वन्दे मातरम

वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।

कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।

त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।

श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ।
-बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय/चत्तेर्जी

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.

-दर्शाना मंचेकर
manchekardarshana@gmail.com

सुनेचा विरोधिपक्ष

सासूबाई (नव्या सुनेला): या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.
तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं?

सूनबाई : मी विरोधीपक्षात बसते.
गंपू - हुस्स्श...फार फार दमलो बुवा..
गुंडोपंत - काय झाल दमायला ? त्या चिंगी चा भाऊ पाठीमागे काठी घेऊन आला का परत ?
गंपू - हाट....तस काही नाही..मी आज दिवसभर क्रिकेट खेळत होतो..
गुंडोपंत - अरे वा...मग थांबलास का ?? अजून खेळ..भरपूर धावा काढ..एक दिवस भारतीय संघात निवड होईल...!
गंपू - दिवसभर खेळणार होतो..पण...
....
.
.
.
.
.
.
.
पण मोबाइल ची battery डाऊन झाली..!

कुत्रे मोकळे पण दगड बांधून

झंप्या दारू पिऊन झिंगून रस्त्याने जात असतो, समोरून एक कुत्रे येऊन खूप जोरात भुंकायला लागते, झंप्या रस्त्याच्या कडेच मोठा दगड कुत्र्याला मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न करतो,
पण दगड जागचा हलत नाही....
शेवटी वैतागून म्हणतो....
"काय पण जमाना आलाय.....लोक कुत्र्याला मोकळे सोडतात..... आणि दगड बांधून ठेवतात...."
पुण्यातील एक किस्सा
एक मुलगी ट्राफिक तोडून चालली होती.
हवालदारनी अडवल आणि विचारल - 'काय हो...तुम्हाला शिट्टी ऐकू आली नाही का??!'
पुणेरी मुलगी - 'मी फ्लर्ट लोकांना भाव देत नाही'

आई, असं का ग केलंस?

का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि
रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी
ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली
आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"
आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,
तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास
सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर
पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग
तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..