एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल..

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज प्रश्न केला....

वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत आणी नविन आईत काही फरक वाटतो का..?

मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीचन्र्दाची नातेवाईक...

वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल

वडील: कस...काय !                             

मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा