माँडर्न धमकी :-

माँडर्न धमकी :-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शिक्षिका : बंडया, उदया तुझ्या आई-बाबांना शाळेत घेऊनये नाही तर,

तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करुन तुला आणि तुझ्या आई- बाबांना पण Tag करेल....!

फक्त पाच मिनिटे अजून...!!!

जगातील सर्व शास्त्रज्ञांनी खूप वर्षांच्या गहन संशोधनानंतर एक महत्वपूर्ण शोध लावला आहे...!!
सर्वसामान्य माणसाला किती तास झोप आवश्यक आहे....???
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अलार्म वाजल्यावर तो बंद करून फक्त पाच मिनिटे अजून...!!!

तपासणी

एकदा एक शेतकरी आपले शेत नांगरत होता.
त्याच्या शेताजवळ एक मोटार थांबली व त्यातुन एक माणूस उतरला. तो माणूस शेतकर्‍याच्या दिशेने चालत आला व म्हणाला मला तुमच्या शेताची व झोपडीची तपासणी करायची आहे.

शेतकर्‍याने त्याला परवानगी दिली व म्हणाला साहेब शेताच्या त्या दिशेला जाऊ नका.

मला सांगू नका, माझ्याकडे तुमचे शेत तपासायचे पत्र आहे.


शेतकर्‍याचे सांगणे न ऎकता तो माणूस शेतकर्‍याने सांगीतले त्याच दिशेला जाऊ लागला.

थोड्यावेळाने त्या दिशेकडून किंचाळ्या ऎकू येऊ लागल्या व तो माणूस बाहेर जायचा रस्ता शोधत होता.

त्याच्या कडे बघत शेतकरी ओरडला," माझ्या बैलाला दाखवा ते पत्र."
पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात

दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात

तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..

 

आश्चर्यच आहे एकही अक्षर
नाही माझ्या वहीवर
कुठे गेले ते शब्द सगळे
जे मी लिहिले होते वहीवर
 हे कुठले काळे ढग
आले माझ्या समोर
छोटी छोटी निरपराध मुले
झोपळी आहेत रस्त्यावर
चुक नसूनही अपघातात
एक निशप्राणझालेआहे कलेवर
असह्य आजाराने त्रस्त असे
कितीतरी आहेत सभोवार
एक वेळच्या अन्नासाठी
विकण्याची पाळी आली एका युवतीवर
सांगा ना हे लिहिताना
यातना होत नसतील; माझ्या शब्दाना
का राहतील मग ते  माझ्या  वहीवर
बघून सगळे येई त्यानाही  अन्धारुन

कविता बोडस
दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

Taken From मनोगत

उगाचच...

शतानंद.
एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!