जरा पॅलेट सांभाळ हा रंगांचा, सुगंधांचा

 आकाशाचा कॅनव्हास उघडतो आहे मी...

 माणसाचे चित्र पुन्हा एकदा रेखाटून पहा!







 ‘मीर’ नेही पाहिले आहेत तुझे ओठ,

 म्हणून म्हणतो, ‘ही जणू गुलाबाची पाकळीच आहे!’

 बोलणे ऐकले असते तर गालिब झाला असता!

  कुंपणाच्या काटेरी तारांमुळे हवा जखमी होते

 तुझ्या सरहद्दीजवळून जाताना नदी मस्तक टेकते...

 माझा एक दोस्त रावी नदीच्या पल्याड राहतो आहे!

कुणालाही ठावठिकाणा विचारला त्याचा

 तर दरवेळी नवाच पत्ता सांगितला जातो आहे!

 तो बेघर आहे की दिसेल त्या घरात शिरणारा?

ता तर सभ्यता, संस्कृती, कला सारेच वाटून टाकले आपसात

 कुठून कुणी साद घालणार नाही की प्रतिसाद देणार नाही 

सारा अवकाश जणू कात्रीने कापून टाकला आहे आम्ही!

 शेतकऱ्याने चालवला नांगर, जमीनदाराचे झाले शेत

 वाण्याने दुकानातला गल्ला भरला, ती तर ईश्वराची कृपा

 मातीची गादी तर पुन्हा रिती, जिने शेत रुजवले होते!

  चला, आपले बोलणे एकमेकात वाटून घेऊ या

 तुम्ही काही ऐकायचे नाही, मी समजून घ्यायचे नाही!

 दोन अडाण्यांमधला किती हा सुसंस्कृत संवाद!