यात एक कुत्रा हि नाचत होता....
लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? " .........

त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना !!!!!!! :)
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी आण.

बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!!

आजोबा - माहितीये रे.......
... समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे!!!!!!!!!!!!!
पत्रकाराने एका जखमीला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"

जखमी रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला
.
.
....
.
.
.
.
.
"धप्पा"!!!!!!!!
बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.

नवरा - कशावरून???

.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?

बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.

हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,'' आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का???????

मुलगा थोडा वेळ विचार करतो.......तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,




" हे बघ,बोअर करु नकोस."!!!!!!!!
संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात.
शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?

बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"जमिनीवर!!"
चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....

पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
पलीकडचा आवाज - मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे.
पलीकडचा आवाज - आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे.
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
पलीकडचा आवाज - जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे.
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग.
पलीकडचा आवाज - जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग...

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?

पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे????

प्रश्न की आमंत्रण?

वरपिता : तर... तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय.

बंडू: होय.

वरपिता : बरं... मला सांगा तुम्ही ड्रींक्स वगैरे घेता का?

बंडू : अम्मं... एक विचारू?

वरपिता : बेशक!

बंडू : हा प्रश्न आहे की आमंत्रण?

कॉफी

बंड्या : एक कॉफी केवढ्याला???
वेटर: ५० रुपये, साहेब.
बंड्या : गप ये............ समोरच्या दुकानात ५० पैशाला आहे!!!
.
.
.
.
.
.
वेटर: ते xerox च दुकान आहे!!!
डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
.
.
.
.
.
.
पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.... !!

माणूस व रेल्वे

एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.

रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबते. रेल्वे चालक संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात आणि त्याला प्रश्न विचारतात.

अधिकारी- संता, तू असे का केलेस..??

संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.
मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून बाजूला जात
नव्हता.

अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..?? एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात
घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??

संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय करणार..??














आई" हा फक्त शब्द पुरेसा आहे ......
आई म्हणजे .........
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे
सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार
पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर
घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच
लढायची
एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस
जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील...

ब्रम्हगुप्त



ब्रम्हगुप्त हा एक प्रतिभाशाली भारतीय खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा जन्म शके ५२० (इस. ५९८) मध्ये झाला.

ब्रम्हगुप्त व्याघ्रमुख राजाच्या राज्यसभेत खगोलशास्त्रज्ञ होता. व्याघ्रमुख राजा उत्तर गुजरातचा प्रमुख होता. त्याची राजधानी भिनमाळ येथे होती. भारतात सातव्या शतकात ह्युएनत्संग ह्या परदेशी प्रवाशाचे आगमन झाले. त्याचेही आपल्या प्रवास वर्णनात भिनमाळसंबंधी मोठ्या गौरवाने लिहिले आहे. अल्बेरुणी हा व्यासंगी इतिहासकारही भिनमाळसंबंधी आवर्जून लिहितो. ब्रम्हगुप्तच्या वडिलांचे नाव जिष्णुगुप्त असून आजोबांचे नाव विष्णुगुप्त असे होते. ब्रम्हगुप्त जातीने वैश्य होता. ब्रम्हगुप्त हा वराहमिहीराचा शिष्य असावा. वराहमिहीराचे वास्तव स्थान उजनी होते. ते भिनमाळच्या जवळपास आहे. त्यावरून ह्या गुरू-शिष्यसंबंधास एक प्रकारे दुजोराच मिळतो. ब्रम्हगुप्तास 'आर्यभटीय', 'पंचसिद्धांतिका', 'बृहतजातक', 'लघुजातक' ह्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कल्याणवर्मा ह्याचा 'सारावली' ग्रंथ त्याने अभ्यासला. ग्रीकांच्या खगोलशास्त्र विषयक ग्रंथाचे ब्रम्हगुप्ताने अवलोकन केले असावे असा अल्बेरुणी चातर्क आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न झाले.

ग्रंथसंपदा

ब्रम्हगुप्ताने विविध ग्रंथांचे परिशीलन करून ब्रम्हसिद्धान्त व खंडखाद्य ह्या ग्रंथांची रचना केली. ब्रम्हसिद्धान्त हा ग्रंथ ब्रम्हस्फुटसिद्धान्त म्हणून विख्यात आहे. ह्या ग्रंथात खगोलीय गणित व गणित विषयाचा समावेश आहे. खंडखाद्य ग्रंथात प्रामुख्याने खगोलगणिताचा विचार केलेला आहे. ग्रहांचे मंदोच्चे, चंद्र-सूर्य ग्रहणे, दिनमान, ग्रह-नक्षत्रस्थिती ह्याचे सांगोपांग विवेचन त्यात केलेले आहे. ब्रम्हगुप्ताच्या ग्रंथावर सोमेश्वर, वरुणाचार्य, भटोत्पल, पृथूदकस्वामी, आमराज व त्रीविक्रमाचार्य ह्यांनी टीका लिहिल्या आहेत. कोलब्रुकने ब्रम्हसिद्धान्तामधिल अंकगणित व बीजगणिताच्या भागाचे इंग्रजीत भाषांतर केले. ब्रम्हसिद्धान्त लिहिल्यानंतरही लोकांनी आर्यसिद्धान्तच प्रमाण मानला. त्यामुळे लोकांना आकर्षण वाटेल असा खंडखाद्य हा ग्रंथ ब्रम्हगुप्ताने लिहिला. खंडखाद्याचे पूर्व व उत्तर असे दोन विभाग असून त्यात खगोलशास्त्रीय विवेचन आहे. खंडखाद्य म्हणजे गोड मावा हा खगोलशास्त्रज्ञ अभासकांमध्ये फार प्रिय आहे.

ब्रम्हसिद्धान्त का लिहिला याचे विवेचन करताना ब्रम्हगुप्त म्हणतो. :-

ब्रम्होक्तं ग्रहगणितं महताकालेन यत्खिलीभूतं ।
अभिधीयाते स्फुटं तञ्ञिष्णुसुतब्रम्हगुप्तेन ॥
ससाध्य स्पष्टतरं बीज नलिकादियंत्रेण ।
तत्ससंस्कृतग्रहेभ्यः कर्तव्यौ निर्णयादेशौ ॥

ह्या ब्रम्हगुप्ताच्या उद्गारात अगदी स्पष्ट दिसते की, पूर्वीचे ग्रहगणित हे अर्थहीन झाले होते म्हणून नलिका दियंत्राने वेध घेऊन ब्रम्हगुप्ताने पूर्वीच्या सर्व चुका सुधारून आपला सिद्धांत प्रस्थापित केला.

बलख येथील खगोलशास्त्रज्ञ अबू मशार ह्याच्या पुस्तकात ब्रम्हगुप्तच्या सिद्धान्तावरील ग्रहगणित समाविष्ट आहे. खलिफा अलमन्सूर याच्या आज्ञेवरून महंमद-बीन-इब्राहिम-अलफजारी ह्याने ब्रम्हसिद्धान्ताचे अरेबीत भाषांतर केले व त्यास सिंदहिंद असे नाव दिले ब्रम्हगुप्तच्या सिद्धान्ताची त्याच्या आयुष्यात वाखाणणी झाली नाही. परंतु भास्कराचार्यांनी ब्रम्हगुप्तचाच मार्ग स्वीकारला. हे त्याचे सुयश नव्हे काय?

भारतीय खगोलशास्त्राचा सर्वांगीण प्रगतीकार

भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने घातला हे खरे असले तरी त्याची सर्वांगीण प्रगती ब्रम्हगुप्तानेच केली. ग्रहांचे आकाशातील भ्रमण, मंदोच्चे, पात ह्याचे त्याने संशोधन केले आहे. ह्या संशोधनात त्याची स्वतंत्र बुद्धी दिसून येते. आकाशस्थ ज्योतींचे वेध घेण्यासाठी ब्रम्हगुप्तने स्वतःची यंत्रे तयार केली होती. ब्रम्हगुप्तास अयनगतीचे ज्ञान नव्हते. अयनचलनाची कल्पना त्यास आली असती तर आज भारतीय पंचांगात जो गोंधळ दिसतो त्याचे प्रमाण खात्रीने कमी झाले असते.

ब्रम्हगुप्तने भुव्यास १५८१ योजने आहे म्हणून सांगितले आहे.

वराहमिहीर



पहिल्या आर्यभटानंतर एक थोर खगोल शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. वराहमिहीरचा जन्म शके ४१२ ( इ. स. ४९० ) मध्ये झाला असावा. वराहमिहीर अवंती येथे वास्तव्य करीत असे. त्याने यवन देशात भ्रमंती करून खगोलशास्त्रविषयक ज्ञान संपादन केले असा एक प्रवाद आहे. परंतु त्यात तथ्य नाही. वराहमिहीराने ज्या विषयांवर लेखन केले आहे ते विषय भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीही हाताळले आहेत. त्यामुळे वराहमिहीरावरील आरोप टिकण्यासारखा नाही.

'पंचसिद्धांताचा ग्रंथ. '

वराहमिहीराने खगोलशास्त्रीय गणितावर 'पंचसिद्धांतिका' हा ग्रंथ लिहिला. त्यात पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर पितामह अशा पाच सिद्धान्तांचा अंतर्भाव आहे. हे पाचही सिद्धांत आजच्या सूर्यादी पाच सिद्धान्तांहून भिन्न होते. डॉ. वुलहर यांना काश्मीरमध्ये पंचसिद्धांतिकेच्या दोन प्रती मिळाल्या. त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. ह्या प्राचीन सिद्धान्तांपैकी वराहमिहीराच्या काळी पितामहसिद्धांत व वसिष्ठसिद्धांत विचारात घेतले गेले नाहीत. कारण त्यात संदिग्धता फार मोठी होती. रोमक व पौलिश सिद्धांत त्या मानाने बरेच स्पष्ट होते व सूर्यसिद्धांत सर्वात अधिक सुस्पष्ट होता. हे सिद्धांत इ. स. ४०० मध्ये प्रस्थापित झाले असावेत असे डॉ. थिबोंचे मत आहे, परंतु कै. शं. बा. दीक्षित ह्यांना ते शककाल पूर्वीचे वाटतात.

वराहमिहीराने पितामहसिद्धान्तानुसार अहर्गण नक्षत्र व दिनमान काढण्याच्या रीती सांगितल्या आहेत. पितामहसिद्धान्तातील ग्रहगणिताविषयी वराहमिहीराने काहीच सांगितले नाही. त्यात ग्रहगणित असावे असे ब्रम्हगुप्त म्हणतो. परंतु ते दृक्प्रत्ययी नसल्याने वराहमिहीराने ते दिले नसावे असा एक तर्क आहे. पंचसिद्धान्तीकेतील वसिष्ठसिद्धान्तात रवी व चंद्र ह्यांचाच केवळ विचार केला आहे. तिथी व नक्षत्रे काढण्याची रीती सांगितली आहे. रांश्यशकला ही माने त्यात आहेत आणि छायेचा बराच विचार केला आहे. दिनमानासंबंधीही विचार केलेला आहे. रोमक सिद्धान्तातही केवळ रवी व चंद्र ह्यांचेच गणित आहे. ह्या सिद्धान्ताची मूलतत्त्वे बाहेरून आली असावेत असा तज्ज्ञांना वाटते. इतर सिद्धान्तांप्रमाणे रोमक सिद्धान्तात ४३, २०, ००० वर्षाचे महायुग ही पद्धत नाही. रोमक युग २८५० वर्षाचे आहे. पंचसिद्धान्तीकेतील पॉलिश सिद्धान्तात मंगळादी ग्रहस्थिती सांगितल्या नाहीत, परंतु ग्रहाच्या वक्र, मार्गित्व, उदय व अस्त ह्यांचे विवेचन आहे. पौलिशसिद्धांताचे ३६५ दिवस २५ घटी ३० पळे आहे व त्याच प्रमाणे महायुगातील सायन दिवस १, ५७, ७९, १६, ००० असून राहू-भगण २, ३२, २२८ हून किंचित कमी होतात. दिनमान व रात्रीमान ह्यांच्यातील सारखेपणा, तिथी नक्षत्रांची निश्चिती, ग्रहणे वक्रमार्गित्व ह्यांचाही विचार त्यात केलेला आहे.

वराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत सूर्यसिद्धान्ताला सर्वात अधिक महत्त्व दिले आहे. मूल सूर्यसिद्धान्तात युगपद्धती असून कलियुगाचा प्रारंभ गुरुवारी मध्यरात्री मानला आहे. म्हणजे त्यावेळी रवी-चंद्राचे भोग पूर्ण होते. आपल्या सर्वसामान्य युगपद्धती नुसार कलियुगाचे मान ४, ३२, ००० वर्ष समजतात. द्वापार, त्रेता, कृत, कलियुग ही युगे ह्यांच्या अनुक्रमे दोन, तीन, चारपट आहेत. ह्या चारी युगांना मिळून एक महायुग होते व अशी १००० महायुगे मिळून एक कल्प किंवा ब्रम्हदेवाचा दिवस होतो. कल्पात चौदा मनू होतात. कल्पारंभापासून वर्तमान महायुगारंभापर्यंत सहा मनू व सत्तावीस महायुगे गेली व अठ्ठावीसाव्यातील कृत, त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून आता कलियुग चालू आहे. प्रत्येक मनू एकाहत्तर महायुगांचा असतो. पंचसिद्धान्तीकेतील भगण आदी संख्या व आजचे वर्षमान एकमेकांशी जुळत नाहीत. सूर्यसिद्धान्ताचा संबंध टोलेमीशी असावा. असे वेबर ह्याला वाटते. परंतु त्याच्या आक्षेपात मुळीच तथ्य नाही ही गोष्ट कै. शं. बा. दीक्षित यांनी साधार सिद्ध केली आहे.

वराहमिहीराचे 'बृहतजातक' व 'लघुजातक' हे ग्रंथ आजही प्रचारात आहेत. त्यातील फलज्योतिषाचे आकर्षण कायम असल्याने त्याची उपयुक्तता वाढत गेली. वराहमिहीराच्या बृहत्संहिता ग्रंथाचे भाषांतर डॉ. केर्न ह्यांनी इंग्रजीत केले आहे.

वराहमिहीराच्या संहिताग्रंथावरून त्याच्या वैज्ञानिक प्रतिभेची आणि कल्पकतेची साक्ष पटते. त्याने पदार्थाच्या गुणधर्मांचा विचार केला. सृष्टिचमत्कारांचा अर्थ वास्तव दृष्टिकोनातून लावण्याचा प्रयत्न त्याने केला. पदार्थाचे गुणधर्म व्यावहारिक पद्धतीने कसे उपयोगात आणावेत त्याचे विवेचन त्याने केले.

वराहमिहीराने म्हटले आहे :

पञ्च्महाभूतमयस्तारागणपञ्जरे महीगोलः ।
खेऽय स्कांतांतःस्थो लोह इवावस्थितो वॄत्तः ॥

पुष्कळशा लोहचुंबकांनी खेचलेला लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे ( अधांतरी ) त्याच्या मध्यभागी स्थिर राहतो. त्याचप्रमाणे हा पृथ्वीगोल ( पंचमहाभूतांनी वेढलेला ) तारांगणाच्या पिंजर्‍यात म्हणजे भूगोलात स्थिर आहे.

वराहमिहीराने बृहदसंहितेत 'केतूचार' नामक अध्यायात वारंवार दिसणार्‍या धूमकेतूंचे आश्चर्यकारक वर्णन केले आहे. त्यात त्यांचे स्वरूप, संख्या, शुभाशुभ फले ह्यांचे विवेचन आहे. आज ज्याप्रमाणे शोधकाच्या नावावरून धूमकेतूस नाव दिले जाते त्याच प्रमाणे उद्यालक, कश्यप, पद्मकेतू अशी ऋषींची नावे वराहमिहीराने या धूमकेतूंना दिलेली आहेत. त्या त्या ऋषींची नावे संबंधीत धूमकेतूंचा शोध लावला म्हणून दिली असावीत व वराहमिहीराने केलेली धूमकेतूची वर्णने अगदी अद्ययावत वाटतात. एका धूमकेतूचे वर्णन करताना तो म्हणतो : चलकेतू प्रथम पश्चिमेस दिसतो. त्याची शिखा दक्षिणेस असते व ती तिकडे एक अंगुल उंच असते. तो जसजसा उत्तरेस जातो तसतसा मोठा दिसतो. सप्तर्षी, ध्रृव आणि अभिजित ह्यांस स्पर्श करून तो मागे फिरतो व आकाशाच्या अर्धाचे आक्रमण करून दिसेनासा होतो. बृहत्संहितेचा टीकाकार भटोत्पल ह्याने केतूचार अध्यायाच्या टीकेत पराशर ऋषींची धूमकेतूंच्या संदर्भातील वर्णने दिली आहेत. काही धूमकेतूंचा कालावधीही स्थूलामानाने दिला आहे. वराहमिहीराने उघड्या डोळ्यांनी सौरडागांचे निरीक्षण केल्याचा उल्लेख बृहत्संहितेत केला आहे.

वराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत काही स्वयंवह यंत्राचे प्रकारही सांगितले आहे. वराहमिहीराच्या वैज्ञानिक प्रतिभेचे दर्शन ह्या उदाहरणात घडते. वराहमिहीराने खगोलशास्त्राची विविध अंगे विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वैज्ञानिक विचारांच्या दिशेने भारतीयांनी वाटचाल केली असती तर भारत विज्ञानाच्या क्षेत्रात पूर्वीच निश्चित आघाडीवर दिसला असता.