तू-नसशील

अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.
एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी
साडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले
तेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारख तू
म्हणाल होतास,
“आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा ? “
हे सारे उद्याही तसेच असेल…….
ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील
संधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत
न्हाउन निघेल.
आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा
कण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल
हे सारे तसेच असेल
फक्त तू नसशील………तू नसशील
मात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची
लालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.



- अनुराधा पोतदार
- सकाळ दिवाळी अंक २०००
गांधीजी एकदा चित्रगुप्ताला विचारतात, " माझी ३ माकडं कशी आहेत?? "

चित्रगुप्त - सगळी छान आहेत.
"आंधळा" कायदा बनला आहे.
"बहिरा" सरकार बनला आहे.
आणि
"मुका" तर सगळ्यात मजेत आहे.
आजकाल "पंतप्रधान" आहे.
एका विवाहित बायकांनी भरलेल्या बसचा अपघात होतो..
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो...
सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते..
बंड्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.....
..
..
कारण
.
.
.
.
.
 त्याच्या बायकोची बस चुकली होती.
एकदा बॉस लवकर ऑफिसमध्ये येतो
आणि पाहतो की
त्याचा मॅनेजर सेक्रेटरीशी गुलुगुलु गप्पा मारत बसलाय…..
बॉसः (संतापाने) याच्यासाठी पगार देतो मी तुला ?
मॅनेजरः नाही सर ,
हे तर मी फुकटात करतो……
मास्तरीण गण्याला: “रिकाम्या जागा भरा,
.
९०० उंदिर खाऊन माँजर ________ चालली”
.
.
गण्या: “९०० उंदिर खाऊन माँजर हळुहळु चालली” .
.
मास्तरीण रागात:“ ऊभा रहा बेँचवर,
मजाक करतो का माझ्यासोबत ”
.
.
गण्या: “मॅडम हे तर मी तुमच मन राखण्याकरता लिहल
नायतर ९०० उंदिर खाऊन मांजर काय तिचा बाप पण चालु शकणार नाय“..
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.

मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.

तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि …… तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....
कंजूस मालक : जा २ होटल मधून ३-३ तंदूरी घेवुन ये.....
नोकर : साहेब ६ एकाच होटलमधून का नको....
.
.
.
.
.
कंजूस मालक : माकडा वेगले वेगले आणलेस तर चटनी आणि कांदा जास्त भेटेल..