तिच्या लग्नाची पत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
... नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,

दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,

एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,

'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,

काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,

'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,

सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!

करायला गेल तर ...........

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत

चालायला गेलं तर
निखाऱ्यांही फूले होतात

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत
गमावलं मी पण होतं..
.
गमावलं तिने पण होतं..
.
फरक फक्त एवढा आहे..?
.
तिला मिळविण्या करीता मी सर्व
काही गमावलं..
.
अन्..?
.
तिने सर्व
काही मिळविण्या करीता मला गमावलं..

उपाशी रहा, मुर्ख व्हा

स्टीव्ह जॉब्जचे भाषण
उपाशी रहा, मुर्ख व्हा
उल्हास हरी जोशी

नुकतेच ऍपलचा संस्थापक स्टिव्ह जॉब्ज याचे निधन झाले. अमेरिकेचे प्रेसिडेन्ट बराक ओबामा पासुन आय.टी. इन्डस्ट्रीमधील बील गेट्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी ऍलीसन सारखे दिग्गज पण हळहळले. स्टिव्ह हा इतिहासात एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळखला जाईल असे अमेरिकेतील तद्यांचे मत आहे. एडीसन प्रामाणेच स्टिव्ह कडे पण इंजिनीअरींगची कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालिफिकेशन नव्हते. कॉलेजमधला ड्रॉप आऊट असलेला, वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःची कंपनी काढणार्या्, वयाच्या 30 व्या वर्षी आपल्याच कंपनितुन हकालपट्टी झालेल्या, नंतर कंपनीत परत आल्यावर ऑपल ही जगातील एक दिग्ग्ज-आघाडिची कंपनी बनविणार्याु स्टिव्हला हे कसे जमले? 12 जुन 2005 सली त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटीत केलेले भाषण जगभर गाजले. या भाषणाचा हा स्वैर मराठी अनुवाद.
प्रिय मित्रांनो,
जगातील सर्वोकृष्ट युनिव्हर्सिटिमधील आजचा तुमचा पहिला दीवस आहे. या निमित्ताने तुम्ही मला भषण देण्यासाठी निमंत्रीत केलेत हा माझ्या दृष्टिने मोठा गौरव आहे. कारण मी स्वतः कॉलेज ग्रॅज्युएट नाही. खरे सांगायचे तर आजच्या या निमंत्रणाच्या निमित्ताने, पहिल्यांदाच, कॉलेज ग्रॅज्युएशनच्या जवळपास मी आलो आहे. आज मी माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तीनच गोष्टी ! फार काही नाही.
मझी पहिली गोष्ट आहे ती बींदु जोडण्याची, डॉट्स कनेक्ट करण्याची.
माझ्या जन्माच्या आधीपासुनच याची सुरवात झाली. माझी खरी आई कॉलेजमधे शीकणारी एक तरुण कुमारी माता होती. माझा जन्म झाला तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. माझा सांभाळ करणे तिला शक्य नव्हते म्हणुन तिने माझी रवानगी ऍडॉप्शनसाठी म्हणजे दत्तक देण्यासाठी म्हणुन केली. तिची इच्छा होती की कॉलेजमधुन ग्रॅज्युएट झालेल्या जोडप्याने मला दत्तक घ्यावे. त्याप्रमाणे एक वकील जोडपे मला दत्तक घ्यायला तयार पण झाले होते.पण ऐनवेळी कुठेतरी माशी शींकली. त्यांनी अचानक एक मुलगी दत्तक घ्यायचे ठरवले. त्यामुळे वेटींग लिस्टवर असलेल्या माझ्या आई वडिलांना मध्यरात्री फोन आला. ‘ अचानक एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध झाला आहे. तुम्हाला तो मुलगा हवा आहे का?’ त्यांना विचारण्यात आले. ‘अर्थातच आम्हाला हवा आहे.’ माझ्या आई वडिलांनी उत्तर दिले. नंतर माझ्या खर्यात आइला कळले की माझी दत्तक आई कॉलेज ग्रॅज्युएट नाही तर माझे दत्तक वडील शाळेचे सुध्धा ग्रॅज्युएट नाहीत. त्यामुळे दत्तकाच्या कागदांवर सही करायला माझी खरी आई तयार होत नव्हती. पण ज्यावेळी माझ्या दत्तक आईवडिलांनी माझ्या खर्याख आईला वचन दिले की ते मला कॉलेजमधे नक्की पाठवतील, त्यानंतर काही महिन्यांनी माझ्या खर्या आइने कागदावर सही केली.
त्यानंतर 17 वर्षांनी मी खरोखरच कॉलेजमधे जॉईन झालो. पण मी चुकुन स्टॅनफोर्डसारखेच महागडे कॉलेज निवडले. वर्कींग क्लासमधुन आलेल्या माझ्या दत्तक आई वडिलांनी पै पै जमवुन माझ्या शीक्षणासाठी पैसे जमा केले होते ते खर्च होऊ लागले. सहा महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की मी घेत असलेले शीक्षण त्या लायकिचे नाही. एक म्हणजे आपण आयुष्यात पुढे काय करायचे हे ठरले नव्हते आणि या साठी माझे कॉलेज मला काय मदत करु शकेल हे पण समजत नव्हते. मी उगीचच माझ्या दत्तक आईवडिलांनी मोठ्या कष्टाने जमवलेले पैसे वाया घालवत होतो. त्यामुळे मी ड्रॉप आऊट व्हायचे ठरवले. पण मी मनातुन थोडा घाबरलो होतो. पण मागे वळुन पहाता मला वाटते की तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. मी ड्रॉप आऊट झाल्यामुळे मला इंटरेस्ट नसेलेले क्लासेस अटेन्ड करण्यापासुन माझी सुटका झाली. पण त्याचवेळी मला आवडु शकेल अशा कोर्ससाठी मी ड्रप ईंन पण झालो.
पण ही गोष्ट वाटते तेव्हडी सोपी नव्हती. आता मी कॉलेजचा स्टुडंट नव्हतो. त्यामुळे मला मिळालेली खोली गेली होती. मित्राच्या खोलीवर जमिनीवर झोपावे लागत होते. खिषात पैसे नव्हते. त्यामुळे जुन्या कोकच्या बाटल्या 5 सेन्टस ला विकुन पैसे मीळवावे लागले. गावात एक हरेकृष्ण मंदीर होते. तेथे दर रविवारी संध्याकाळी पोटभर मोफत जेवण मिळे. त्यासाठी 7 मैलांची पायपीट करत जावे लागत होते. परंतु मला ते आवडले. त्यावेळी केवळ उत्सुकतेपोटी मी ज्या गोष्टी केल्या आणि माझ्या अंतर्मनाने ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या त्या पुढे लाख मोलाच्या ठरल्या. याचे एकच उदाहरण मी तुम्हाला देतो.
त्यावेळी रीड कॉलेजमधे कॅलिग्राफीचे देशातील सर्वोत्तम शीक्षण मीळत असे. कॉलेजच्या कॉम्पसमधे प्रत्येक पोस्टर, प्रत्येक लेबल सुंदर पध्ध्दतिने हाताने कॅलिग्रा॑फ केलेले असायचे. मी ड्रॉप आऊट होतो. कुठलेच क्लासेस अटेन्ड करण्यावे बंधन माझ्यावर नव्हते. त्यामुळे मी कॅलिग्राफी क्लासमधे जाऊन बसु लागलो. त्या ठिकाणी माझी खर्यान अर्थाने अक्षरांशी अक्षराओळख झाली. तेथे मला सेरीफ आणि सॅन सेरीफ टाईप फेसेसचे ज्ञान मिळाले. अक्षरांमधल्या जागेचे महत्व कळले. ग्रेट टायफोग्राफी कशामुळे ग्रेट होते याची थोडीशी समज आली. ही गोष्ट सुरेख, ऐतिहासीक, कलापुर्ण अशी होती. ही अशी गोष्ट होती की ती सायन्स शीकवु शकत नाही. मला हे शीकताना खुप मजा आली.
मी हे सगळे छंद म्हणुन शीकत होतो. याचा मला आयुष्यात काहीच उपयोग होणार नाही असेच मी समजुन चाललो होतो. पण दहा वर्षांनंतर, जेव्हा आम्ही पहिला मॅसिनटोश(Macintosh) कॉम्युटर डिझाईन करत होतो, हे सगळे मला आठवले. आम्ही त्याचा मॅकमधे उपयोग केला. हा जगातील पहिला कॅम्युटर होता की ज्यामधे एक सुंदर अक्षरलिपी होती. जर मी रीड कॉलेजमधील हा कोर्स केला नसता तर आमच्या कॉम्युटरमधे ही सुरेख लिपी आलीच नसती. त्यानंतर विन्डोने हीच लिपी कॉपी केल्यामुळे सगळ्या पी.सी. ( पर्सनल कॉंम्युटर) वर याचा उपयोग सुरु झाला. मी जर कॉलेजमधुन ड्रॉप आऊट झालो नसतो आणि कॅलिग्राफी क्लासला ड्रॉप ईन झालो नसतो तर आज पर्सनल कॉम्पुटरमधे जी सुरेख अक्षरलिपी पहायला मीळते ती मिळाली नसती.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील बिंदु किंवा डॉट्स जोडण्यासाठी नेहमी पुढेच म्हणजे भविष्यकाळाकडेच बघायला हवे असे नही. उलट तुम्हाला मागे वळुन, म्हणजे भुतकाळाकडेच बघावे लागते. भूतकाळातील घटनाच भविष्यकाळातील डॉट्स जोडायला कारणिभुत असतात यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. तुम्ही कशावर तरी विश्वास ठेवायला हवा. मग ते तुमचे गट्स, डेस्टिनी, आयुष्य, कर्म- काहिही असेल. मझ्या या अप्रोचने मला कधिही खाली पहायला लावले नाही, तर त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रचंड परिवर्तन घडले.
कदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.
तेथे एक कावळा आला....
मुलाला बापाने विचारले, ते काय आहे?
मुलगा म्हणाला कावळा.
पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे?
मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.
तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे?
मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा............
मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते?
मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का?
कावळा...... कावळा... कावळा.

पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते?
मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,
का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून,
तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?
मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.
त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.
परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.
त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,
आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.
त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,
उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.
तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.
फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,
त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.
उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.
लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात?
आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात. त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय. तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?” वडील हसतात आणि म्हणतात..” आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..
कंजूस साहेब - हे तू ह्यावर्षी इमानदारिने काम केलेस त्याबद्दल तुला ५००० रुपयांचा बोनस धनादेश........

आणि

तू जर असाच काम करत राहिलास तर ह्यावारती पुढच्या वर्षी नक्कीच स्वाक्षरी करीन.....