पुण्यात कित्येकदा इतकी चांगली माणस भेटतात कि विचारावस वाटत ....






तुम्ही मुळचे कुठले.
पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल,

"गधड्या, अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी… कितीतरी लाईक करायचे राहून गेले… ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले… दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या… पण तुला आहे का काही त्याचं?"
आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली....! आज तिचा फोन आला.....
...
.
..
.
.
.
.शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...
.
.
.
स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले
"....
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ....
.
.
.
.
.
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली " माफ करशील ना मला "...
.
.
.
तो म्हणाला
" माफी कसली मागतेसअपराध्यासारखी कर्तव्यपूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......"
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होशील नक्की माझी ".
..
.
.
ऐकून ती म्हणाली "आठवणीतआणि हृदयाच्या कोपर्यात असशील नेहमी".
.
.
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला"
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला
".
.
.
.
आणि म्हणाला






दुसरी शोधली पाहिजे..
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'

     तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..
" साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, 
पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात."

तात्पर्य :-
      लोक सन्मान तुमचा नाही तर,  तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.

!! कडू आहे पण सत्य आहे !!
कधी कधी वाटतं हे नाव , पैसा , प्रसिद्धी सगळं सोडून संन्यास घ्यावा...
:
:
:
:
मग वाटतं आधी हे सगळं मिळू तर दे ..
गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं.

असे होऊ नये म्हणून फार पुर्वी शहाणी माणसे गाढवांना जोडीजोडीने बांधत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बांधत. गाढवं जागची हलत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात.

असे म्हणतात की या वरूनच आपल्या पुर्वजांना लग्नाची कल्पना सुचली..