जाता जाता गाईन मी

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे


कवी - कुसुमाग्रज

ऋणमुक्त

 सहज सहज टाकुन गेलास
ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी.

दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस ?

कधिही
न ढळणारा तो दवाचा थेंब
तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.
कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..


कवियत्री – इंदिरा संत

उखाणे

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये
डोंगरांची रांग

निळे निर्झरिणी
अगे सारणीचे राणी
खडकाच्या डोळ्यालाही
येते कसे पाणी?

जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप?

दावणीस गाय
धूळ काळजाला आली
सूर्य फेकून नदीत
कुठे सांज गेली?

खांद्यावर बसे
त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच
वारियाने डोले

झाड मधे आले
होई वाट नागमोडी
उडे पोपटाचे रान
पिंजर्‍याला कडी

दगडाचा घोडा
त्याला अंधाराचे शिंग
शुभ्र हाडांनाही फुटे
कसे काळे अंग?

संध्याकाळी आई
देवघरात रडते
तिच्या पदराच्या मागे
केवड्याचे पाते

आम्ही भावंडेही
भय डोळी वागवितो
चांदण्यात आईसाठी
वारा दारी येतो

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?


कवी - ग्रेस

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


कवी -  ग्रेस 

लेझिम चाले जोरात

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!


कवी  - श्रीधर बाळकृष्ण रानडे
बॉयफ्रेंन्ड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन....

ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवते.
आणि त्यात लिहिते,
मी तुझ्या आनंदासाठी 
काहीही करायला तयार आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगैरे काही नाही, बस डोकं नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका..

झूलाघर

सायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी
गाय वासरे हंबरती
सांगती झाली वेळ आईची
आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती
मी पण पाहते वाट आईची
लागली ओढ तिच्या भेटीची

इतुक्यात एक चिमणी छोटीशी
येऊनी बसली माझ्या पाशी
होती ओठात एक काडी चार्‍याची
आपल्या चिमुकल्यां साठी
सांगत होती जणु घालीन
घास माझ्या पोरांच्या ओठी
ही मिलनाची आस बघुनी
मी व्याकुळ झाले मनी
केव्हा येईल आई माझी

नको वाटते तिची नौकरी
दिवस भराची दुसर्‍याची चाकरी
नको राहणे झूलाघरात
वाटते राहावे आई पाशी
डब्यातले थंड अन्न न मला रूचते
शेव, मिक्चर न मला आवडे
एकटेपणात न दिवस सरे
सारखी आईची आठवण येते
कसे हे जीवन आमचे
न आईची कुशी मिळते
न प्रेमानी अन्न भरवते
बालपण आमचे हे असेच संपते
एकटेपणाची आठवण मनात सलते

कसे हे जीवन चक्र बदलले
आई-वडिल दोघेही घरा बाहेर पडले
वाट पाहता-पाह ता थकले डोळे
सारखी आईची आठवण येते
कधी येईल सांगा माझी आई

पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का?
निरोप माझ्या आईला
वाट पाहते लेक आईची
सायंकाळ ही आता सरू लागली
सायंकाळ ही आता सरू लागली.


कवियत्री - सौ. स्वाती दांडेकर