मी कागद झाले

मी मुलतानमधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी,
तुझे नि माझे व्हावे ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी,
जड लंगर तुझीया पायी तू पीस कसा होणार
माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार.

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही,
विनायकाने मग त्यांची आळवणी केली नाही,
पापण्यान्त जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले,
उच्चारून होण्याधीच, उच्चाटन शब्द आले,

दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही; असे ती वदली!


कवि - मनमोहन

भावनांची वादळे

 

इलाही जमादार

इलाही जमादार (१ मार्च १९४६) हे मराठीतील गझलकार आहेत.


इलाही जमादार यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

१. जखमा अशा सुगंधी (गझलसंग्रह)
२. भावनांची वादळे
३. दोहे इलाहीचे
४. मला उमगलेली मीरा (विराण्यांचे विश्लेषणात्मक काव्यरूप)
५. वाटसरू (मुक्तछंद आणि ग्येय कविता)
६. अर्घ्य (गझलसंग्रह)
७. सखये (गझलसंग्रह)
८. गुफ्तगू (उर्दू गजल संग्रह देवनागरी)
९. मोगरा (गझलसंग्रह)
१०. चांदणचुरा (मुक्तके, रुबाई)
११. तुझे मौन (५६९ शेरांची गजल)
१२. गजल शलाका (गजल तंत्र)
१३. रंगपंचमी (भावगीते ग्येय कविता)
१४. ओअ‍ॅसिस (गझलसंग्रह)
१५. निरागस (गझलसंग्रह)
१६. आभास (गझलसंग्रह)



पुरस्कार :-

१) गुणवंत कामगार पुरस्कार
२) सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वेलफेअर को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने १९९४-९५ चा ‘आर्टिस्ट ऑफ दि ईयर’चा बहुमान
३) कविता, गजल, लावणी लेखन स्पर्धेत पारितोषिके
४) ‘जखमा अशा सुगंधी’ या गजलसंग्रहास ‘गंगा लॉज मित्र व यशवंतराव चव्हाण साहित्य व संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने कै.गंगाधर पंत ओगले पुरस्कार
५) राष्ट्रगौरव पुरस्कार
६) स्वामी विवेकानंद पुरस्कार
७) प्रबोधनयात्री पुरस्कार
८) अ.भा.त्रैभाषिक गजल परिषदेचा २००५ चा ‘शान-ए-गजल’ पुरस्कार
९) दुधगांव भूषण पुरस्कार
१०) सांगली भूषण पुरस्कार

मुंबई

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला ‘इलाही‘ जाणवली मुंबई


कवी - इलाही जमादार
कवितासंग्रह – भावनांची वादळे

जीणं

जीणं फाटतया तिथेच ओवावा धागा गं
बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा

द्यावा ऊन्हाला कधी आधार
गाव बुडणारा सोसावा पूर
काटे पायात खुडून ऊन ऊन्हांत झडून
बोरी बाभळीच्या होती बागा गं

इथे नात्यांची लागते झळ
होई जीवाची गा होरपळ
सारं हातचं देऊन,ऊन हातात घेऊन
कोण पराया? कोण सगा गं

माझं घावं ना मायाळू गाव
तुझ्या वेशीत रोज ही धाव
तुझं म्हणून गोड मानून
ठेव ओसरीत थोडी जागा गं


कवि - प्रशांत मोरे

एक गोंडस मागणी

एक छोटीशी मुलगी वडिलावर चिडून घराबाहेर बसली होती.....
.
आई-: काय झाल चिऊ???
.
मुलगी:- तुझ्या नवरा सोबत माझ पटत नाही,
.
.
.
.
.
.
.
.
मला माझा नवरा पाहिजेल...