गंगुबाई

एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......

डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात.

लेडीस डब्बा

रेल्वे स्टेशन वरून लोकल सुटत असते....

झंप्या घाई घाईत नेमकी "लेडीस" डब्ब्यात चढतो...

टी.सी :- अरे मुर्खा, दिसत नाही तुला हा लेडीस डब्बा आहे ते..
...
झंप्या :- अरे बाप रे... सॉरी हा.. मला वाटलं तुम्ही "पुरुष" आहात...

माणसाचे चार मित्र

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाडप्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....
तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभागअसतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो,""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हामाझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडेयेते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्यासंपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्तझालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

व्हॅलेन्टाईन्स चा दिवस

व्हॅलेन्टाईन्स डे चा येऊन गेला दिवस |
पोरा पोरियनं धरले होते प्रेमाचे नवस ||
गावभर हिंडून फुल देत फिरावं |
जो फसन जाळ्यात त्याले नाही सोडावं ||
काय आहे नियम खरचं का कयते |
आय लव्ह यु म्हणाले बापाचं काय जाते ||
सेम टू यु म्हणून झंडी दाखवावं हिरवी |
लफडेबाज पुस्तके वाचून घ्यावं सारी ||
मंग कानी प्रेमाचा सुरु होतो खेल |
दुपारी सिनेमा, संध्याकाळी भेल ||
आतंकवाद्यावानी बांधून तोंडाले |
मोकये यायले रानं गाडीवर मंग फिराले ||
लाज, शरमिले पार मंग सुट्टी |
शाळा, कॉलेजचे रोजच मंग गट्टी ||
फेशनचा जमाना रापचिक कपडे |
एकानं दहासंग खुशाल करावं लफडे ||
नवीन पिढीचं दिमाग लागले फिराले |
हृदयाले करून जमीन, प्रेम लागले पेराले ||
प्रेमाच्या नावावर नुसते मजे |
गरम तेल एकाचं दुसर्यान् तयाव भाजे ||
सरता वर्षे अजून धरावं नवसं |
व्हॅलेन्टाईन्स डे चा केव्हा येनं दिवस ||

बस आणि बायको

बस गच्च भरली होती.
आता ती सुरु होणार तोच ड्रायव्हर म्हणाला," गाडीचा टायर पंक्चर आहे"
ताबडतोब कंडक्टर उतरला. त्याच्या मागोमाग गण्या उतरला,
दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला,
बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली
कंडक्टर गण्या ला म्हणाला," मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे.
आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत ,
पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत.
मी खरच खूप आभारी आहे.

गण्या म्हणाला," मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही .
माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे,
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीच रद्द होऊ नये म्हणून...........
नासा मंगळावर पाठवण्यासाठी सर्व उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेत होते
त्यात ३ देशाचे लोक इंटरव्यू साठी आलेले
फक्त एकाच व्यक्ती मंगळावर जाऊन पुन्हा पृथ्वी वर येणार असते
पहिला उमेदवार एक रशिया चा इंजिनिअर असतो,त्याला विचारले जाते कि मंगळावर जाण्यासाठी त्याला किती रुपये हवे
रशियन इंजिनिअर: एक करोड रुपये,कारण मी ते सर्व पैसे संशोधनासाठी दान करेल

दुसरा उमेदवार होता अमेरिकेचा इंजीनिअर
त्याला पण हाच प्रश्न विचारला गेला
त्याने दोन करोड रुपये मागितले
अमेरिकन इंजिनिअर : मी एक करोड रुपये माझ्या परिवाराला देईल तर उरलेले एक करोड रुपये समाजसेवेसाठी दान करेल

आणि सर्वात शेवटचा उमेदवार होता भारताचा "लालू प्रसाद यादव "
जेव्हा त्याना विचारले गेले कि त्याला मानधन म्हणून किती रुपये हवे तेव्हा तो हळूच इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या कानात बोलतो फक्त “तीन करोड रुपये”
इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आश्चर्य चकित होऊन विचारतो कि इतर सर्वांपेक्षा जास्ती का बरे
लालू प्रसाद यादव : साहेब एक करोड तुम्ही ठेवा, मी एक करोड ठेवतो आणि उरलेले एक करोड त्या इंजिनिअरला देऊ आणि देऊ कि पाठवून त्याला मंगळावर
चम्प्या आणि त्याचा मित्र
दुपारी जेंव्हा एका गाड्यावर पराठे
खायला गेलेले असतात ,

तिथे दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत
येतात ..!!!

त्यांनी ऑर्डर दिली आणि गप्पा मारत
राहिल्या,

बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर त्यांची ऑर्डर
आली...!!!

आणि जसे त्यांनी खायला स्कार्फ
काढला आणि एकमेकांकडे पहिले
...
...
...
....
....
...
...
...

पहिली: अय्या तू चिंगी नाहीस...!!!

दुसरी:अय्या तू पण मिनी नाहीस....!!!