नागपंचमी

अजि नागपंचमीचा। आला पवित्र वार
निज अंतरंगी आज। राखा मुळी न वैर
हृदयात प्रेमपूर। भरपूर आज वाहो
आनंद सर्व जीवा। जगतात आज राहो
हा नागपंचमीचा। दिन थोर थोर साचा
जो सर्प मूर्त मृत्यु। त्यालाहि पूजण्याचा
मृत्युहिही गोड माना। सर्पाहि पूज्य माना
जो दुष्ट घेइ चावा। त्यालाहि देव माना
सर्वांतरी सदंश। सर्वात सच्चिदंश
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
प्रेमा सदैव देऊ। अवघ्या चराचरास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
नागाहि पूज्य मानू। त्या प्रेम गोड देऊ
मग बंधुबंधु आम्ही। किति गोड रीति राहू
हा थोर थोर दिवस। दिधला तुम्हां आम्हांस
घालून पूर्वजांनी। प्रेमा शिकावयास
वर्षात एक दिवस। ना सुष्ट दुष्ट पाहू
दिनी ह्या तरी निदान। सर्वांस प्रेम देऊ
अद्वैत तत्त्व थोर। कर्मात आणण्यास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
ती संस्कृती उदात्त। अपुली शुभा अनंत
जणु साठवीत एका। ऋषि नागपंचमीत
त्या थोर पूर्वजांची। पाहून थोर दृष्टी
मज येतसे भरुन। ही होइ अश्रुवृष्टि
डोळ्यांमधून आज। वाहोत प्रेमगंगा
सौख्यांबुधीत सारे। या रे विशंक डुंबा
वाणीमधून आज। माधुर्य ते स्त्रवू दे
करणीमधून सर्व। स्नेहामृता झरू दे
वेलीवरील फूल। तेही न आज तोडा
हिरव्या तणांकुराला। त्याही न आज तोडा
काडी न आज मोडा। लावा कुणा ढका न
प्रेमात आज राहो। सृष्टी उभी बुडून
घ्या फावडे न कुदळ। असतील जीवजंतू
दुखवा न त्यांस आज। आणा न त्यांस अंत
भूमाय ही क्षमेची। मूर्ती तिला न दुखवा
न खणा मुळीच आज। गाऊन गीत सुखवा
जगतात आज कोणा। भयभीति ती नसू दे
आजी परस्परांत। विश्वास तो वसू दे
लघु जीव कीड मुंगी। तृणपर्ण मृत्कणाही
दुखवी न आज बंधो। सर्वत्र देव पाहि जीव
सर्वत्र आत्मतत्त्व। समदृष्टि थोर ठेव
सकलांहि त्या सणांत। ह्या नागपंचमीस
आहे महत्त्व फार। वाटे मदंतरास


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

दसरा

आला दसरा, रमणीय सुखाचा हसरा।। आला....।।

माझे मम ही सीमा लंघा
शमवा अंत:कलिचा दंगा
परोपकारामाजी रंगा
दु:खा विसरा।। रमणीय....।।

अज्ञानाची संपो रात्री
लावा ज्ञानाच्या त्या ज्योती
भू-मातेची मंगल किर्ती
भुवनी पसरा।। रमणीय....।।

सदगुण-सोने आज लुटू या
दुर्गुण सारे दुरी घालवु या
निज-चित्तावर मिळवू विजया
हे ना विसरा।। रमणीय....।।

मनावर जरी विजय मिळेल
स्वातंत्र्यादिक सहज येतिल
भाग्यश्री ती धावत येइल
शंका न धरा।। रमणीय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

संक्रांत

मकर-संक्रांत
सुखाच्या सुकाळा
चला हलवा करु
या रे सारी जणे
कलह-मत्सर
शेगडी पेटवा
कळकळ तळमळ
शेगडीच्यावर
स्नेहाचे घ्या तिळ
भक्तीच्या शर्करे
औत्सुक्याच्या हाते
सुंदर हलवा
प्रेमाचे रोमांच
पितळी ती फुले
दयेचा श्रद्धेचा
रंग केशराचा
दिव्य हा हलवा
मने जोडणारा
चला एकमेकां
गोडीने या राहू
आली शुभ वेळा
चला करु
मोढ्या आनंदाने
श्रमावया
कोळसे जमवा
हृदयाची
पितळी सुंदर
द्या ठेवून
निर्मळ साजिरे
पाक करा
हळूच हलवा
होऊ लागे
काटा हाच खुले
हलव्याने
सहानुभूतीचा
हाच शोभे
मने मोहणारा
अभिनव
देऊ घेऊ खाऊ
संसारात


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

लहान मित्राबद्दल!

असे माझा मित्र हो लहान। तदगुणांचे परि सकल करिति गान
ऐकुनीया किति सौख्य होइ माते। असे ठाव ते फक्त मन्मनाते।।

दृष्टी निर्मळ मुखमंडल प्रसन्न। दिसे न कधी तो कुणालाहि खिन्न
दु:ख निज लपवी, अन्य दु:ख जाई। हरायाते तो सदोदीत पाही।।

वीणिमाजी वाहते प्रेमगंगा। करि न कोणाच्या कधी मनोभंगा
हृदय हाळु त्यांचे फुलापरी रम्य। कार्यशक्ति परी तदीया अदम्य।।

शील त्याचे सर्वांशि निष्कलंक। करी जवळ सदा गोरगरिबरंक
गर्व चित्ताला नसेच तो ठावा। जगन्मित्र जणू कुणाशी न दावा।।

अंतरंगी खेळवी सद्विचार। घडे हातुन सर्वदा सदाचार
जरी घडली हातून अल्प चूक। अश्रु आणिल लोचनी करिल शोक।।

निज स्वल्पहि अपराध घोर मनी। परी दुस-याचा चित्ति कधी नाणी
जरी दुस-याचा अल्प गुण दिसेल। स्तवन त्याचे करुनिया मनि सुखेल।।

देशभक्तीचा तदंतरी पूर। देशसेवेचा हृदयि उठे सूर
वस्तु परदेशी सदा ठेवि दूर। तया स्वातंत्र्याचीच हूरहूर।।

स्वता वापरुनी शुद्ध साधि खादी। वळवि परमनही गोड वचें बोधी
कार्य करुनी जो ना कधी वदेल। निज स्तुति ऐकुन लाजुन जाईल।।

कार्य दुस-याचे सतत ये कराया। स्वयंसेवक तो स्रवदा सहाया
असा नाही पाहिला युवा अन्य। बघुनि त्याला वाटते धन्य धन्य।।

मुखी त्याच्या ते हास्य सदा गोड। शब्द अमृतासम नाहि तया जोड
प्रेमपूर्ण किती सरळ मधुर डोळे। दिव्य सुंदर ते तेज भाळि खेळे।।

दंत निर्मळ ते जणू मोतियांचे। अधर पातळ जणू वेल पोवळ्यांचे
नाक सरळ परी जरा बाकदार। दिसे मुद्रा दिलदार ती उदार।।

सदा गाठाया ध्येय उच्च पाही। सदा दिनदिन जो वरति वरति जाई
थोर त्याचे ते जीवन मज वाटे। तया पाहुन गहिवरे हृदय दाटे।।

असे त्याला शुभ नाम नामदेवष करो नामासम वर्तना सदैव
नाम अन्वर्थक देवराय होवो। तुझी त्याच्यावर सर्वदा दया हो।।

प्रभो! तुमच्या मी लागतसे पाया।  तयावर ठेवा सदा दया-छाया
मनोरथ त्याचे पूर्ण करा देवा। तच्छिरावरती वरदहस्त ठेवा।।

मदायुष्यहि हे तयालागि द्यावे। असे जे जे मत्सत् तयास द्यावे
प्रभो! सांभाळी त्यास तू कृपेने। सकल संकट मोहादि लयाते ने।।

दयासिंधो हे दीनबंधु देवा। असे माझी प्रार्थना एकमेवा
मित्र माझा मत्प्राण जणू अन्य। कृतार्थ करा तज्जीवनास धन्य।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२७

लहानपणची आठवण

होतो मी लहान
आनंदाने मनी
नाचता नाचता
क्रीडा-रसपान
टपकन आवाज
जीव माझा भ्याला
भानावरी आलो
अंगणी हिंडलो
देखिले मी दृश्य
माझे तो लोचन
झाडावरुनिया
पडलेसे साचे
लोळा गोळा त्याचे
मन्मना गहिवर
आसन्नमरण
घरात घेवोनी
मऊ कापसाची
झारी आणीयेली
चिमुकली चोच
घातले, हृत्सिंधु
मधून ते पाहे
हृदय कोवळे
बारीक धान्याचे
चोचीत घातले
मज त्या वेळेला
खेळ तो रुचेना
पिलाच्या समीप
कोठेही न गेलो
फिरवीत डोळे
जीव हुरहुरु
हात लावताच
खेळत अंगणी
नाचतयसे
हरपले भान
करीतये
अंगणात झाला
एकाएकी
पाहू मी लागलो
चहूकडे
अत्यंत करुण
ओलावले
पिलू पाखराचे
विव्हळत
पंख ना खंबीर
आवरेना
पिला उचलोनी
शीघ्र आलो
गादी छान केली
पाणियाची
उघडून बिंदु
हेलावत
उघडोनी डोळे
माझे भरे
कण मी आणिले
हळूहळू
काहीही सुचेना
खाणेपिणे
बसून राहिलो
सोडूनिया
दुर्बळ पाखरु
करी माझा
चीं चीं चीं चीं करी
हृदय विदारी
त्याच्या मऊ अंगा
कापूसही टुपे
होते हबकले
वेदना अपार
‘कैसे याचे दु:ख
काय मी रे करू
देवा आळविले
दयेच्या माहेरा
पाखराजवळ
त्याला समजावित
‘खाई दाणापाणी
काय तुज माझा
नको रागवू हो
वाचवाया प्राण
होई बरा नीट
मग जा तू थेट
आठवण तुज
कुशीच्या उबेची
येईल स्मृती हे
जरा होई पाहे
येथे उणे तुज
करांत घेईन
गादी मऊमऊ
त्यावर निजवीन
माझे न ऐकशी
तोंड हे मलूल
आई, बघ कैसे
कैसे काय करू
आई बघ याला
काही तरी करी
उपाय थकले
मिटीत तो डोळा
त्याचा शब्द
हात माझा खुपे
जणू वाटे
उंचावरुन फार
होती त्यास
अजाण मी हरू
देवराया’
‘वाचव पाखरा
विश्वंभरा’
होतो मी बोलत
गोड शब्दी
पी रे माझ्या राजा
राग येतो
मीही रे लहान
झटे तुझे
होई जरा धीट
आईकडे
येते का आईची
गोड गोड
खरे जरी आहे
चांगला तू
पडू ना देईन
कुरवाळोनी
तुला मी घालीन
थोपटून
का रे गोड बोल
का रे केले
करीत पाखरु
सांग मज
होते काय तरी
उपाय तू’
झाला लोळा गोळा
क्षणामाजी
मृदुल ती मान
हृदयरडले
पाखरा राजसा
मजसी तोडून
मी ना कोणी तुझा
आई आहे परी
धाय मोकलील
प्राण ती सोडील
चोचीमध्ये दाणा
तुला न बघून
रडेल ती शोके
घिरट्या घालील
तुझ्या आईसाठी
नको ताटातुटी
मऊ मऊ तुला
टाकून तू प्राणा
संबोधिले ऐसे
पावले ते मृती
मी माझ्या लहान
“मूठमाती यास
आईजवळून
घेतले पवित्र
सोवळ्याची होती
फाडून घेतली
रेशमाच्या वस्त्री
गुंडाळून, गेह
बागेमध्ये गेलो
जेथे त्या फुलती
मोग-याजवळ
रडत खणली
आसवांच्या जळे
पवित्र ती केली
दगडधोंड्यास
टाकून पडले
माझे किती
गेलास सोडून
क्षणामध्ये
वाटे तुला जरी
घरी तुझी
टाहो रे फोडील
तुझ्यासाठी
येईल घेऊन
रडेल ती
वेडी ती होईल
भिरीभिरी
तिच्या प्रेमासाठी
करु राजा
घातला बिछाना
जाशी परी
पाखरास किती
हाय गेले
बोललो भावास
चल देऊ”
रेशमाचे वस्त्र
गुंडाळाया
जुनी एक चोळी
धांदोटी मी
पिलाचा त्या देह
सोडियेले
मोगरे शेवंती
तेथे गेलो
जागा नीट केली
खळगी एक
भूमी ती शिंपिली
जणू आम्ही
बाजूस करोनी
देह उचलोनी
फुले ठेवीयेली
अश्रू ते नेत्रीचे
शेवटले स्नान
पिलाला प्रेमाचे
डोळ्यांतील धारा
लोटिली ती माती
मऊ मेणाहून
त्यावर लोटून
डोक्यावर तेव्हा
शोकाने भरलेला
पिलाची ती आई
वर घिरट्या घाली
“तुझे बाळ गेले
नको ओरडोनी
त्याला नाही काही
मातृप्रेमाविणे
दिले त्याला पाणी
दिले बिछान्यास
नको ग ओरडू
माझी कासाविशी
बैसली पक्षिणी
करी आर्तस्वर
उरलेली माती
माता ती पहाते
कठोर वाटले
डोळ्यांतून लोटे
माती लोटुनिया
माता येई तीर
हुंगीतसे माती
डोळ्यांतून पाणी
प्रदक्षिणा घाली
मातीत खुपसूनी
ठेवियेला
शेजारी तयाचे
थांबती ना
घातले अश्रूंचे
दु:खाचे ते
स्नान त्या घालिती
मोठ्या कष्टे
मऊ लोण्याहून
दिली माती
पक्षी ओरडला
त्याचा शब्द
पहावया आली
केविलवाणी
गेले हो पक्षिणी
फोडी टाहो
पडू दिले उणे
सारे दिले
दिले त्याला घास
मऊ मऊ
माऊली तू अशी
होई फार”
वरी डहाळीवर
आरडून
लोटिली मी हाते
भरल्या नेत्री
कर्तव्य ते मोठे
अश्रुपूर
झालो आम्ही दूर
तैशी खाली
प्रेमळ पक्षिणी
माझ्या आले
पिलास पक्षिणी
चोच राही
शेवटला घास
शेवटल्या बोला
गेली ती माउली
माझा शोके ऊर
गेली ती पक्षीण
करित आर्तस्वर
बळे शोकपूर
आलो हो निघून
आईस म्हणालो
माझे गेले आज
दहा दिन त्याचे
आसवी भिजवीन
मोग-याजवळ
तेथे मी रडेन
आई म्हणे, “वेड्या,
कर्तव्य तू केले
पाखराला रोग
सुतक कशाला
मोग-याला तुझ्या
त्यात ते बसेल
तुम्हांला बघेल
सुगंध अर्पील
जा ये हातपाय
नको करु कष्ट
जेवायचे झाले
श्रमलासी फार
आईचे बोलणे
माझी मी धुतले
हातपाय माझे
जेवाया बैसलो
पोटामध्ये एक
भरोनीया येई
घास नेता वर
पिला जणू दिला
बोले जणू
पुन्हा डहाळीवर
फुटू पाहे
उडूनिया दूर
गेली गेली
आम्ही आवरुन
घराप्रती
“शिवू नको मज
पाखरु ते
सुतक धरीन
जागा त्याची
रोज मी जाईन
दोन्ही वेळा”
सुतक कसले
ये घरात
नव्हता कसला झाला
तरी त्याचे
फुले जी येतील
येऊनिया
प्रेमाला देईल
गोड गोड
धुवून ते नीट
आता मनी
घेई घास चार
पंढरी तू”
ते तदा ऐकिले
हातपाय
धुवुन मी आलो
खिन्न मनी
घासही न जाई
अंतरंग
तोंडाच्या जवळ
वरुन ते जळ
खाऊन बळेच
सदगदीत झालो
काही दिन चैन
पुढेपुढे त्रास
शोकापूर गेला
खेळात बुडाली
संसारसागरी
करी चमत्कृती
आज तो प्रसंग
लिहून काढला
लहानपणीचे
आहे का अजून
का झाले पाषाण
जगी वावरुन
सोनियाचा घडा
ठेवावा भरुन
सत्स्मृतींची सुधा
प्राशावी पाजावी
गोड आठवणी!
आज नाही साचा
करी माझे मन
प्रेमाने भरलेले
जीवनात माझ्या
आणावी निर्मळा,
प्रेम मानवांना
प्रेम सर्व प्राण्यां
प्रेम देऊ दे गे
पाषाण मृत्कणां
सर्वत्र पाहू दे
वर्षु दे सत्प्रेमा
घळघळे
थोडेसे मी गेलो
पुन:पुन्हा
पडेना जीवास
ओसरला
आठवण गेली
वृत्ती पुन्हा
संस्मृती विस्मृती
अभिनव
पुन्हा आठवला
भरल्या मने
प्रेमळ मन्मन
जैसे तैसे?
भावनाविहीन
इतुकी वर्षे?
मानवी जीवन
सतस्मृतींनी
भरुन ठेवावी
स्नेह्यांसख्यां
लहानपणीचा
राहिलो मी
पुन्हा आज ओले
करी पुन्हा
पुन्हा प्रेमकळा
आठवणी!
प्रेम पाखरांना
देऊ दे गे
झाडा माडा तृणा
देऊ दे गे
मला माझा आत्मा
निरंतर


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२६

मृत्युमित्र

( कोलेरिज कवीने एका अर्भकाच्या मृत्युप्रसंगी चारच ओळींचा श्लोक लिहिला, त्याचा अनुवाद.)

अद्याप पातकाने। नाहीच स्पर्शिलेली
अद्याप दु:खदैन्ये। नाहीच भाजिलेली
तो येइ मृत्युमित्र। कळि गोड ही खुडीत
फुलली न पूर्ण तोची। देवासमीप नेत
‘देवासमीप आता। कलिके फुले सुखाने
येथे किडी न खाती’। मृत्यू वदे मुखाने


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर १९२८

शांति कोण आणते?

(जगात मोठमोठ्या लढाया होताता. शेवटी तह होतात. शांती येते. परंतु हे तह, ही शांति कोण घडवून आणते? सतीचे अश्रू व संतांची प्रार्थना. एका इंग्रची कवितेच्या आधारे.)

शस्त्रास्त्रांनी सुटती न कधी प्रश्न ते जीवनाचे
ना केव्हाही मिटतिल लढे संगराने रणाचे
शांती येते भुवनि न कधी बाँबतोफादिकांनी
अर्की निर्मी अमृतरस हे ऐकिले काय कोणी?।।

युद्धी जाई पति मरुनिया होइ पत्नी अनाथा
बाळा घेई जवळि रडते फोडूनी स्वीय माथा
शोकावेगे अगतिक अशी सोडिते अश्रुधार
त्या अश्रूंनी सकल जगती शांतिचा येइ पूर।।

“येवो देवा! सकल भुवनी प्रेम, दावी सुपंथ
मद्वंधना, सतत चुकती, तू क्षमा मूर्तिमंत”
ऐशी अंत:करणि करि जी प्रार्थना नित्य संत
आणी तीच प्रशमुनि रणे शांततेचा वसंत।।

जे कारुण्ये कढत कढत श्वास तो संत सोडी
त्यांच्यामध्ये अभिनव असे तेच त्याला न जोडी;
धर्मग्रंथांमधिल सगळे सार ते मूर्तिमंत
सत्यश्रू तो उभय मिळुनी होतसे आपदंत।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१