त्याचं आणि तिचं लग्नं होणार होतं. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर पण तिच्या घरचे आड आले. त्याच्या घरी जाऊन लग्नाची प्राथमिक बोलणी वगैरे करायची नाटकं केली तिच्या वडिलांनी आणि थोडा काळ जाऊ दिला. मग एके दिवशी खानदान की इज्जत, नहीं तो मैं मर जाऊंगा वगैरे ब्लॅकमेल करून तिचं लग्नं लावून दिलं दुस-याच मुलाशी. त्यानंतर ते जवळपास वीसेक वर्ष भेटलेच नव्हते एकमेकाला.
आणि आज इतक्या वर्षांनी ते रस्त्यात भेटले. जुन्या जखमा परत चिघळल्या. 'घरी येतोस? इथेच रहाते मी पुढच्या चौकात'. दोघेजण तिच्या घरी गेले. दोघांनी खूप गप्पा मारल्या. शेवटी निघायची वेळ आली. 'थांब रे, जेऊनच जा आता'. तिनी त्याला आग्रहाने वाढलं अगदी. परत भेटू असं म्हणत त्यांनी निरोप घेतला एकमेकांचा. जिना उतरता उतरता तो मनाशी म्हणाला,
'थँक गॉड, हिच्याशी लग्नं नाही झालं, काय बेकार करते ही स्वयंपाक, हॉरीबल'.😝
आणि आज इतक्या वर्षांनी ते रस्त्यात भेटले. जुन्या जखमा परत चिघळल्या. 'घरी येतोस? इथेच रहाते मी पुढच्या चौकात'. दोघेजण तिच्या घरी गेले. दोघांनी खूप गप्पा मारल्या. शेवटी निघायची वेळ आली. 'थांब रे, जेऊनच जा आता'. तिनी त्याला आग्रहाने वाढलं अगदी. परत भेटू असं म्हणत त्यांनी निरोप घेतला एकमेकांचा. जिना उतरता उतरता तो मनाशी म्हणाला,
'थँक गॉड, हिच्याशी लग्नं नाही झालं, काय बेकार करते ही स्वयंपाक, हॉरीबल'.😝