*भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस साल्वादोर अल्वारेन्गा*


अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. 

जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे.

   एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र!


जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५०० किलोहुन अधिक मासळी पकडली. दोघेही खूप खुश होते.


पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. अचानक भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरजोरात पाऊस कोसळू लागला. त्यांनी लगबगीने किनारा गाठायचा प्रयत्न केला. पण वादळामध्ये रस्ताच सापडत नव्हता. जोरदार पावसामुळे किनारा दिसायचा बंद झाला आणि त्यांची बोट खोल समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली. हे वादळ पुढे ५ दिवस तसेच सुरु राहिले.


वादळामुळे बोटीला खूपच मार बसला. बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली, मोटर वाहून गेली. त्यांनी रेडिओवरून स्वतःच्या मालकाशी संपर्क करायचा प्रयत्न केला. पण त्यांचे अचूक स्थान निश्चित न करता आल्यामुळे आणि वादळ दीर्घकाळ टिकल्यामुळे बचाव पथक माघारी परतले. दोन्ही मच्छिमार समुद्रामध्ये बुडून मृत्यू पावले असतील असा समज करून त्यांनी शोधकार्य थांबविले.


बोटीवर असलेले खाद्य अवघ्या काहीच दिवसांत संपले. पावसाचे पाणी साठवून त्यांनी ते प्यायला सुरुवात केली. खूप दिवस पाऊस न पडल्यास त्यांना स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माश्यांचे रक्त पिऊन दिवस ढकलावे लागायचे. ( समुद्राच्या पाण्याचा एक थेंब म्हणजे 0.001 ग्रॅम मीठ. आपले शरीर या  सोडियमला सहन करण्याइतपत सक्षम नसते. मूत्रपिंडावर दबाव येऊन ते निकामी होण्याची शक्यता , मज्जासंस्थेचा नाश, अंतर्गत अवयवांना विषबाधा, निर्जलीकरण अशा अनेक शक्यता असतात त्यामुळे अत्यन्त संकटात सुद्धा हे पाणी माणूस पिऊ शकत नाही ) जोस अल्वारगेन्गा हा एक तरबेज मच्छिमार होता. मासे, कासव आणि समुद्रपक्षी ह्यांना तो अगदी शिताफीने पकडायचा.


तासामागून तास जाऊ लागले, दिवसामागून दिवस जाऊ लागले, महिन्यांमागून महिने सरू लागले पण त्याना किनारा काही सापडत नव्हता. कोणतीही बोट किंवा विमान पण दृष्टीपथात पडत नव्हते आणि जरी पडले तरी सगळी उपकरणे खराब झाल्यामुळे संपर्क करता येत नव्हता. एव्हाना दोघांनाही कळून चुकले होते कि आता परत घरी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. या अथांग समुद्रामध्येच भरकटत असताना एखाद्या दिवशी मृत्यू कवटाळेल अशी अगतिक परिस्थिती निर्माण झालेली होती


जोस स्वतःला दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचा पण कॉर्डोबा मात्र निराशेच्या गर्तेत लोटला जात होता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होत होता. ४ महिने समुद्रामध्ये अडकून पडल्यामुळे आणि रोज रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला आणि त्याने खाणेपिणे सोडून दिले. काही दिवसांमध्ये त्याचा भुक आणि निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला.


आपल्या सहकाऱ्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला जबर मानसिक धक्का बसला. त्याने कॉर्डोबाचा मृतदेह ५-६ दिवस तसाच ठेवला. काय करावे त्याला सुचेना. त्याच्या मनात पण आता आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याने मनाशी काही तरी दृढनिश्चय केला आणि सहकाऱ्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला.


पुढे अजून ७ - ८ महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता. तब्बल ४३८ दिवसानंतर त्याला पहिल्यांदा आशेचे किरण दिसू लागले. समोरच मार्शल बेटाचा किनारा दिसत होता. लगबगीने तो किनाऱ्यावर पोचला आणि तेथील एका झोपडीचे दार ठोठावले. झोपडीतील माणसांना सुरुवातीला तो जे सांगत होता त्यावर विश्वास बसेना. पण नंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली.


मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क 9650 किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता. 


अश्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारगेन्गाने भरकटलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये सर्वांत जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम केला आणि जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे पण सिद्ध केले.


     आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये मश्गुल असल्याने जीवन मरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा कविता आणि मनोरंजनाचा विषय किंवा फारतर चित्रपटाचा विषय असू शकतो. त्यामुळे साधे-साधे अडचणीचे प्रसंगसुद्धा आपण अत्यन्त आक्रस्ताळेपणाने किंवा चीडचीड करत हाताळतो. सहज आणि संघर्षरहित जीवनाची इतकी सवय आपण स्वतःला लावून घेतली आहे की घरात भाजीपाला नसेल , किराण्यातला एखादी वस्तू सम्पली असेल तरी आपण कासावीस होतो. कोरोना सारख्या संकटाने घरात बंदिस्त झालेले अनेक आत्मे लहानसहान गोष्टींसाठी तळमळतांना पाहिलं की अशा गोष्टींची आठवण होते.

स्त्रोत: गूगल : The Incredible story of Alvarenga- Who Survived 438 Days Adrift In The Pacific.

 Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .

लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .


एक डॉक्टर म्हणाले " याला  काय झालं असेल हो ? "


डॉक्टर १ :left knee arthritis  ."


डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ".


डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ."


डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे  lower motor neurons बिघडले असणार ."


डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .


डॉक्टर ६.............काही बोलणार....


 तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,

.

.

.

.


 *इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय*?????        

 आजची मीडिया देखील आशेच अंदाज लावत बसते

 काल कटिंग सलूनच्या  दुकानावर एक पाटी वाचली.. ..


"आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू "..🤣


इलेक्ट्रिकच्या  दुकान वाल्याने फलकावर लिहिलं होतं.....


"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣


चहाच्या टपरीवर असा फलक होता...


"मी  साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो."

🤣


एका उपाहारगृहाच्या  फलकावर वेगळाच मजकूर होता  ..


"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या" 😀


इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..


"आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा "..

😂


पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..


"पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं, म्हणजे जबडा मोठा उघडा" ..🤣


फळं विकणाऱ्या माणसाने कमालच केली. ..


"तुम्ही फक्त कर्म करा, फळ आम्ही देऊ ".. 🤣


घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता  ..?


"पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा.."

🤣


ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं.....😅


"या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा ..."

🤣

 परवा एक बातमी वाचली : 

*एच डी एफ सी बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही खात्यांची माहिती दुसऱ्यांना दिली*


या बाबतीत मी अगदी निश्चिंत आहे. कारण माझे अकाउंट एस बी आय मध्ये आहे. 


ते पन्नास चकरा मारल्याशिवाय  माझ्या अकाउंट ची माहिती मलाच देत नाहीत तर दुसऱ्याला काय देतील.


😂😂😂😂

नवरा

नवरा  म्हणजे समुद्राचा 

भरभक्कम काठ 

संसारात उभा राहतो

पाय रोवून ताठ      


कितीही येवो प्रपंच्यात

दुःखाच्या लाटा

तो मात्र शोधीत राहतो

सुखाच्या वाटा       


सर्वांच्या कल्याणा करता

पोटतिडकीने बोलत राहतो

न पेलणारं ओझं सुद्धा 

डोक्यावर घेऊन चालत राहतो  


कधी कधी बायकोलाही

त्याचं दुःख कळत नसतं

आतल्या आत त्याचं मन 

मशाली सारखं जळत असतं  


नवरा आपल्या दुःखाचं 

कधीच प्रदर्शन मांडत नाही 

खूप काही बोलावसं वाटतं

पण कुणाला सांगत नाही   


बायकोचं मन हळवं आहे

याची नवऱ्याला जाणीव असते 

दुःख समजून न घेण्याची 

अनेक बायकात उणीव असते  


सारं काही कळत असून

नवऱ्याला अपमान गिळावे लागतात 

वेदनांना काळजात दाबून

पुन्हा कष्ट उपसावे लागतात    


सगळ्यांच्या आवडी जपता जपता 

मन मारीत जगत असतो 

बायको , पोरं खूष होताच

तो सुखी होत असतो  


इकडे आड तिकडे विहीर 

तशीच बायको आणि आई 

वाट्टेल तसा त्रास देतात 

कुणालाच माया येत नाही 


त्याने थोडी हौसमौज केली तर

धुसफूस धुसफूस करू नका

नवऱ्या विरुद्ध विनाकारण

दारू गोळा भरू नका  


दोस्ता जवळ आपलं मन

त्यालाही मोकळं करावं वाटतं

हातात हात घेऊन कधी

जोर जोरात रडावं वाटतं 


समजू नका नवरा म्हणजे

नर्मदेचा गोटा आहे

पुरुषाला काळीज नसतं

हा सिद्धांत खोटा आहे  


मी म्हणून टिकले इथं

दुसरी पळून गेली असती

बायकोनं विनाकारण

नवऱ्याला धमकी दिलेली असती 


घरात तुमचं लक्षच नाही

हा एक उगीच आरोप असतो

बाहेर डरकाळ्या फोडणारा

घरी म्यांव म्यांव करीत बसतो 


सारख्या सारख्या किरकिरीनं

त्याचं डोकं बधिर होतं

तडका फडकी बाहेर जाण्यास

खूप खूप अधीर होतं  


घरी जायचं असं म्हणताच

त्याच्या पोटात गोळा येतो

घरात जाऊन बसल्या बसल्या

तोंडात आपोआप बोळा येतो 


नवरा म्हणा , वडील म्हणा

कधी कुणाला कळतात का ?

त्यांच्या साठी कधी तरी 

कुणाची आसवं गळतात का ?  


पेला भर पाणी सुद्धा

चटकन कुणी देत नाही 

कितीही पाय दुखले तरी 

मनावर कुणी घेत नाही  


वेदनांना कुशीत घेऊन 

ओठ शिउन ' तो ' पडून राहतो 

सर्वांच्या सुखासाठी 

एकतारी भजन गातो  


बायको आणि मुलांनी 

या संताला समजून घ्यावं

फार काही नकोय त्याला 

दोन थेंब सुख द्यावं    


मग बघा लढण्यासाठी

त्याला किती बळ येतं

नवऱ्याचं मोठेपण हे 

किती जणांच्या लक्षात येतं ? 

चुलीवरची स्कॉच

 चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा,

चुलीवरची कोंबडी, चुलीवरचीभाकरी,चुलीवरचं अमुक, चुलीवरचं तमुक वगैरे वगैरे, बरीच क्रेझ आहे हल्ली चुलीवरच्या पदार्थांची... 

असंच पुण्यात एक बोर्ड वाचला.. 

*"चुलीवरची स्कॉच मिळेल"*

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

हौसेने मित्रांसह आत गेलो तर हरामखोर *हातभट्टीची* विकत होता...🥴


😂😂😛😛😂😂

 डॉक्टर मनकवडे: अहो, तुमचा मुलगा माती खातो यात गंभीरपणे विचार करण्यासारखं आणि माझ्यासारख्या मानोचिकित्सकाकडून उपचार करून घेण्यासारखं काहीही नाही. अगदी सर्वसाधारण मुलांसारखा आहे तो असं मला वाटतं.

बाबुराव: पण डॉक्टर, हे नॉर्मल नाही असं मला तरी वाटतं आणि त्याच्या बायकोचंही तेच मत आहे