पुण्यात कित्येकदा इतकी चांगली माणस भेटतात कि विचारावस वाटत ....






तुम्ही मुळचे कुठले.
पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल,

"गधड्या, अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी… कितीतरी लाईक करायचे राहून गेले… ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले… दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या… पण तुला आहे का काही त्याचं?"
आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली....! आज तिचा फोन आला.....
...
.
..
.
.
.
.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
.
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले
"....
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ....
.
.
.
.
.
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली " माफ करशील ना मला "...
.
.
.
तो म्हणाला
" माफी कसली मागतेसअपराध्यासारखी कर्तव्यपूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......"
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होशील नक्की माझी ".
..
.
.
ऐकून ती म्हणाली "आठवणीतआणि हृदयाच्या कोपर्यात असशील नेहमी".
.
.
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला"
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला
".
.
.
.
आणि म्हणाला






दुसरी शोधली पाहिजे..
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

     तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..
" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, 
पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."

तात्पर्य :-
      लोक सन्मान तुमचा नाही तर,  तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.

!! कडू आहे पण सत्य आहे !!
कधी कधी वाटतं हे नाव , पैसा , प्रसिद्धी सगळं सोडून संन्यास घ्यावा...
:
:
:
:
मग वाटतं आधी हे सगळं मिळू तर दे ..
गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.

असे होऊ नये म्हणून फार पुर्वी शहाणी माणसे गाढवांना जोडीजोडीने बांधत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बांधत. गाढवं जागची हलत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात.

असे म्हणतात की या वरूनच आपल्या पुर्वजांना लग्नाची कल्पना सुचली..

बिछडा प्यार...

त्याचं आणि तिचं लग्नं होणार होतं. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर पण तिच्या घरचे आड आले. त्याच्या घरी जाऊन लग्नाची प्राथमिक बोलणी वगैरे करायची नाटकं केली तिच्या वडिलांनी आणि थोडा काळ जाऊ दिला. मग एके दिवशी खानदान की इज्जत, नहीं तो मैं मर जाऊंगा वगैरे ब्लॅकमेल करून तिचं लग्नं लावून दिलं दुस-याच मुलाशी. त्यानंतर ते जवळपास वीसेक वर्ष भेटलेच नव्हते एकमेकाला.

आणि आज इतक्या वर्षांनी ते रस्त्यात भेटले. जुन्या जखमा परत चिघळल्या. 'घरी येतोस? इथेच रहाते मी पुढच्या चौकात'. दोघेजण तिच्या घरी गेले. दोघांनी खूप गप्पा मारल्या. शेवटी निघायची वेळ आली. 'थांब रे, जेऊनच जा आता'. तिनी त्याला आग्रहाने वाढलं अगदी. परत भेटू असं म्हणत त्यांनी निरोप घेतला एकमेकांचा. जिना उतरता उतरता तो मनाशी म्हणाला,

'थँक गॉड, हिच्याशी लग्नं नाही झालं, काय  बेकार करते ही स्वयंपाक, हॉरीबल'.😝
आसे चालु आहे सध्या


डोनाल्ड ट्रम्प ला व्हाइट हाऊस पेंट करायचे होत.. त्याने निविदा मागवल्या...
चीन च्या कारागिराने 3 कोटि सांगितले,
यूरोप च्या कारागिराने 7 कोटी  सांगितले आणी भारताच्या करागिराने 10 कोटी सांगितले...
त्यावर ट्रम्प ने चीनच्या माणसाला विचारले तू 3 कोटी का मागितले...तो म्हणाला 1कोटींचा कलर,1 कोटींचा कामगार खर्च,आणी 1 कोटी नफा....
मग यूरोप च्याची वेळ तो म्हणाला 3 कोटी चा कलर,2 कोटी कामगार खर्च,आणी 2 कोटी प्रॉफ़िट...
आणी मग भारतीय व्यक्तीला विचारले तर तो म्हणाला 4 कोटी तुम्हाला,3 कोटी मला, आणी 3 कोटी त्या चीनच्या व्यक्ति ला जो कलर करणार आहे....

भारतीय व्यक्तीला ते कॉन्ट्रैक्ट मिळाले ना!!!!
पुणे -: "काय घ्याल आपण??

बासुंदी आणू की खीर?"


कोल्हापूरकर - "घरात एकच वाटी आहे का?
एका क्लार्कने आपल्या बाॅसला दम दिला " तुमचे पुढचे दात पाडतोच "
सगळ्यानी त्याला वेड्यात काढले.
तो अधिकारी रिटायर होताना ह्या कारकूनाने त्याच्या सर्व्हिसबुक मद्धे नोंद केली " ओळखीची शाररिक खूण -- पुढचे दोन दात पडले आहेत ".

त्या अधिका-याला पुढचे दोन दात काढावे लागले. मगच त्याची पेन्शन सुरू झाली.
माझा एक मित्र आहे
तो
इतके दर्द भरे
स्टेटस् टाकतो की,
.
.
.
.
.
.
कधी-कधी मी पण
त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो!!!
बायकोनें नवऱ्याला विचारले.."अहो आजकाल जिकडेतिकडे लोक जीएसटी ची चर्चा करत आहेत, हे जीएसटी म्हणजे काय ?"                       

नवरा : अगं जीएसटी म्हणजे काय हे झटकन समजणे थोडे अवघडच आहे. पण तरीपण तुला मी माझा अनुभव सांगून थोडक्यात समजावतो.

जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा घरी यायला उशीर झाला तर प्रथम अंगणात बहिणीला मग दारावर आईला अन् नंतर घरात  वडिलांना सर्व उशीर होण्याचे कारण समजावे लागे पण आता लग्न झाल्यावर मला तिघांना समजावं लागत नाही तुला समजवून सांगितले की पूरे !!!

तो आणि ती

तो आणि ती दोघेही मनोरुग्ण …. एकाच इस्पितळात ……

इस्पितळात ज्या दिवसा पासून भेटले होते तेव्हा पासूनच

त्यांच्यात एक बंध निर्माण झाला होता…. सार्‍यांना त्याचे अप्रूप वाटे…

सारा दिवस ते सोबतच असायचे… एकमेकांशी कधीचं बोलत नसत…

नि:शब्द….. जणू त्यांचे मन एकचं होते म्हणून त्यांना शब्दांची गरज नसावी….

असेच रोज सारखे आजही ते इस्पितळाच्या आवारात मूकपणे फिरत होते…

चालता चालता ते स्विमींग पुल पाशी आले… काय झाले कुणास ठाऊक …

त्याने तिचा हात झटकला आणि पळत जाऊन पाण्यात उडी मारली…

ना तो बाहेर येण्यासाठी धडपडला….. ना तरंगण्यासाठी त्याने हात पाय मारले

त्या पाण्याच्या तळाशी जाऊन स्थिरावला …. आत्महत्या करत असावा तो बहुतेक…

हे पाहून क्षणातच तीने सुध्दा पाण्यात उडी मारली….

त्याची मान पकडून त्याला लागलीच बाहेर घेवून आली… त्याचा जीव वाचवला…

दूसर्‍या दिवशी डॉक्टर आले…हे सगळे पाहून…ऐकून….

त्यांनी तिला त्वरीत इस्पितळातून सुटी देण्याचे फर्मावले….

कारण आता ती बरी झाली होती…. तिचे मन स्थिर झाले होते.  ती विचार करु शकत होती…

डॉक्टरांनी तिला बोलावले आणि म्हणाले

"तुझ्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे”

तिच्या चेहर्‍यावर तसेचं शांत भाव होते… डॉक्टर पुढे म्हणाले

"चांगली बातमी ही की तुला Discharge देण्यात येत आहे कारण

काल तू जे केलेस त्यावरुन तू आता जबाबदार झाली आहेस आणि

तू आपल्या प्रेमाच्या व्यक्तींची काळजी घेवू शकतेस. तुझी कालची कृती

वेड्या माणसाची असूच शकत नाही. म्हणून तू आता बाहेरच्या जगात जाण्यासाठी मुक्त आहेस…

वाईट बातमी अशी की…. तो काल तू ज्याला वाचवलेस… तो मेला

त्याने रात्री काल रात्री स्वतःला पंख्याला टांगून घेतले….."

हे सांगताना डॉक्टरांचे डोळे पाणावले ….. त्यांनी तिच्या कडे पाहीले…

ती अजूनही तशीच शांत होती……मग म्हणाली

" त्याने स्वतःला नाही टांगून घेतले…

तो ओला झाला होता ना म्हणून लवकर वाळावा यासाठी मीच त्याला पंख्याला टांगले………
.
.
.
मी घरी केव्हा जाऊ शकते ???? 

आज सगळ्याच आल्यात ना

काही बायका रोज संध्याकाळी पार्कात बसून गप्पा मारायच्या आणि खूप हसायच्या.
कुलकर्णी काका नेहमी पार्कात फे-या मारायला जात असत, या बायकांची मैत्री, त्यातला आनंद पाहुन कुलकर्णी काकांनाही फार छान वाटे.
पण, एक दिवस त्या सगळ्या बायका शांत बसल्या होत्या. सगळ्यांचे चेहरे पडले होते. कुलकर्णी काकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांना राहवेना. काका त्या बायकापाशी गेले आणि म्हणाले, " रोज तुम्ही इतक्या छान हसत असता. आज काही घडलयं का?"
त्यातली एक जण म्हणाली, "
.

.
.

..

.
.

.

आज सगळ्याच आल्यात ना. "

घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा...

मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने फक्त म्हैसकर कुटुंबच सुन्न झालेले नाही. ज्या कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी आहे असे प्रत्येक घर या घटनेने हादरले आहे. मलाही एकच मुलगी आहे, कालपासून काळजीने झोप उडालीय, एकुलत्या एक मुलाशी वागायचे कसे हेच कळेनासे झाले आहे कालपासून, जर एवढ्या आनंदी कुटुंबात हे असे घडू शकते तर आम्हा मध्यमवर्गीयांचे काय?, आम्ही दोघे नोकरी करतो, दिवसभर मुलगा एकटा आणि रात्री घरात गेलो की आमचेच प्रश्न संपत नाहीत, तर त्याचे प्रश्न आणि विषय कसे हाताळणार, काय करावे कळतच नाहीय... अशा एक ना दोन शेकडो प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत.

घराघरात असे अस्वस्थ मन्मथ आहेत आणि त्यांच्या काळजीने त्याच्याही पेक्षा अस्वस्थ झालेले आईबाप. कुठेही जा, ज्यांचा म्हैसकर परिवाराशी संबंध नाही, त्यांची ओळखही नाही पण वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि आम्हाला आमचा मुलगा समोर दिसतोय हीच चर्चा सर्वत्र आहे.

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘मस्त मजेचे आईबाबा’ या नावाने मुलाखत घेण्याचा कार्यक्रम मी करायचो. मुलांना कसे वाढवायचे, त्यांच्यात भावनिक गुंतवणूक कशी करायची हा त्याचा विषय असायचा. मध्यंतरात पालकांनी प्रश्न विचारा असे आवाहन डॉ. नाडकर्णी करायचे. त्यावेळी आम्ही आमच्या मुलीसोबत तिच्या मासिक पाळीविषयी कसे बोलायचे, किंवा मुलगा वयात येतोय, त्याला सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगायच्या, असे शेकडो प्रश्न त्यावेळी यायचे. एवढा नाजूक विषय, पण आईबापाशी मुलं मुली तो बोलू शकत नाहीत. यातून एक सूत्र समोर आले, की आम्ही आमच्या मुलांचे आईबाप आहोत पण मित्र होऊ शकलेलो नाही. मित्र होण्यासाठी त्याच्याशी एक सहज संवाद व्हायला हवा तोच कधी आमचा झालेला नाही.

आठवून पाहा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी आली की तुम्ही त्यांना काय विचारता... डबा खाल्ला का? सगळा का संपवला नाही? रोज कशी तुझ्या आवडीची भाजी मिळणार? होमवर्क दिले का? अभ्यास कसा चालूय? सर काय म्हणाले? आता जायचे असेल हुंदडायला? या आणि अशा तत्सम मोजक्या प्रश्नाशिवाय आम्ही त्याच्याशी बोलतच नाही कधी...! एखादा सिनेमा आवडला का? त्याची स्टोरी काय होती? त्यात तुला काय आवडले? मला आज एक छान पुस्तक वाचायला मिळाले. तूही वाच, तुला ते नक्की आवडेल. चल आज नाटकाला जाऊ, चांगलं नाटक आहे. आजचा पेपर वाचलास का? अमूक लेख खूप छान आहे. नक्की वाच... हे असे संवाद किती घरांमध्ये घडतात? किती पालक अशा अवांतर गोष्टी महत्त्वाच्या मानतात?



आम्ही आमच्या अपेक्षांचे ओझे आमच्या मुलांच्या पाठीवर लादून मोकळे होतो. दप्तरांच्या ओझ्यापेक्षा आई बापाच्या अपेक्षांचे न दिसणारे ओझे मुलांना अनेकदा असह्य होते. ते बोलून दाखवत नाहीत पण आतल्या आत घुसमटायला लागतात. आम्ही मात्र; त्याला खूप अभ्यास आहे त्यामुळे तो असा शांत शांत झालाय... असा त्या घुसमटण्याचा आमच्या सोयीचा अर्थ काढून मोकळे होतो. आम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचे होते, आम्हाला मोठा अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीने आम्ही होऊ शकलो नाही म्हणून आमच्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण करावे असा दुराग्रही अट्टाहास आम्ही धरतो.

त्यातून मग माझ्या मुलाने किंवा मुलीने काय व्हावे हे मी माझ्या मित्रांशी बोलतो आणि आपले आई बाबा कसे आहेत किंवा कसे असायला हवेत या विषयीची मतं आमची मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. पण आम्ही आमच्या मुलांशी किंवा मुलं आई बाबांशी या अशा विषयांवर एकमेकांशी कधी बोलतच नाहीत.

औरंगाबादचे एक दाम्पत्य. डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट पत्नी स्त्री रोगतज्ज्ञ. त्यांचे स्वत:चे मोठे हॉस्पिटल. एकुलता एक मुलगा. पण त्याला डॉक्टरकीत रस नाही. त्याला इंग्रजी विषय घेऊन साहित्यिक व्हायचे होते. घरात काही काळ भूकंपाची स्थिती. पण ते दोघे समंजस होते. मुलाला जे शिकायचे ते शिक अशी भूमिका त्यांनी घेतली. आज तो मुलगा पुण्यात इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करतोय. किती मुलांच्या वाट्याला हे येते?

मुंबईचे एक वडील. कॉर्पोरेट आॅफिसात नोकरी करणारे. त्यांचा मुलगा १८ वर्षांचा झाला त्या रात्री त्यांनी त्याला एक कविता लिहून भेट दिली. आता तू स्वतंत्र आहेस, काहीही करू शकतोस पण हे करताना आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करता आल्या तर बघ आणि रात्री १२ वाजता एक केक आणि ती कविता त्यांनी त्या मुलाला भेट दिली. नात्यांमधला हा हळुवारपणा आज किती पालकांच्या वागण्यात दिसतो?

पालक आणि मुलांमधला संवादच दिवसेंदिवस कमी होत जातोय. दोघांनी नोकरी केल्याशिवाय घर चालवणे आजच्या काळात कठीण होऊन बसले आहे. त्यात सरकारी असो की खासगी, नोकरीतले ताणतणाव आई बाप दोघेही घरी घेऊन येतात. त्यातून होणारी चिडचिड, पियर प्रेशरमुळे मुलांमध्ये वाढत जाणारी मानसिक दरी आणि या सगळ्यात त्याच्याशी बोलणारेच कोणी नसल्याने त्याची होणारी घुसमट. मग अशी मुलं मोबाईल, फेसबुच्या नादी लागतात. सोशल मीडियातून मिळणारे लाईक्स आणि हिटस् त्यांना त्यांची ओळख वाटू लागते. मग ते त्यांच्या मनातलं फेसबुकला सांगायला लागतात... अगदी मी आज आत्महत्या करणार आहे, जीवन संपवणार आहे हे देखील फेसबुकच्या निर्जीव वॉलवर लिहून जीवन संपवणारी मुलं आजूबाजूला अनेक आहेत...! हे थांबायला हवे.

मुलांना पतंग उडवण्यासाठी गच्चीवर घेऊन जाणारे आईबाबा बारकाईने पाहिले तर पतंग पालकांच्या हाती असतो आणि मांजाची चक्री मुलांच्या हातात असते. पतंग उंच गेला की काही वेळ तो आम्ही मुलाच्या हाती देतो आणि पुन्हा तो आमच्या हातात घेतो आणि मुलाला मांजा गोळा करायला सांगतो. वास्तविक पतंगाची दोरी त्याच्या हाती हवी आणि मांजाची चक्री पालकांच्या हाती. किती ढिल द्यायची हे पालकांनी ठरवावे पण आम्ही उलटेच करतो... साधे साधे छंदही त्याला जोपासू देत नाही. छंदासारखे खळाळते झरे देखील आम्ही बांध घालून थोपवतो. अभ्यास, मार्क आणि आणखी मार्क यांच्या जीवघेण्या स्पर्धेत त्याला झोकून देतो. ९० टक्के मार्क मिळाल्यानंतरही आम्ही आणखी थोडे मिळायला हवे होते असे म्हणतो. या स्पर्धेच्याही पलीकडे एक सुंदर जग आहे, संवादाचे पूल आहेत, नात्यांचे घट्ट पदर आहेत हेच मुळी विसरून जाणाऱ्या पालकांना मन्मथच्या जाण्याने हादरवून टाकले आहे. काही तरी चुकते आहे हे कळतेय, पण वळायचे कसे याचा शोध मन्मथच्या जाण्याने सुरू झालाय हे मात्र खरे...

- अतुल कुलकर्णी

हरवलेला आत्मविश्वास

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले.

गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.
पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.

लेखक:
कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?

जोशी काका :
नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का ?

जोशी काका : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.
बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती


"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

 तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..



पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

 कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??


तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

 पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई रोज रानात दिवस भर कष्ट करून पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.


आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो


आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,


ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔



हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....
आजचा विचार

शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी

पहाटेचे मित्र वाढवा

आणि

रात्रीचे मित्र कमी करा

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतिची.....


        🌿 दोन पक्ष 🌿
(१) कृष्ण पक्ष ,(२) शुक्लपक्ष
                         
         🌿 ऋण🌿
(१) देव ऋण , (२) पितृ ऋण ,
        (3) ऋषि ऋण .

       🌿चार युग 🌿
(१) सतयुग , (२)त्रेतायुग ,
(३)द्वापरयुग , (४)कलियुग.

       🌿चार धाम🌿
(१)द्वारका , (२)बद्रीनाथ ,
(३)जगन्नाथ पुरी , (४)रामेश्वरम धाम.

       🌿चारपीठ 🌿
(१)शारदा पीठ ( द्वारिका )
(२)ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम )
(३)गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) ,
(४)शृंगेरीपीठ !

       🌿चार वेद🌿
(१)ऋग्वेद , (२)अथर्वेद ,
(३)यजुर्वेद ,
(४)सामवेद.

      🌿चार आश्रम🌿
(१)ब्रह्मचर्य , (२)गृहस्थ ,
(३)वानप्रस्थ , (४)संन्यास.

       🌿चार अंतःकरण🌿
(१)मन , (2)बुद्धि , (३)चित्त ,                (४)अहंकार.

       🌿पचं गव्य🌿
(१)गाईचे तूप(२)दूध , (३)दही ,
(४)गोमूत्र , (५)शेण

       🌿पचं देव🌿
(१)गणेश , (२)विष्णु , (३)शिव ,
      (४)देवी ,(५)सूर्य.

        🌿पंच तत्त्व🌿
(१)पृथ्वी ,(२)जल , (३)अग्नि ,
(४)वायु , (५)आकाश.

       🌿सहा दर्शन🌿
(१)वैशेषिक , (२)न्याय , (३)सांख्य ,
(४)योग , (५)पूर्व मिसांसा , (६)दक्षिण मिसांसा.

        🌿सप्त ऋषि🌿
(१)विश्वामित्र ,(२)जमदाग्नि , (३)भारद्वाज , (४)गौतम ,
(५)अत्री , (६)वशिष्ठ,(७)कश्यप.

       🌿सप्त पुरी🌿
(१)अयोध्यापुरी,(२)मथुरापुरी,
(३)मायापुरी,(४)काशी,(५)कांची,
(६)अवंतिका,(७)द्वारका पुरी.

       🌿आठ योग🌿
(१)यम,(२)नियम,(३)आसन,(४)प्राणायाम,(५)प्रत्याहार,(६)धारणा,(७)ध्यान,(८)समाधी,

        🌿आठ लक्ष्मी🌿
(१)आग्घ,(२)विद्या,(३)सौभाग्य,
(४)अमृत,(५)काम,(७)सत्य,  (८)भोग आणी योग लक्ष्मी.

      🌿नव दुर्गा🌿
(१)शैल पुत्री,(२)ब्रह्मचारिणी,(३)चंद्रघंटा,(४)कुष्मांडा,(५)स्कंदमाता,(६)कात्यायिनी,
(७)कालरात्रि,(८)महागौरी,
(९)सिद्धिदात्री.

      🌿मुख्य दिशा चार🌿
(१)पूर्व,(२)पश्चिम,(३)उत्तर (४)दक्षिण

       🌿उपदिशा सहा🌿
(१)ईशान,(२)नैऋत्य,(३)वायव्य, (४)आग्नेय,(५)आकाश (६)पाताल.

    🌿मुख्य अवतारअकरा🌿
(१)मत्स्य्,(२)कच्छप,(३)वराह,(४)नरसिंह,,(५)वामन,(६)परशुराम,(७)श्रीराम,(८)कृष्ण,(९)बलराम,(१०)बुद्ध,(११)कल्कि.

     🌿मराठी महिने बारा 🌿
(१)चैत्र,(२)वैशाख,(३)ज्येष्ठ,(४)आषाढ,(५)श्रावण,(६)भाद्रपद(७)अश्विन,(८)कार्तिक,(७)मार्गशीर्ष,(८)पौष,(११)माघ,(१२)फाल्गुन

   🌿बारा राशी🌿
(१)मेष,(२)वृषभ,(३)मिथुन,(४)कर्क,(५)सिंह,(६)कन्या(७)तुला,(८)वृश्चिक,(९)धनु,(१०)मकर,(११)कुंभ,(१२)कन्या.

🌿बारा ज्योतिर्लिंग🌿
(१)सोमनाथ ,(2)मल्लिकार्जुन ,(३)महाकाल ,(४)ओंकारेश्वर ,(५)बैजनाथ ,(६)रामेश्वरम ,(७)विश्वनाथ ,(८)त्र्यंबकेश्वर ,(९)केदारनाथ ,(१०)घुष्नेश्वर ,(११)भीमाशंकर ,(१२)नागेश्वर.

   🌿पंधरा तिथि🌿
(१)प्रतिपदा,(२)द्वितीया,(३)तृतीया,(४)चतुर्थी,(५)पंचमी,(६)षष्ठी,(७)सप्तमी,(८)अष्टमी(९)नवमी,(१०)
दशमी,(११)एकादशी,(१२)द्वादशी,(१३)त्रयोदशी,(१४)पोर्णीमा,
(१५), अमावास्या !

        🌿स्मृतिया🌿
(१)मनु,(२)विष्णु,(३)अत्री,(४)हारीत,(५)याज्ञवल्क्य,(६)उशना,(७)अंगीरा,(८)यम,(९)आपस्तम्ब,(१०)सर्वत,(११)कात्यायन,(१२) ब्रहस्पति,(१३)पराशर,(१४)व्यास,(१५)शांख्य,(१६)लिखित,(१७)दक्ष,(१८)शातातप ,(१९)वशिष्ठ.
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.
बायकोचा मेसेज असतो---

"किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!"

अर्जंट पाहिजेत.....

एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,,,,,,,,
जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल,,,,,..✌​

एक ऑप्टिशियन पाहिजे
जो लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन नीट करून देईल,,,,,,👍​

एक कलाकार पाहिजे,,,,,,,,,,,,,
जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्ययाचे रेषा रेखाटू शकेल,,,,,,,,,,😊

एक बांधकामगार पाहिजे,,,,,,,,,
जो दोन शेजाऱ्यांमध्ये उत्तम सेतू उभारू शकेल,,,,,,,,,🙏​

एक माळी काका पाहजे,,,,,,,,,
जो चांगल्या विचारांच रोपण करू शकेल,,,,,,,,,,☝​

एक प्लंम्बर पाहिजे,
जो तुंबलेल्या मनांना मोकळं करू शकेल,,,,,,,,,,,🤗

एक शास्त्रज्ञ पाहिजे,,,,,,
जो एकमेकांबद्दलची ओढ शोधू शकेल,,,,,,,,,,,,😌

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,,,,,,,,,,,,

एक शिक्षक पाहिजे,,,,,,,,,,
जो एकमेकांशी संवाद कसा
साधायचा ते शिकवू शकेल,.....☝​

आज सर्वांना याचीच नितांत गरज आहे.
एक पुणेकर व्यक्तीने मिठाईचे दुकान उघडले

आणि जाहिरात दिली

" कामगार पाहिजे"

पात्रता- मधूमेह असला पाहिजे ...

Made in Pune
मन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले,
पोरगी  पसंत पडली

पंडीतजी बोलले, ३६ चे ३६ गुण जुळले 😊

मन्याचे घरवाले उठून जाऊ  लागले

पंडितजी बोलले : काय झालं हो  ???

मन्याचे घरवाले  :- पोर तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ?
डाटा वापरासाठी मराठी एकक.

KB, MB, GB
या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे .



KB - कण भर
MB - मण भर
GB - गांव भर.
या दोन कथा आहेत, दोन्ही कथा वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की आपण आज जे काही करतो त्याचा पुढील पिढीवर परिणाम कसा होतो !!!

पहिली कथा

आपल्याला अल कॅपिनो माहीत असेलच, एके काळचा शिकागोचा सर्वात मोठा डॉन. त्याने अक्षरशः शिकागो वर राज्य केले आहे. दरोडे असो कि खून किंवा जुगार किंवा वेश्यागृहे, तुम्ही ज्या कुठल्या गुन्ह्याची कल्पना करू शकाल ते सगळे गुन्हे अल कॅपिनोनी केले होते. "इझी ऐडी" असे टोपण नाव असणाऱ्या आणि कायद्याला वाट्टेल तसं वाकवू शकणाऱ्या वकिलाच्या मदतीने कायद्याच्या कचाट्यातून हा माणूस मात्र नेहमीच सुटत आला. या बदल्यात इझी ऐडीला अल कॅपिनोनी जबर पैसा, मोठे घर वगरेसगळ दिलं. इझी ऐडीच घर एखाद्या नगराएवढे मोठे होते. संपूर्ण सुरक्षा होती. नोकरचाकर देखील होते दिमतीला. या ऐडीचा जीव मात्र एकुलत्या एका पोरात होता. गुन्हेगारी विश्वाचा एवढा मोठा वकील पण त्याने आपल्या पोराला मात्र या सगळ्यापासून दूर ठेवले. सत्य असत्याची जाण करुन दिली. ऐडीला नेहमी वाटायचं की आपला मुलगा मोठा झाला की त्याला समाजात आदरयुक्त स्थान असावे. इतकी प्रचंड संपत्तीअसून ऐडी मात्र आपल्या मुलाला न चांगले नाव देवू शकत होता न चांगलीउदाहरणे. एका दिवशी ऐडीला ही घुसमट पेलवेना आणि त्याने अल कॅपिनोची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला याची किंमत माहीत होती. अक्ख्या शिकागोवर राज्य करणार्या डॉनच्या विरुद्ध तो उभा होता. पोलिसांना आणि कर अधिकार्यांना त्याने अल कॅपिनो विरुद्ध सगळी माहिती आणि पुरावे दिले. परिणाम भीषण झाला. एका दिवशी भर रस्त्यात त्याची हत्या झाली. पण त्याने त्याच्या मुलासाठी मात्र एक उदाहरण निर्माण केले होते. सत्यासाठी जीवही जाऊ शकतो. राह कठीन है मगर अंतिम जीत सत्य कीही होती है !!! पोराला हे शिकवण्यासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले होते !! पोलिसाना ऐडीच्या खिश्यात रोझरी आणि एक कविता सापडली

The poem read: The clock of life is wound but once, and no man has power to tell just when the hands will stop At, later or early hour Now is the only time you own. Live, love, toil with a will Place no faith in time For the clock may soon be still


 दुसरी कथा

दुसऱ्या महायुद्धाने जगाला अनेक हिरो दिले. असाच एक साहसी योद्धा होता Butch O'Hare. फायटर पायलट असलेला बुच विमानवाहक युद्धनौका Lexington वर होता या महायुद्धात. साऊथ पैसीफिक या महासागरात ही युद्धनौका तैनात होती. एका दिवशी अख्ख्या स्क्वाड्रनला एका मिशन वर पाठवण्यात आले, आकाशात उडाल्यावर बुचच्या लक्षात आले कि त्याच्या विमानात पुरेसे इंधन नाही आहे. बेसकॅम्पनी त्याला परतण्याचा आदेश दिला. खट्टू मनानी बुचनी फॉरमेशन सोडले आणि परत यायला निघाला. परत निघालेल्या बुचला रक्त गोठवणारे दृश्य दिसले. मोठं जपानी स्क्वाड्रन बुचच्या युद्धनौकेवर चाल करून येत होते. अमेरिकन स्क्वाड्रन सोर्टीवर निघाले होते आणि त्यांनी युद्धनौका अक्षरशः हतबल होणार होती. बचाव करायला नौकेवर एकही विमान नव्हते आणि बुचच्या विमानात पुरेसे इंधन पण नसल्यामुळे तो अमेरिकन स्वाड्रनला परत आणू शकणार नव्हता. जपानी स्क्वाड्रनशी लढणे हा एकाच पर्याय बुचला दिसला आणि तो बेभानपणे जपानी फॉरमेशन मध्ये घुसला. असेल नसेल तो सगळा दारुगोळा त्याने वापरून काही जपानी विमानांना घायाळ केले. दारुगोळा संपल्यावर विमानाचे पंख त्याने शस्त्र म्हणून वापरायला सुरवात केली. जपानी स्वाड्रनची पाच विमाने त्याने पाडली होती आणि उरलेल्या जपानी स्क्वाड्रननी माघारघेतली. आपल्या अतिशय नुकसान झालेल्या विमानाला बुचने कसे बसे युद्धनौकेवर उतरवले. विमानात असलेल्या कॅमेराने बुचचा भीम पराक्रम रेकॉर्ड केला होता. बुचच्या या पराक्रमाची सगळ्यांनी दाद दिली. आसमंतात ऐकू जातील इतक्या जोऱ्यात टाळ्या वाजवण्यात आल्या. २० फेब्रुवारी १९४२ ला केलेल्या या पराक्रमासाठी बुच नौसेनेचा FIRST ACE OF WWII झाला आणि शौर्यपदकांनी त्याचा सन्मान करण्यात आला. मात्र या अवघा २९ वर्षाचा महान योद्धा पुढील वर्षी एका हवाई कारवाईत मारल्या गेला. त्याच मूळ शहर त्याला विसरू शकणार नव्हते. त्याच्या शहराने त्या शहरातील विमानतळाला त्याचे नाव दिले. आपण कधी शिकागोला गेलात तर O'Hare आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचा पुतळा बघा. टर्मिनल १ आणि २ च्या मध्ये हा या वीराचा पुतळा !!!!

आता तुम्ही म्हणाल कि या दोन कथांचा एकमेकांशी काय संबंध... Butch O'Hare हा ईझी ऐडीचा मुलगा होता !!

कालबाह्य परंपरा

मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे...
एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले.
त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला.
थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते
आणि
ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते .
तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर
उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते
आणि
शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं.
दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते.
असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.
मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते
तेंव्हा
इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते.
यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.
पुढील 3-4 दिवस असे सतत घडते.
कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे.
अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े बघायला सुद्धा तयार नाही.
तेंव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले.
मग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले
आणि
दुसरे एक नवीन माकड आत टाकले.
या नवीन माकडाने केळी 🍌 नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुनी सर्व माकडं मिळून त्या नवीन माकडाला झोडू लागलीत.
दुसर्‍या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात.
हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडं त्याला झोड़तात.
पण यात विशेष हे असते की काल आलेले नविन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील असते ज्याच्या अंगावर कधीही गरम पाणी पडलेले नसते.
आता मारणाऱ्याला माहीत नाही
आपण का मारत आहोत?
आणि
मार खाणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात आहोत?
या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात.
आणि
रोज तोच प्रकार घडतो.
नवीन माकड केळीसाठी शिडीकड़े वळले की,
उर्वरित सर्व माकडं त्याला मारतात.
मारणार्‍या माकडांमध्ये जुनी माकडं ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत आणी
त्यांच्यासोबतच नवीन माकडं ही सामील होती ज्यांनी कधीही गरमा-गरम पाणी अंगावर झेलले नव्हते.
अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात.
प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो .
आता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडं असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो.
पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला की, इतर सर्व माकडं त्याला मारतात.
कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते,
आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला मारायचे बस्स एवढेच सर्वाना माहीत !!!

बोध:-
माणसांचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो.
पण आपल्याला त्यांचे मूळ कारण माहीतच नसते.
कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो.
त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात. तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे "अंधानुकरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो.
म्हणून कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्या मागचे कारण नीट समजून, ते वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया खरे आहे किंवा नाही हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास करू नये.
फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा...!!!!!
सर्व सुशिक्षित ज्ञानी लोकांना समर्पित
मित्र- यावर्षी वॅकेशनचा काय प्लॅन आहे?

मी- काही विशेष नाही..
गेल्यावर्षी युरोपला नव्हतो गेलो.....
आता यावर्षी अमेरिकेला नाही जाणार..
कधी कधी मित्रांवरच केस टाकावी असे वाटते
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
निदान तारखेच्या निमित्ताने भेटतील तरी  कोर्टात

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-  01 मे 1960
👉राजधानी - मुंबई
👉 राज्यभाषा - मराठी
👉🏼एकूण जिल्हे - 36
👉 एकूण तालुके-  355
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
👉🏼 ग्राम पंचायत -  28,813
👉 पंचायत समित्या 355
👉 एकूण जिल्हा परिषद- 34
👉 आमदार विधानसभा  288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा- 720 किमी
👉 नगरपालिका- 226
👉 महानगरपालिका- 27
27 वी मनपा पनवेल 1oct 2016
👉 शहरी भाग - 45.2 %
👉 ग्रामीण भाग 55 .8 %
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा 9.36 % प्रदेश व्यापला आहे
👉🏼 महाराष्ट्राची घनता 365
 👉🏼देशातील 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - पुणे  ( 94.3 लाख )
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - सिंधुदुर्ग (8.50 लाख)
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा
जनगणना 2011नुसार नंदूरबार 64.4 %
2014  पासुन पालघर 57.14 %
👉🏼MH लिंग गुणोत्तर  - 929
👉🏼सर्वाधिक रत्नागिरी - 1122
👉🏼MH बाल लिंग गुणोत्तर - 894
👉🏼सर्वाधिक पालघर - 967
👉🏼 महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.

👉🏼 अनुसुचित जाती पुणे प्रथम क्रमांकावर
👉🏼 अनुसुचित जमाती नाशिक प्रथम क्रमांकावर

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर  कळसूबाई (1646मी)
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉🏼 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - रत्नागिरी
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - नागपुर
(Oct 2016)
सर्व आजारांवर औषध आहे, पन एका आजारावर आज पर्यंत औषध सापडल नाही.आणि
तो आजार म्हणजे
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"कसतरीच होतय..."
पी टी चे सर... "सांग गन्या , ओलम्पिक मधे  भारताले मेडल काउन नाही भेटलं....?"



गन्या... "गुर्जी , मेडल कसं भेट्न...?

तुमी आमाले  पीटी मंधी निसते  कागदंच येचाले लावता अन् गवत उपडाले लावता................!!!"
शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं

सकाळी सकाळी सासू म्हणाली
म्हशीला खायला घाल

सून गोठ्यात गेली
म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली

सासूने विचारलं
म्हशीला चारा टाकला का

सून म्हणाली

ती आजुन ब्रश करतेय...
मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
विद्यार्थी: दहा.
मास्तर : ते कसे ?
विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील.
त्यांचा काय फणस होणार ?
एक भिखारी देवाला
हे देवा....
मला खाण्यासाठी अस काय तरी दे..
जे खाल्यावर सुधा संपायला नको...😜😜
.
.
देव-
हे घे पोरा...
.
.
.
'चिगंम'
मास्तर : सांग.. ५ – ५ = कीती??

सगळी मुले शांत..
🙄🙄

मास्तर : सांग बंड्या.. जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि
मी ५ इडल्या खाल्ल्या..
तर

तुझ्याकडे काय उरले??

बंड्या : सांबर अणि चटणी..!!!
Physics च्या नियमानूसार ....

 कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते....

उदाहरणार्थ


जबाबदारी!!!!
शाळेत आपल्या आदरणीय शिक्षकांनी केलेल्या काही शिक्षा आठवल्या कि, पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण, त्यांतून त्यांनी काय शिकवले ते बघा..!

👇
👇

१) बाकावर उभे राहा :-
😳😳 आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा. ☺

२) हात वर करून उभे रहा :-
😨😨 उच्च धेय्य ठेवा, उंची गाठा. 😊😊

३) भिंतीकडे तोंड करून उभे रहा :-
😱😱 आत्मपरीक्षण करा. 😀😀

४) वर्गाबाहेर उभे रहा :-
😁😁 चार भिंतीतून बाहेर या, जग बघा. 😄😄

५) गुढगे टेका :-
😔😒 विनम्र व्हा. 😀😄

६) कोंबडा व्हा :-
😁😳😟 शारीरिक सहनशक्ती वाढवा. 😀😄😃

७) फळा पुसा :-
😒😤😖 झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.😄😄😃

८) तोंडावर बोट ठेवा :-
😷🙊🙊 (स्वत:च्या) बाता कमी मारा. 😉😄😃

९) कान धरा :-
😁😁😳 लक्षपूर्वक ऐका.😀😄😄

१०) वाका, अंगठे धरून उभे रहा :-
😟😦😧 लवचिक बना.😉☺😃

११) हा धडा दहा वेळा लिहा :-
😁😁😳 अचूकतेसाठी सराव करा. 😀😄😃

१२) शाळा सुटल्यावर थांबा :-
😣😩😫 जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना! 😃😃😃
नवस करून, 9 महीने जीवापाड जपून, दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडिल "विनोद" कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय -
पु. ल. देशपांडे
😁😜😄

प्रताप नावाबद्दल पण तेच....
"हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल??
—पु. ल. देशपांडे
😂😂

पणशीकरांना मुलगा झाला...
मुलाचे नाव "श्रीपाद" ठेवले...
त्याचे पूर्ण नाव:

श्री पाद पण शी कर..!!!

💐पु. ल. देशपांडे 💐
एका शाळेत कार्यक्रमामध्ये ग्रुप फोटो काढण्याचा प्लॅन बनतो....
..
😸मुख्याध्यापक फोटोग्राफरला:- 20 रुपये खुप होतात, शाळेत 1600 विद्यार्थी आहेत 10-10 रुपये मधे फोटो काढा.
..
😉मुख्यध्यापक टीचरला:- फोटोसाठी सर्व विद्यार्थ्यांना ३०-३० रू. आणायला सांगा
..
😋टीचर वर्गामधें :”ऐका मुलांनो, ऊद्या तुमचा फोटोशूट होणार आहे,
सर्वांनी आपापल्या घरून ५०-५० रूपये घेवून या,,
.
मुलगा :😠 “ही सर्व टीचरांची मिलीभगत आहे,,
एक फोटो चेे 20/- रूपये लागतात आणी आपल्याकडून ५०-५० रू घेतात.. ,, .
.
.
नंतर आपल्याच पैशाने हे सर्व स्टाफ रुममधे समोसे खातील. आणी आपल्याला मिळेल ठेंगा ,, . .
At home-
😜मुलगा : “आई ऊद्या शाळेत फोटोशुट होणार आहे...१०० रु. मागितलेत . .
..
👵आई: 100 rs!!😧
ऊघड-ऊघड लुट आहे ही,
नंतर आपल्याच पैशाने मजा मारतील हे...
..
थांब तुझ्या बाबाकडून घेवुन देते 
..
आई ...बाबाला : 👦अहो ऐकल का ऊद्या चिंटुच्या शाळेत फोटोशुट आहे २०० रूपये मागितले !!”
😆😆
हाच भारत आहे, सगळीकडेच लुटमार चालू आहे.... 😂😂😜😜😜😜


👇🏻

या वरिल उदाहरणात १९०/- रु. म्हणजे बेहिशोबी मालमत्ता 👆याचा हिशोब देता न येणे म्हणजे तो काळा पैसा .....!👌👌
द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती.

प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता.

आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला....

त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला  मुक्कामाला एक छान खोली पाहिजे....

हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य घेवून जा....

परदेशी पाहूणा रुम बघायला गेला.....

मधल्या वेळेत मँनेजरने १०० डाँलरची नोट घेतली व बेकरी वाल्याचे पैशे चूकते केले....

 बेकरीवाल्याचा धंदा जेमतेमच चालत होता .
तो खूश झाला. त्याने त्या १००डाँलर्सची नोट घेतली व किराणा दुकणदाराची उधारी चूकती केली.....

किराणा दुकाणदाराला आनंद झाला.
फार दिवसापासून कामवाल्या बाईचे पैशे देता न आल्यामुळे ती कामावर येत नव्हती....

तो लगेच तिच्याकडे गेला .१०० डाँलर्सची नोट कामवाल्या बाईला दिली व सांगितले की आजपासून रोज कामावर येत जा...

 बिचारीचा आनंद गगनात मावेना.फार दिवसापासून तिला काम नव्हते .जवळ पैशे नव्हते...
ती उधार उसनवार करुन कसा तरी संसाराचा गाडा चालवत होती....

१०० डाँलर्स मिळाल्यामुळे तिला आनंद झाला....

ती तात्काळ ते पैसे घेवून हाँटेल मालकाकडे गेली....
जो खूपच चांगला ,दयाळू व मदतगार होता. तिला पैशांची गरज होती तेव्हा त्याने तिला १००डाँलर्स उसनवार दिले होते...

त्या बाईने हाँटेल मालकाचे पैशे परत केले. व आभार मानून निघून गेली.....

तितक्यात त्या परदेशी पाहूण्याला खोली पसंद न पडल्यामुळे तो मँनेजरकडे आला व १००डाँलर्सची नोट घेवून निघून गेला....

अर्ध्या एक तासा साठी १०० डाँलर्स बाजारात चलन रुपाने फिरले.
प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडली...

त्यामुळे हाँटेल मालक ,बेकरीवाला,किराणा दुकाणदार,कामवाली बाई प्रत्येकाचे देणे घेणे फिटले व पुन्हा ते व्यवसाय करु लागले...

 आपल्याजवळ जी संपत्ती असते त्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त असतो....

प्रत्येकजणांनी कथेतील माणसा प्रमाणे वर्तणूक केली तर विजय मल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. .....

नेहमी पैसा  फिरता ठेवा.
त्यावर अनेक जणाचे संसार  चालतात. जीवन जगण्यासाठी त्याचा वापर करा,
फक्त त्याच्यासाठी जगू नका.....
नवरा (बायकोला चिडवत ) :-

काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...

बायको :- एकटीच आली असेल....

नवरा :- हो तुला कस माहीत...?

बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
😜😜😜😂😂😂

1000 X 1000

श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.

मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.

अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.

श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.

श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.

एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

‘कारण त्याला 1000 X  1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.

‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.

‘हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.

‘हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.

‘माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.

‘वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला  बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला

‘ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.

‘तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला

‘श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो’

मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.

जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा  का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.

अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!...........
हल्ली झाडांवरील आंबेही स्वतःच खाली पडू लागले आहेत...

कारण त्या आंब्यांनाही माहित आहे...

भर उन्हात ते चोरून तोडणारं...
बरोबर नेम धरून दगड मारणारं...
तेच ते जिद्दीला पेटणार बालपण...

आता

मोबाईल फोन मध्ये हरवलंय...

भयानक दरोडा

हॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.

‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा.

लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’

दरोडेखारांनी ओरडून सांगताच
सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.

याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’
( Mind Changing Concept ) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची
किमया.

त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी
पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला,

‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा
दरोडा आहे, बलात्कार नाही.’

याला म्हणतात व्यावसायिक रहाणे
( Being professional ). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.

दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले.
त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, जो एम.बी.ए. होता 
 तो 6 वी पर्यंत शिकलेल्या
सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला
आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर
सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील.
जरा धीर धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’

याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’
   ( Experience ) असे म्हणतात.

हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.

दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर
सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब
पोलिसांना फोन कर!’

सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70 लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’

याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’
( Swim with the tide ). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.

सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा
दरोडा पडला तर काय मजा येईल!’

याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी बदलणे’
( Changing priority).

कारण ‘पर्सनल
हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.

दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली
की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला.

पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.

कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली.
मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?

खरी मेख काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.

 तो वैतागून म्हणाला, ‘आपण
जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण.
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले.

पण
त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80
लाख डॉलर्स लाटले.

खरे आहे माणसाने शिकले पाहिजे.नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षित दरोडेखोर’ व्हायला पाहिजे,’

याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच ‘नॉलेज’
( Knowledge) ज्याची किंमत
सोन्यापेक्षाही जास्त असते.

तुमचे सोने नाणे
लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.     
संशयाची हद्द झाली राव.....
.
.
.
नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... .
.
.
.
यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!! 😜😜😜😜😜😜

डॉक्टरसुद्धा अत्रंगी पोहोचलेला (पुण्याचा).....

म्हणाला.... "तीलाच तर बायपास केली आहे आता !!"
एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी
.
गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले.
.
बाई येऊन उभी राहिली कोर्टात.
.
दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.
.
वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का ?
.
”बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना..
.
ओळखते कि...
.
तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस,
.
पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या..
.
थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘
.
खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिकल्या..
.
सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं,
.
गाव सोड बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी..
.
माहितीये मला सगळं..”
.
वकील सुन्न…. काय बोलणार..??
.
चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू...
.
असा विचार करून दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले,
.
"ताई तू यांना पण ओळखत असशील?"
.
दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “
.
अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना ?
.
बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता,
.
कालिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ?
.
आन चार वर्षाचं कालेज सातवर्ष करीत होता...
.
म्हणले, लई नाद याला पोरींचा,
.
तुह्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..?
.
”सगळ्या कोर्टात हशा माजला…
.
जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"
.
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले..
.
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले...
.
कि,तुम्ही ह्या जज ला ओळखता का ?
.
तर मी दोघांना बुटानं मारीन...
1) औषधोप४
२) मानसोप४
3) प्रथमोप४

1) समोप४
2) पाहुण४
3) सदवि४
4) दूरवि४

1) सं४
2) वि४
3) आ४
4) प्र४
5) ला४

1) सदा४
2) समा४
3) शिष्टा४
4) भ्रष्टा४
5) अत्या४
6) सुवि४
7) उप४
8) अवि४
9) कुवि४
10) हिंसा४

'चार'ची गाथा… 
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
आहे !

' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.

' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !

यांची टीका ही ' चौफेर ' असते.
यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !

चारचे सामर्थ्य  देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.

' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते.  यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील  ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते ! 

' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !

वर्ण देखील ' चार ' आहेत.  ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.

लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !

जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.

' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही ! 

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!