व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !!


1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!!


2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !! 


3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!

 कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !!

म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !!


4) जाळायला काही नसलं तर पेटलेली 

 काडीसुद्धा आपोआप विझते .... !!


5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब 

 लागला नाही की मग त्रास होतो .... !!


6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , 

कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !!


7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !!


8) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी 

 घाबरलेला असतो , बरा झाल्यावर

 शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो .... !!


9) घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते .... !!


10) माणूस अपयशाला भीत नाही .अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ....? याची त्याला भीती वाटते .... !!


11) बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण .... !!


12) कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे . ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे . 


13) पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते .... !!


14) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात !! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा .... !!


15) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही , पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .... !!


16) आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो .


17) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो . पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !!


18) संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला .... !!


19) ''अंत " आणि '' एकांत " ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो .... !!


20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं .... !! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस .... !!


21) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते . सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते .... !!


22) सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो .... !!


23) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस .... !!


24) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते .... !!


25) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या

 गरजेपेक्षा कमी घेणं .... !!


26) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले .... !!


27) अत्यंत महागडी , न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे " आयुष्य " ..... !!


28) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती ,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती .... !!


29) आपण किती पैसा मिळवला यापेक्षा , तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले , हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो .... !! ..... !!

 A forward...


आजकाल *देवांची* व *देवस्थानांची* अवस्था सुद्धा *डॉक्टरांसारखीच* झालीय,


म्हणजे *गावातला देव* किंवा *मंदीर* म्हणजे *BHMS* किंवा *BAMS* डॉक्टर.

किरकोळ सर्दी, पडसं, थंडीताप, छोटे मोठ्या तक्रारी अडचणी असतील तर या डॉक्टर कडे जायचे.


जरा *मध्यम आजार* असेल तर *अष्टविनायक,* *गणपती पुळे,* *पावस,* *चाफळ* वगैरे ठिकाणी गेलं म्हणजे कसं *MBBS* वाल्याकडं गेल्यासारख वाटतं.


 जरा *कडक आजार* असेल तर *मांढरदेवी,* *जेजूरी,* *पाली,* *शनी शिंगणापुर* असे जरा *प्रयोगशील डॉक्टरर्स,* डिग्री मोठी नसताना पण धाडसानं प्रँक्टीस करणाऱ्या डॉक्टरां सारखेच.


*शिर्डी,* *सिद्धीविनायक,*

*दगडूशेठ,* *लालबाग,*  म्हणजे *MS,* *MD.* थोडा खर्च जादा पण *स्पेशालिस्टकडे* गेल्यासारखा अनुभव येतो.


*तिरूपती,* *अमरनाथ,* *वैष्णवीदेवी,** म्हणजे *फॉरेन रिटर्न डॉक्टरच!* हे शक्यतो पैसेेवाल्यांचे डॉक्टर. पैसा कितीही गेला तरी चालेल पण गुण एकदम झकास आला पाहिजे. सगळे आजार बिजार एकदम गायबच झाले पाहिजेत. इथे सामान्य पेशंटना सहजासहजी प्रवेश नाही.


आणि एकीकडे


*पंढरीचा पांडूरंग* म्हणजे आपला *सरकारी डॉक्टर,*

कमी पैशात सगळ्या गोरगरीबांची दुखणी बरी करणार. कधीही जावा, कधीही उठवा, रागावणार नाही का आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करू असली भानगड नाही. पैसे द्या अथवा देवू नका, दारात येईल त्याच्यावर औषधोपचार करणार...

🙏🏻🌞शुभ सकाळ🌞🙏🏻

   🌹🙏आजची गोड सुरवात 🙏🌹


🌹🙏जय सदा आनंद 🙏🌹

        


अती कोपता कार्य जाते  लयाला, 

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।


अती लोभ आणी जना नित्य लाज,

अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।


अती मोह हा दु:ख शोकास मूळ, 

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।


अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,

अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।


अती दान तेही प्रपंचात छिद्र, 

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।


अती भोजने रोग येतो घराला, 

उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।


अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, 

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।


अती आळशी वाचुनी प्रेतरूप, 

अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।


अती द्रव्यही जोडते पापरास, 

अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।


अती भाषणे वीटती बुद्धिवंत, 

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।


अती वाद घेता दुरावेल सत्य, 

अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।


अती औषधे वाढवितात रोग, 

उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।


अती दाट वस्तीत नाना उपाधी, 

अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।


अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, 

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।


अती भूषणे मार्ग तो संकटाचा, 

अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।


स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, 

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।


अती भांडणे नाश तो यादवांचा, 

हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।। 


अती गोड खाणे नसे रोज इष्ट, 

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।


जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, 

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।


सदा पद्य घोकोनियां शीण येतो, 

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।


🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹 

 *मराठी माणूस "मागे"*

*असण्याची २२ कारणे...*


मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले *'संशोधन'* व *"निरीक्षणाअंती २२ कारणे* दिसून आली, जी *मराठी माणसांनी "स्वतःला" विचारावीत व त्यावर "स्वतःच" उपाय योजना* करावी. ह्या बाबी *प्रत्येक मराठी माणूस 'सकारात्मकतेने'* घेईल हिच अपेक्षा...! (वाद नको.! कारण, *'नाहक वादविवाद'* मराठी माणूसचं घालतो..!!)


*हिच ती २२ कारणे : -*


१) *कमी प्रवास -* प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.


२) *अति राजकारण -* मराठी समाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का ? 


३) *दोनच हाथ कमवणारे -* सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे. 


४) *सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला -* कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.


५) *खोटं बोल पण रेटून बोल -* सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते.


६) *आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष -* आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, देशी व थातुरमातुर उपचार केले जातात.


७) *आर्थिक निरक्षरता -* पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते. 


८) *दूरदृष्टीचा अभाव -* पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात. 


९) *ऐतिहासिक स्वप्नात -* अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. तेव्हा सत्य परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे. 


१०) *गृहकलह, कोर्टकचेरी -* गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.


११) *समाज अर्थपुरवठा पद्धत -*  नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही. 


१२) *जनरेशन गॅप -* खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही. 


१३) *ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट -* प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार.... व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो. 


१४) *धरसोड वृत्ती -* हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी... कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती... अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.


१५) *कष्टाची लाज -* विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरात कामं करण्यास लाजं वाटते. 


१६) *फालतू बाबींना महत्व -* एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला... पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे. 


१७) *दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद -* भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची  नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात... अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे *"आश्चर्य"...!!!*  मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे...!!! 


१८) *इंग्रजी कच्चे -* मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. 


१९) *संवादकौशल्याचा अभ्यास -* जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.


२०) *चाकोरी मोडत नाही -* अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी - पंचायत - ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.


२१) *जाती प्रथा -* (फालतू प्रथा) जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म - पंथ - जात - पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. 


२२) *वेळेची किंमत -* वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.


*हिच आहेत मराठी माणूसं मागे असण्याची २२ कारणे...!

 1)  मंथरा सारख्या शुल्लक दासीने कैकयी चे कान भरले,आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात जावे लागले.

२)  वनवासात असतांना मारिच नावाच्या राक्षसाने घेतलेल्या सुवर्णमृगाच्या" आकर्षणास सीता माता बळी पडतात आणि श्रीरामास त्याच्या शिकारीस पाठवतात

3)  साधुच्या वेशात आलेला रावण, सीतेला लक्षमण रेषा पार करायला भाग पाडतो, आणि तिचे अपहरण करतो

४)  आणि सर्वात कहर  म्हणजे, एका गणू नावाच्या सामान्य नागरिकाच्या वक्तव्याने व्यथित होऊन, *"लोक काय म्हणतील"* या भावनेने श्रीराम *परत* आपल्या प्राणप्रिय सीतेचा त्याग करतात

५)  अंतिमतः स्वतःचे पावित्र्य सिध्द करण्यासाठी सीतामाता धरणीभंग करून त्यात स्वतःला झोकून देते, तर पुढे तिच्या विरहाने प्रभू रामचंद्र नदी मध्ये प्राणत्याग करतात.


 *लोकांच्या नादी लागून देवाची ही दशा होऊ शकते, तर आपणा सामान्यांची काय गत होत असेल.  ?  ? ?* 


*आयुष्य एकदाच मिळते, आपल्या आयुष्यातील मंथरा मारिच रावण आणि गणू ओळखायला शिका*,


 *गैरसमज पुर्वग्रह व अनठायीभिती  टाळुन मोकळा संवाद साधा हीच जगण्याची खरी रीत.😊*

 *प्रगल्भता म्हणजे काय ?*

(MATURITY)


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.      


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.    


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.  


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता. 


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.   


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.


प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.   


आणि शेवटी अती महत्वाचे 


*प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.*


🌸 ( संग्रहालयातील)

 काय चूक काय बरोबर......?

=================

काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. 

एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची.

पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात.

लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,.


एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळांचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही......

दुसरी मुलाखत होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची

मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....!


गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत.

तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं आयुष्य कस काय प्रिफर करता ? त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिल ते अस :-


त्या म्हणाल्या, 

समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र बेट असते आणि तुम्ही त्याच्याशी फक्त एकाच ब्रिजद्वारे रिलेट होऊ शकता तो ब्रिज म्हणजे त्यांच्याशी तुमचा भावनिक संवाद.......!

नातं निर्माण होण्यासाठी नेहमीच पैसा उपयोगी पडत नाही तर त्यासाठी गरज असते ती संवेदनशीलता आणि प्रेमळ शब्दांची.

पैशापेक्षा तुम्ही कुणाचं दुःख जेव्हा सहानुभूतीपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची ठरते


मी एका उच्च शिक्षित पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि नंतर समाज सेवेत रुजू झाले. मी समाजातील इतकी दुःख बघितली की माझी पैशा प्रतीची आसक्ती निघून गेली. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाजसेवेतून समाधान मिळत. मला श्रीमंतीच प्रदर्शन करण्याची गरजच वाटत नाही. अशा प्रदर्शनातून काय दाखवायचं आणि कुणाला दाखवायचं आहे ? जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आपल्या हिंदू  धर्मात भगवत गीतेत  आणि गौतम बुद्धांनीही सांगितलं आहे की जग आणि जीव नश्वर आहेत. मग जे नश्वर आहे त्याचा मोह कशासाठी......!


एकीकडे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असणारी एक स्त्री जी त्या श्रीमंतीचं स्टॅंडर्ड मेंटेन करताना लाखोंचा चुराडा सहज करते. 

एकदा घातलेली लाखोंची चप्पल ती पुन्हा वापरतही नाही. आणि दुसरीकडे काही हजारांसाठी देशातील गरीब शेतकरी आणि त्यांचं कुटुंबीय स्वतःच आयुष्य संपवतात. 

एकीकडे एक वेळ जेवून उपासमार सहन करणारा समाज तर दुसरीकडे पैशाचा अक्षरशः अपव्यय करत जगणारी मंडळी.


माननीय श्रीमती सुधा मूर्ती ह्या खरोखरीच आदरणीय आहेत

कारण आज त्यांच्याकडे येणारा प्रत्येक पैसा त्यांची समाज हिताकडे वळवला आहे. त्यांच्यासारखी अनेक मंडळी आहेत जी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणून जगत आहेत.. ....


आपल्याच देशात असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध विचारसरणीच्या स्त्रियांना वाचून मन विचारात पडलं..........!!

क्षणभर काय चूक काय बरोबर हा प्रश्न पडला........!

मग एकच मनात आलं की

माझं उर्वरित आयुष्य श्रीमती सुधा मूर्ती यांच्या सारख जगण्याची बुद्धि दे.

त्यांचे जीवन हे "चरित्र" आहे. ते पाठ्यपुस्तकात "धडा" रुपाने पुढील पिढीला "ज्ञात" होवो हिच अपेक्षा.