भिकारी : ये माय भाकर दे .....
..
..
..
..
आजी : अजून भाकरी झाल्या नाही नंतर ये

भिकारी : हा माझा मोबाईल नंबर घे.....
आणि भाकर झाल्यावर मला मिस काल दे..

आजी : अरे बाबा, त्यापेक्षा मी माझा फेसबुक स्टेटस अपडेट करते भाकरी झाल्यावर ...
...ते बघ आणि मग ये ...

टाय-बो पार्टी

एकदा चम्या अगदी बारीक चेहरा करून येतो तर पम्या त्याला विचारतो ,''काय झाले? काल तर तू एकदम खुशीत होतास टाय-बो पार्टीला जायचे आहे म्हंणून?"

चम्या म्हणतो "गेलो होतो ना, पण तिथे लोक बाकीचे पण कपडे घालून आलेले होते."

पवित्र चिकन मटन

प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते ... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने शुक्रवारी चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू शुक्रवारच्या रात्री संताच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.

धर्मगुरु संताला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनन्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची खुप मनधरणी केल्यानंतर संता सिंग अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने संताच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, '' तु धर्माने सिख होता, आणि सिख म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस ''

संताचे शेजारी खुप खुश होते - पण पुढील शुक्रवार येई पर्यंतच.

पुढील शुक्रवारच्या रात्री पुन्हा संताच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला. शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा संताच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्या घरात शिरले आणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, जेव्हा ते अचानक थांबले आणि आश्चर्याने संताकडे पाहू लागले.

तिथे संता एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम्ही आलू आणि टमाटर आहात ''

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं



श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,

सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव

पार्कात विराजती उद्यान गणेश

नांवाजलेली शाळा-कॊलेजं

म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!

विद्यार्जन नि विद्यादानाला

जे सदैव सप्रेम सादर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!



वसंत देसाई, वसंत प्रभू

सी रामचंद्र नि सुधीर फडके

दादरचेच तर होते

ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर

चक्क नौशादसाहेब झोपत होते!

मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची

‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे

लताजींची रिहर्सल चालायची!

असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…

म्हणूनच गडया,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



छबिलदासचा फर्मास बटाटावडा

नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’

नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर

नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,

खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं

दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं

ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



शिवाजी पार्कच्या मैदानाला

एक किलोमीटरचा कटटा असतो,

तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत

इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!

चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो

’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा

मात्र निराळाच ढंग असतो!

पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी

काला-खटटा च्या गाडीवर मात्र

गि-हाईक हमेशा हजर असतं...

नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं



हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत

साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत

लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत

फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!





पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ

फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ

भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का

गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का

अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत

दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!

हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर

नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर

इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण

नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण

सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई

त्याच लोकांचं इथे घर असतं,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

दिपिकाचा महिमा

दीपिका जेव्हा युवराज सिंग कडे गेली तेव्हा त्याचा फोर्म गेला आणि त्याला भारतीय टीम मधून निघावे लागलेले.
ती जेव्हा रणबीर कपूर कडे गेली तेव्हा रणबीर कपूर च्या फिल्म्स फ्लोप व्हायला लागल्याआता
ती मल्ल्या कडे आहे तर त्यांची किंगफिशर एयरलायींस कंपनी एकदम बंद पडायच्या लायकीला आली आहे
.
.
.
.
.
.
.

माहित नाही ती कॉंग्रेस मध्ये कधी जातेय ?

ग्राहक हेच दैवत

रम्या : अहो चम्या शेठ, ही रिसिट बघा. पाच वर्षांपूवीर् मी माझे फाटलेले बूट तुमच्याकडे शिवायलादिले होते. मी ते विसरूनच गेलो होतो.

चम्या : नो प्रॉब्लेम. मी शोधून काढतो.थोड्या वेळाने चम्या धुळीने माखलेला एक बॉक्स घेऊन येतो.

रम्या : अरे वा, मला तर विश्वासच बसत नाहीय की तुम्ही एवढ्या आठवणीने माझे बूट ठेवले असतील.

चम्या : इट्स ओके. ग्राहकांचं समाधान हेच तर आमचं उद्दीष्ट आहे. असो, आता ८ दिवसांनी बूट न्यायला या. अजून त्याची शिलाई बाकी आहे.

२०७०- एपीजे अब्दुल कलाम

२०७० मध्ये लिहिलेलं एक पत्र

मी नुकतच ५० पूर्ण केलय भासतो मात्र ८५ चा मला किडनीचा त्रास आहे पाणी कमी पिण्यामुळे वेळ नाही जास्त आता माझ्यापाशी जगण्याचा मी ५० पूर्ण केलय सर्वात वयस्क व्यक्ती मी या समाजाचा...

लहानपणी माझ्या परिस्थिती वेगळी होती हिरवळ होती पाऊस होता भिजण्यातली मजा होती आज सारं मी फक्त स्मरतो कृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...

लहानपणी आयाबायांचे सुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी घरीपाण्याचे पाईप असतआता केसच नाही कुणाला पाणीच नाही कुठे वापरायला पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुनाजागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..

आठवतं मला आज "पाणी वाचवा"चे फलक असायचेत लोक मात्र फलक म्हणून फक्त वाचायचेत आता नद्या तलाव सारं काही सुकलं आहे उरलं सुरलं असेल काही दुषित होऊन बसलं आहे..

उद्योग धंदे संपले आहेत वाढलीय बेरोजगारी खा-या पाण्याला पिण्याजोगं करण्याचीच सारी तयारी तोच एक उद्योग आहे कामगार आहेत "पाणी" पगारी

पाण्यासाठी सगळी कडेदंगे सतत सुरू आहेत आजचे दिवस खरच खूप वेगळे आहेत "दिवसाला ८ पेले" आधी पाणी आवश्यक असे आज फक्त अर्धा पेला माझ्यासाठी उरला आहे...

कसा दिसतोय माणूस आज? सुकलेला, सुरकुतलेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनीपुरता पोळलेला त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजारमृत्युच्या कारणांने ग्रासलेला...

पाण्याच्या अभावी विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो कळलय न कारण "पाण्याचा अभाव" पण उपाय काहीच आमच्याजवळ नसतो..पाण्याचं उत्पादन अशक्य झाडे नाही.. हवा दुषित पुढची पिढी अशीच असणार रापलेली, पोळलेली, त्रासित

आज श्वास घेण्यासाठी हवा विकत घेतो आम्ही "१३७ मी क्युब" हवा विकत घेतो आम्ही जे घेऊ शकत नाही कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात दुषित हवा घेत बिचारे मरेस्तोवर जगत जातात

जिथे कुठे असेल पाणी कडेकोट जपल्या जाते पाउस पडलाच कधीतर आम्लवृष्टी होते विसाव्या शतकाचा निष्काळजीपणा भोगतोय बजावलं होतं वाचवा पाणी? फळ आता आम्ही साहतोय

माझ्या बालपण ऐकताना मुलगा माझा विचारतो "कुठेय हो पाणी आता"? मी फक्त आवंढा गिळतो...दुखी होण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाहीमी देखिल कारणीभूत या सगळ्याला मी ही त्याच पिढीचा अंश असतो

आता माझीच मुलं बाळं माझी चुक भोगताहेत फार फार मोठी किमंत माझ्या चुकिची देताहेत अशीच भोगत राहतील कारण मागे जाणं शक्य नाहीपुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही

कसं तरी करून मला मागे जायलाच हवं माझ्या पुर्वजांना मला मला कळकळीनं सांगायला हवं"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं" अजून वेळ गेली नाही त्यांनी समजायला हवं

मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम